https://goodworld.in A website by Madhav Bhope

तेजस्वी बुद्धी Divine Wisdom

gayatri mantra-1

 Divine Wisdom

ईश्वर शरण बुद्धि

चरकसंहिता हा आयुर्वेदाचा संस्कृत भाषेतील एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. याचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक महर्षि चरक आहेत. एकदा महर्षि पुनर्वसु आपला हा अद्वितीय ग्रंथ निर्माण केल्यानंतर एका जंगलातून चालले होते. घनदाट जंगलातील पायवाटेवर, ते चालले होते आणि त्यांच्या मागे त्यांचा शिष्य अग्निवेश. चालता चालता एकदम पुनर्वसु थांबले. त्यांनी आकाशाकडे पाहिले, चारी दिशांना पाहिले, आणि एक सुस्कारा सोडून म्हणाले, “ महानाश होणार आहे.”

अग्निवेशांनी विचारले, “कसा महानाश, गुरुवर्य?”

पुनर्वसु म्हणाले, “ पृथ्वी दूषित होत आहे, पाणी दूषित होत आहे, वायु, तारे, आकाश, सूर्य, चंद्र, सगळे बिघडत आहेत. येणाऱ्या काळात, अन्नधान्य आपले गुण सोडून देईल, औषधी वनस्पति आपला प्रभाव सोडून देतील, पृथ्वीवर तुटणारे तारे येऊन आदळतील, विनाशकारी तूफान आणि भूकंप येईल, महानाशाचे तांडव होईल! मनुष्य वाचणार नाही!”

ही कथा चरक ‘विमान’ स्थानाच्या तिसऱ्या अध्यायात येते. त्यात पुढे असे सांगितले आहे, की अग्निवेशांनी जेंव्हा ही भयानक भविष्यवाणी ऐकली, तेंव्हा हात जोडून त्यांनी विचारले, “ गुरुदेव!, तुम्ही  अशी भयभीत करणारी भविष्यवाणी का बरें करीत आहात? सगळ्या रोगांचे उपाय सांगणारा असा ग्रंथ आपण लिहिलात. तरी हा असा विनाश येईल असे आपण का म्हणतात?”

महर्षि पुनर्वसु म्हणाले, “ ते मी यामुळे म्हणतो कारण की येणाऱ्या काळात लोक धर्म सोडून अधर्माच्या रस्त्याला लागतील, सत्य सोडून असत्याच्या मार्गाला लागतील. सत्य आणि धर्म यांमध्ये त्यांची रुचि राहणार नाही.”

अग्निवेशांनी विचारले, “ सत्य आणि धर्म यांमध्ये लोकांची रुचि न राहण्यामागे काय कारण असेल गुरुदेव?”

गुरुदेव म्हणाले, “ बुद्धिचे बिघडणे हेच या महानाशाचे कारण असेल. जेंव्हा बुद्धि बिघडते, तेंव्हा ती सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर चालते, आणि तिची धर्मामध्ये रुचि राहत नाही.”

प्रज्ञापराधो मूलं सर्व रोगाणाम्|

बुद्धीच्या बिघडण्याने सर्व रोग होतात. पण बुद्धीच्या बिघडण्याने केवळ शारीरिक रोग निर्माण होत नाहीत, तर सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, आत्मिक रोगही निर्माण होतात. म्हणून असे म्हणतात की जेंव्हा विनाशाचा काळ जवळ येतो, तेंव्हा बुद्धि विपरीत होते, “विनाशकाले विपरीत बुद्धि”. देवता जेंव्हा कोणाचा नाश करायचा असतो, तेंव्हा दुसरे तिसरे काही करीत नाहीत, केवळ त्या माणसाची बुद्धि भ्रष्ट करतात. तसेच जेंव्हा कुणाचे रक्षण करायचे असते, तेंव्हा त्यांच्या बुद्धीत अशी प्रेरणा करतात की तो मनुष्य स्वतःच योग्य मार्गावर चालतो.

चाणक्याने म्हटले आहे, की “हे भगवान! जर माझ्या वाईट कर्मांमुळे माझे सर्व काही हरण होणार असेल, तर होऊ दे, पण केवळ माझी बुद्धि शाबूत माझ्याजवळ राहू दे.”

सामवेदात असेच वर्णन केले आहे. सामवेदाच्या 101 व्या  मंत्रात भक्तीचे वर्णन केले आहे, आणि म्हटले आहे, की भक्ति सफल होईल, तेंव्हा भगवंतांकडे काय मागायचे? तर ‘मेधा’ मागा. मेधा म्हणजे अशी बुद्धि जी मर्यादेत राहायला शिकविते, स्थिर राहते,  विसरत नाही.

जगप्रसिद्ध गायत्री मंत्र सर्वप्रथम ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलाच्या 7 व्या सूक्ताचा 10 वा मंत्र म्हणून आला आहे.(इतर वेदांतही तो आला आहे.)त्यात कुठलीही धन संपत्ति मागितली नाही, तर सविता देवतेला आवाहन केले आहे, प्रार्थना केली आहे , की माझ्या बुद्धीला तुझ्याकडे घेऊन चल.

ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒

भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि। धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥

बादशहा अकबराची गोष्ट

अकबर बिरबलाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या आहेत. बिरबल हा विद्वान ब्राह्मण होता. तो नेहमी ईश्वराचे स्मरण करीत असे. बादशहालाही सांगत असे- ईश्वराचे स्मरण करा. एके दिवशी बादशहा म्हणाला, “बिरबल, तू जो ईश्वर म्हणतोस तो कुठे राहतो? काय करतो? त्याचे दर्शन कसे होऊ शकते?”

बिरबल विचारात गढला. आता या बादशहाला समजेल आणि पटेल अशा भाषेत कसे सांगायचे?  बिरबलाने बादशहाकडून 7 दिवसांचा वेळ मागून घेतला. म्हणाला, सातव्या दिवशी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन. सहा दिवस झाले, बिरबलाला काही उत्तर सुचले नाही. सातव्या दिवशी तो चिंतातुर बसला होता. बिरबलाचा ८ वर्षाचा मुलगा होता. तो बिरबलासारखाच चतुर तर होताच, पण इतक्या लहान वयातही अध्यात्माची त्याला खूप जाण होती, आणि आपले म्हणणे समोरच्याला पटवून देण्याची विलक्षण हातोटी त्याच्यात जन्मजात होती..  त्या त्याच्या मुलाने येऊन विचारले, “ पिताजी, का एवढे चिंतेत बसला आहात?”

बिरबल म्हणाला, “बादशहाने तीन प्रश्न विचारले आहेत. त्यांचे उत्तर काही अजून सापडत नाही.” असे म्हणून बिरबलाने मुलाला ते तीन प्रश्न कोणते तेही सांगितले.

तो छोटासा मुलगा म्हणाला, “इतक्याशा गोष्टीची चिंता करताय? याचे उत्तर तर मी सांगू शकतो”

बिरबल म्हणाला, “सांग बरे?”

मुलगा म्हणाला, “तुम्हाला नाही, बादशहाला सांगेल.”

शेवटी बिरबल मुलाला घेऊन बादशहाकडे गेला आणि म्हणाला, “महाराज, तुमच्या प्रश्नांची उत्तरें हा माझा मुलगा देईल.”

बादशहाने आश्चर्याने त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाला, “काय? हा तुझा छोटासा मुलगा माझ्या प्रश्नांचे उत्तर देईल?”

मग बादशहा त्या मुलाला म्हणाला, “सांग बरें, आमच्या प्रश्नांचे काय उत्तर आहे?”

मुलगा म्हणाला, “बादशहा, तुम्ही भारतात नवीन आले आहात. तुम्हाला भारताची संस्कृति अजून माहिती नाही. भारताची संस्कृति ही आहे की आपल्याकडे कोणी अतिथि आला, तर आधी त्याला खाऊपिऊ घाला, त्याचा सत्कार करा, मग त्याच्याशी बोला.”

बादशहा कौतुकाने म्हणाला, “बरे,  अतिथि महाराज, तुम्ही काय घेणार?”

मुलगा म्हणाला, “महाराज, मी छोटा आहे, त्यामुळे मला दूध आवडते.”

बादशहाने एका चांदीच्या पात्रात दूध मागवले, आणि मुलाला म्हणाला, “घ्यावे महाराज!”

मुलाने ते चांदीचे पात्र हातात घेतले, त्यातील दुधाचे निरीक्षण केले, त्यात आपले बोट बुडवून इकडे तिकडे फिरविले.

बादशहा म्हणाला, “काय करतो आहेस बाळा? दूध पीत का नाहीस?”

बालक म्हणाला, “बादशहा मी ऐकले आहे की दुधात मक्खन (लोणी) असते, पण या दुधात तर लोणी दिसत नाहीये.”

बादशहा हंसून म्हणाला, “ तू अजून बालक  आहेस, बाळा! अरे, या दुधात लोणी आहे. पण ते लोणी जर बघायचे असेल तर त्या दुधात दही  घालून त्याला विरजण लावावे लागते, त्याचे दही झाल्यावर त्याला घुसळावे लागते, खूप जोर लावावा लागतो. तेंव्हा कुठे लोणी वर येते.”

मुलगा म्हणाला, “बादशहा! तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांचे हेच उत्तर आहे. ईश्वर सगळीकडे आहे. या जगाच्या कणाकणात आहे. पण त्याचे दर्शन तेंव्हा होते, जेंव्हा मनाला “ॐ” रूपी दही घालून विरजण लावले जाते, मग धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या रवीने घुसळले जाते, तेंव्हा भक्त आपल्या हृदयात ईश्वराला प्रत्यक्ष, स्पष्टपणे पाहू शकतो.”

बादशहा म्हणाला, “अरे वा! तू माझ्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरें अगदी समाधानकारक दिली आहेस. माझा याबाबतीतला संशय दूर झाला. आता मला सांग की ईश्वर काय करतो?”

मुलगा म्हणाला, “ ही तुम्ही गुरु बनून विचारता आहात, की शिष्य बनून?”

बादशहा म्हणाला, “गुरु म्हणून नाही, मी शिष्य म्हणून विचारतो आहे!”

मुलगा म्हणाला, “अजब शिष्य आहात तुम्ही, महाराज! गुरु खाली उभा आहे, आणि तुम्ही उंच आसनावर बसला आहात!”

वरमून बादशहा खाली उतरला आणि मुलाला सिंहासनावर बसवले. हात जोडून म्हणाला, “आता सांग, ईश्वर काय करतो?”

मुलगा हंसून म्हणाला, ‘ हेच करतो, महाराज, वरच्याला खाली करतो आणि खालच्याला वर करतो!”

आणि ही खरेच नाही काय? मोठ्या मोठ्या लोकांना धुळीला मिळतांना आपण पाहत नाही काय? आणि धुळीत असणाऱ्यांनाही सिंहासनावर बसलेले आपण पाहत नाही काय? सगळे सोडून जातात, सगळ्या आशा समाप्त होतात, तेंव्हा तोच एक ईश्वर मनुष्याच्या बरोबर राहतो. त्याचे रक्षण करतो.

वैदिक धर्माचे प्रचारक, सुप्रसिद्ध आर्यसमाजी महात्मा आनंद स्वामी नांवाचे  सत्पुरुष होऊन गेले,(15 ऑक्टोबर 1882 – 24 ऑक्टोबर 1977)ते गायत्री मंत्राचे प्रचारक होते. त्यांनी ‘गायत्री मंत्राचे महत्त्व’ या विषयावर दिलेल्या  प्रवचनांमधून वरील गोष्टी संकलित केलेल्या आहेत.

 

माधव भोपे 

Shri Guru Dattatreya

datta-4

Shri Guru Dattatreya

दत्त जन्म की कथा

आज 14 दिसंबर, मार्गशीर्ष महीने की पूर्णिमा का दिन, जिसे दत्त जयंती के रूप में मनाया जाता है।
महायोगीश्वर भगवान दत्तात्रेय भगवान विष्णु के अवतार माने जाते हैं। इनका अवतरण मार्गशीर्ष महीने की पूर्णिमा को प्रदोष काल में हुआ।
दत्तात्रेय को भगवान विष्णु के 24 अवतारों में से एक माना गया है। मार्कंडेय पुराण के 9वें और 10वें अध्याय में भगवान दत्तात्रेय के जन्म की कथा बताई गई है।

दत्तात्रेय नाम की कथा
श्रीमद्भागवत में वर्णित है कि महर्षि अत्रि ने पुत्र प्राप्ति की कामना से व्रत किया। तब भगवान विष्णु ने कहा, “दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः” अर्थात “मैंने अपने आपको तुम्हें दे दिया।” भगवान विष्णु अत्रि के पुत्र के रूप में प्रकट हुए और “दत्त” कहलाए। चूंकि वे अत्रि के पुत्र थे, अत: उन्हें “आत्रेय” भी कहा गया। इस प्रकार, उनका नाम “दत्तात्रेय” प्रसिद्ध हुआ।
मार्गशीर्ष पूर्णिमा के दिन मृग नक्षत्र में संध्या के समय दत्तात्रेय का जन्म हुआ, इसलिए इस दिन उनका जन्मोत्सव मनाया जाता है।

दत्तात्रेय के जन्म की कथा
महर्षि अत्रि की पत्नी अनुसूया एक साध्वी और पतिव्रता महिला थीं। वह अपने आश्रम में आने वाले अतिथियों का स्नेह और आदर के साथ स्वागत करती थीं। किसी भी अतिथि को वह भूखा या खाली हाथ नहीं जाने देती थीं। उनके पतिव्रत्य और सेवा भाव के प्रभाव से सूर्यदेव भी उनके सामने शीतल हो जाते और पवन भी उनके समक्ष नम्र हो जाता।
उनके पतिव्रत्य की ख्याति सुनकर नारद मुनि ने यह समाचार ब्रह्मा, विष्णु और महेश की पत्नियों सावित्री, लक्ष्मी और पार्वती को सुनाया। इससे उन देवियों के मन में ईर्ष्या उत्पन्न हुई। उन्होंने अनुसूया की परीक्षा लेने का विचार किया और अपने पतियों से उसका सत्त्व हरण करने का आग्रह किया।

त्रिदेव ब्राह्मण रूप धारण कर महर्षि अत्रि के आश्रम में आए। अनुसूया ने उनका सत्कार किया और भोजन की विनती की। ब्राह्मण रूप में त्रिदेव ने कहा कि उन्हें विवस्त्र होकर भोजन परोसना होगा। अनुसूया ने अपने तपोबल से उनकी पहचान कर ली। उन्होंने अपने पति का स्मरण कर उनकी शक्ति का जल उन ब्राह्मणों पर छिड़का, जिससे वे तीनों शिशु बन गए। अनुसूया ने उनकी इच्छा पूरी की और उन्हें स्तनपान करवाया।
जब महर्षि अत्रि लौटे, तो उन्होंने पूरी घटना सुनी और नारद मुनि को यह बताया। नारद ने यह बात देवियों को बताई। देवियां चिंतित होकर अनुसूया के पास पहुंचीं और क्षमा याचना की। अनुसूया ने अत्रि मुनि के कहने पर उन बालकों पर गंगाजल छिड़का, जिससे वे देव रूप में लौट आए।
त्रिदेव ने प्रसन्न होकर अनुसूया को वरदान दिया कि वे तीनों एक स्वरूप में उनके पुत्र बनेंगे। इस प्रकार, दत्तात्रेय का जन्म हुआ।

दत्तात्रेय का स्वरूप और उनका अर्थ
दत्तात्रेय का प्रिय स्थान उंबर का वृक्ष है। उनका स्वरूप जटाधारी, विभूति लगाए, व्याघ्र चर्म पहने, कंधे पर झोली और साथ में गाय व चार कुत्तों के साथ दिखाया जाता है।

  • गाय पृथ्वी का प्रतीक है या कामधेनु का स्वरूप है।
  • चार कुत्ते चार वेदों का प्रतीक हैं।
  • त्रिशूल तीन गुणों पर विजय का प्रतीक है।
  • सुदर्शन चक्र काल का प्रतीक है।
  • शंख “ॐ” ध्वनि का प्रतीक है।
  • भस्म वैराग्य का प्रतीक है।
  • भिक्षापात्र दान का संदेश देता है।
  • जपमाला नामस्मरण का महत्व बताती है।

दत्तात्रेय का महत्व विभिन्न संप्रदायों में

दत्तात्रेय वारकरी संप्रदाय में भी पूजनीय हैं। श्री ज्ञानदेव और श्री एकनाथ दत्त उपासक थे। आनंद संप्रदाय की गुरु परंपरा दत्तात्रेय से ही प्रारंभ होती है। चैतन्य संप्रदाय की गुरु परंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी-तुकाराम के रूप में है। इस परंपरा के राघव चैतन्य ने दत्त की उपासना की थी। मुस्लिम समाज में इस देवता को “शाह फकीर” के रूप में जाना जाता है। ऐसा माना जाता है कि भक्तों के लिए दत्त प्रभु मलंग वेष  धारण करते हैं। इस कारण दत्त के कई भक्त मुस्लिम समुदाय में भी हैं।

आहार शुद्धि – Proper Diet

proper diet

Proper Diet

आहार शुद्धि

मनुष्याचा जो स्वभाव बनतो, त्यात अनेक कारणें असतात. त्यात आहार हेही एक कारण असते. ‘ जैसा खावे अन्न, वैसा बने मन.’ आहार जितका सात्त्विक असेल तितकी वृत्ति सात्त्विक बनते.

सात्त्विक, राजस आणि तामस आहार म्हणजे काय, हे जर समजून घ्यायचे असेल, तर गीतेमध्ये याबद्दल थोडक्यात पण फार सटीक वर्णन केले आहे. गीतेच्या १७ व्या अध्यायात (श्रद्धात्रय विभाग योग) श्लोक ८ ते १० मध्ये भगवंताने सांगितले आहे-

आयु:सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धना: |
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया: || 8||

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिन: |
आहारा राजसस्येष्टा दु:खशोकामयप्रदा: || 9||

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् |
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् || 10||

सात्त्विक मनुष्यामध्ये विवेक जागृत असतो, त्यामुळे तो आहाराच्या चव किंवा रूप रस गंध यापेक्षा, त्याच्या परिणामाकडे आधी लक्ष देतो. त्यामुळे सात्त्विक आहाराचे वर्णन करतांना भगवंतानेही प्रथम त्याचा परिणाम काय होतो हे वर्णन केले आहे- अर्थात- सात्त्विक आहार हा आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, आणि सुख, संतोष वाढविणारा असतो- आणि नंतर त्याचे वर्णन केले आहे- तो रसपूर्ण, स्निग्ध, स्थिर राहणारा आणि हृदयाला बळ देणारा असतो.

राजस मनुष्यामध्ये भोज्य पदार्थांबद्दल  ‘राग’ (मराठीतील ‘राग-म्हणजे क्रोध- तो नव्हे, तर राग म्हणजे आसक्ति) असतो- म्हणून त्याची दृष्टी सर्वप्रथम भोज्य पदार्थाच्या बाह्य रूप, रस, गंध आणि चव याकडे जाते, उदा.- तिखट तर्रीदार मिसळ, कांद्याचे भजे, खमंग साबुदाणा वडा- इत्यादि यांची चव इत्यादि यांना प्रथम प्राधान्य राहते. अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आनंद घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेणे अशी त्याची दृढ समजूत असते. ‘ये नही खाया तो तूने क्या हासिल किया जिंदगीमें’ अशी वाक्यें आपण सर्रास ऐकतो किंवा वाचतोच. तर भगवंताने राजस आहाराचे वर्णन करतांना आधी त्याची चव, स्पर्श इत्यादींचे वर्णन केले आहे- कटु- (संस्कृत मध्ये कटु म्हणजे तिखट), आम्ल- म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट(उदा. वेगवेगळ्या प्रकारची लोणची), अत्युष्ण- म्हणजे अतिशय गरम गरम, तीक्ष्ण- म्हणजे जिभेला झोंबणारे, रुक्ष (उदा. चिवडा, भेळ इत्यादि) आणि विदाहिनः म्हणजे दाह उत्पन्नकरणारे- झणझणीत-अशा प्रकारचा आहार हा राजस व्यक्तिला प्रिय असतो- 

  आणि या आहाराचे वर्णन करून झाल्यावर मग त्याचे परिणाम वर्णन केले आहेत, जशी राजस स्वभावाची व्यक्ति आधी असा जिभेला पाणी आणणारा आहार दिसताच त्यावर तुटून पडते, आणि नंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात, त्याचे परिणाम म्हणजे- दु:खशोकामयप्रदा: असा आहार खातांना जरी प्रिय लागला, तरी त्याचा परिणाम हा भविष्यात- दुःख, शोक आणि ‘आमय’ म्हणजे रोग यामध्ये होतो.

तामस मनुष्यामध्ये मोह म्हणजे मूढता असते. त्यामुळे तो मोहपूर्वक भोजन करतो. म्हणून तामस आहाराच्या वर्णनात केवळ तामस पदार्थांचे वर्णन आले आहे, परिणामाचे वर्णन आले नाही-

यात-यामम् – याम या संस्कृत शब्दाचा अर्थ तीन तासांचा अवधि असा होतो. यात-यामम् म्हणजे जे अन्न शिजवून तीन तासांच्या वर अवधि उलटून गेलेला आहे. आपण सकाळचे करून ठेवलेले पदार्थ संध्याकाळी खातो, किंवा रात्रीचे पदार्थ सकाळी फोडणी देऊन वगैरे खातो-(अन्न वाया कसे घालवायचे(?) या सदराखाली) ते सर्व या श्रेणीत मोडतात. (याबद्दल नंतर कधी सविस्तर लिहिले जाईल)

गत-रसम् – स्वादरहित, पूति – दुर्गंधयुक्त, पर्युषितम् – म्हणजे शिळे, एक रात्र उलटून गेलेले, खराब झालेले, उच्छिष्टम् – दुसऱ्यांचे उष्टे, अमेध्यम् म्हणजे अशुद्ध, अपवित्र- (आपण हॉटेल मध्ये अत्यंत चवीने खात असलेले अन्न यातील कुठल्या कुठल्या प्रकारात मोडते हे आपले आपण तपासून पहावे)

अशा प्रकारे गीतेमध्ये भगवंतांनी तीन प्रकारच्या आहाराचे वर्णन केले आहे.

याशिवाय भगवंताने अनेक ठिकाणी आहारा संबंधी उल्लेख केला आहे

अध्याय 4-

अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति |
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ||4- 30||

इथे नियत म्हणजे मोजका आहार असे वर्णन केले आहे.

अध्याय 6

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत: |
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन || 16||

जे लोक खूप जास्त किंवा खूप कमी खातात, खूप झोपतात किंवा झोपतच नाही अथवा कमी झोपतात त्यांना ‘योग’ साध्य होऊ शकत नाही.[ या श्लोकाचे अनेक प्रकारचे अर्थ लोक लावू शकतात आणि आपल्या वागण्याचे समर्थन करू शकतात- पण तो एक वेगळाच विषय आहे].

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥17॥

 जे लोक योग्य तेवढाच आहार घेतात- ना कमी ना जास्त, योग्य तितकेच झोपतात- थोडक्यात म्हणजे मर्यादेत सगळ्या गोष्टी करतात त्यांना विनासायास योग साध्य होऊ शकतो.

आता वरील विवेचनावरून अजून कितीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात- स्वामी रामसुखदासजींनी त्यांच्या गीता दर्पण या पुस्तकात अतिशय समर्पकपणे अशा प्रश्नांची उत्तरें दिली आहेत. खाली  आपण अशा काही शंकांची  चर्चा करणार आहोत.

आहार शुद्धि-2

याआधी आपण मनुष्याचा स्वभाव बनण्यास ‘आहार’ हे एक मुख्य कारण असल्याचे पाहिले, आणि गीतेमध्ये आहाराबद्दल काय सांगितले आहे ते थोडक्यात पाहिले, तसेच सात्त्विक, राजस आणि तामस आहार यांची थोडक्यात माहिती घेतली.

पण सात्त्विक आहार पण प्रमाणाबाहेर घेतल्यास काय होते? गीतेमध्ये सगळ्याच गोष्टींबद्दल मध्यम मार्गाचे समर्थन केले आहे- ना अति कमी, ना अति जास्त. सात्त्विक मनुष्याने सुद्धा सात्त्विक आहार, काही कारणामुळे-जसे की त्याच्या चवीबद्दल त्याच्या मनात तात्पुरता का होईना, पण मोह निर्माण झाला, आणि ते अधिक मात्रेत घेतले, तर तो राजस आहार होईल, ज्याचा परिणाम रोगामध्ये होईल. आणि अधिक लोभात येऊन त्याने तेच सात्त्विक भोजन अत्यधिक प्रमाणात सेवन केले, तर तोच आहार तामस होईल, ज्याचा परिणाम निद्रा आणि आळस यांच्यात होईल.  याउलट राजस मनुष्याने राजस भोजनही कमी प्रमाणात घेतले तर त्याचा परिणाम राजस (रोग, दुःख इ.) न होता सात्त्विक भोजनाप्रमाणे होईल. हीच गोष्ट तामस आहारालाही लागू होईल.

आहाराचे पदार्थ सात्विक असूनही जर ते न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचे नसतील, निषिद्ध मार्गाने मिळविलेल्या पैशांचे असतील, तर असा आहार, सात्त्विक असूनही काही ना काही राजसी किंवा तामसी वृत्ति निर्माण करेल. त्यामुळे आहार सात्त्विक असावा, सच्च्या कमाईचा असावा, पवित्रतापूर्वक बनवलेला असावा, आणि भगवंताला अर्पण करून, शांतिपूर्वक थोड्या प्रमाणात ग्रहण करावा, जेणेकरून त्याचा अतिशय चांगला परिणाम होईल.

राजस आहार न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचा असला, तरी, अशा आहाराचा शरीरावर तात्काळ होणारा जो परिणाम आहे, रोग उत्पत्ति इ . तो तर होईलच, पण हा आहार न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचा असल्याने असा परिणाम जास्त वेळ टिकणार नाही आणि राजस वृत्ति जास्त वेळ राहणार नाही.

तसेच तामस भोजन सच्च्या कमाईचे असले तरी, तामस वृत्ति, जसे की आळस, निद्रा इत्यादि तर होतीलच. पण ते कमी प्रमाणात होईल.

कोणत्याही वर्ण, आश्रम, संप्रदायाचा मनुष्य असला, तरी तो जर परमार्थ मार्गात लागला असेल, साधन करीत असेल, तर त्याची रुचि स्वाभाविक रित्याच सात्विक आहारात राहील, राजस किंवा तामस आहारात राहणार नाही.

प्रश्न: आयुर्वेद आणि धर्मशास्त्रात विरोध का आहे? जसे की आयुर्वेदात अरिष्ट, आसव, मदिरा, मांस इत्यादींची योजना औषध रूपात केलेली आढळते, जेंव्हा की धर्मशास्त्र याचा निषेध करते, असे का?

उत्तर: शास्त्रें चार प्रकारची आहेत- नीतिशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, धर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र.  नीतिशास्त्रामध्ये धन, संपत्ति, वैभव इत्यादि प्राप्त करण्या विषयी माहिती आलेली आहे. नीतिशास्त्रात कूटनीतिचे ही वर्णन येते, ज्यामध्ये दुसऱ्यांशी छल कपट करण्याचे मार्गही सांगितले आहेत, जे की ग्राह्य नाहीत. आयुर्वेदशास्त्रामध्ये शरीराची मुख्यता आहे, त्यामुळे त्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात, ज्यामुळे शरीर ठीक राहील. या गोष्टी काही वेळेस पडतात. धर्मशास्त्रामध्ये सुखभोगाची मुख्यता आहे, त्यामुळे त्याच्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात, ज्यामुळे इहलोक आणि परलोक दोनहीमध्ये सुख मिळेल. मोक्षशास्त्रात जिवाच्या कल्याणाची मुख्यता आहे, त्यामुळे,  त्याच्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्यामुळे जीवाचे कल्याण होईल. धर्मशास्त्राच्या विरुद्ध मोक्षशास्त्रात धर्मशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी येत नाहीत. त्याच्यात सकाम भावाचे वर्णन येते, पण त्याचे महत्त्व नाही सांगितले, उलट त्याची निंदाच केलेली आहे. कारण की साधकात जोपर्यंत सकाम भाव राहतो, तो पर्यन्त परमात्मप्राप्तिमध्ये उशीर लागतो.

आयुर्वेद आणि धर्मशास्त्र, दोन्ही प्रकृतीच्या राज्यातील आहेत.

लोकांमध्ये साधारण अशी भावना बनलेली दिसते की औषध रूपात मांस इ. अशुद्ध पदार्थ खाण्यात काही दोष नाही. पण असे तेच लोक  असतात, ज्यांच्यात केवळ शरीर ठीक ठेवणे, सुख आराम मिळविणे, हाच मुख्य उद्देश असतो.

प्रश्न: शरीर राहील तर मनुष्य साधन भजन करेल- त्यामुळे अभक्ष्य भक्षण केल्याने शरीर नीट राहत असेल तर त्यात काय हरकत आहे?

उत्तर: अभक्ष्य भक्षण केल्याने शरीर कायम राहील, मृत्यू टळेल असे नाही. आयुष्य बाकी असेल तर शरीर राहील. शरीराचे राहणे किंवा न राहणे ही प्रारब्धाच्या अधीन आहे. अभक्ष्य भक्षणाने मृत्यू टळू शकत नाही, केवळ शरीर थोडे पुष्ट होऊ शकते.

मनुष्य साधन भजन करण्याचा केवळ बहाणा बनवतो, खरे तर शरीरात मोह आसक्ती असल्याने तो अशुद्ध गोष्टींचे सेवन करतो.

वरील विवेचन ही स्वामी रामसुखदासजी यांच्या गीता दर्पण नांवाच्या पुस्तकावर आधारित आहे.

माधव भोपे 

Gita Jayanti and Mokshada Ekadashi गीता जयंती 2024 आणि मोक्षदा एकादशी

margashirsha

गीता जयंती 

आज दि. 11 डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती अशी मान्यता आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य आपल्याला नवीन सांगायला नको.

श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य अगाध आणि असीम आहे. हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयींमध्ये मानला जातो. मानवजातीच्या उद्धाराचे तीन राजमार्ग प्रस्थानत्रय या नांवाने सांगितले जातात.

त्यापैकी ‘उपनिषद्’ हा वैदिक मार्ग आहे. दुसरा ब्रह्मसूत्र हा दार्शनिक मार्ग आहे, आणि भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे (म्हणजे श्रुति आणि स्मृति यांना अनुसरणारा),असे म्हटले जाते.

उपनिषदांमध्ये ‘मंत्र’ आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये ‘सूत्रें’ आहेत आणि गीतेमध्ये ‘श्लोक’ आहेत. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंतांची ‘वाणी’ असल्यामुळे, ते मंत्रच आहेत.  ह्या श्लोकांमध्ये अत्यंत गहन अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना ‘सूत्रें’ ही म्हटले जाते. उपनिषद् ‘अधिकारी’ मनुष्यांच्या उपयोगाचे आहे, ब्रह्मसूत्र ‘विद्वानांच्या’ उपयोगाचे आहे, परंतु भगवद्गीतेतील ज्ञान हे सर्वांच्या उपयोगाचे आहे.

भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे. साधक कोणत्याही देशाचा, भाषेचा, धर्माचा, विचाराचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधन सामग्री या ग्रंथात आहे.

कारण की, गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुति केलेली नाही, तर वास्तविक तत्त्वाचेच वर्णन केलेले आहे. वास्तविक तत्त्व तेच आहे, की जे परिवर्तनशील, प्रकृति आणि प्रकृतिजन्य पदार्थांपासून सर्वथैव अतीत, आणि संपूर्ण देश, काल, वस्तु, व्यक्ति, परिस्थिति, इत्यादींमध्ये नित्य, निरंतर एकरस आणि एकरूप राहणारे आहे. जो मनुष्य ज्या ठिकाणी आणि जसा आहे, त्या ठिकाणी आणि तसेच, वास्तविक तत्त्व पूर्ण विज्ञमान आहे. परंतु परिवर्तनशील असलेल्या वस्तु, व्यक्ति मध्ये ‘राग’ आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही. संपूर्णपणे रागद्वेषरहित झाल्यानंतर त्याचा स्वाभाविकच अनुभव येतो.

 

गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत, विस्तारपूर्वक समजावण्याबाबत एकेका साधनाचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही. आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत परमात्व तत्त्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्येही आपले कल्याण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहूनही परमात्त्व प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकविली आहे. त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकेल असा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही.

 

स्वामी रामसुखदासजी सांगतात- गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण, अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाव स्फुरण पावतात. याचे मनःपूर्वक पठण केल्यास परम शांती मिळते. ह्याचा एक विधी असा आहे की, प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासहित पाठ करावेत, नंतर एकांतात बसून गीतेच्या “यत्र योगेश्वर कृष्ण” या शेवटच्या श्लोकापासून “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तकावाचून उलटा पाठ केल्यास परम शांती मिळते. गीतेचा दररोज एक वेळा किंवा अनेक वेळा पूर्ण पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करताच तिचे निरसन होते. वास्तविक या ग्रंथाचे माहात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही.

 

आज गीताजयंतीच्या दिवशी, भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करून, गीतेतील जितके जमतील तितके अध्याय वाचल्यास नक्कीच हा दिवस सार्थकी लावल्यासारखे होईल.

मोक्षदा एकादशी

आजच्या या एकादशीला मोक्षदा एकादशीही म्हणतात. प्राचीन काळी वैखानस नांवाचा राजा गोकुळावर राज्य करीत होता. त्याला एकदा स्वप्नामध्ये त्याचे वडील मृत्यूनंतर अतिशय कष्ट भोगत असल्याचे दिसले. त्यावरून त्याने राजपुरोहिताचा सल्ला घेतला, राजपुरोहिताने त्याला पर्वत नांवाच्या ऋषींकडे पाठविले. त्यांनी त्यांच्या ज्ञानाने जाणून राजाला सांगितले की त्याचे वडील त्यांच्या काही पापाचरणाने नरकात कष्ट भोगत आहेत. त्यावर उपाय म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे, जिचे नांव मोक्षदा एकादशी आहे, तिचे व्रत करून तिचे पुण्य आपल्या वडिलांना द्यावे, जेणेकरून ते त्यांच्या पापातून मुक्त होतील. राजाने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मोक्षदा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य आपल्या वडिलांना दिल्यावर ते मुक्त झाले अशी कथा आहे. मोक्षदा एकादशीला आपल्या पितरांसाठी तर्पण करावे असे सांगितले आहे.

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!!

 

LIC Bima Sakhi Yojna-एल.आय.सी ची बीमा सखी योजना

LIC-Bima-Sakhi-Yojana

बीमा सखी योजना- 18 ते 70 वयोगटातील महिलांना एलआयसी एजंट बनण्याची सुवर्णसंधी- सोबत महिना 7000 रूपये स्टायपेण्ड!

दि. 9 डिसेंबर च्या वर्तमानपत्रात “बीमा सखी योजना” या नांवाची, LIC India(भारतीय जीवन बीमा  निगम)ची एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली. या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी हरियानातील पानिपत या शहरी केल्याचे वाचण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात याबद्दल त्या दिवशी LIC तर्फे देण्यात आलेली जाहिरातही वाचण्यात आली.

कुतूहलाने त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्यातील एका वैशिष्ट्याने लक्ष वेधून घेतले- ते म्हणजे यासाठी 18 ते 70 वयापर्यंतच्या, कमीत कमी 10 वी पास असलेल्या महिला पात्र आहेत. LIC अशा प्रकारे 2 लाख महिलांना एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणार आहे असे म्हटले आहे. त्यासाठी निवडलेल्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा रु. 7000 चा स्टायपेण्ड देण्यात आहे- म्हणजे वर्षाचा रु. 84000- दुसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 6000- म्हणजे वर्षाचा रु. 72000 आणि तिसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 5000-म्हणजे वर्षाचा रु. 60000- असा 3 वर्षांचा एकूण रु. 2,16,000 स्टायपेण्ड देण्यात येणार असल्याचे लिहिले आहे- आणि हा 3 वर्षांचा कालावधी हा प्रशिक्षण काळ राहील असे सांगितले आहे. या कालावधीच्या पूर्ततेनंतर संबंधित महिलांना LIC Agent म्हणून काम करता येणार आहे( LIC चे कर्मचारी नव्हे), आणि त्यातील ग्रॅजुएट असलेल्यांना विकास अधिकारी (Development Officer) म्हणून काम करण्याचीही संधी मिळू शकते असे लिहिले आहे.

अजून या योजनेचे पूर्ण तपशील कळू शकले नाहीत. जसे की- या कालावधीत कसे प्रशिक्षण दिले जाईल? आणि कुठे? तसेच LIC च्या संबंधित वेबसाइट वर वरील स्टायपेण्डच्या समोर वर्षभरात 24 पॉलिसीज- म्हणजे साधारण महिन्याला 2 पॉलिसीज कराव्या लागतील असा उल्लेख आहे. त्यामुळे अशा पॉलिसीज जर पूर्ण नाही होऊ शकल्या तर काय, याबद्दल उल्लेख नाही. मात्र केलेल्या पॉलिसीज वर कमिशन वेगळे मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या महिलांना अशा प्रकारच्या कामात रस आहे, थोडे अधिकचे काम करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी यासंदर्भात apply करून बघायला काही हरकत नाही, असे वाटते. आणि त्यासाठी जास्त काहीच कागदपत्र देण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या महितीतील कोणी अशा महिला असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोंचवावी असे वाटते. तसेच  इच्छुक महिलांनी LIC च्या वेबसाइट वर जाऊन apply करावे.

या संदर्भातील सगळे तपशील खाली दिले आहेत.

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, google search वर जाऊन, bima sakhi(इंग्लिश मध्ये) किंवा बीमा सखी (मराठीमध्ये) टाइप करावे. त्यानंतर जे रिजल्ट येतील, त्यात खालील वेबसाइट दिसेल (अगदी पहिल्याच क्रमांकावर नाही, पण वरून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर) https://licindia.in/lic-s-bima-sakhi

त्यावर क्लिक करावे. त्यानंतर खालील स्क्रीन येईल-

 

lic-1 स्क्रीन वर अजून खाली गेल्यानंतर Click here for Bima Sakhi असे एक बटन येईल. त्यावर क्लिक करायचे-lic-3

 

 

त्यांनंतर अर्जाचा खालील स्क्रीन येईल.lic-5

 

त्यात आपली माहिती भरायची. जन्मतारीख टाकतांना ती MM/DD/YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायची आहे, म्हणजे जन्माचा महिना पहिल्यांदा, नंतर जन्मतारीख, आणि नंतर वर्ष. आपल्या मोबाईल नंबरच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. ई -मेल अॅड्रेस असल्यास टाका, नसल्यास ती जागा रिकामी सोडा. त्यानंतरच्या कॉलम मध्ये- Are you related–… इत्यादि मध्ये मात्र No वरती क्लिक करणे आवश्यक आहे- अर्थात त्यासाठी तुम्ही LIC ह्या कुठल्याही एजंट, डेव्ह. ऑफिसर, कर्मचारी, इत्यादींच्या नात्यात येत नसले पाहिजे. 

त्यानंतरच्या कॉलम मध्ये तिथे दिलेला Captcha भरायचा, आणि नंतर सबमिट करायचे.  सबमिट केल्यावर खालील मेसेज येईल- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकेल.

LIC-6 (1)

 

 

 

The importance of Margashirsha- मासानां मार्गशीर्षोहं

margashirsha

The Significance of Margashirsha in Hindu Culture

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।10.35।।

।मैं मासों में मार्गशीर्ष हूँ अंग्रेजी महीनों के अनुसार दिसम्बर और जनवरी के भाग मार्गशीर्ष हैं। भारत में इस मास को पवित्र माना गया है। जलवायु की दृष्टि से भी यह सुखप्रद होता है? क्योंकि इस मास में न वर्षा की आर्द्रता या सांद्रता होती है और न ग्रीष्म ऋतु की उष्णता।मैं ऋतुओं में बसन्त हूँ प्रकृति को सुस्मित करने वाली बसन्त ऋतु मैं हूँ। समस्त सृष्टि की दृश्यावलियों को अपने सतरंगी सन्देश और सुरभित संगीत से हर्ष विभोर करने वाला ऋतुराज पर्वत पुष्पों के परिधान पहनते हैं। भूमि हरितवसना होती है। सरोवर एवं जलाशय उत्फुल्ल कमलों की हंसी से खिलखिला उठते हैं। मैदानों में हरीतिमा के गलीचे बिछ जाते हैं। सभी हृदय किसी उत्सव की उमंग से परिपूर्ण हो जाते हैं। सृष्टि के हर्षातिरेक को राजतिलक करने के लिए चन्द्रिका स्वयं को और अधिक सावधानी से सँवारती है।मुझे न केवल भव्य और दिव्य में ही देखना है और न केवल सुन्दर और आकर्षक में? वरन् हीनतम से हीन में भी मुझे पहचानना है मैं हूँ? जो हूँ सुनो

The month of Margashirsha, often regarded as the most sacred month in the Hindu calendar, holds immense importance both spiritually and practically. Its prominence is explicitly mentioned in the Bhagavad Gita, where Bhagvan Shrikrishna proclaims, “Masanaam Margashirshoham” (Among all months, I am Margashirsha), emphasizing its unparalleled divine essence. This article delves into why this month is revered, its spiritual significance, health benefits aligned with the Indian climate, and the ancient scriptures’ recommendations for an ideal lifestyle during this time.


Margashirsha: The Month of Divinity

Margashirsha corresponds to November–December in the Gregorian calendar. It is considered the ninth month of the lunar Hindu calendar and marks the transition from autumn to winter. This transitional period is a time of renewal, reflection, and devotion.

The declaration in the Bhagavad Gita elevates Margashirsha to a divine status. Bhagvan Shrikrishna’s words highlight its unique sanctity, symbolizing purity, abundance, and the ideal time for spiritual awakening. Hindu traditions associate this month with the manifestation of Lord Vishnu’s qualities, such as compassion, wisdom, and righteousness.


Spiritual Significance of Margashirsha

  1. Devotion and Worship:
    Margashirsha is regarded as the ideal month for spiritual activities such as meditation, chanting, and worship. It is said that prayers and rituals performed during this time yield manifold blessings.

    • Satyanarayan Puja, dedicated to Lord Vishnu, is frequently conducted during this month.
    • Chanting the sacred mantra “Om Namo Bhagavate Vasudevaya” is believed to bring inner peace and connect one with divine consciousness.
  2. Gita Jayanti:
    One of the most significant events of Margashirsha is Gita Jayanti, the day when Bhagavad Gita was revealed by Bhagvan Shrikrishna to Arjuna on the battlefield of Kurukshetra. This day is celebrated with readings of the Gita, discussions, and reflections on its teachings.

  3. Simplicity and Charity:
    Hindu scriptures like the Padma Purana and Skanda Purana emphasize simplicity and acts of charity in Margashirsha. Offering food, clothes, and other essentials to the needy is highly meritorious. The concept of “daan” (charity) during this month is a way to cleanse the soul and cultivate selflessness.

  4. Kartik Ekadashi and Margashirsha Purnima:
    The month is also adorned with significant tithis like Kartik Ekadashi and Margashirsha Purnima, where devotees fast and engage in spiritual practices to attain liberation (moksha).


Health Benefits During Margashirsha

From a health perspective, Margashirsha marks the onset of winter in India, bringing cooler temperatures and a conducive environment for physical and mental rejuvenation. Ancient Ayurvedic texts underscore specific practices to maintain health during this month:

  1. Strengthening Immunity:
    The transition from autumn to winter often challenges the body’s immunity. A diet rich in seasonal produce, such as fresh vegetables, citrus fruits, nuts, and warming spices like turmeric, ginger, and cinnamon, is recommended.

  2. Detoxification:
    Margashirsha is an excellent time for detoxifying the body. Traditional Ayurvedic practices like Panchakarma or simple home remedies such as herbal teas can help cleanse the system.

  3. Sun Salutations and Yoga:
    The crisp morning air during Margashirsha is ideal for outdoor yoga and Surya Namaskar (sun salutations). These practices align the body with the rhythm of nature, enhancing vitality.

  4. Balance and Rest:
    The cooler weather encourages restful sleep and reduces physical fatigue. Embracing nature’s rhythm by waking up early and meditating during Brahma Muhurta (approximately 4:00 AM) is highly beneficial.


Margashirsha and Spiritual Growth

The spiritual essence of Margashirsha lies in its alignment with the cosmic rhythm. The tranquility of the season inspires self-introspection and fosters a deeper connection with the divine.

  1. Meditation and Japa:
    Meditation during this month is particularly effective due to the stillness of the environment. Practicing Japa (repetitive chanting of mantras) enhances focus and invokes divine blessings.

  2. Pilgrimages and Holy Baths:
    Ancient scriptures like the Mahabharata and Garuda Purana recommend pilgrimages to holy sites and ritualistic baths in sacred rivers during Margashirsha. The waters of rivers like the Ganga are believed to hold heightened purifying properties during this month.

  3. Vrat (Fasting):
    Observing fasts on auspicious days like Ekadashi and Purnima is spiritually uplifting. Fasting helps cleanse the body and mind, paving the way for higher spiritual experiences.


Rituals and Practices in Margashirsha

  1. Worship of Tulsi:
    The Tulsi plant holds special significance during this month. Devotees light lamps and offer prayers to Tulsi, seeking her blessings for prosperity and well-being.

  2. Kirtans and Bhajans:
    Singing hymns and participating in kirtans (devotional music sessions) uplift the spirit and create an atmosphere of divine energy.

  3. Simplicity in Living:
    Margashirsha encourages simplicity and moderation. Emphasizing contentment, it advises detachment from materialistic desires and focusing on spiritual fulfillment.

  4. Observing Silence:
    The practice of Mauna Vrata (observing silence) is recommended to cultivate inner peace and enhance spiritual awareness.


Margashirsha in Ancient Hindu Scriptures

  1. Bhagavata Purana:
    The Bhagavata Purana mentions that Margashirsha is the month when spiritual practices yield higher benefits compared to other months.

  2. Skanda Purana:
    This scripture highlights the importance of worshipping Lord Vishnu during Margashirsha, as it is the most auspicious period for seeking His grace.

  3. Padma Purana:
    The Padma Purana encourages acts of kindness and charity, reinforcing the principle of selfless service.


Modern Relevance of Margashirsha

In today’s fast-paced world, the principles associated with Margashirsha offer a much-needed reprieve. Its emphasis on simplicity, introspection, and spiritual growth serves as a reminder to pause and reconnect with one’s inner self. Practicing gratitude, mindfulness, and acts of kindness during this month can significantly improve mental well-being and foster a sense of community.


Conclusion

Margashirsha, the divine month honored by Bhagvan Shrikrishna in the Bhagavad Gita, is a period of immense spiritual, physical, and emotional significance. From its health benefits aligned with the changing climate to its spiritual practices fostering inner peace and divine connection, this month encapsulates the essence of Hindu culture. Embracing the principles of Margashirsha—devotion, simplicity, and mindfulness—not only nurtures the soul but also enriches the quality of life.

Let us honor this sacred month with heartfelt devotion, meaningful actions, and a commitment to spiritual growth, realizing the divine within and around us.