https://goodworld.in A website by Madhav Bhope

Reinvestment-Deposit-Calculator-Is Your Bank Calculating Your Fixed Deposit Interest Correctly? Find Out!

goodworld_reinvestment deposit featured image
reinvestment-deposit-calculator

 

Reinvestment Deposit Interest Calculator: Calculate Exact Bank Maturity Values easily

When you invest in a Fixed Deposit (FD) under a Reinvestment Plan (or Cumulative Scheme), the interest earned isn’t paid out monthly or quarterly. Instead, it gets added back to your principal every quarter, earning you “interest on interest.”

 

However, if you’ve ever tried calculating your maturity amount using standard online compounding calculators, you might have noticed a frustrating mismatch between your bank’s advice slip and online results.

 

Why Standard FD Calculators Give You the Wrong Numbers

Most general FD calculators calculate tenure using decimal years (for example, converting 5 years into 1,827 days and dividing by 365 to get 5.005479 years). While mathematically sound, that is not how Indian banks calculate interest!

 

In Indian banking, reinvestment deposits and premature closure payments are calculated following strict Indian Banks’ Association (IBA) and RBI-aligned guidelines:

 

  1. Completed Quarters: Interest is compounded quarterly for every full quarter or year the deposit has run.
  2. Broken Period Days: Any remaining days after the last completed quarter earn Simple Interest calculated on the newly compounded amount.
Because regular calculators treat every day as compounded, they often overestimate or underestimate your actual maturity payout—sometimes by hundreds or thousands of rupees!

 

How Our Calculator Helps You Countercheck Your Bank

We built this Reinvestment Deposit Interest Calculator to bridge that gap and give you 100% bank-accurate calculations.

 

Whether you are planning a new cumulative FD or verifying a maturity advice slip received from Public or Private sector banks (like SBI, HDFC, ICICI, PNB, or Canara Bank), this tool shows you the exact arithmetic behind your returns.

 

Key Benefits for Depositors:

  • 100% Indian Banking Logic: Uses the exact Completed Quarters + Broken Period Simple Interest methodology used by core banking software (CBS).
  • Standard DD/MM/YYYY Format: Designed specifically for Indian users—no tricky date pickers or inverted month-day formats.
  • Transparent Calculation Breakdown: See step-by-step how much interest was generated during completed quarters versus remaining days.
  • Verify Premature Closures: If you need to break your FD early, input your deposit date and early closure date to cross-check the exact payout amount calculated by your bank branch.

How to Use the Calculator:

  1. Enter your Deposit Date and Payment / Closure Date in DD/MM/YYYY format.
  2. Enter the Deposit Amount (₹) and the annual Interest Rate (%).
  3. Select your bank’s compounding frequency (Quarterly is standard for most Indian reinvestment deposits).
  4. Click Calculate to reveal your exact maturity value, interest earned, and the full mathematical breakdown!
Try the tool below to verify your Fixed Deposit maturity value today!
Reinvestment Deposit Interest Calculator

Reinvestment Deposit Interest Calculator

Calculation Result

Principal Amount
Total Tenure Breakdown
Total Elapsed Days
Interest Amount
Total Maturity Amount

Bank Calculation Breakdown

Note: Interest is calculated per standard Indian banking practices: compound interest for completed quarters, plus simple interest on the compounded amount for any remaining broken days. Calculations do not include premature closure penalties, revised rates, or TDS deductions.

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-(३)* cyber-fraud-3

featured image for cyber fraud-3

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

 

cyber-fraud-3

सायबर फ्रॉड- (३)
 
 
*बँकस्य कथा रम्या:*
*सायबर फ्रॉड..(३)*

माझा गोंधळलेला चेहरा पाहून मला डोळ्यांनं खुणवून माझा हात धरून बावधनकर साहेब मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले..
“साहेब, तुमची नक्की खात्री आहे की हा डिजीएम साहेबांचाच फोन आहे ?”

मी उसळून म्हणालो..
“अरे ! हा काय प्रश्न झाला ? मी बरेच दिवस डिजीएम साहेबांच्या सहवासात राहिलो आहे, त्यांचा आवाज मी चांगलाच ओळखतो. मी खात्रीनं सांगू शकतो की हा नक्की त्यांचाच आवाज आहे. पण.. तुम्ही असं का विचारताय ?”

“कारण मला शंका येतेय की पलीकडून बोलणारी व्यक्ती आपले डिजीएम साहेब नसावेत..”

कसलातरी विचार करीत गंभीर चेहऱ्याने बावधनकर साहेब म्हणाले.

“कशावरून..?” मी विचारलं.

“हा आवाज, ही बोलण्याची पद्धत जरी हुबेहूब आपल्या डिजीएम साहेबां सारखीच असली तरी एका गोष्टीमुळे शंका येतेय. ती म्हणजे.. कितीही चिडले तरी आपले डिजीएम साहेब कधीही आणि कुणालाही अजिबात अशा शिव्या देत नाहीत.. कुणाबद्दल साधे अपशब्दही ते कधी वापरत नाहीत..”

बावधनकर साहेबांनी व्यक्त केलेली शंका तशी अगदी यथार्थ अशीच होती. आमचे रकिब साहेब खूप मृदु हृदयाचे होते. कदाचित आमच्याकडून पैसे पाठविण्यास उशीर झाल्याने ते चिडले असतील आणि तशा उतावीळ, उत्तेजित अवस्थेत त्यांच्या तोंडून ते अपशब्द बाहेर पडले असावेत.

अचानक मला आठवलं..

डिजीएम साहेबांचे व्यवस्थापकीय सचिव (Adm. Sec. to DGM) श्री. अनिल सास्तुरे हे माझे बॅचमेट, माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तर..?

लगेच मी सास्तुरे साहेबांना फोन लावला. सुदैवाने त्यांनी तो पहिल्याच झटक्यात उचलला. दुपारपासून झालेला घटनाक्रम मी त्यांना थोडक्यात सांगितला. त्यावर ते म्हणाले..

“डिजीएम साहेब तर आज सकाळपासून ऑफिसमध्येच आहेत. तरी देखील त्यांनी तुला असा फोन केला होता का ? याबद्दल त्यांनाच विचारून लगेच तुला कळवतो..”

अवघ्या मिनिटाभरातच सास्तुरे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले..

“अरे, डिजीएम साहेबांना मी तुझा किस्सा सांगितला तेव्हा ते खूप मोठ्यानं हसले आणि म्हणाले की कुणीतरी प्रॅक्टिकल जोक केला असावा. ते तर विनोदाने असंही म्हणाले की.. त्या कोटनिसला सांगा की पैसे मागायचेच असते तर मी कमीतकमी दोन तीन लाख रुपये तरी मागितले असते. माझ्या नावाने फक्त चाळीस हजार रुपये मागून त्या जोक करणाऱ्या व्यक्तीने एकप्रकारे अप्रत्यक्षपणे माझी लायकी कमी लेखून माझा अपमानच केला आहे..”

थरथरत्या स्वरातच सास्तुरेंना “थॅन्क्स..!” म्हणून मी कॅशियर कडे धाव घेतली. “सॉरी.. पण आता पैसे पाठवायची गरज नाही आहे..” असं त्याला सांगून ते व्हाउचर आणि चाळीस हजार रुपये परत घेतले आणि सुटकेचा निःश्वास टाकला.!

एव्हाना, सास्तुरे साहेबांनी मला काय सांगितलं असावं याचा बावधनकर साहेबांना अंदाज आलाच होता. ते म्हणाले..

“तुम्हाला त्या नकली डिजीएमचा फोन किती वाजता आला होता ?”
“अं.. ठीक दोन वाजता..!”
“अच्छा..! आणि किती वेळात वैजापूरला पोहोचतो असं त्यांनी सांगितलं..?”
“अर्ध्या तासात..!”
“पहा..! आत्ता साडेतीन होतायेत. म्हणजे तब्बल दीड तास झाला त्याचा फोन येऊन. एवढ्या वेळात तर औरंगाबादहून सुद्धा इथपर्यंत पोहोचता येतं..”
बावधनकर साहेब बोलत असतानाच माझा मोबाईल वाजला. नंबर पाहून मी म्हटलं..
“हा त्या नकली डिजीएम चाच फोन आहे..”
“द्या तो फोन इकडे..! आता मीच बोलतो त्याच्याशी..! मघाशी विनाकारण खूप शिव्या ऐकून घेतल्या त्याच्या.. !!”
असं म्हणून बावधनकर साहेबांनी माझ्याकडून फोन जवळ जवळ हिसकावूनच घेतला.

“नमस्ते साब..! बावधनकर बात कर रहा हूँ..!”
“अरे ! क्या sss बावधनकरजी ? आखिर क्या.. प्रॉब्लेम क्या है जी ? अभी तक उस खाते में पैसे क्यों नहीं जमा हुए ?”
“साब, अभी यहां कनेक्टिव्हिटी का थोड़ा प्रॉब्लेम चल रहा है.. बस कुछ ही देर में सॉल्व्ह हो जाएंगा.. लेकिन सर, आप तो आधे घंटे में यहां आने वाले थे.. क्यों नहीं पहुंचे सर अभी तक ?”
“अरे, रास्ते में हमारी लासूर ब्रँच पड़ती है ना, वहीं पर थोड़ी देर के लिए रुका हूँ..”

“तू वहीं रुक साले sss ! हम पुलिस को लेकर वहीं पर पहुंच रहे है ! खुद को ज्यादा शाणा समझता है क्या ? अभी तुझे तेरी नानी याद दिलाता हूँ.. !!”

बावधनकर साहेबांनी असा काही रुद्रावतार धारण केला की पलीकडच्या त्या नकली डिजीएमने घाबरून फोनच बंद केला. खरं तर त्यांना आणखी खूप शिव्या द्यायच्या होत्या त्या तोतया डिजीएमला.. पण त्याने फोनच कट केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.

त्यानंतर अष्टपुत्रे साहेबांच्या केबिनमध्ये बसून आम्ही त्या तोतया डिजीएमने पाठविलेल्या अकाउंट नंबर बद्दल डिटेल एन्कवायरी केली तेंव्हा समजलं की SBI च्या गाझियाबाद शाखेचं ते खातं कुणा दीपक कुमार चौरसिया नावाच्या व्यक्तीचं होतं. त्या खात्यातील काही अलीकडचे व्यवहार तपासले असता एक धक्कादायक बाब उघड झाली. 

ती अशी की गेल्या काही दिवसात देशाच्या विविध भागातून त्या खात्यात चाळीस चाळीस हजार रुपये जमा झाल्याच्या अनेक नोंदी होत्या. हे पैसे खात्यात जमा होताच लगेच काढून घेण्यात आले होते आणि सध्या त्या खात्यात फक्त मिनिमम बॅलन्स बाकी ठेवण्यात आला होता. म्हणजेच हे एक मोठं रॅकेट होतं आणि देशाच्या विविध राज्यांत ते पसरलेलं होतं. त्यावेळी एटीएम द्वारे एका खात्यातून एका दिवसात जास्तीतजास्त चाळीस हजार रुपयेच काढता येत असल्याने तेवढीच रक्कम सर्वांकडून मागविण्यात आली असावी.

अष्टपुत्रे साहेबांनी मागविलेला चहा पिऊन आणि त्यांचे आभार मानून बँकेत परतलो. केवळ आमचे अकाउंटंट श्री सुनील बावधनकर यांच्या सतर्कतेमुळेच आज फार मोठ्या फसवणुकी पासून मी वाचलो होतो. त्यामुळे त्यांचे शतशः आभार मानले आणि ताबडतोब रिजनल ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर झालेला सर्व प्रकार घातला. तसंच फसवणुकीचा प्रयत्न झाल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी का ? याबद्दल वरिष्ठांना सल्लाही विचारला.

मात्र “प्रत्यक्षात पैशाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याने पोलिसांत तक्रार केल्यास प्रकरणास विनाकारण चुकीची प्रसिद्धी मिळून बँकेची बदनामीच होईल..” असे कारण देत वरिष्ठांनी पोलिसांत तक्रार देण्याची परवानगी दिली नाही. तसंच ही बाब गुप्तच ठेवा आणि झालेल्या प्रकरणाबद्दल गावात किंवा स्टाफमध्ये अजिबात चर्चा करू नका असा वैयक्तिक खाजगी सल्लाही दिला.

ज्या खात्याचा उपयोग करून बसल्या बसल्या केवळ मोबाईल वर बोलून अनेकांची फसवणूक केली जात आहे, “तो” (दीपक कुमार चौरसियाचा) खाते नंबर व “तो”(तोतया डिजीएमचा) मोबाईल नंबर पोलिसांना दिल्यास ते या प्रकरणी सखोल चौकशी करतील आणि गुन्हेगारांना अटक करतील.. परिणामत: भविष्यात होणाऱ्या अनेकांच्या संभाव्य फसवणुकीला आळा घालता येईल, असं मला वाटत होतं. परंतु वरिष्ठांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं मला भाग होतं. त्यामुळे खूप इच्छा असूनही या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नाही.

काही दिवसांनी कानांवर ज्या बातम्या उडत उडत आल्या त्यावरून असं समजलं की गेल्या काही दिवसांत त्या नकली डिजीएमने आमच्या बँकेच्या गंगापूर, कन्नड, अंबड, परतूर, सेलू, गंगाखेड, वसमत, हिंगोली, कळमनुरी अशा अनेक शाखांच्या मॅनेजर्सना असाच फोन करून पैसे पाठवायला सांगितले होते. नेमके किती मॅनेजर्स त्या तोतयाच्या जाळ्यात फसून पैसे घालवून बसले हे जरी खात्रीलायकरित्या समजलं नसलं तरी किमान तीन-चार मॅनेजर्सनी “आपण त्या खात्यावर पैसे पाठवून लुबाडलो गेलो असल्याची” खाजगीत प्रामाणिकपणे कबुली दिल्याची आम्हा अधिकारी वर्गात कुजबुज होती.


या घटनेच्या सुमारे वर्षभरानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांत “बँकेतील उच्च पदस्थांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून बँक कर्मचारी/अधिकाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीस अटक..” या मथळ्याखाली एक विस्तृत बातमी छापून आली. सदर टोळीचे सदस्य वेगवेगळ्या बहाण्यांनी देशभरातील विविध बँकांच्या रिजनल/झोनल कार्यालयात जाऊन कार्यालय प्रमुखांची भेट घ्यायचे व त्यांचा आवाज, बोलण्याची पद्धत इत्यादीचा बारकाईने अभ्यास करायचे. तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील शाखा, अधिकारी/ शाखाधिकाऱ्यांची नावे, त्यांचे फोन नंबर इत्यादी माहिती मिळवून त्याचा उपयोग करून आणि उच्च पदस्थांच्या आवाजाची तंतोतंत नक्कल करून पैशांची मागणी करायचे. सिंडिकेट बँकेच्या सांगली शाखेतील मॅनेजरने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथून टोळीच्या सदस्यांना अटक केली होती.

या घटनेच्या निमित्ताने वाघमारे बाईंची आदर्श शाळा पाहण्यात आली. तेथील परोपकारी, सेवाभावी शिक्षकांपासून प्रेरणा घेऊन वैजापुरातील अनाथ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला सढळ हाताने नियमितपणे वैयक्तिक मदत करण्यास प्रवृत्त झालो. बँकेच्या “SBH विद्या” योजने अंतर्गत दरवर्षी शाळेतील काही गरजू विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा दहावी पर्यंतचा सर्व खर्च बँकेतर्फे करण्याची व्यवस्था करण्यात आली. बँकेच्या “कम्युनिटी वेल्फेअर” योजने अंतर्गत शाळेला वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलर व सिलिंग फॅन्स उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी जवळच्या खेड्यांतून पायी चालत येणाऱ्या शाळेतील गरीब विद्यार्थिनींना बँकेच्या स्टाफ कडून वर्गणी गोळा करून सायकलीही पुरवण्यात आल्या.


कधी कधी वाटतं की त्या दिवशी SBI स्टाफचं लंच टाईमला शिर-खुर्मा खाण्यासाठी बाहेर जाणं आणि उशिरानं येणं, बावधनकर साहेबांनी तोतया डिजीएमचा फोन उचलणं, डिजीएम साहेबांचे सेक्रेटरी श्री. सास्तुरे साहेबांना फोन करून विचारण्याची मला बुद्धी होणं.. हा सारा काय निव्वळ योगायोगच होता ? तसं पाहिलं तर सकाळी फोन द्वारे अशीच फसवणूक झालेल्या वाघमारे बाईंचं बँकेत येणं म्हणजे एक प्रकारे मला मिळालेला सावधगिरीचा इशाराच होता. पण तरी सुद्धा डिजीएम साहेबांचं नुसतं नाव ऐकताच अती-उत्तेजीत होऊन सारासार विचार करण्याची बुद्धीच मी हरवून बसलो होतो.
थोडक्यात काय, तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
कदाचित.. त्या दिवशी शाळेतून परततांना कसलाही अभिमान न बाळगता, अगदी निर्मळ हृदयानं वाघमारे बाईंची मनापासून माफी मागितल्यावर त्यांच्या मनात माझ्याबद्दल ज्या सद्भावना आल्या असतील त्यांच्या प्रभावाने तर माझ्यावर आलेलं संकट टळलं नसेल ना ?

(समाप्त)


अजय कोटणीस 


ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

या आधीचे प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-२

 

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-(2)* cyber-fraud-2

atm-2

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

 

cyber-fraud-2

सायबर फ्रॉड- (२)
 
आमचे डीजीएम श्री. बिजॉय रकीब म्हणजे एक अतिशय निस्पृह, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असं आदर्श व्यक्तिमत्व होतं.
 
मध्यम उंची, सुदृढ देहयष्टी, तुळतुळीत टक्कल आणि मूळचे काश्मिरी असल्याने गोऱ्या गुलाबी कांतीचे असलेले रकिब साहेब कामाच्या बाबतीत जितके कडक, शिस्तप्रिय होते तितकेच व्यक्तिगत जीवनात अत्यंत रसिक, जिंदादिल व साहित्य, सिने-नाट्य, गीत, संगीत प्रेमी होते. 
 
यापूर्वी परभणी रिजनल ऑफिसमध्ये कार्यरत असताना त्यांचा अतिशय निकटचा सहवास लाभला होता. त्यावेळी त्यांची साधी राहणी, समर्पित कार्यनिष्ठा, दिलखुलास वृत्ती व कर्मचाऱ्यांप्रती मैत्रीभाव, हे सारं जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबद्दल मनात खूप आदरभाव होता.
 
असे हे माझे आवडते डिजीएम रकीब साहेब मला त्यांचे पर्सनल काम करण्याबद्दल विचारत होते. मला एक प्रकारे तो माझा सन्मानच वाटला.
 
“बात ऐसी है कि मेरा बेटा जो अभी दिल्ली में पढ़ रहा उसके दोस्त का आज सुबह दिल्ली के पास गाजियाबाद में एक्सीडेंट हुआ है । उसे वहां के अस्पताल में भर्ती कराया गया है और फिलहाल मेरा बेटाही उसकी देखभाल कर रहा है । 
 
अस्पताल के खर्चे के लिए उसे चालीस हजार रूपयोंकी तुरंत जरूरत है । औरंगाबाद से बाहर होने के कारण अभी मै उसकी कोई मदद नहीं कर पा रहा हूँ, इसलिए तुम्हे फोन किया है ।
 
मै तुम्हे एक अकाउंट नंबर देता हूँ.. ये मेरे बेटे के दोस्त का अकाउंट है । उस खाते में अर्जेंटली चालीस हजार रुपया जमा करना है। मेरा बेटा पैसों के लिए वहां एटीएम रूम के बाहर कार्ड लिए खड़ा हुआ है । पैसे खाते में जमा होते ही मुझे कॉल कर के बता देना । आधे घंटे के बाद जब मैं वैजापुर पहुंचूंगा तब तुम्हे चेक दे कर तुम्हारे पैसे लौटा दूंगा ।”
 
एवढं बोलून झाल्यावर मधेच थांबून रकीब साहेब म्हणाले..
“कोटनीसजी sss ! सुन रहे हो ना..?”
“हां सर ! सुन रहा हूँ सर..!!”
क्षणाचाही वेळ न दवडता मी उत्तर दिलं.
 
एकीकडे डिजीएम साहेबांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतांनाच एवढ्या तातडीने चाळीस हजार रुपये कुठून आणावेत ? याचाही मी विचार करीत होतो. महिना अखेर असल्याने माझ्या खात्यात जेमतेम पाचशे रुपयेच शिल्लक होते. बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या खात्यातही यावेळी मोठी रक्कम जमा असण्याची शक्यता जवळपास शून्यच होती.
 
डिजीएम साहेबांचं आपल्या भारी भक्कम, करड्या आवाजात आज्ञावजा सूचना देणं सुरूच होतं.
 
“हां..और एक बात ! ये SBI का खाता है । लेकिन याद रहे, RTGS या NEFT नहीं करना है, क्योंकि उसमें Funds transfer होने में काफी वक्त लग जाता है । SBI की ब्रँच में जाकरही इस अकाउंट में कॅश जमा करना पड़ेगा । समझ में आ गई पूरी बात ? Any doubts ?”
 
“जी नहीं सर! SBI में जा कर इस अकाउंट में चालीस हजार जमा करने है और पैसे Transfer होने पर आपको फोन करके बताना है ।”
 
“एक्झॅक्टली..! व्हेरी गुड ! कम ऑन..! बी क्विक..! अब फोन रक्खो, और पैसे लेकर SBI की तरफ दौड़ पड़ो..! आधे घंटे बाद आपसे मुलाकात होगी तब एक अच्छीसी चाय पिला देना..! In the mean time, I’m waiting for your phone. Don’t forget to call me. मिलते है.. बा sss य, कोटनीसजी..!”
 
फोन ठेवल्या ठेवल्या भिंतीवरील घड्याळाकडे नजर गेली. दोन वाजून दहा मिनिटे झाली होती. बाप रे ! ताबडतोब चाळीस हजार रुपये जमा करून SBI मध्ये जायला हवं. कारण अडीच वाजता त्या बँकेचा लंच टाईम सुरू होईल. लगेच इंटरकॉमवर बोलून अकाउंटंट श्री. सुनील बावधनकर यांना ताबडतोब केबिन मध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना डिजीएम साहेबांच्या फोनबद्दल सांगितलं. कुशाग्र बुद्धीचे बावधनकर साहेब म्हणाले..
 
“साहेब, यावेळी तरी कुणाही स्टाफच्या खात्यात चाळीस हजार रुपये एवढी मोठी रक्कम शिल्लक असणं शक्यच नाही. तेंव्हा आता एकच मार्ग आहे. कुणातरी कस्टमर कडून तात्पुरते पैसे मागून आणणं.. आपल्या बँकेशेजारीच पेट्रोल पंप आहे. रोज दुपारी चार वाजता ते दिवसभराचा गल्ला आपल्या बँकेत जमा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे आत्ता सुद्धा कॅश उपलब्ध असेलच. मी लगेच त्यांना फोन करून चाळीस हजार रुपये इथे मागवून घेतो. त्यांनी पैसे पाठविले की मग आपण SBI मध्ये जाऊ..”
 
बावधनकर साहेबांना वैजापूरला येऊन दोन वर्षं झाली होती. त्यामुळे वैजापूर गावात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. त्यांनी फोन केल्यावर पाचच मिनिटांत पेट्रोल पंप मालकाने चाळीस हजार रुपयांची कॅश बँकेत पाठवली. मात्र ती कॅश म्हणजे पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये, पन्नास रुपये अशा लहान मोठ्या किमतीच्या नोटांची अनेक बंडले होती. एवढी जास्त नोटांची बंडले कदाचित SBI ने स्वीकारलीही नसती. म्हणून हेड कॅशियरकडे ती बंडले सोपवून त्या लहान नोटांच्या बदल्यात दोन हजार रुपयांच्या वीस नोटा एक्सचेंज करून घेतल्या.
 
या सर्व धावपळीत दोन वाजून पंचवीस मिनिटे होऊन गेली होती. तोपर्यंत बँकेच्या जीपच्या ड्रायव्हरने जीप बँके बाहेर काढून सुरू करून ठेवली होती. अक्षरशः धावत पळतच आम्ही जीप मध्ये बसलो आणि ठीक अडीचच्या ठोक्याला SBI मध्ये पोहोचलो.
 
बँकेत शुकशुकाट दिसत होता. हॉलमधील बाकावर बसलेले दोन तीन कस्टमर वगळता काउंटर्सच्या पलीकडे एकही कर्मचारी किंवा अधिकारी दिसत नव्हता. गेटवरील वॉचमनकडे चौकशी केली तेव्हा कुणातरी मुस्लिम कस्टमरच्या निमंत्रणावरून सगळा स्टाफ नुकताच त्याच्याकडे रमझान ईद निमित्त शिर-खुरमा खाण्यासाठी गेल्याचे समजले. सुदैवाने SBI चे मॅनेजर श्री. अष्टपुत्रे व अन्य सर्व अधिकारी हे बावधनकर साहेबांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांनी लगेच अष्टपुत्रे साहेबांना फोन लावून आम्ही अर्जंट कामानिमित्त त्यांच्या ब्रँचमध्ये आल्याचे कळविले तेव्हा ते म्हणाले..
 
“सॉरी..! पण येथील प्रख्यात बिल्डर व आमचे “हाय व्हॅल्यू कस्टमर” श्री. समद खान यांच्याकडे नुकताच शिर-खुर्म्यासाठी आलो आहे. मात्र तुमच्यासाठी येथील कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून अवघ्या पंधरा वीस मिनिटांतच मी बँकेत परत येतोय..”
 
बावधनकर साहेबांचे अष्टपुत्रे साहेबांशी बोलणे चालू असतानाच मला मोबाईल वर एक कॉल आला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलला. पलीकडून डिजिएम साहेबच बोलत होते. किंचित चिडक्या, वैतागलेल्या स्वरात ते म्हणाले..
 
“अरे क्या है भाई कोटनीसजी ? आपने अभी तक खाते में पैसे जमा नहीं करवाए ? उधर से मेरा बेटा मुझे फोन पे फोन किए जा रहा है..! मेडिकल इमर्जन्सी है भाई, मौके की नजाकत को जरा समझो यार.. “
 
“सॉरी सर.. फिलहाल हम SBI में ही आए हुए है..” असं म्हणून मी त्यांना येथील सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर सहज मी त्यांना विचारलं..
“सर, ये आपका नया मोबाईल नंबर है क्या ? क्योंकि मेरे पास आपका जो नंबर सेव्ह है, वो ये नंबर नहीं है..!”
 
त्यावर डिजिएम साहेब म्हणाले..
“अरे नहीं नहीं..! मेरा नंबर वहीँ है जो आपने सेव्ह कर रक्खा है। अभी अभी मेरे उस मोबाइल की चार्जिंग खतम हुई, इसलिए कार ड्रायव्हर के मोबाईल से बात कर रहा हूँ। जब खाते में पैसे जमा हो जाए तब मुझे इस ड्रायव्हर के नंबर पर ही inform करना..!”
 
डिजिएम साहेबांशी बोलणं संपवून, ‘आता अष्टपुत्रे साहेब येईपर्यंत पंधरा वीस मिनिटं कुठे टाईम-पास करावा ?’ याचा विचार करीत असतांनाच मागून कुणा स्त्रीनं “नमस्कार साहेब sss !” असा आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं तर त्या सकाळी बँकेत आलेल्या मुख्याध्यापिका वाघमारे बाई होत्या. त्या म्हणाल्या..
 
“मी या बँकेतून होम लोन आणि पर्सनल लोन घेतलं आहे. काही कारणास्तव या महिन्याचा कर्जाचा हप्ता भरू शकत नाही हे मॅनेजर साहेबांना सांगण्याकरता इथे आले होते. पण ते कुठेतरी बाहेर गेल्यामुळे त्यांच्याशी भेट झाली नाही. तसाही आता बँकेचा लंच टाईम आहे. माझी शाळा बँकेच्या अगदी समोरच आहे. इथे थांबण्यापेक्षा थोड्या वेळासाठी तुम्ही जर माझ्या शाळेत आलात तर मला खूप आनंद होईल. प्ली sss ज सर..!”
 
वाघमारे बाईंचा आग्रह मोडणं माझ्या अगदी जीवावर आलं. तसंही अष्टपुत्रे साहेब पंधरा वीस मिनिटां नंतरच येणार होते.
“ठीक आहे.. फक्त दहा मिनिटांसाठी येतो..”
 
असं म्हणून बावधनकर साहेबांना घेऊन रस्ता ओलांडून वाघमारे बाईंच्या शाळेत गेलो.
 
वाघमारे बाईंनी शाळा छान स्वच्छ व सुंदर ठेवलेली होती. शाळेच्या आवारात आकर्षक फुलझाडं कलात्मकरित्या लावलेली होती. पटांगणाच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या छोट्याशा हौदात कमळावर बसून वीणा वादन करीत असलेल्या सरस्वतीची छोटीशीच पण सुबक अशी मूर्ती होती. शाळेच्या बाहेरील भिंतीवर जागोजागी सुंदर अक्षरात सुविचार लिहिलेले होते. सर्व वर्गात शिक्षक मन लावून शिकवित होते. वर्गातील मुली सुद्धा शांत बसून एकाग्र चित्ताने शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत होत्या. सारं वातावरण एकदम प्रसन्न, आल्हाददायक वाटत होतं.
 
इतक्यात शाळेची मधली सुटी झाली. कसलाही गडबड, गोंधळ वा आरडा ओरड न करता मुलीं वर्गाबाहेर येऊन शाळेच्या पटांगणातील वडाच्या पारावर तसंच ठिकठिकाणी ठेवलेल्या बाकांवर जाऊन बसल्या. वाघमारे बाईंनी आम्हाला टीचर्स रूम मध्ये नेऊन सर्व शिक्षकांचा परिचय करून दिला.
 
त्या शाळेतील सर्वच शिक्षक ध्येयाने झपाटलेले होते. प्रत्येक शिक्षकाने शाळेतील दहा दहा गरीब विद्यार्थिनी दत्तक घेतलेल्या होत्या. त्यांच्या वह्या पुस्तकांचा, युनिफॉर्म, दप्तराचा सर्व खर्च हे सारे शिक्षक स्वतःच्या पगारातून करीत असत. याशिवाय गरीब, होतकरू विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या पालकांशी संवाद साधणं, मुलींना पुढे शिकविण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून प्रोत्साहन देणं, अशी अनेक समाजोपयोगी कामं हे शिक्षक आवडीनें व हिरीरीनं करीत असत. त्या शिक्षकांच्या तोंडून हे सारं ऐकून मी तर भारावूनच गेलो. आपणही यापुढे गरीब व अनाथ विद्यार्थ्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना, वसतिगृहांना सढळ हाताने मदत करायची असा त्याचवेळी मनोमन निर्धार केला.
 
आम्ही शाळेच्या बाहेर निघालो तेव्हा वाघमारे बाई आम्हाला सोडायला शाळेच्या गेट पर्यंत आल्या होत्या. त्यांचा निरोप घेताना मी म्हटलं..
“मॅडम, माफ करा ! आज सकाळी मी तुम्हाला नकळत दुखावलं. खरं म्हणजे त्या झालेल्या प्रकारात तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही तर स्वच्छ, निष्पाप मनानं समोरच्या फसवणाऱ्या व्यक्तीच्या फोनवर विश्वास ठेवला होता. कुणासोबतही असं घडू शकतं. तुम्हीं गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. खरंच, चुकलो मी… सॉरी !”
 
वाघमारे बाईंनी मनमोकळं, मंद सुहास्य करीत हलकेच आपली मान किंचित खाली झुकवली. जणू माझ्या दिलगिरीचा स्वीकार करून त्यांनी मला माफ केलंय असंच मला वाटलं. माझ्या मनावरचं ओझं एकदम नाहीसं झालं आणि प्रफुल्लित मनानं मी SBI कडे जाण्यास निघालो. एवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी नंबर पहिला. तो मघाचाच डिजीएम साहेबांच्या ड्रायव्हरचा फोन नंबर होता.
 
मला एकदम धडकीच भरली. अरे बापरे ! बघता बघता तीन वाजले की..! आपण अजून डिजीएम साहेबांनी सांगितलेल्या खात्यात पैसे जमा केलेलेच नाहीत. डिजीएम साहेब आता नक्कीच मला खूप झापणार.. काय करावं ? फोन उचलावा की नाही ?
माझा चिंताग्रस्त चेहरा पाहून बावधनकर साहेब म्हणाले..
 
“काय झालं साहेब ?”
 
“अहो, डिजीएम साहेबांचा सारखा फोन येतोय. अष्टपुत्रे साहेब तर अजूनही बँकेत परत आलेले नाहीत. आता डिजीएम साहेबांना काय उत्तर देऊ ?”
यापूर्वी झोनल ऑफिसमध्ये काम केलं असल्याने बावधनकरांचाही डिजीएम साहेबांशी परिचय होता. त्यामुळे ते म्हणाले..
“द्या तो फोन इकडे..! मी समजावून सांगतो त्यांना..!”
 
बावधनकर साहेबांनी माझ्याकडून मोबाईल घेऊन तो त्यांच्या कानाला लावताच पलीकडून डिजीएम साहेब कडाडून बरसले..
 
“व्हॉट द हेल यू आर डूइंग देअर सीन्स लास्ट वन अवर कोटनीसजी ? नॉनसेन्स ! एक छोटासा काम करने को कहा था आपको.. ! यू ब्लडी फूल..! अब रहने दो.. मै कोई और इंतजाम कर लेता हूँ..! हॅट या sss र, मैने सोचा था कोटनीस अपना आदमी है, तुरंत काम कर देगा..! बट आय वॉज राँग.. यू लेट मी डाऊन.. यू हॅव डिसहार्टेड मी, शेम ऑन यू..! यू हॅव डिसअपॉइंटेड मी ग्रेटली..”
 
डिजीएम साहेबांच्यां तोफेचा असा प्रचंड भडिमार सुरू असतानाच अष्टपुत्रे साहेब लगबगीनं बँकेत शिरताना बावधनकर साहेबांनी पाहिलं आणि डिजीएम साहेबांना मध्येच थांबवित ते म्हणाले..
 
“सर..सर..सर..! प्लीज सुनिये..! मै अकाउंटंट बावधनकर बात कर रहा हूँ.. अभी अभी SBI के मॅनेजर साब बँक में वापस लौट आए है.. अगले पांच ही मिनट में आपके बताए हुए खाते में पैसे ट्रान्सफर हो जाएंगे.. आप निश्चिंत रहिये..!”
 
बावधनकर साहेबांच्या शब्दांनी जणू जादूच केली. डिजीएम साहेब एकदम शांतच झाले. बावधनकरांचे आभार मानत ते म्हणाले..
“थँक्यू व्हेरी मच, बावधनकर जी ! ठीक है, अब मैं फोन रखता हूँ.. आप जल्दी से काम पूरा कर दो.. !”
 
त्यानंतर आम्ही घाईघाईनं SBI मध्ये पोहोचलो. अष्टपुत्रे साहेबांसोबतच बँकेतील अन्य स्टाफ सुद्धा परत येऊन आपापल्या काउंटरवर जाऊन बसला होता. क्रेडिट व्हाउचर वर गाझियाबाद शाखेतील खात्याचा नंबर टाकून ते व्हाउचर व सोबत आणलेल्या दोन हजाराच्या वीस नोटा मी कॅश काउंटरवर दिल्या. कॅशियरने पैसे मोजले आणि आता तो क्रेडिट व्हाउचर पोस्ट करणार इतक्यात.. अचानक बावधनकर साहेब कॅशियरला म्हणाले..
“थांबा ! आम्ही सांगेपर्यंत ते व्हाउचर पोस्ट करू नका. आलोच आम्ही दोन मिनिटांत..”
 
“ओके..” असं म्हणून आमचं व्हाउचर पोस्ट न करता तो कॅशियर दुसऱ्या कामाकडे वळला.
 
बावधनकर साहेबांना एकाएकी हे काय झालंय..? त्यांनी कॅशियरला व्हाउचर पोस्ट करण्यापासून का रोखलं आहे ? मला काहीच कळेना. पैसे पाठवण्यास उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या डिजीएम साहेबांचा क्रुद्ध चेहरा नजरे समोर आला आणि आयत्या वेळी कामात मोडता घालणाऱ्या बावधनकर साहेबांचा किंचित रागही आला.
 
प्रश्नार्थक चेहऱ्याने मी त्यांच्याकडे पाहिलं..
 
(क्रमशः ३)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

या आधीचे प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१-cyber-fraud-1

atm

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

cyber-fraud-1
*बँकस्य कथा रम्या..*
 (१)*सायबर फ्रॉड-१
 
त्यावेळी मी औरंगाबाद जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद च्या वैजापूर शाखेत शाखाधिकारी म्हणून नुकताच कार्यभार सांभाळला होता.
 
एके दिवशी सकाळी, अगदी बँक उघडल्या उघडल्याच, चष्मा लावलेल्या, सोज्वळ, मृदु, सात्विक चेहऱ्याच्या एका मध्यम वयाच्या सडपातळ बाईंनी घाईघाईत माझ्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत होते. जोरजोरात श्वास घेत आणि कपाळावरील घाम पुसत त्या म्हणाल्या..
 
“साहेब, ताबडतोब माझं खातं बंद करा. नुकतेच कुणीतरी माझ्या खात्यातून तीस हजार रुपये काढून घेतले आहेत. हा पहा, माझ्या मोबाईलवर तसा मेसेजही आला आहे..”
 
हे बोलतांना त्या बाईंना चांगलीच धाप लागली होती. भीतीनं त्यांचा घसाही कोरडा पडल्याचं जाणवत होतं.
 
“हे पहा, तुम्ही अशा घाबरून जाऊ नका. शांत व्हा, आणि आधी इथे खुर्चीवर शांतपणे बसा पाहू..”
 
मी त्या बाईंना धीर देत म्हटलं. हातातली पर्स टेबलावर ठेऊन एक दीर्घ सुस्कारा सोडत त्या बाई खुर्चीवर बसल्या. 
 
मी त्यांच्यासाठी मागवलेलं पाणी त्यांनी आधाशासारखं घटाघटा पिऊन टाकलं. मग डोळ्यावरील चष्मा काढून पदराच्या टोकानं त्याची काच पुसण्याच्या निमित्तानं त्यांनी हळूच आपल्या डोळ्यातील अश्रूही टिपून घेतले. थोडावेळ काही न बोलता त्या स्वस्थ बसल्या. आता त्यांना बरं वाटत असावं असं समजून मी म्हणालो..
“हं.. सांगा आता ! काय घडलंय नेमकं..?”
 
खाली मान घालून रडवेल्या स्वरात त्या बाई म्हणाल्या..
 
“साहेब, माझं नाव ललिता वाघमारे. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मी मुख्याध्यापिका आहे. 
शाळेच्या कामासाठी काल मी औरंगाबादला गेले असता दुपारी तीन वाजता एका व्यक्तीचा मला फोन आला. “मी बँकेतून बचत खात्याचा अधिकारी बोलतो आहे..” असं तो माणूस म्हणाला.
 
त्यानंतर माझं नाव आणि माझा अकाउंट नंबर सांगून तो माणूस म्हणाला की “तुमच्या खात्याचं kyc expire झाल्याने ते खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या खात्यातून आता कोणताही व्यवहार करू शकणार नाही. तुमचं एटीएम कार्ड देखील ब्लॉक करण्यात आल्याने तुम्हाला एटीएम मधून सुद्धा पैसे काढता येणार नाहीत.”
 
एवढं बोलून थोडा दम घेऊन झाल्यावर त्या बाई पुढे म्हणाल्या..
 
“साहेब, योगायोगाने कालच माझे पगाराचे पैसे खात्यात जमा होणार होते. मी नेहमी एटीएम नेच खात्यातील पैसे काढते. त्या माणसाने एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगताच धास्तावून “मग आता मला काय करावं लागेल ?” असं मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला..
“जर तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड घेऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बँकेत आलात तर तुमचं खातं आजच पुन्हा सुरू करता येईल. अन्यथा उद्या शुक्रवार आहे. आणि शुक्रवार-शनिवार या दोन्हीं दिवशी ही कामे करता येत नसल्याने खाते पुन्हा सुरू होण्यासाठी तुम्हाला पुढील सोमवार पर्यंत वाट पहावी लागेल.”
 
मला आता त्या बाईंच्या कथेत इंटरेस्ट यायला लागला होता.
“बरं मग पुढे..?”
उत्सुकतेनं मी विचारलं.
 
“ज्यावेळी मी त्याला सांगितलं की सध्या मी औरंगाबादला असून आज साडेपाच पर्यंत बँकेत येणे शक्य नाही, तेंव्हा तो माणूस म्हणाला की “तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर व एटीएम कार्डचे डिटेल्स सांगा. तसेच एटीएम कार्ड मागील CVV नंबर सुद्धा सांगा. आम्ही इथून खात्याचा ब्लॉक काढल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो आम्हाला कळवा. आम्ही तो ओटीपी कॉम्प्युटर मध्ये फीड केल्यावर तुमचं खातं पुन्हा सुरू होईल.”
एवढं बोलून त्या बाई थांबल्या. सायबर फ्रॉड करणाऱ्यांची ही नेहमीचीच मोडस ऑपरेंडी असल्याने पुढे काय घडलं असावं याचा एव्हाना मला पुरेपूर अंदाज आला होता.
 
“मग..? काय केलंत तुम्ही ? दिली त्या माणसाला सगळी माहिती..?”
खाली मान घालून माझ्या नजरेला नजर न देता हळूच त्या बाई पुटपुटल्या..
 
“हो..!”
 
आणि मग एकदम बळंच अवसान आणीत माझ्याकडे पहात किंचित तक्रारीच्या सुरात त्या म्हणाल्या..
 
“मग काय करणार साहेब ? एटीएम वापरण्याची आता एवढी सवय झाली आहे की एटीएम बंद होणार हे ऐकल्याबरोबर मी घाबरून गेले. शिवाय कालच आमचा पगारही होणार होता. तो ही काढायचा होता. बंद झालेलं एटीएम पुन्हा लगेच चालू झालं नसतं तर पैसे काढण्यासाठी बँकेत येऊन इथल्या गर्दीत तासभर रांगेत उभं रहावं लागलं असतं. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे ताबडतोब बँकेत येणं मला शक्य नव्हतं आणि एटीएम साठी सोमवार पर्यंत थांबण्या इतका मला धीर नव्हता.
 
सुदैवाने माझं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड माझ्या पर्समध्येच होतं. तो माणूस फसवत असेल अशी मला जराही शंका आली नाही. ताबडतोब मी त्याला त्यानं विचारलेली सर्व माहिती दिली आणि थोड्या वेळानं माझ्या मोबाईल वर आलेला ओटीपी नंबरही त्याला सांगितला. एटीएम पुन्हा चालू झाल्याचं त्या माणसाने सांगितलं तेंव्हा त्याला “थॅन्क्स” म्हणून मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. खरं म्हणजे त्याचवेळी मोबाईल वर कोणता तरी मेसेज आल्याचा “नोटिफिकेशन ॲलर्ट साउंड” सुद्धा मी ऐकला, पण मी कामाच्या घाईत होते आणि एटीएम चालू झाल्या बद्दलचाच तो मेसेज असावा असं समजून तेंव्हा तो मेसेज मी पाहिला नाही.”
 
सलग एका दमात एवढं सारं बोलल्यामुळे वाघमारे बाईंचा श्वास फुलून आला होता. क्षणभर थांबून एक दीर्घ उसासा सोडत त्या पुढे म्हणाल्या..
“त्या दिवशी औरंगाबादचं काम संपवून वैजापूरला परतायला रात्र झाली, त्यामुळे आता उद्या सकाळीच एटीएम मधून पगाराची रक्कम काढू असा विचार केला. त्याप्रमाणे आत्ता सकाळी दहा वाजता जेव्हा तुमच्या बँकेशेजारील एटीएम मधून पैसे काढायला गेले तेव्हा “Insufficient balance” असा मेसेज आला म्हणून लगेच “मिनी स्टेटमेंट” काढलं, तर त्यात माझ्या खात्यातून काल तीस हजार रुपये काढल्याचं दिसत होतं. मला एकदम काल बँकेतून आलेला फोन आठवला आणि फसवणुकीची शंका आली. लगेच काल मोबाईलवर आलेला मेसेज काढून पाहिला, तर तो खात्यातून तीस हजार रुपये काढल्याचाच मेसेज होता..”
 
बोलता बोलताच वाघमारे बाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण मघासारखा ते पुसण्याचा अट्टाहास न करता तशाच डबडबलेल्या डोळ्यानं आणि दोन्ही हात जोडून थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या..
 
“साहेब, माझा नवरा दारूडा आहे. काहीच कामकाज करत नाही तो. माझ्या पगारावरच सारं घर चालतं. पीएफ वगैरे कटून कसाबसा जेमतेम तीस हजार रुपये पगार खात्यात जमा होतो. तो साराच्या सारा गेला. कसा काढायचा आता महिना ? देणेकरी तर पैशाकरता जीव नकोसा करतील. बँकांच्या कर्जाचे हप्तेही भरायचे आहेत. दया करा साहेब, हात जोडून विनंती करते, कसंही करून माझे पैसे मला परत मिळवून द्या..”
 
वाघमारे बाईंची ती दयनीय अवस्था बघवत नव्हती. त्यांना धीर देत म्हटलं..
“मॅडम, अशा घाबरून जाऊ नका. आधी तुमचं खातं चेक करतो आणि मग बघतो काय करता येईल ते..”
 
मॅडमचं खातं चेक केलं तेव्हा खरोखरीच खात्यातून काल तीस हजार रुपये काढलेले दिसत होते. लगेच औरंगाबादच्या झोनल ऑफिसमधील एटीएम चॅनेल मॅनेजरशी बोलून त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले..
 
“कस्टमरने ओटीपी स्वतःच्या मर्जीने (Willingly share) कळविला असल्याने बँक refund साठी जबाबदार नाही. तसंच असे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही खूपच कमी असते. मात्र कस्टमरचे खाते तसेच एटीएम कार्ड ब्लॉक करून त्याच्याकडून लेखी तक्रार घेऊन ती आमच्याकडे पाठविल्यास फ्रॉडस्टरच्या खात्यातील पेमेंट रोखण्याचा काहीतरी प्रयत्न करता येईल.”
 
वाघमारे मॅडमना हे सर्व सांगितल्यावर त्या म्हणाल्या..
“एकदा फसवून, खात्यातून पैसे काढून घेतल्यावर आता कसले परत मिळणार आहेत ते पैसे ? मी काही लेखी तक्रार वगैरे करणार नाही. तुम्ही फक्त एवढं करा की माझं हे सेव्हिंग खातं बंद करून टाका आणि दुसरं नवीन खातं उघडा. तसंच जुनं एटीएम कार्ड रद्द करून नवीन कार्ड इश्यु करा..”
 
खूप समजावून सांगून ही वाघमारे बाई ऐकेनात. शेवटी त्याचं खातं बंद करून ताबडतोब नवीन खातं उघडून दिलं आणि नवीन खात्याची एटीएम कार्ड रिक्वेस्टही टाकली. नवीन खात्याचं पासबुक त्यांच्या हातात ठेवत म्हणालो..
 
“हे घ्या मॅडम तुमच्या नवीन खात्याचं पासबुक. हा नवीन खाते नंबर तुमच्या वरिष्ठांना कळवा म्हणजे तुमचा पगार ह्या खात्यात जमा होत जाईल. तसंच आठ दहा दिवसांत तुमचं नवीन एटीएम कार्डही तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. तुम्हाला पैशांची अर्जंट गरज असेल तर आमच्या बँकेकडून तुम्हाला ताबडतोब पन्नास हजार रुपयांपर्यंतचं पर्सनल लोन मिळू शकेल.”
 
पासबुक घेऊन वाघमारे मॅडम खाली मान घालून स्वतःशीच काहीतरी विचार करीत केबिनमध्ये शांत बसल्या असताना मी त्यांना म्हणालो..
 
“मॅडम, आम्ही लेखी मेसेज व ऑडिओ मेसेज द्वारे वारंवार खातेदारांना सावध करत असतो की.. “बँक कधीही फोन द्वारे कस्टमरला पिन किंवा ओटीपी नंबर मागत नाही. कधीही, कुणाही अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी किंवा पिन सांगू नका.” हा संदेश वारंवार तुमच्या मोबाईल वर दिसत असतो, ऐकू येत असतो. तरीदेखील तुमची अशी कशी फसगत झाली ? तुम्ही तर उच्च शिक्षित आहात, मुख्याध्यापिका आहात. तुम्हीच जर अशा घाबरून जाऊन कुणाही अनोळखी व्यक्तीला अशी महत्त्वाची माहिती फोनवर सांगितलीत तर कसं होईल ? तुमच्या सारख्या सुशिक्षित, जबाबदार व्यक्तीकडून अशा उतावीळ, धांदरट, बेजबाबदार व निष्काळजी वर्तनाची तर अजिबातच अपेक्षा नव्हती..”
 
मान वर करून माझ्याकडे एकटक पाहत वाघमारे बाई म्हणाल्या..
“पटतंय मला. केवळ फोन वरून कुणीही काहीतरी बोललं म्हणून मी एकदम असं घाबरून जायला नको होतं. यात जसा माझा मूर्खपणा आहे तशीच ही गोष्ट जर बाहेर कुणाला समजली तर त्यात माझी बदनामी सुद्धा आहे. सगळेजण मला अक्कलशून्य, बावळट समजतील. म्हणूनच मी लेखी तक्रार देण्याचं टाळलंय.
आता आणखी एकच विनंती आहे की कृपया ह्या झालेल्या प्रकाराची तुम्ही कुठेही वाच्यता करू नका. हे छोटंसं गाव आहे. गावभर बातमी पसरायला वेळ लागणार नाही. आणि मग.. आत्ता तुम्ही मला जसा उपदेश केलात तसाच उपदेश गावातील जो तो माणूस मला ऐकवू लागेल..”
 
“तुम्ही अगदी निश्चिंत रहा. सुदैवाने माझ्याखेरीज बँकेतील अन्य कुणालाही या घटनेबद्दल किंचितही कल्पना नाही. आणि माझ्याकडून ही गोष्ट कायम गुप्तच ठेवली जाईल..”
 
टेबलावरची पर्स उचलून निमूटपणे, जड पावलांनी वाघमारे बाई बँकेबाहेर निघून गेल्या. त्यानंतर कितीतरी वेळ मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो.
 
मला राहून राहून वाटत होतं की आधीच निराश, खचलेल्या आणि दुःखात असलेल्या वाघमारे बाईंना मी असं टोचून बोलायला नको होतं. “एक वाईट अनुभव समजून, झालं गेलं विसरून जा, आणि यापुढे सावधगिरी बाळगा..” असं म्हणून त्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शिक्षिका असण्यावर बोट ठेवून त्यांना मी अप्रत्यक्षपणे मूर्ख, बावळट आणि घाबरटच म्हटलं होतं. जेव्हा फसगत व्हायची असते तेव्हा सारासार विचार न करता मनुष्य समोरच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. त्या थोड्या वेळाकरता त्याची जणू बुद्धीच काम करेनाशी होते. हे कुणाबाबतही घडू शकतं. न जाणो उद्या माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला तर..?
 
मी घड्याळात पाहिलं. बारा वाजून गेले होते. आज बँकेत अजिबातच गर्दी नव्हती. बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाल्याने टेबलावरची कामं भराभरा उरकून पेंडिंग ऑडिट रिप्लाइज देण्याच्या कामात मी गढून गेलो. थोड्या वेळानं मान वर करून पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते. “बापरे ! वेळ कसा चट्कन निघून गेला ते कळलंही नाही..” स्वतःशीच मी पुटपुटलो. ऑडिट रिप्लाईजचं रेंगाळलेलं पण महत्त्वाचं असं काम एकदाचं पूर्ण झाल्यामुळे समाधानानं खुर्चीवर बसल्या बसल्या मागे रेलून कुठलं तरी आवडतं गाणं गुणगुणू लागलो तोच टेबलावरील लॅन्ड लाईन फोन खणखणला..
 
या मोबाईलच्या जमान्यात लॅन्ड लाईन कॉल म्हणजे नक्कीच रिजनल ऑफिस किंवा झोनल ऑफिसचा फोन असावा असा विचार करीतच रिसिव्हर उचलला. माझा अंदाज खरा ठरला. पलीकडून खुद्द डिजीएम साहेबच बोलत होते..
“हॅलो..! कोटनीस जी sss! कैसे हो ? मैं डीजीएम बात कर रहा हूँ..”
“हॅलो सर..! कोटनीस बात कर रहा हूँ सर..! मैं ठीक हूँ सर..!”
तत्परतेने मी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
 
डीजीएम साहेबांचा फोन आहे हे समजताच नकळत लगबगीनं स्वतःला सावरून घेत, खुर्चीवर ताठ होऊन बसत जीवाचा कान करून ते काय सांगत आहेत ते मी ऐकू लागलो..
“सुनो, कोटनीस जी sss ! मै शिर्डी ब्रँच व्हिजिट के लिए औरंगाबाद से घंटाभर पहलेही निकल चुका हूँ । आधे घंटे में वैजापुर पहुँचूंगा । वहाँ दो मिनट रुक कर फिर आगे निकल जाऊंगा । मेरा एक पर्सनल काम है.. करोगें ?”
“क्यों नहीं सर ! इट्स माय प्लेझर..! आप बस हुकुम कीजिए सर, प्ली sss ज.. !!”
आवाजात शक्य तितकी अदब, तत्परता व आज्ञाधारकपणा आणीत म्हणालो.
( क्रमशः 2 )

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

Smooth Roads don’t make good drivers

smooth roads

Smooth roads don’t make good drivers.

Never raise your children in comfort and expect them to grow to be strong. Because smooth roads never make good drivers. A man has to undergo the hardships of life to learn the meaning and value of life.

 The founder of Dubai once said something in an interview that shook the entire room. 

Sheikh Rashid, the man who built Dubai from nothing but sand, was once asked a simple question: What do you see in the future of your country? 

He paused, and then he said something no one in that room ever forgot. 

He said, “My grandfather rode a camel. My father rode a camel. I drive a Mercedes. My son drives a Land Rover, and my grandson will drive a Land Rover too,
But my great-grandson- he will ride a camel again!

Now, the interviewer was confused. He asked why, and Sheikh Rashid looked at him and delivered one of the most powerful truths ever spoken. 

He said, 

“Hard times create strong men. 

Strong men create easy times. 

Easy times create weak men, 

and weak men create hard times! “

That is not a quote, this is a warning. 

Imagine this: 

You work day and night. You sacrifice everything. 

You build something from nothing, so your children never have to struggle the way you did.

And what happens? 

They grow up never knowing what hunger feels like. 

They never know what it means to be told “no”. 

They never know what it feels like to have nothing and still keep going. 

So they become soft, not because they are bad people, but because you removed the very thing that made you strong. 

You handed them comfort, and comfort, is the most dangerous inheritance you can leave behind

A wise father understands this. Perhaps he could give his son everything, but he will have one rule that will be never broken. 

You will earn your place under his roof. No one in this family is given what they did not build.

He would say, I am not raising a son who inherits wealth. I am raising a son who inherits strength, because wealth without strength disappears in one generation

You can see it everywhere. The mightiest empires in history, the Persians, the Egyptians, the Greeks, the Romans, the British, they did not fall because of enemies. They fell because they became comfortable. They weakened from the inside. Comfort killed them. 

So the next time you think the greatest gift you can give your children is an easy life, stop, because you are not protecting them. You are destroying the very thing that will keep them alive when you are gone.



Add text to image Tool

Tip: Drag the text on the image to reposition it!