https://goodworld.in A website by Madhav Bhope

Devotee-2 Shri Mahadev-भक्तांच्या कथा-2 -भगवान शिव

bhagan shiv

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee-2 Shri Mahadev

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

भगवान शिव

 

Devotee-2 Shri Mahadev

याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली. भक्तांच्या मालिकेत आपण भगवान शिव यांची कथा जाणून घेऊयात. पुन्हा तोच प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो, की भगवान शिव हे तर साक्षात देवाधिदेव- महादेव आहेत. मग त्यांचे नांव भक्तांच्या यादीत कसे? जगद्गुरु आद्य श्रीशंकराचार्य यांनी देव पंचायतनची जी कल्पना रुजवली, त्यातील पाच देव म्हणजे- श्री विष्णू, भगवान शंकर, श्रीदेवी आदिशक्ति, श्री गणेश आणि सूर्य भगवान. मग या पंचयातनपैकी असलेले भगवान शंकर हे कोणाचे भक्त?

भगवान शंकर आणि भगवान नारायण हे सदा अभिन्न आहेत. परंतु भक्तांच्या आवडीप्रमाणे एकच सच्चिदानानंदघन परमात्मा दोन स्वरूपांमध्ये स्थित आहे. आणि दोघेही एकमेकांची भक्ति करतात, असे वर्णन ठिकठिकाणी आले आहे.

भगवान नारायण (विष्णू), आणि त्यांचे अवतार- श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे परम शैव आहेत.   भगवान विष्णूंनी श्री शंकराच्या पूजेमध्ये सहस्र कमलदल अर्पण करण्याचा संकल्प केला, आणि जेंव्हा त्यात एक कमल कमी पडू लागले, त्यावेळी आपले कमलरूप नेत्र काढून त्या ठिकाणी अर्पण केले. तोच श्री विष्णूंचा शिवाप्रति असलेला भक्तिभाव किंवा भक्तीचा उद्रेक हा सुदर्शन चक्र बनून श्री विष्णूंना  प्राप्त झाला जो की श्री विष्णू विश्वाच्या कल्याणार्थ आणि भक्तांच्या संरक्षणार्थ नेहमी वापरतात. याचे फार बहारदार वर्णन श्री पुष्पदंत गंधर्वाने रचलेल्या शिव महिम्न स्तोत्रात आलेले आहे.vishnu lotus to shiva

हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः।
यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः।
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्।।
शिव महिम्न स्तोत्र १९।।

तर श्रीरामाने, रावणाशी युद्ध करण्याच्या आधी, दक्षिणेमध्ये श्री    रामेश्वर लिंगाची स्थापना केली. श्री कृष्णाने शंकराची आराधना करून कार्तिक स्वामीला, महाराणी जंबूवती चा मुलगा सांबच्या रूपात प्राप्त केले.rameshwaram-1

त्याचप्रमाणे भगवान शिव हे परम वैष्णव आहेत. ते निरंतर राम नामाचा जप करतात. आणि त्यांच्या मुक्तिधाम काशीपुरी मध्ये देहत्याग करणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कानात ‘राम’ या तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मुक्ति प्रदान करतात.

पुराणात अशी एक कथा येते की श्री विष्णूंचे शत कोटी मंत्र आहेत, किंवा श्री राम चरित्र हे शत कोटी श्लोकांचे आहे- एकदा देव दानव आणि राक्षस यांच्यामध्ये हे वाटून घेण्याविषयी वाद झाला, आणि ते सगळे भगवान शिवांकडे गेले. तेंव्हा शिवाने, त्या शंभर कोटी श्लोकांचे सारखे वाटे करून तिघांना दिले.  प्रत्येकाच्या वाट्याला 33 कोटी, 33 लाख, 33 हजार, 333 श्लोक आले. एक श्लोक उरला. हा एक श्लोक अनुष्टुप छन्दात होता, ज्याच्यात 32 अक्षरें असतात. भगवान शिवाने तिघांना 10-10 अक्षरें वाटून दिली. उरली दोन अक्षरें- ती दोन अक्षरें होती- ‘रा’ आणि ‘म’. शिवांनी सांगितले- ही दोन अक्षरें मात्र मी कोणालाही देणार नाही- त्यांना मी माझ्या कंठात ठेवीन- कारण ते माझे आराध्य दैवत आहे.

एकदा देव आणि असुर मिळून समुद्र मंथन करीत होते. त्यावेळी सगळयात पहिल्यांदा समुद्रातून अतिशय जहाल असे हलाहल विष वर आले. ते विष सर्व लोकांमध्ये पसरू लागले. तेंव्हा देव आणि दानव भगवान शंकरांना शरण गेले आणि विश्वाचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी श्री रामाचे नांव घेऊन ते हलाहल विष हातावर घेऊन, प्राशन केले. परंतु ते तोंडात असतांना त्यांना लक्षात आले की हे विष जर पोटात गेले, तर आपल्या पोटात असणाऱ्या विश्वाला, सर्व सृष्टीला हे मारक ठरेल. तेंवह त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. तेंव्हापासून त्यांचे नीलकंठ हे नांव प्रसिद्ध झाले.halahal vish

श्री विष्णूसहस्र नामाच्या शेवटी जी फलश्रुति आहे, त्यात आले आहे की, पार्वतीने शंकरांना विचारले, की या सहस्र नामांना जर थोडक्यात घ्यायचे असेल तर काय करायला पाहिजे?

पार्वत्युवाच —
केनोपायेन लघुना विष्णोर्नामसहस्रकम् ।
पठ्यते पण्डितैर्नित्यं श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो ॥ २६॥

त्यावर शंकरांनी पार्वतीला सांगितले-

ईश्वरउवाच—
श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ २७॥
श्रीरामनाम वरानन ॐ नम इति ।

हे पार्वती, श्रीराम हे एक नाम हे सहस्र नामांच्या बरोबर आहे. त्यामुळे एक राम नाम घेतले तर ते विष्णूंच्या सहस्र नामांच्या बरोबर आहे.

भगवान श्रीकृष्ण जेंव्हा गोकुळात अवतार घेते झाले, त्यावेळी त्यांचे मोहक बालरूप पाहण्यासाठी सर्व देव लालायित झाले. भगवान शिव हे तर त्यांचे परम भक्त होते. श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्यासाठी ते जोग्याच्या वेशात गोकुळामध्ये दाखल झाले, आणि यशोदेच्या दारावर जाऊन भिक्षा मागू लागले. यशोदा जेंव्हा त्यांना भिक्षा द्यायला दारावर आली, तेंव्हा त्यांनी धन किंवा धान्यरूपी भिक्षा नको असून, तुझ्या पोटी आलेल्या दिव्य बालकाचे दर्शन हीच भिक्षा दे असे यशोदेला विनवून, त्यांनी श्रीकृष्णाच्या बालरुपाचे दर्शन घेतले होते अशी कथा आहे.bhagvan shiv visits gokul

अशा प्रकारे, भगवान शिव हे भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार- श्री राम आणि श्रीकृष्ण यांचे परम भक्त आहेत.

भक्तांच्या मालिकेत श्री गणेशापासून सुरुवात करून, आज आपण भगवान शंकरांची भक्ति पाहिली. यानंतर आपण ‘ब्रह्मदेव’ यांची कथा पाहणार आहोत.

त्यानंतरच्या लेखांत आपण अनुक्रमे खालील भक्तांची चरित्रे पाहणार आहोत.

  • देवर्षि नारद
  • महर्षि व्यासदेव
  • शुकदेव
  • भक्त ध्रुव
  • भीष्म
  • भक्त प्रल्हाद
  • हनुमान
  • शंकराचार्य
  • संत ज्ञानेश्वर
  • संत एकनाथ
  • संत सूरदास
  • गोस्वामी तुलसीदासजी
  • महान भक्त मीराबाई
  • संत नामदेव
  • संत तुकाराम
  • दक्षिणेतील अनेक संत

संतांची, भक्तांची ही यादी खूप मोठी आहे. संतांची आणि भक्तांची चरित्रें वाचून अनयासेच सत्संग होतो.

तेंव्हा, या मालिकेत यातील जास्तीत जास्त भक्तांची चरित्रे देण्याचा प्रयत्न राहील.

श्रीहरि!

संकलन-माधव भोपे 

भक्तांच्या कथा-1-श्री गणेश-Devotee-1 Shri Ganesh

ganesh-2-1024x892

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

प्रथम भक्त- श्री गणेश

ganesh prithvi parikrama

Devotee-1 Shri Ganesh

श्री गणेश हे तर स्वतः च आद्य देव आहेत, मग त्यांचे नांव भक्तांमध्ये कसे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भगवंताची रूपें अनंत आहेत. पण या रूपांपैकी ५  रूपें ही मुख्यतः पूजली जातात- 

१. भगवान नारायण- किंवा विष्णू, २. भगवान शिव, ३. भगवति महाशक्ति, ४. भगवान सूर्य, आणि ५. भगवान गणपति.  

गणपति आद्य पूज्य असल्याच्या अनेक कथा वाचायला मिळतात, गणपति हे रुद्रगणांचे अधिपति आहेत, त्यामुळे त्यांची पूजा सर्वप्रथम केल्याने कार्य निर्विघ्न पार पडते, अशी श्रद्धा आहे. गणेशाला प्रथम पूजनाचा मान कशामुळे प्राप्त झाला, याबद्दलची कथा सर्वश्रुत आहे- जेंव्हा सृष्टीच्या आरंभी, देवतांमध्ये कोणाला प्रथम पूजनीय मानले जावे हा प्रश्न उपस्थित झाला, तेंव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सर्व प्रथम पूर्ण करून येईल, त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल. 

त्यानंतर सर्व देव आपआपल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. त्यावेळी, गणेशाने, आपल्या आई वडिलांची, अर्थात, भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रदक्षिणा केली, कारण की, ‘माता साक्षात् क्षितेस्तनुः’ अर्थात, माता साक्षात पृथ्वीरूप आहे, आणि पिता हे प्रजापतिरूप आहेत.  त्यामुळे श्रीगणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा अशा रीतीने सर्वांच्या आधी पूर्ण झाली आणि तेंव्हापासून श्री गणेशाला आद्य पूजेचा मान मिळाला.  हीच कथा, श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या संदर्भात सुद्धा वेगळ्या प्रकारे येते. 

पण या कथेचा आशय इतकाच, की अशा प्रकारे आपल्या माता पित्यांची श्रेष्ठता आणि माता पित्याच्या  भक्तिचा आदर्श श्री गणेशाने स्थापित केला आणि दाखवून दिले, की केवळ शरीराच्या बळावर किंवा इतर लौकिक साधनांवर विश्वास ठेवून सिद्धी मिळू शकत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही धोका खाऊ शकतो.  अशा प्रकारे आपल्या माता पित्याच्या भक्तीचा आदर्श घालून देणाऱ्या श्री गणेशाला आरंभी वंदन!

Mind blowing experiences of a Banker-10 एका बँकरचे थरारक अनुभव-10

bankasya katha

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बॅंकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव

(भाग : 10)

शनिवारचा दिवस उजाडला. आज बँक अर्धा दिवसच होती. आपापली कामं आटोपून सारा स्टाफ दुपारी चार वाजताच घरी गेला होता. माझी औरंगाबादला जायची ट्रेन संध्याकाळी सहा वाजताची असल्यामुळे ऑफिसचं सर्व काम लवकर आटोपून निवांत बसलो असतानाच रविशंकर बँकेत आला.
 
“सर, आपसे कुछ बात करनी है.. “
 
असं म्हणून त्याने आपली कैफियत मांडायला सुरवात केली. 
 
रविशंकर आणि बेबी सुमित्रा या दोघांनाही औरंगाबादच्या सेशन कोर्टाने अद्यापही अटकपूर्व जामीन मंजूर केलेला नव्हता. जोगळेकर वकिलांच्या प्रयत्नांना अजून यश येत नव्हतं. आतापर्यंत आम्ही आमच्या कर्मचारी संघटनांकडे या प्रकरणात मदतीसाठी धाव घेतलेली नव्हती. खरं म्हणजे आमच्या बँकेत अधिकारी वर्गासाठी एक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी एक, अशा दोन वेगळ्या, स्वतंत्र कामगार संघटना अस्तित्वात होत्या. सुदैवाने या दोन्ही संघटना सशक्त, प्रभावी आणि झुंजार वृत्तीच्या होत्या.
 
या व्यतिरिक्त बँकेत जातीनिहाय देखील काही कर्मचारी संघटना होत्या. यात अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील कर्मचारी व अन्य मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील कर्मचारी यांच्या देखील स्वतंत्र संघटना होत्या. रविशंकर हा बिहारमधील “कहार” नामक अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील होता तर बेबी सुमित्रा ही छत्तीसगडच्या आदिवासी समाजातील म्हणजेच अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील होती.
 
काही संकुचित वृत्तीच्या अप्रगल्भ कर्मचारी नेते मंडळींना प्रत्येकच घटनेकडे कायम जातीयवादी चष्म्यातूनच पाहण्याची सवय असते. दुर्दैवाने औरंगाबाद मधील एका अशाच कलुषित दृष्टीच्या दुय्यम स्तराच्या नेत्याने “रविशंकर व बेबी सुमित्रा ह्यांना ताबडतोब अटकपूर्व जामीन न मिळणे” या घटनेला जातीय भेदभावाचा रंग दिला आणि या अन्यायाविरुद्ध रविशंकर व बेबी सुमित्रा यांनी आवाज उठवावा व बँक मॅनेजमेंट तसेच न्यायपालिकेत याची दाद मागावी याकरिता त्या दोघांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 
 
अर्थात रविशंकर व बेबी सुमित्रा हे दोघेही मुळातच सुसंस्कृत, शालीन व सुस्वभावी असल्यामुळे त्यांनी सुरवातीला या नेत्याच्या आग्रहाला अजिबातच भीक घातली नाही. मात्र जेंव्हा या नेत्याने हेड ऑफिस मधील वरीष्ठ नेत्यांमार्फत त्या दोघांवर दबाव आणण्यास सुरवात केली तेंव्हा मात्र ते वैतागून गेले. रविशंकरचं म्हणणं होतं की मी ताबडतोब जोगळेकर वकिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शीघ्रातीशीघ्र जामीन मिळवून देण्यास सांगावे म्हणजे या नेत्यांच्या प्रेशर मधून त्याची मुक्तता होईल.
 
“ठीक आहे ! उद्या दुपारीच मी जोगळेकर वकिलांची या संदर्भात भेट घेईन.”
माझ्या ह्या आश्वासनाने रविशंकर निश्चिन्त झाला. खुश होऊन तो म्हणाला..
“सर, मैं भी कल दोपहर को आपके साथ वकील साब के ऑफिस में आना चाहता हूँ.. आप के सामने मुझे उन से कुछ सवाल पूछने है.. !!”
“फिर तो बहुत अच्छा..! आप ठीक बारह बजे वकिल साब के दफ़्तर पहुँचो.. संडे के दिन उनका ऑफिस सिर्फ दोपहर एक बजे तक ही खुला रहता है..”
 
ठरल्याप्रमाणे दुपारी बारा वाजता जोगळेकर वकिलांच्या ऑफिस वर पोहोचलो. रविशंकर सोबत बेबी, सैनी व रहीम चाचा या तिघांनाही तिथे आलेलं पाहून मला थोडं आश्चर्यच वाटलं. आम्ही वकील साहेबांना भेटलो तेंव्हा त्यांची स्वीय सहाय्यक रश्मी नेहमी सारखीच त्यांना अगदी खेटून बसली होती. अचानक मला तिथे आलेलं बघून ती किंचित चपापली. जोगळेकर साहेबांना अगोदर मी रुपेशच्या अटकेबद्दल माहिती दिली आणि मग रविशंकर व बेबी यांना अटकपूर्व जामीन कधी मिळणार याबद्दल पृच्छा केली तेंव्हा ते म्हणाले..bankasya katha
 
“उद्याच..! रुपेशच्या अटकेबद्दल किंवा त्यापूर्वी त्याच्याकडून घेतलेल्या कबुली जबाबाबद्दल मला तेंव्हाच कळवलं असतंत तर या दोघांनाही फार पूर्वीच जामीन मिळून गेला असता. असो.. ! खरं म्हणजे आता तर तशी जामीन घेण्याचीही आवश्यकताच राहिलेली नाही. पण अनायासे या संदर्भात उद्या सकाळीच माझं कोर्टापुढे ऑर्ग्युमेंट आहे, तेव्हा रुपेशच्या कन्फेशनच्या ग्राउंडवर उद्या अकरा वाजेपर्यंत या दोघांच्याही बेल ची कोर्ट ऑर्डर मिळून जाईल.”
 
“आपका बहुत बहुत धन्यवाद, वकील साब..!”
दोन्ही हात जोडून वकील साहेबांचे आभार मानून रविशंकरने त्यांना विचारलं..
“सर, आपकी फीस कितनी देनी होगी ?”
“वोही, जो पहले तय हुई थी..! चालीस हजार रुपये.. !!”
“सर, मुझे पूछना यह था कि हमारी बेल के लिये आपको अबतक कुल कितना रुपया खर्च करना पड़ा ?”
रविशंकरने विचारलेला हा प्रश्न ऐकून मी गोंधळात पडलो. असा विचित्र प्रश्न त्याने का बरे विचारला असावा ? जोगळेकर साहेब ही त्या प्रश्नामुळे बुचकळ्यात पडलेले दिसत होते. ते म्हणाले..
 
“किस खर्च की बात कर रहे हो आप ? मैने तो बेल के लिए अबतक कोई खर्च नही किया..!”
त्यावर अतिशय नम्रपणे खुलासा करीत रविशंकर त्यांना म्हणाला..
 
“पब्लिक प्रॉसिक्युटर, पुलीस, कोर्ट के कर्मचारी तथा जज साब को मॅनेज करने के लिये अब तक मैने और बेबीने पच्चीस पच्चीस हजार रुपये आपके असिस्टंट पुराणिक साब को दिये है.. इस से पूर्व, हमारे साथी शेख रहीम और सुनील सैनी से भी इसी तरह दस दस हजार रुपये उन्ही के द्वारा अलग से लिये गए थे..”
जोगळेकर साहेबांप्रमाणेच माझ्यासाठीही मी माहिती नवीन आणि धक्कादायक होती. पुराणिक वकिलांनी खोटं बोलून त्यांच्या बॉसच्या नकळत अशिला कडून पैसे उकळले होते हे उघड होतं. तरी देखील स्वतःला व मॅटरला सावरून घेत जोगळेकर साहेब म्हणाले..
 
“तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी चौकशी करतो. जर तुम्ही आधीच काही रक्कम पुराणिक वकिलांकडे जमा केली असेल तर उद्या काम झाल्यावर फक्त उरलेले पैसे द्या. तसंच ज्यांच्या ज्यांच्याकडून चुकून जास्तीचे पैसे घेण्यात आले असतील त्यांना ते परत केले जातील..”
जोगळेकर साहेबांचा निरोप घेऊन आम्ही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पडलो. भेटीचा उद्देश सफल झाल्यामुळे माझे सहकारी खुशीत होते. त्या आनंदातच जवळच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेलो असतांनाच तिथे रश्मीचा फोन आला. ती म्हणाली..girl talking over phone
 
“मी ऑफिस मधून घरी निघाले आहे. इथून अगदी जवळच आहे माझं घर..! तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर घरी येऊन मला भेटूनच जा. तुमच्याच फायद्याचं काम आहे. वाट पाहते मी तुमची.. !!”
“ठीक आहे, आलोच मी..!”
असं बोलून फोन कट केला. माझ्या सहकाऱ्यांकडे पाहून मला एक विचार सुचला. तसंही एकट्याने रश्मीच्या घरी जाणं मला सेफ वाटत नव्हतं. मी त्यांना म्हणालो..
“आपण सारे जण आता रश्मी मॅडमच्या घरी जाणार आहोत. सुरवातीला मी एकटाच आत जाईन. नंतर मी रविशंकरला मिस कॉल करतांच तुम्ही सगळे जण तिच्या घरी या. म्हणजे आत माझ्यावर तसाच काही अवघड प्रसंग आला असला तर त्यातून माझी सुटका होईल..”
 
 
रश्मीचं घर म्हणजे एक ऐसपैस फोर बीएचके आलिशान फ्लॅट होता. बेल वाजवताच रश्मीने दार उघडत हसतमुखाने स्वागत केलं. भुरभुरणारे मोकळे केस, आकर्षक उघडे दंड दाखविणारा बिनबाह्यांचा ब्लाऊझ, बेंबीच्या खाली नेसलेली झुळझुळीत सिल्की साडी अशा सिंपल घरगुती पेहरावातही रश्मी खासच दिसत होती. हॉलमधील गुबगुबीत सोफ्यावर बसल्यावर रश्मीने फ्रिजमधून थंडगार पाणी आणून दिलं.blush of love blouse 134609
 
“छान आहे फ्लॅट तुमचा..”
काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो. माझ्या जवळ येऊन बसत रश्मी म्हणाली..
“जोगळेकर साहेबांनीच वाढदिवसाची गिफ्ट म्हणून घेऊन दिलाय मला हा फ्लॅट.. यू नो, माझे आणि बॉसचे खूपच जवळचे संबंध आहेत.. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच समजतात मला ते..”
 
हॉलमध्ये हलक्या, मंद पाश्चात्य संगीताचे हळुवार सूर दरवळत होते. अतिनिकट बसलेल्या रश्मीने लावलेल्या उंची सेंटचा उबदार, उत्तेजक सुगंध मला अस्वस्थ करीत होता..
“माझ्याशी कोणत्या महत्वाच्या गोष्टीबाबत बोलायचं होतं तुम्हाला ?”
मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला..
लाघवी, मादक स्मित करीत रश्मी म्हणाली..
“अरे..! एवढी काय घाई आहे ? आत्ताच तर आलात तुम्ही.. थोडा वेळ बसा, आराम करा.. मी आलेच चेंज करून..”
 
कपडे तर आधीच चेंज केले आहेत हिने, आता आणखी काय चेंज करणार आहे ही बया ? असा विचार करीत तेथील टी-पॉय वरील Star & Style, Cine Blitz, Debonair, Vogue, Women’s Era अशा मासिकांतील गुळगुळीत चित्रे पहात बसलो.
थोड्याच वेळात फिकट लाल गुलाबी रंगाचा अत्यंत झिरझिरीत स्लीव्हलेस गाऊन घालून डौलदार पदन्यास करीत रश्मी हॉलमध्ये आली. ओठांना डार्क रेड लिपस्टिक लावून आलेल्या रश्मीचा उंच, भरदार, गोरापान लुसलुशीत देह त्या पारदर्शक पोशाखात अधिकच देखणा, उठावदार दिसत असल्याने ती जाम डेंजरस सेक्सी दिसत होती. कपाटातून काचेचे दोन ग्लास आणि व्हिस्कीची बाटली काढून ग्लास भरताना तिनं विचारलं..
“सोडा की आईस ?”
 
आळसावलेल्या मदमस्त स्वरात बोलणाऱ्या रश्मीचे इरादे खतरनाक दिसत होते.
“नो थँक्स..! मी ड्रिंक्स घेत नाही..”
कसेबसे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले..
“ओ.., रिअली ? बी फ्रॅंक.. लाजू नका.. नो फॉर्म्यालिटीज प्लिज.. नाऊ वुई आर फ्रेंड्स..”
चेहऱ्यावर आश्चर्य दाखवीत आपल्या ग्लासात बर्फाचे तुकडे टाकून तो ग्लास नाचवीत रश्मी माझ्या शेजारी येऊन बसली. अंग चोरून घेत कोपऱ्यात सरकत मी म्हणालो..
 
“नाही.. खरंच, मी कधीच ड्रिंक्स घेत नाही..”
“ठीक आहे बाबा.., तुम्ही ड्रिंक घेत नाही, मान्य..! पण मग आजपासून सुरू करा नं घ्यायला.. या रश्मीच्या आग्रहास्तव.. अं.. ?”
व्हिस्कीचा घोट घेत माझ्या अंगावर रेलून माझ्या डोळ्यात डोळे घालीत तो उष्टा ग्लास माझ्या ओठांजवळ आणीत रश्मी म्हणाली.
आता हे अति होत होतं. मी ताडकन उभा राहिलो..images 31
 
“हे पहा मॅडम, अशा गोष्टींत मला अजिबात इंटरेस्ट नाही. अगोदर तुम्ही मला इथे कशाला बोलवलंत ते अगदी थोडक्यात सांगा..! आधीच मी खूप घाईत आहे, आणखीही खूप महत्वाची कामं आहेत मला.. माझे सहकारी माझी वाट पहात बाहेर थांबले आहेत. मी इथून लवकर निघालो नाही तर माझ्यासाठी कदाचित ते इथं तुमच्या घरी सुद्धा येतील..”
 
हे बोलत असतानाच रश्मीच्या नकळत मी मोबाईल वरून रविशंकरला मिस कॉलही करून टाकला.
“मॅनेजर साहेब, तुमच्या हाताखालच्या स्टाफची इतकी काय काळजी करता ? घाबरता का त्यांना ? अहो, बॉस आहात तुम्ही त्यांचे..! त्यांनीच घाबरायला पाहिजे तुम्हाला.. थांबतील ते तुमच्यासाठी कितीही वेळ.. बरं चला, आपण तुमच्या फायद्याच्या कामाबद्दल बोलू..”
 
रश्मीचं बोलणं चालू असतानाच दारावरची बेल वाजली. त्रासिक मुद्रेने “आता यावेळी कोण तडफडलंय..?” असं पुटपुटत हातातील ग्लास टी-पॉय वर ठेवून रश्मीने दार उघडलं. दारातील चौघा बँक कर्मचाऱ्यांना पाहून ती क्षणभर चकित झाली. पण मग लगेच सुहास्य वदनाने “ओहो, अरे वा.. !! आइये.. आइये..” असं म्हणत त्यांचं स्वागत केलं. आमचा स्टाफ आत येऊन सोफ्यावर स्थानापन्न झाल्यावर त्यांना आणि विशेषतः त्यांच्यातील बेबीला पाहून रश्मीला आपल्या अंगावरील पारदर्शी पेहरावाची लाज वाटली असावी. “एक्स्क्यूज मी.. तुम्ही बसा, मी आलेच चेंज करून..” असं म्हणून टी-पॉय वरील व्हिस्कीचा ग्लास शिताफीने उचलून घेत ती आतल्या खोलीत गेली.
 
थोड्याच वेळात ओठांची लिपस्टिक पुसून, बंद गळ्याचा फुल स्लीव्ह ब्लाउज आणि एक साधी सुती साडी नेसून सोज्वळ रुपात हातात सरबताचे ग्लास घेऊन रश्मी हॉलमध्ये आली. ती आल्यावर मुद्दाम तिच्या देखत रविशंकर मला म्हणाला..
“सॉरी सर, हमे वैजापूर वापस जाने की जल्दी थी और कितनी देर से आप हमारा फोन भी नही उठा रहे थे इसीलिए आपसे मिलने के लिए हमे बिना बुलाये ही मॅडम के घर आना पड़ा..! वैसे, अबतक आपका यहाँ का काम तो हो ही गया होगा..”
 
“अरे नही..! दरअसल, जिस काम के सिलसिलेमें मैं यहाँ आया था, वो बात तो मॅडम ने अबतक कही ही नही..”
असं म्हणून मग रश्मीकडे पहात मी म्हणालो..
“मॅडम, हे सर्व माझे विश्वासू सहकारी आहेत. तुम्हाला माझ्याशी ज्या महत्वाच्या गोष्टी बाबत चर्चा करायची आहे, ती तुम्ही नि:संकोच यांच्यासमोरही करू शकता..”
रश्मीची अवस्था पेचात पडल्या सारखी झाली पण मग पटकन निर्णय घेत ती म्हणाली..
“ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही.. खरं म्हणजे जी ऑफर देण्यासाठी मॅनेजर साहेबांना मी इथे बोलावलं होतं, ती ऑफर तुम्हा सर्वांसाठीही आहे. पण सुरवात मॅनेजर साहेबांपासून होईल. कारण त्यांच्याबाबतीत हे सहज शक्य आहे.
 
तर… ऑफर अशी आहे की जोगळेकर साहेब पोलिसांच्या चार्जशीट मधून तुमचे नाव वगळून देतील. त्या बदल्यात तुम्हाला त्यांना पन्नास हजार रुपये फी द्यावी लागेल. आणि हे काम करण्यासाठी वकील साहेबांना तयार करण्याची माझी फी फक्त चाळीस हजार रुपये.. अशा प्रकारे फक्त नव्वद हजार रुपये खर्च करून तुम्ही किमान 15-20 वर्षं चालणाऱ्या कोर्टाच्या खटल्यातून आत्ताच कायमचे मुक्त होऊ शकता.”
 
रश्मीची ऑफर आकर्षक होती. ही कोर्ट केस किमान 10 वर्षं तरी चालेल असं बँकेचे वकील श्री मनोहर यांनी सांगितलंच होतं. कोर्टाच्या तारखा, पोलिसांच्या नवनवीन धमक्या, पैशांच्या मागण्या या साऱ्या त्रासातून फक्त नव्वद हजार रुपये देऊन मुक्तता होणार होती.
“पण.. असं करता येणं शक्य आहे ?”
मी माझी मूलभूत शंका रश्मीला विचारली.
 
“अर्थात ! ज्याप्रमाणे पोलीस चार्जशीट मध्ये एखाद्याचे नाव नव्याने जोडू शकतात त्याचप्रमाणे ते एखादे नाव गाळू ही शकतात. ही खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि त्यासाठी पोलिसांचे ही सहकार्य घ्यावे लागते. पण तुम्ही त्याची काळजी करू नका. ते आमचं काम आहे. यापूर्वी ही अनेकदा आम्ही आमच्या क्लायंट्सची नावे चार्जशीट मधून वगळून दिलेली आहेत.”
 
रश्मी ज्या आत्मविश्वासानं बोलत होती त्यावरून तिच्या बोलण्यावर काही शंका घेण्याचं कारणच नव्हतं. पण शेवटी जर जोगळेकर साहेबच हे काम करणार असतील तर थेट त्यांनाच विनंती का करू नये ? मधल्यामधे ह्या रश्मीला विनाकारण का पैसे द्यायचे ?
 
माझ्या मनात घोळत असलेले विचार मनकवड्या रश्मीने अचूक ओळखले असावेत. कारण, माझ्याकडे पाहून दिलखुलासपणे हसत ती म्हणाली..
“माझे बॉस फक्त मर्डरच्याच केसेस घेतात हे तर तुम्हाला ऐकून माहितंच असेल. बाकीच्या केसेसमध्ये ते फक्त कोणते महत्त्वाचे मुद्दे जज साहेबांपुढे मांडायचे हे रेफरन्स सहित आमच्या सारख्या ज्युनियर्सना सांगतात आणि त्या केसेस त्यांच्या तर्फे आम्हीच कोर्टात प्लीड करतो. तुमच्या अटकपूर्व जामिनाच्या केसेस ही बॉसने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही ज्युनिअर वकिलांनीच कोर्टात प्लीड केल्या होत्या. मात्र चार्जशीट मधून नाव वगळणे या सारखी अवघड केस लढणे आम्हा ज्युनिअर वकिलांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. त्यासाठी जोगळेकर साहेबच हवेत. आणि ते तर कोणत्याही परिस्थितीत मर्डर व्यतिरिक्त अन्य कुठलीही केस स्वतः लढत नाहीत. इथेच तुम्हाला माझी गरज आहे. ही केस लढण्यासाठी त्यांना केवळ आणि केवळ मीच तयार करू शकते. हवं तर तुम्ही डायरेक्ट त्यांना विनंती करून पहा, ते स्पष्ट नकार देतील..”
 
रश्मीच्या या खुलाशानंतर अन्य स्पष्टीकरणाची आवश्यकताच नव्हती. तरीदेखील मी मनातली शंका विचारूनच टाकली..
“पुराणिक वकिलांप्रमाणेच तुम्हीही तुमच्या बॉसच्या नकळत आमच्याकडून पैसे उकळत आहात असे आम्ही का समजू नये ?”
माझ्या या प्रश्नावर पोट धरून खो खो हसत ती कुटील मेनका म्हणाली..
 
“फसलात ना ? अहो, मुळात पुराणिक वकिलांनी आमच्या बॉसच्या नकळत तुमच्या कडून पैसे जादा पैसे घेतलेच नाहीत. त्यांची तसं करण्याची कधी हिंमतही होणार नाही. उलट बॉसच्या सांगण्यावरूनच त्यांनी तुमच्याकडून जादा पैसे उकळले होते. ही आमच्या बॉसची नेहमीचीच प्री-प्लॅनड बिझिनेस टॅक्टीज् आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप असा प्रकार असल्याने जादा पैसे देणारा सहसा याची कुणाजवळ वाच्यता करीत नाही. मात्र ह्या रविशंकर यांनी हिंमत दाखवून बॉस समोरच जादा घेतलेल्या पैशांबद्दल जाब विचारला तेंव्हा नाईलाजाने बॉसला आपलं रेप्युटेशन वाचविण्यासाठी अज्ञानाचं सोंग पांघरून तुमचे जादा घेतलेले पैसे परत करावे लागले.”
 
रश्मीच्या ह्या गौप्यस्फोटाने आम्ही सारे अवाकच झालो. रश्मी पुढे म्हणाली..
“मी मात्र सरळ सरळ बॉसला फसवून त्यांच्या नकळतच तुमच्याकडून पैसे घेणार आहे आणि तेही advance मध्ये. बॉस माझ्या शब्दाबाहेर नाहीत. मी त्यांना गळ टाकल्यावर केवळ माझ्या आग्रहाखातर ते तुमची केस घेतील. आणि त्या माझ्या आग्रहाचीच किंमत मला तुमच्याकडून वसूल करायची आहे, असं समजा..”
बापरे ! ही तर सगळी “चोरों की बारात”च दिसत होती. “तुमच्या ऑफर बद्दल एक दोन दिवसांत विचार करून सांगतो..” असं रश्मीला सांगून आम्ही तिचा तो मायावी रंगमहाल सोडला.
 
सोमवारचा दिवस उजाडला.. सकाळ पासूनच आपल्यासोबत आज काहीतरी आकस्मिक, अनुचित व भयंकर अशुभ असं घडणार आहे अशी अंतर्मनात अनामिक हुरहूर लागून राहिली होती. दहा वाजता बँकेत पोहोचून केबिनमध्ये प्रवेश करतो न करतो तोच माझ्या मागोमाग चहावाला राजू घाईघाईत आत शिरला. आज नेहमी सारखी त्याच्या हातात चहाची किटली सुद्धा नव्हती. चेहऱ्यावर भीतीचे भाव असलेला आणि बोलताना थरथर कापणारा राजू आपले डोळे मोठ्याने विस्फारून सांगू लागला..
 
“साहेब घात झाला.. तुम्हाला फसविण्यासाठी पोलिसांनी भयंकर कट आखला आहे. रुपेश आत्ता पोलीस स्टेशनमध्ये बसला आहे, आणि पोलिसांनी पढविल्याप्रमाणे नवीन, सुधारित कबुलीजबाब देतो आहे.
“मॅनेजर साहेब व अन्य स्टाफच्या सांगण्या वरूनच मी या गुन्ह्यात सामील झालो होतो व या फसवणुकीचा संपूर्ण प्लॅन मॅनेजर साहेब व स्टाफ यांनीच तयार केला होता..”
असा त्याचा सुधारित कबुलीजबाब आहे..”
 
(क्रमश: 11)
 

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Renuka Ashtak-7 अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

mahur gad-2

( वृत्त – भुजंगप्रयात )
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रह्मांड पोटीं
स्वयें पाळिशी जीव कोट्यानकोटी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१॥


कधीं आपुलें दाविसी मूळपीठ
मिळो ना मिळो खावया गूळ – पीठ
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥२॥


तुझ्यापाशिं राहीन खाईन भाजी
जगामाजि सांगेन ही माय माझी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥३॥


बरा नाहिं का मी धुया लुगडें हो
अशा पूरवावी दयाळू गडे, हो
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥४॥


तुझी भक्ति अंगामधें संचरावी
तुझी माउली वेणि म्यां विंचरावी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥५॥


तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी
तुझ्या द्वारिं राहीन, वाहीन पाणी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥६॥


नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला
तुझ्या पंक्तिला येउं दे द्वादशीला
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥७॥


जिवाहूनि आतां करुं काय दान
आईनें रुसावें असा कायदा न
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥८॥


सदा विष्णुदासाचिया हे अगाई
दया येउं दे जाहलों गाइ – गाई
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥९॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

renuka-7

 वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥


सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥


विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥


साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥


सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥


मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥


पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥


माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥


ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥


तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥


काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥


पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥


कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥


मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥


कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥


केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

renuka-3

( वृत्त : चामर )
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥

तारिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात कीं
हेचि पाय हांसतील कौतुकें तुला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥२॥

एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीनं कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥३॥

मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघें तुझेंचि कृत्य हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके तुला ॥४॥

तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
नित्य मार शत्रुहातिं मारवीसि कां मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके ! तुला ॥५॥

जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मीं तसा कधीं न कांहिं बाइ ! कापिला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥६॥

रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना
ती उनाड सांगतीस आटपावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥७॥

ओढती न पेरुं देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम – क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ रखितेस हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥८॥

काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी
काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥९॥

काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वतीं
काय घातलासि हा अनाथ देह कर्वतीं
काय लोटलेंसि घोर दुःखसागरीं मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१०॥

काय लीहिलेंसि दैविं गर्भवास सोसणें
काय दीधलेंसि जन्म – मृत्युलागिं पोसणें
काय लाविलेंस नित्य तोंड वासणें मला
हें विहीत काय, सांग माय रेणुके ! तुला ॥११॥

आदि मध्य – आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला ॥१२॥

विष्णूदासाची कविता