https://goodworld.in A website by Madhav Bhope

Learning journey-1

e6b6ca34594b195e57c656177db2d978

माझे बँकेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू

जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे. Life is a learning journey. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काही शिकवून जातो, आणि तो अनुभव गाठीस बांधून आपला प्रवास अव्याहत पुढे चालू ठेवायचा असतो, अशी माझी श्रद्धा आहे. वेगवेगळे अनुभव, परिस्थिती, आणि प्रसंग जसे आपल्याला काही शिकवण देऊन जातात, तसेच काही व्यक्ति, आपल्याला बरेच काही शिकवून जातात. काही व्यक्तींमधील काही गुण आपल्याला खूप प्रभावित करीत असले, तरी, आपल्याला ते आत्मसात करता येण्याची अजिबात शक्यता नसते. आपण नुसते कौतुकाने बघत राहण्यापलीकडे काही करू शकत नाही.

अशाच व्यक्तीपैकी एक अवलिया माणूस म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये औरंगाबाद झोनल ऑफिसला साधारण 2 वर्ष उप महा प्रबंधक (DGM- Deputy General Manager) म्हणून आलेले मूळचे काश्मीरचे असलेले, काश्मिरी पंडित, श्री अजॉय नकीब हे व्यक्तिमत्व. अत्यंत साधी राहणी, गोरीपान आणि ठेंगणा ठुसकी पण मजबूत शरीरयष्टी, धारदार नाक, आणि किंचित घारे डोळे, डोक्याला टक्कल पडत आलेले, पण गालाला पडणाऱ्या खळ्या, आणि  कायम प्रसन्न मुद्रा आणि फ्रेंडली वागणूक, यामुळे ते पूर्ण झोनल ऑफिसच्या गळ्यातील ताईत झाले होते.image 4

स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची सर्वात मोठी सहयोगी बँक होती, जी आता, स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच विलीन झालेली आहे. त्याकाळी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 सहयोगी बँका होत्या, आणि त्या बँकामधील उच्चपदस्थ व्यक्तींच्या एका सहयोगी बँकेतून दुसऱ्या सहयोगी बँकेतही बदल्या होत होत्या. श्री नकीब हे स्टेट बँक ऑफ पटियाला मधून बदलून या काळात स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या औरंगाबाद येथील झोनल ऑफिसला साधारण वर्ष 2011 ते 2013 या कालावधीत झोनल ऑफिसचे मुख्य म्हणून आले होते

एखादी व्यक्ति किती इतक्या उच्च पदावर असतांनाही किती साधी राहू शकते, याचे अजॉय नकीब म्हणजे एक चालते बोलते उदाहरण होते. बँकेतील नोकरी म्हणजे व्यक्ति जितक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असेल, तितकी ती जास्त बिझी, व्यस्त राहणार आणि सतत तणावाखाली राहणार, हे समीकरण या माणसाला अजिबात लागू पडत नव्हते.

मी त्या वेळी औरंगाबाद येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या ट्रेनिंग सेंटर येथे होतो. ट्रेनिंग सेंटरची जबाबदारी सांभाळतांना बऱ्याचदा चांगलीच दमछाक व्हायची. बऱ्याच वेळा, नकीब साहेबांना, ट्रेनिंगच्या नवीन बॅच च्या सुरुवातीला, उद्घाटन करण्यासाठी बोलवायला, मी जात असे. झोनल ऑफिस च्या मुख्याचा वेळ किती किमती आहे, हे माहीत असल्यामुळे, मी त्यांची वेळ घेऊन जात असे, आणि त्यांना आमंत्रण देतांना, त्यांना वेळ उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करीत असे. त्यावेळी, ते अगदी दिलखुलासपणे  म्हणत, “अरे, भोपेजी, मेरे पास तो समय ही समय है. आप हुकूम करो, कब हाजिर होना है!” वास्तविक पाहता, ते माझ्यापेक्षा हुद्दयाने खूप मोठे होते, पण त्यांनी कधीच असे जाणवू दिले नाही. आणि माझ्याशीच नाही, तर सगळ्यांशी त्यांचा हाच व्यवहार होता. केंव्हाही त्यांच्याकडे गेले, तरी ते कधीच आपण खूप कामात आहोत, आपल्याजवळ अजिबात वेळ नाही, असे दाखवीत नसत. आणि केंव्हाही गेले, तरी ते कधीच तणावात दिसत नसत.

आम्ही कधी कधी त्यांना अधिकाऱ्यांच्या एखाद्या बॅचला, एखादा महत्वाचा विषय शिकविण्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून बोलवत असूत. त्यावेळी बँकेतील अगदी कठीण विषय ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन अगदी सोपे करून सांगत.

त्यांचे एकेक किस्से ऐकल्यावर, अवलिया, हे एकाच विशेषण त्यांना द्यावेसे वाटत असे. खरे तर त्यांच्या पदाला, बँकेची ड्रायवरसहित चांगली मोठी गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण त्यांनी स्वतःच्या घरी, किंवा बाजारात इत्यादि जाण्यासाठी चक्क एक छोटीशी नॅनो कार विकत घेतली होती, आणि आपल्या खाजगी कामासाठी त्या गाडीतून फिरत.

त्यांना पूर्ण मराठवाड्यात दौऱ्यासाठी जावे लागे. अर्थातच बँकेची गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण एखाद्या वेळी ते चक्क बसने जात, अगदी साधा वेष, पॅन्ट, हाफ बाह्यांचा बुशशर्ट, आणि पायात साधी चप्पल, या वेशात ते एखाद्या बँकेच्या एखाद्या खेड्यातलया शाखेत जाऊन धडकत. आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत. त्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेत. आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शाखा व्यवस्थापकाला सूचना देत.

झोनल ऑफिस मध्ये अगदी प्यून पासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी एकदम इनफॉर्मल वागत.

पण एवढेच नाही, हा मनुष्य हरहुन्नरी, रसिक आणि त्याचवेळी कलाकार सुद्धा होता.

औरंगाबादचे झोनल ऑफिस हे तेथील स्टाफ च्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला गुणांमुळेही प्रसिद्ध होते. आणि त्यासाठी हैदराबादच्या हेड ऑफिस मध्ये औरंगाबाद चे खूप नांव होते.

दर वर्षी हैदराबादला बँक डे ला खूप मोठा कार्यक्रम होत असे. त्यावेळी वेगवेगळ्या झोन्स मधील सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रम होत आणि त्यांच्या स्पर्धाही होत. एके वर्षी, गाण्याच्या स्पर्धा होत्या, आणि त्यात, झोन मधील स्टाफची स्पर्धा घेऊन, त्यातील विजेत्याला हैदराबाद येथे, झोन चे प्रतिनिधित्व करायला मिळणार होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेरील नामवंत कलाकार बोलावले होते. त्यात चक्क नकीब साहेबांनी, स्पर्धक म्हणून भाग घेतला, आणि काश्मीर की कली या चित्रपटातील, “इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहाँसे” हे गाणे इतके अप्रतिम गायले, की परीक्षकांनी त्यांच्या गाण्याला प्रथम क्रमांक दिला. आणि तो नक्कीच ते DGM होते म्हणून नाहीत, तर गाण्याच्या गुणवत्तेवर दिला. पण नकीब साहेबांनी, त्याचा जरी नम्रपणे स्वीकार केला, पण DGM म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कलाकाराचीच निवड, हैदराबाद ला जाण्यासाठी केली.

झोनल ऑफिस च्या लोकांची दरवर्षी कुठे तरी सहल जात असे. तो पर्यन्त सहसा उच्च पदस्थ असलेले अधिकारी त्या सहलीत कधी प्रत्यक्ष सहभागी होत नसत. पण नकीब साहेब अत्यंत उत्साहाने कोकणला रायगड ला निघलेल्या सहलीत सामील झाले. त्या सहलीत एकूण 40-50 जण होते, त्यात मीही होतो. आणि त्यांनी पूर्ण सहलीत सगळ्यांसोबत त्यांच्यातीलच एक होऊन मनमुरादपणे सहलीचा आनंद लुटला. पूर्ण बसच्या प्रवासात, मी त्यांच्या मागच्या सीट वर असतांना, श्री सुधीर ओंकार (दुसरे तितकेच कलाकार आणि हर हुन्नरी व्यक्तिमत्व) यांच्या शेर शायरी वर कितीतरी वेळ चाललेल्या गप्पा मी ऐकत होतो, आणि दोन रसिक माणसांच्या गप्पांचा मनमुराद आनंद लुटत होतो.DSC02631

एका गावी, आम्ही पायी चालत असतांना एक म्हातारी बाई काही तरी (फळ) विकायला रस्त्यात उभी होती. तिच्याकडून खूप मोठी फळे विकत घेऊन सगळ्यांना दिली, आणि त्यांच्या पाकिटातून हाताला येतील तितक्या नोटा, फळांच्या किमतीच्या कितीतरी अधिक, न मोजता, त्या बाईला दिल्या!DSC02627

आम्ही रायगडला गेलो. आमच्यात बरेच चांगले गायक, वादक होते. त्यातील हौशी असलेले, विश्वास काळे इत्यादींनी ढोलकी वगैरेही सोबत आणली होती. गड बघून आल्यावर सर्वजण भारावलेल्या अवस्थेत होते. अशा वेळी काळे आणि इतर मंडळींनी, “ गर्जा महाराष्ट्र माझा” हे वीरश्री पूर्ण गाणे, ढोलकीच्या तालावर म्हणायला सुरुवात केली, आणि सर्वजण त्या ठेकयात सामील झाले. त्यावेळी नकीब साहेबही त्या ठेकयात उत्साहाने सामील झाले. त्यावेळचे एक दोन व्हिडिओ अजून माझ्याकडे आहेत, ते या ब्लॉग सोबत देत आहे.

मित्रांनो, असा हा अवलिया माणूस, काश्मिरी पंडित, अशातच, चक्क महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात येऊन स्थायिक झाला आहे, आणि तिथे महाराष्ट्रातील आदिवासी लोकांसोबत समरस होऊन कार्य करीत आहे, हे मला आज गूगलवर सर्च केल्यावर समजले. आणि त्यांनी एक यू ट्यूब चॅनल पण सुरू केले आहे.

त्यात आणखी एका चॅनल वर त्यांनी आपल्याविषयी थोडक्यात सांगणारा एक व्हिडिओ टाकला आहे. 

मन मौजी , मस्त कलंदर, आणि जीवन आपल्याच धुंदीत जगणारा असा एक अवलिया, म्हणूनच

अशी काही व्यक्तिमत्व आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

यापुढील लेखात, बँकेतील इतर काही सहकारी, ज्यांच्या कडून मी खूप काही शिकलो, अशा व्यक्तींबद्दल लिहायचा विचार आहे.

सुगरणीचा खोपा

sugran pakshi

गेल्या महिन्यात एके ठिकाणी गेल्यावर तिथे एका जुनाट, वापरात नसलेल्या विहिरीवर, सुगरणीचे अनेक खोपे दिसले. विहीरीच्या काठाने उगवलेल्या झाडांवर त्यांनी खोपे बांधले होते. आणि अनेक सुगरण पक्षी, त्यांचा तो विशिष्ट आवाज करीत लगबग लगबग करीत ये-जा करीत होते. sugran

त्या पक्ष्यांची मेहनत बघून वाटले, आजकाल छोट्या छोट्या अडचणींना वैतागून, व्यसनाधीन होणारे, किंवा डिप्रेशन मध्ये जाणारे किंवा आत्महत्या करणारे लोक, जर या पक्ष्यांच्या जीवनातून काही बोध घेतील तर किती बरे!

बहिणाबाई चौधरीने म्हणून ठेवले आहे. 

तिची उलूशीच चोच,

तेच दात, तेच ओठ

तुले देले रे देवाने

दोन हात दहा बोटं

बहिणाबाई म्हणतात, त्या पक्ष्याला ना हात आहेत, ना बोटं. तिची छोटीशी चोंच हीच तिचे हात आणि बोटं. तरी पण किती जिद्दीने ती तिचे घरटे विणते!

खरंच बहिणाबाई चौधरी या आपल्या खानदेशी कवयित्रीची  जीवनाकडे बघण्याची दृष्टी किती practical आणि आशावादी होती !

त्या निमित्ताने इथे बहिणाबाईची सुगरणीच्या खोप्यावरील कविता या ठिकाणी देण्याचा मोह आवरत नाही. म्हणून ती पूर्ण कविता येथे सादर करीत आहे. 

खोप्या मधी खोपा

अरे खोप्या मधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिनं

झोका झाडाले टांगला

sugran-2

पिलं निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव

जीव झाडाले टांगला

सुगरीन सुगरीन

अशी माझी रे चतुर

sugan female
sugan female

तिला जन्माचा सांगाती

मिळे गण्या गंप्या नर 1

sugran male

खोपा विणला विणला

जसा गिलक्याचा 2 कोसा3

पाखराची कारागिरी

जरा देख रे माणसा!

तिची उलूशीच4 चोच,

तेच दात, तेच ओठ

तुले देले रे देवाने

दोन हात दहा बोटं

काय लोकाचीबी तऱ्हा

कसे भांग घोटा पेल्हे5

उभा जमिनीच्या मधी

आड6 म्हणती उभ्याले

आसं म्हनू नही कधी

जसं उभ्याले आडवा

गुढी उभारतो त्याले

कसं म्हनती पाडवा?6gudhi

बहिणाबाई चौधरी

शब्द अर्थ:

  1. गण्या गंप्या नर- सुगरण पक्षिणीला खोपा विणता येतो. परंतु तिच्या नराला येत नाही. तो फक्त तिला गवताच्या काड्या वगैरे आणून देतो. म्हणून त्याला गण्या गंप्या म्हणजेच बावळट म्हटले आहे.
  2. गिलक्याचा कोसा- गिलके म्हणजे घोसाळे (पारसे दोडके). कोसा म्हणजे त्याचे वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना. याला इंग्लिश मध्ये loofah म्हणतात.loofah
  3. वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना
  4. उलूशीच- छोटीशी
  5. पिले.
  6. आड म्हणजे पूर्वी घरात किंवा गल्लीत असायचे ते छोटे पाण्याचे स्रोत. इथे बहिणाबाईने कोटी केली आहे. आड हा  जमिनीत ‘उभा’ असतो. त्याला आड म्हणणे जसे चूक आहे, तसेच गुढी पाडव्याला आपण गुढी ‘उभारतो’, पण मग त्याला ‘पाडवा’ कसे काय म्हणतो.? असा जाता जाता विनोद केला  आहे.

भक्ति सुधा- गोंदवलेकर महाराज नित्य प्रवचन

1619604348 Thorale RAM e1719828001724

गोंदवलेकर महाराज प्रवचन 

 

भक्तिसुधा (@bhaktisudha9) या यू ट्यूब चॅनेल वर ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या दैनंदिन प्रवचनातील त्या त्या तारखेचे प्रवचन, अत्यंत रसाळ आणि भक्तिपूर्ण आवाजात, दररोज प्रकाशित होत असते. तसेच प्रवचनाच्या  नंतर, “हाचि सुबोध गुरूंचा,” ही भक्तिरचना  आणि त्यानंतर , ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ हा जप साधारण ७ मिनिटे, अशी ही नित्य उपासना’ या चॅनेल वर अगदी नित्य नियमाने प्रकाशित होत असते. 

दररोज जर १५ मिनिटे आपण ही उपासना, अगदी काम करता करता जरी ऐकली, तरी महाराजांचे शब्द कानी पडतील, आणि श्रीरामाचे नांव कानावर पडेल. म्हणून भक्तिमार्गावर असणाऱ्या भाविकांसाठी,  दररोजची प्रवचने या ठिकाणी पोस्ट करीत आहोत. 

Website of Shri Gondavalekar Maharaj Sansthan1619604681 Sampurna Samadhi

संस्थान ची वेब साईट 

Click Here इथे क्लिक करा 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

Suffering and awakening

spiritualism 4552237 1920 1024x739 1

There is a fundamental misconception and often unconscious misconception in human beings. We believe that the world has the ability to make us happy, but this is being withheld from us. And that we regard that as a personal insult that life is doing to us.

 Why is life withholding happiness from me?  Why all these things always happen to me?  Because it’s not happening to others!

 You read their Facebook posts!  They’re all happy!

They’re eating meals. You see pictures of meals. And then you see their happy faces. And not only are they happy, they’re also so good looking.😊.  Everybody’s good looking. What we forget is that it’s the technology of filters and stuff. Everyone can look beautiful using technology.

So people watch that and said wow, these people’s lives are so great.

 My mind is so awful. And then you also pretend to be happy. Because everybody else is pretending.

So, the misconception is, “The world is here to make me happy, but it’s not doing it.”

 And this is a very serious misconception because it makes your whole life miserable.

Because that  means  something  that should be happening is not happening in my life.  It’s just not happening.

But of course, that misconception is that the world is here to make you happy, and it can’t do that. It’s not here to make you happy, it’s here to make you conscious, to awaken you.

Then you realize, ” I was wrong all along. I’ve been complaining uselessly for all these years . I’ve been complaining uselessly for 40 years that’s there’s something wrong with the world.”

But there wasn’t anything wrong at all. Because the world is here to awaken me.

If humans are not challenged, or why just humans, any life form, only grows through being challenged, which means encountering  obstacles and difficulties in their process of growth.

Even plants and animals, all encounter diffficulties. Every life form is precarious, its existence is precarious, and it encounters obstacles to its unfoldment. And that, ultimately, is how evolution happens. Through encountering difficulties, obstacles, challenges.

 Because as you encounter the obstacles and challenges, they seem to block you. And you think life would be much better if I did not have these challenges. But it wouldn’t because you would go to sleep if you did not have challenges.  So having challenges brings about an influx of energy on whatever level, even if it’s physical. And every organism gains new strengths by attempting to overcome these limitations. If you want to become physically stronger, you have to exercise.

( Unless you have a job that is physically hard working andforces you to exert yourself physically. )

Otherwise you have to exercise if you want to grow stronger. You have to lift weights. How does that feel at first? It feels painful. You are making life difficult for your body. Because your body is not going to grow stronger unless you make your the body’s life difficult. Your body would be so relaxed sitting on the on the sofa and watching Netflix. But it’s not going to grow stronger. It’s actually getting weaker because it’s not being challenged. But challenge it, and then there is a demand for added energy and this  just operates on the physical level and there’s a moment when there’s a gap. Exerting yourself and the energy isn’t there yet, so it’s very hard, but at some point the energy comes flooding in because there was a demand for it. And at that point you may actually begin to enjoy the physical movement because of this added energy and suddenly,  strength is increasing and this is just on the physical level. But it can also operate on a psychological level and on a spiritual level.

When you become very unhappy in your life then there is a possibility that the unhappiness causes you to awaken because at some point you realize either because you had a spiritual teacher or  even in some people it happens spontaneously.

The psychological suffering that humans undergo can at some point bring about an awakening when you just can’t stand it anymore.

 And something snaps and suddenly an awakening happens. But it would not have happened if you hadn’t gone through those sometimes years of suffering.

People tell that they  would not have understood the spiritual books or open to anything spiritual if they  had not experienced a serious, very serious illness or an accident or some deep loss in their personal lives.

There would not have been an opening if you had not gone through that suffering. And at some point the suffering awakens you. And really the ultimate purpose of suffering is to awaken.

And then you realize that most suffering is actually unnecessary. It’s actually created by the ‘conditioned entity’- ‘unconscious thought processes’ . Physical pain isn’t suffering. Suffering is a psychological phenomenon. This suffering, can be transcended. If you awaken, you transcend. In other words, you transcend unhappiness. You are no longer unhappy.

 The mind loses its power to make you unhappy because most of your unhappiness is created by the ‘unconscious thought processes’ , not situations. Most of unhappiness is created not by difficult situations that you encounter, but what your mind is  telling you about the difficult situations.

The situation itself is as it is. Then you impose an interpretation on it. The interpretation says this should not be happening. This is awful. Why always to me? Why, why did he do that? That causes the unhappiness and strengthens the fictitious self. is the commentary, the interpretation. And it is an amazing realization that most of your unhappiness is ‘created’!. by your mind.

As you become more present, unhappiness  disappears from your life.

Is it saying  that you will then always be happy? No. It’s not so. Obviously even as your unhappiness leaves you and you become more present, situations arise where you cannot say that you’re happy. Somebody close to you dies. Your father, your mother, or even a child or somebody or something very bad. An accident happens to someone you and you can’t say  I’m still happy.. Sadness will come. And yet, you are not consumed by the sadness. It comes as a wave. And you may weep because somebody close to  you died. There’s still a substratum of peace underneath it.

It may not be called happiness, but it’s deeper than that. There is an all abiding peace underneath it, although there may be tears on the surface.  And you don’t perpetuate emotional pain by continuously thinking about it for months and years. It comes as a wave and then it subsides and even when it’s there, there is still a presence of quietness that you can sense underneath it.

From the talks of Echkart Tolle, the German born spiritual teacher.

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

चायकी महिमा- मारवाड़ी भजन

beautiful creative vector design tea 260nw 2476294887 1

0145d793c0a7aa7a900995f0aac650e6

कलजुग  आयो कृष्णजी, जीव हुवा लाचार,

दूध छोड़कर चाय की जगत करे मनुहार|

साधु पीवे, गृहस्थ पीवे, सभी करे मनुहार

भेड़ चालकी चलणसे , भिसल गयो संसार||

चारों बर्ण भिसल गया जगने जूठण खाई  

हे चायडती जुलमण , कुण तन्ने मुण्डे लगाई

कलयुग की घूटी,  कुण तन्ने मुण्डे लगाई

सूरज उगतां छोरा छोरी, कूक रहा है चाय चाय,6eLCYBNsQJ2d DJN40yadw 1

बुढ़लाती दादी गरलावे, हाय मरी रे चाय चायimages 2

भर चीनमिट्टी का तगरा, धरे पेटमें  हाय हाय,

शिवशंकर कहे सुण पार्वती,

हुवा नशेड़ी घरका सारा, रामकथा नहीं भाई

हे चायडती जुलमण , कुण तन्ने मुण्डे लगाई

घर पर नाई करे हजामत, वो भी कूके चाय चाय,

कपड़ा सीवण दरजी आवे, वो गरलावे चाय चाय9b7ddc6015a3e6f12f8b5ecd77ee3f1a

चिणबाने चेजारो आवे, बाको फाड़े चाय चाय

(चेजारो म्हणजे विहीर खोदणारे, चिणबाने म्हणजे विहीर खोदणे)

जागरण जम्मा रातीजोगा, पटकी पड़गई चाय चाय

स्टेशन पर गाड़ी में बैठो, शोर मचे है चाय चाय India Traditional Market Food Tea Stall Tea Stall 2512434 1024x576 1

मोटर के अड्डे पर जावो तो चिरलावे चाय चाय

जाय धरमशाला में ठहरो, तो गरलावे चाय चाय

देश विदेश कमाबा जावो, दे किलकार् याँ चाय चाय

घर पर आय बटाऊ ठहरे, लाय उकालो चाय चाय

छोरा छोरी ने परणावो, तो भी बोलो चाय चाय 

ओसर मोसर टाणां काढ़ो, लागे चुंगी चाय चाय

धोली गौ को दूध बिगाड्यो गंदलो कर दियो हाय हाय,

शिवशंकर कहे सुण पार्वती, हरिनाम चितार बिसार मती जी 

छोड़ो नशा हरी भज लावा लूटो बहन मेरा भाई

हे चायडती जुलमण , कुण तन्ने मुण्डे लगाई

 

 

अशीच एक विनोदी रचना, पण वास्तव परिस्थिति दाखवणारी, खूप वर्षांपूर्वी राजस्थानच्या मारवाडी भजनांच्या पुस्तकात वाचण्यात आली होती, ती येथे सादर करीत आहे. या रचनांचा कोणी रचयिता वगैरे नसतो, पारंपरिक रचना म्हणून अशीच प्रसिद्धी होते. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4

shriram

मागील लेखावरून-पुढे 

काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे.  आता त्यापुढील श्लोक:

 

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

 

दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.

 

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

 

वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.

 

श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.

 

 

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 

आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे,  विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.

 

श्रीराम राम रघुनन्दन राम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

 

भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे.  अशा या श्रीरामाला मी शरण आहे.

 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

 

श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.

 

 

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं

जाने नैव जाने न जाने ॥30॥

 

माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”

 

 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥

ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती  आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.

 

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.

 

यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.

 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

hanuman

वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.

मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो.  हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली

 

मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः  (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा  वेग)

अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा  आहे

मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.

 

यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.

 

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

valmiki

वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.kokila

 

कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

 

महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:

 

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’

valmiki

हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.

 

त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.

 

यापुढील श्लोक:

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

 

आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.

 

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

 

 

भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम

राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.

 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

 

राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.

 

निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”

 

रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति

परायणं= आश्रयस्थान  

परतर=  इतर,

म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.

रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.

माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!

 

वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.  

 

रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा  भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)

 

[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल

 

एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.


एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.


पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।

ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]

 

 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

 

वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.

मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.

 

भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.

 

पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.

 



 

 

राम       राम       राम.

 

 

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

 

बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.

 

श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.

 

अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे. 

माधव भोपे 

 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1