छोटी रेषा, मोठी रेषा

छोटी रेषा- मोठी रेषा

बऱ्याच वेळी, कुठल्या ना कुठल्या अगदी छोट्याश्या कारणामुळे, मन दुःखी होते, आपल्यासारखे कमनशिबी आपणच, असे वाटू लागते. आपल्याला आपलीच कीव येऊ लागते. त्यासाठी कारण, ज्याला English मध्ये “trigger” म्हणतात, ते, अगदी छोट्यातले छोटे कारण ही पुरेसे होते. अगदी, आपल्याला घरी, रोजच्या वेळी चहा नाही मिळाला, घरातला फॅन बिघडला, आणि मेकॅनिकला फोन करूनही तो वेळेवर आला नाही, आणि त्याच वेळी, सुट्टीचा दिवस असूनही, आपली आवडती मॅच सोडून आपल्याला ते काम करावे लागले, इ. कोणतेही कारण या दुःखी होण्याला पुरेसे होते. आपली कोणालाच पर्वा नाही. आपण किती कष्ट करतो याची कोणाला जाणीव नाही,. इ. इ. एकदा विचारांची गाडी सुरू झाली, आणि तिला जर रोकले नाही, तर ती कुठपर्यंतही भरकटत जाऊ शकते.

ज्या  माणसांना  आयुष्यात सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतात, सगळे व्यवस्थित चाललेले असते, अशांना विशेषतः असे प्रसंग खूप येतात. कारण खरे दुःख काय ते कधी पाहण्याचे, अनुभवण्याचे काम पडलेले नसते. खरे पाहिले  तर आपण जे जीवन आज जगतो, ते कुणाचे तरी स्वप्न असू शकते. कल्पना करा. आपण सकाळीच घरातून बायकोशी भांडून, रागारागाने, नाष्टा न करता, कार घेऊन, ऑफिसला निघालो आहोत. रस्त्याने एक जण हातगाडीवर माल भरून, उन्हाचा चटका असतांनाही, विकायला निघालेला आहे. त्याच्याकडे स्वतःचे घर नाही, भाड्याच्या छोट्याश्या जागेत राहतो आहे, नवरा बायको दोघे काम करतात, लहान दोन छोट्याशा मुलांना शेजारणीच्या हवाली करून निघालेले आहेत. तो जो हातगाडीवाला आहे, तो आपल्याकडे बघतांना, आपल्यासारखे होण्याचे स्वप्न बघत नसेल कशावरून? आपण मस्त एसी गाडीत ऑफिसला चाललो आहोत. एक दिवस आपल्यासारखे घर, गाडी इ. असावे हे त्याचे स्वप्न असू शकते.

लहान मुलें कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला दाखवायला आणतात आणि आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरतात. त्यांना वाटत असते, की ही गोष्ट, दुसऱ्याच्या डोळ्याच्या जितक्या जवळ नेऊ, तितकी त्याला चांगली, स्पष्ट दिसेल. पण मग आपण ती गोष्ट, तो कागद, धोड्या अंतरावर धरतो, मग तो कागद किंवा ती गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आयुष्यातही असेच असते. एखाद्या गोष्टीत आपण जितके लिप्त होतो, एकरूप होतो, तितके आपले perspective म्हणजे योग्यपणे जाणून घेण्याची क्षमता कमी होते, आणि आपण त्या बाबतीत स्वतःकडे अलिप्तपणे बघू शकत नाही. जेंव्हा त्या गोष्टीत आणि आपल्यात थोडे अंतर ठेवून पाहण्याची जाण येते, त्यावेळी कुठलीही गोष्ट, म्हणजेच वस्तू, व्यक्ति, परिस्थिती आपल्याला एवढी व्याकुळ नाही करू शकत.

या बाबतीत एक गोष्ट वाचण्यात आली. आपण एखाद्या वेळी क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होतो, अशावेळी ही गोष्ट आठवून बघावी.

एकदा एक राजकुमार आणि त्याचे 5-7 मित्र घोड्यावरून असेच फिरायला निघाले होते. रस्त्याने काही गुजर स्त्रिया दूध, दही, ताक इत्यादीची विक्री करायला निघाल्या होत्या.

राजकुमाराला भगवान श्रीकृष्णासारखे गोपींची छेड काढण्याची लहर आली. त्याने विचार केला यांचे मटके फोडू, आणि नंतर यांना त्याचे पैसे देऊन देऊ! आणि त्याने गमती गमतीत त्या गुजर स्त्रियांचे मटके, दगड मारून, फोडले. त्या स्त्रिया रडू लागल्या.

पण त्यातील एक गुजरी अशी होती, की जिचे मडके फुटले, दूध दही ताक सांडले, तरी ती काहीच बोलली नाही, उलट हसू लागली.  तेंव्हा राजकुमार तिला म्हणाला, तुला काहीच वाटले नाही का? तू रडत का नाहीस? गुजरी म्हणाली, महाराज, माझी कहाणी फार मोठी आहे. मी ताक सांडल्याचा काय शोक करू? राजकुमारने तिला तिची कहाणी सांगण्याविषयी आग्रह केला, तेंव्हा ती सांगू लागली.

मी अमुक एका शहरातील नगरसेठची पत्नी होते, मला एक छोटेसे मूल होते. सेठ धन कमविण्यासाठी दुसऱ्या प्रदेशात दूर गेले होते. त्या नगराच्या राजाची नीयत खराब होती. माझे सुंदर रूप पाहून राजाची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्याने मला निरोप पाठवला की अमुक दिवशी मला भेटायला ये. तू केंव्हा येशील याचे उत्तर दे. मी त्याला थोडे थांबण्याची विनंती केली, पतीला चिठ्ठी पाठवली आणि त्याला सगळे कळवून लवकर येण्याविषयी सांगितले. पति आला, त्याला सगळा वृत्तान्त सांगितला, मग आम्ही दोघांनी मिळून विचार केला, की काय करावे? पतीने सांगितले, तू राजाला वेळ दे. मी राजाला वेळ देऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले, पण ही अट घातली की त्याच्या आसपास मैलभर कोणीही नसावे. राजा तयार झाला. आम्ही दोघे पति पत्नी घरून निघालो. मी तलवार घेऊन निघाले. पति त्या जागेपासून जवळच एका पडक्या घरात लपून बसला. राजा आला, तेंव्हा मी मोठी हिम्मत करून, राजाला तलवारीने मारून टाकले, आणि धावत पतीजवळ गेले. पाहते तर तेथे पतीला विषारी सापाने दंश केला होता, आणि तो तिथे मरून पडला होता. मग मी एकटीच तिथून पळाले, कारण सापडले असते, तर मला लोकांनी मारून टाकले असते. मूल माझे, घरीच राहिले.

पुढे पळता पळता जंगल लागले, तिथे डाकू भेटले, त्यांनी मला पकडले. माझे सगळे दागिने ओरबाडून घेतले, आणि मला एका वेश्येच्या घरी नेऊन विकून टाकले. आता मी तिथे राहू लागले. तिकडे आमच्या गावात दुसरा राजा झाला. त्याने माझ्या मुलाचा सांभाळ करून त्याला मोठे केले. तो माझा मुलगा मोठा होऊन तिथेच नोकरी करू लागला. इकडे वेश्यान्च्या संगतीत राहून मीही तेच काम करू लागले. एके दिवशी माझा मुलगा माझ्याकडे आला, आणि रात्रभर राहिला. मला नंतर शंका आली म्हणून सकाळी मी त्याला ओळख विचारली, तेंव्हा त्याने नांव पत्ता सांगितला, तेंव्हा कळाले की हा माझाच मुलगा! मला स्वतःची अत्यंत किळस आली, दुःख झाले, की मी कोण होते आणि कुसंगतीने काय झाले. पंडित लोकांना विचारले की असे पाप झाले, तर काय करावे. त्यांनी सांगितले, चिता पेटव आणि त्या आगीत जाऊन बैस. मनात विचार अला, की चिता पेटवली आणि त्यात जाऊन बसले, तर नंतर अस्थि गंगेत कोण टाकेल? म्हणून गंगा किनाऱ्यावर जाऊन, लाकडे एकत्र करून, चिता रचून त्यावर बसले आणि ती पेटवली. लाकडे जळू लागली. इतक्यात गंगेला पूर आला. आग विझली, मी बेशुद्ध झाले, आणि एका लाकडाच्या ओंडक्यासोबत वाहत वाहत दूर एका गावाच्या किनाऱ्यावर जाऊन पोंचले. त्या गावात गुज्जर लोकांची वस्ती होती.  त्यांनी मला वाचवले, आणि माझ्यावर उपचार केले आणि नंतर त्यांनीच माझा सांभाळ केला. आता या गुज्जर लोकांचे दही दूध ताक विकून आपला उदर निर्वाह करते.!

आता तूच सांग राजा, मटका फुटून ताक सांडले, तर त्याचा काय शोक करू?

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

 

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

तसेच आपले न जाणो याआधी किती जन्म झाले आहेत, आणि प्रत्येक जन्मात काय काय दशा झाली आहे.. हे सगळे कितीदा मिळाले आणि कितीदा गेले. यापुढे छोट्याश्या गोष्टींची काय आणि किती चिंता करायची!

 

 

 

 

 

 

 

Go to our Amazon Shop to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

   यही कथा हिन्दी में 

अब छाछ को सोच कहा कर है!

 

एक राजकुमार था| उसके पाँच-सात मित्र घोड़ों पर घूम रहे थे| वहाँ बहुत-सी गूजर-स्त्रियाँ दूध, छाछ, दही आदि की बिक्री करने को जा रहीं थीं|

 

राजकुमार को भगवान् श्रीकृष्ण की याद आ गयी कि वे दूध-दही लूटा करते थे तो हम भी आज वैसा ही करें| एक तमाशा कर लें, फिर उनको दाम दे देंगे| राजकुमार और उसके साथियों ने उनके मटके फोड़ दिये| गूजरियाँ बेचारी रोने लगीं|

 

उनमें से एक गूजरी ऐसी थी, जिसका मटका फूट गया, छाछ बिखर गयी, फिर भी वह हँस रही थी! राजकुमार ने उससे पूछा कि तू रोयी नहीं, क्या बात है? उसने कहा कि महाराज! मेरी बात बहुत लम्बी है! मैं छाछ गिरने का क्या शोक करूँ? राजकुमार ने उससे कहा कि अपनी बात सुनाओ| वह कहने लगी-

 

मैं अमुक शहर के एक सेठ की पत्नी थी और मेरी गोद में एक बालक था| वे सेठ कमाने के लिये दूसरे देश में चले गये| वहाँ के राजा की नियत खराब थी| मेरी छोटी अवस्था थी और सुन्दर रूप था| राजा ने मेरे पर खराब दृष्टि कर ली और कहा कि अमुक दिन तेरे को आकर मिलना ही पड़ेगा, तुम कब आओगी, जवाब दो| मैंने कहा कि अभी ठहरो| मैंने अपने पति को पत्र भेजा कि जल्दी आओ, मेरे पर ऐसी आफत आयी है| पति आ गया| उससे सारी बात कही और आपस में सलाह की कि क्या किया जाय? सेठ ने कहा तुम राजा को समय दे दो| मैंने राजा के पास समाचार भेज दिया कि आप शहर के बाहर अमुक जगह रात में आ जाओ, पर शर्त यह है कि उस स्थान के मिल भर नजदीक में कोई अन्य व्यक्ति न रहे| राजा ने स्वीकार कर लिया| हम दोनों पति-पत्नी घर से निकल गये कारण कि यहाँ टिक नहीं सकेंगे| मैं रात्रि में वहाँ तलवार लेकर गयी| पति को एक टूटे-फूटे मकान (खँडहर)-में छिपने के लिये कह दिया| जब राजा आया तो मैंने तलवार से उसको मार दिया और भागकर पति के पास गयी| वहाँ जाने पर मैंने पति को मरा हुआ पाया! उसको जहरीले साँप ने काट लिया था| फिर तो मैं अकेली वहाँ से भागी कि अगर पकड़ी गयी तो लोग मेरे को मार देंगे| लड़का पीछे छूट गया|

 

आगे भागते हुए जंगल आ गया तो वहाँ डाकू मिल गये| उन लोगों ने मेरे को पकड़ लिया, मेरे सब गहने छीन लिये और वैश्या के घर ले जाकर बिक्री कर दिया| अब मैं वहाँ रहने लगी| उधर दूसरा राजा बैठा तो उसने मेरे लड़के को पालकर बड़ा किया| मेरा लड़का वहीं राज्य में नौकरी करने लगा| इधर वेश्याओं के संग के प्रभाव से मैं भी वैश्या हो गयी| एक बार वह लड़का मेरे यहाँ आया और रातभर रहा| मेरे को वहम हो गया कि यह कौन है? सुबह होते ही पूछा तो उसने अपना नाम पता बताया, तब पता लगा कि अरे! यह तो मेरा ही बेटा है! मेरे को बड़ी ग्लानि, बड़ा दुःख हुआ कि मैं क्या थी और कुसंग के प्रभाव से क्या हो गयी! पण्डितों से पूछा कि ऐसा पाप किसी से हो जाय तो क्या करे? उन्होंने बताया कि चिता जलाकर आग में बैठ जाय| विचार आया कि चिता में बैठ जाऊँगी तो पीछे से गंगा जी में फूल कौन डालेगा? इसलिये गंगा के किनारे लकड़ियाँ इकट्ठी करके बैठ गयी और आग लगा दी| लकड़ियाँ जलने लगीं| इतने में पीछे से बाढ़ आ गयी| आग बूझ गयी और एक लकड़ी पर बैठ-बैठ एक गाँव-के किनारे पहुँच गयी| उस गाँव में गूजर बसते थे| अब वहाँ उनकी चीज बिक्री करके काम चलाती हूँ| आज छाछ लेकर आयी थी| छाछ गिर गयी तो अब इसकी चिन्ता क्या करूँ?

 

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

 

जीवन में ऐसी घटनाएँ घटी है, क्या-क्या दशा हुई है, अब थोड़े-से नुकसान में क्या चिन्ता करूँ? ऐसी बातें तो होती रहती हैं और बीतती रहती हैं| अब छाछ गिर गयी तो क्या हो गया! हमारे न जाने कितने जन्म हुए हैं और उनमें क्या-क्या दशा हुई है! उनमें कभी बेटा मर गया, कभी पति मर गया, कभी पत्नी मर गयी| कभी धन आया, कभी धन चला गया| ये सब कई बार मिले और कई बार बिछुड़े| हवा चलती है तो कहाँ-कहाँ का फूस आकर इकट्ठा हो जाता है और दूसरे झोंके में अलग हो जाता है| इसमें नयी बात क्या हो गयी! संसार में सब आने-जाने वाले हैं| इनके लिये क्या चिन्ता करें?

 

 

 

 

 

Leave a Comment