https://goodworld.in A website by Madhav Bhope

A glimpse of Vedic knowledge-3

yagya

A glimpse of Vedic knowledge-3

A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.

पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.

सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.

चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र.  यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही  जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.

क्र.

वेद

मंत्र संख्या

शैली

विवरण

1

ऋग्वेद

10462

मन्त्रपरक

सगळ्यात  प्राचीन वेद

2

यजुर्वेद

1975

गद्यात्मक

कर्मकांडपरक, शुक्ल आणि  कृष्ण भागात विभाजित

3

सामवेद

1875

गेयात्मक

संगीतमय, यातील बहुतेक  मंत्र ऋग्वेदातीलच आहेत.

4

अथर्ववेद

5987

प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक

सगळ्यात नवीन वेद

ऋग्वेदात काय आहे?

ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१

पदच्छेद- ओ३म्  अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१

agni

ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि  ब्रह्मा.  ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा.  ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन  करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!

yagya

सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.

पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.    

1) संहिता –

संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई

२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.

3) आरण्यके –

अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.

4) उपनिषदे –

सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग  उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.

उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.

अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.

ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.

  1. देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
  2. निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति  अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  3. समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
  4. तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
  5. स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि,  आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
  6. पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.

प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.

पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic knowledge-2

A glimpse of Vedic knowledge-2

A Glimpse of vedas-2

A glimpse of Vedic knowledge-2

The story of Satyakam-Jabala

सत्यकाम जाबालाची गोष्ट

मागील लेखात आपण श्रुति, स्मृति याबद्दल थोडी माहिती घेतली. आणि प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहिले. आपल्याला चार वेदांबद्दल थोडी प्राथमिक माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी आपण छान्दोग्योपनिषदा मधील एक रोचक कथा पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धति होती. मुलगा ७-८ वर्षाचा झाला की, उपनयन संस्कार करून त्याला गुरूंच्या घरी विद्या शिकायला पाठवले जात असे. विद्या शिकवणारे आचार्य, किंवा गुरू, अरण्यात आश्रम करून रहात. असे आचार्य हे विद्वान, निःस्पृह आणि ब्रहमविद्या पारंगत असत. विद्यार्थ्यांचे हित, कल्याण हाच त्यांचा एकमेव उद्देश असे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार त्यांचे असत. योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पूर्ण जबाबदारी गुरूंची असे. म्हणूनच येणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा अधिकारही गुरूंचा असे. गुरुकुलात नित्य यज्ञ याग चालत असे. यज्ञाला समिधा लागतात. येणाऱे  विद्यार्थी  येतांना, हातामध्ये प्रतिकात्मक म्हणून थोड्या समिधा (वाळलेली लाकडे) घेऊन येत आणि गुरूंना अर्पण करीत.

सत्यकाम हा जाबाला नांवाच्या स्त्रीचा मुलगा होता. ती अनेक घरांत काम करीत असे. सत्यकाम जेंव्हा ७ वर्षांचा झाला, तेंव्हा त्याने, त्यावेळच्या प्रथेनुसार, इतर मुलांप्रमाणे, गुरूच्या घरी जाऊन विद्या शिकण्याची इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त केली. गुरूंना आपल्या वडिलांचे नांव आणि गोत्र सांगणे आवश्यक असे, तसे सत्यकामने आपल्या आईला विचारले. त्याची आई विवाहित नव्हती, आणि अनेक घरांमध्ये काम करीत असतांना तिला सत्यकाम झाला होता. तिने तिच्या मुलाला सांगितले, “ बाळा, तुझ्या जन्माच्या आधी मी अनेक घरांमध्ये काम करत होते, अनेक स्वामींची सेवा करत होते. त्यामुळे, तुझे वडील कोण आहेत, हे मी नक्की सांगू शकत नाही. तू फक्त सत्यकाम आहेस- सत्यकाम- जाबाला. तुझ्या गुरुजींनी तुझे गोत्र किंवा वडिलांचे नांव विचारले तर जे खरे आहे ते सांग.

आईचा निरोप घेऊन सत्यकाम निघाला आणि गुरू गौतम यांच्या आश्रमात आला. आपल्याला त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळावा अशी त्याने विनंती केली. गुरूंनी त्याला त्याचे कुळ आणि गोत्र विचारले. सत्यकाम म्हणाला, “मी माझ्या आईला हा प्रश्न विचारला, तेंव्हा तिने सांगितले की माझे वडील कोण हे तिला नक्की माहिती नाही. माझे नांव सत्यकाम- जाबाला.” त्याचे हे उत्तर ऐकून आश्रमात बसलेले विद्यार्थी हसू लागले आणि त्याची टिंगल करू लागले. पण गुरू गौतम त्याला म्हणाले, “ बाळा, तू खरा ब्राह्मण आहेस- कारण की जो खरे बोलतो तो ब्राह्मण. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. आजपासून तू आश्रमात रहा.” सत्यकाम ने सोबत आणलेल्या समिधा गुरूंना अर्पण केल्या आणि आश्रमात राहू लागला.

सत्यकामचे शिक्षण सुरू झाले. त्याला गुरूंनी आश्रमातील दैनंदिन कामें करायला सांगितले. नंतर एके दिवशी गौतमांनी त्याला बोलावले. आणि सांगितले, “आज मी तुझ्याजवळ ४०० गायी देत आहे. तू यांना जंगलात चरायला घेऊन जा, तिकडेच राहा, आणि जेंव्हा या ४०० गायींच्या १००० गायी होतील, तेंव्हा परत ये.” असे म्हणून त्यांनी आश्रमातील अगदी दुबळ्या झालेल्या ४०० गायी त्याच्या हवाली केल्या.

गुरूंच्या आज्ञेनुसार, सत्यकामने त्या ४०० गायी घेतल्या आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. रोज तो त्या गायींना चरायला सोडत असे, त्यांच्यावर लक्ष ठेवत असे, आणि त्याचबरोबर जंगलाचे, निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करीत असे. त्याचबरोबर, तो नदीच्या काठी बसून, चिरंतन सत्य काय आहे याचा विचार करीत असे, चिंतन करीत असे. अशी वर्षांमागून वर्षें लोटली.

एके दिवशी एक पुष्ट दिसणारा बैल त्याच्याजवळ आला, आणि मनुष्यवाणीत म्हणाला, “मुला, आता आमची संख्या १००० झाली आहे. तू आता आम्हाला तुझ्या गुरूंकडे, आश्रमाकडे घेऊन चल.” तो बैल दुसरे तिसरे कोणी नसून वायूदेव होता. तो पुढे सत्यकामला म्हणाला, “ तू जी आमची सेवा केली आहेस, त्याने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू परब्रह्माचे- चिरंतन सत्याचे चिंतन करीत आहेस. मी तुला त्या ज्ञानाचा चौथा हिस्सा सांगतो- पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण- या सगळ्या दिशा या त्या ब्रह्माचा भाग आहेत. आता यापुढील ज्ञान तुला अग्नि देईल.”

सत्यकामने गुरूंच्या आश्रमाकडील आपला परतीचा प्रवास चालू ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, तेंव्हा, सत्यकाम शेकोटी पेटवत होता आणि तीत इंधन टाकीत होता, त्यावेळी अग्निदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, “वायूने तुला चिरंतन सत्याचे काही ज्ञान दिले. मी आता त्याच्या पुढील चौथा हिस्सा तुला सांगतो. पृथ्वी, आकाश, वायू आणि समुद्र, हे सुद्धा त्या परब्रह्माचाच हिस्सा आहेत. आता यापुढील ज्ञान तुला हंस देईल.”

पुढील दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, आणि जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा एक दिव्य हंस उडत त्याच्यापाशी आला. तो हंस म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव होता. तो सत्यकामला म्हणाला, “सत्यकाम, मी तुला आता परब्रह्माच्या ज्ञानाचा पुढील चतुर्थ भाग सांगतो- अग्नि, सूर्य, चंद्र, आणि विद्द्युल्लता या सर्वांना ‘ज्योतिष्मान’ असे नांव आहे. हे ही सगळे, त्या परब्रह्माचे भाग आहेत. यापुढील भाग तुला पाणपक्षी म्हणजेच बदक सांगेल.”

त्यापुढील दिवशी, पुन्हा संध्याकाळी गायी चरवून आल्यावर जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा पाणपक्षी त्याच्या जवळ आला आणि म्हणू लागला, “ सत्यकाम, मी आता तुला परब्रह्माच्या ज्ञानाचा चौथा आणि शेवटचा भाग सांगतो, ऐक. प्राण, डोळे (दृष्टी), कान (श्रवणेंद्रिय) आणि मानस (मन) ही त्याच पूर्ण परब्रह्माचा हिस्सा आहेत. हे चराचर त्याच परब्रह्माचे प्रकटीकरण आहे.”

जेंव्हा सत्यकाम आपल्या गुरूच्या आश्रमात १००० गायींसह  पोंचला, तेंव्हा त्याचा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळला होता. त्याला पाहून त्याचे गुरू, गौतम अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, “माझ्या प्रिय शिष्या, तुझा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळलेला दिसतो आहे.! तुला हे ज्ञान कोणी दिले?”

तेंव्हा सत्यकामने त्याच्या चार गुरूंबद्दल सांगितले आणि नम्रतेने म्हणाला, “गुरुजी, पण हे ज्ञान मला आपल्या मुखातून ऐकायचे आहे. त्याशिवाय त्याला पूर्णता येणार नाही.”

तेंव्हा गुरू गौतमांनी प्रसन्न होऊन त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ते म्हणाले, “ ब्रह्म सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे. ब्रह्मच सर्व आहे. ते अनादि आहे आणि अनंत आहे. स्वतःला जाणल्यानेच ब्रह्म जाणले जाते. यालाच ब्रह्मविद्या म्हणतात.”sun

गुरूंकडून ज्ञान मिळून सत्यकाम धन्य झाला. पुढे चालून सत्यकामही एक उत्तम शिक्षक झाला.

आपण या लेखमालेची सुरुवात करतांना, पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतिकडे आकर्षित होतात, आणि नुसते तात्पुरते आकर्षित होत नाहीत, तर आपल्या संस्कृतिचा, वेदांचा, सखोल अभ्यास करतात, पण एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या गोष्टींबद्दल तितकी किंवा अगदी प्राथमिक माहितीही नसते अशी खंत व्यक्त करून झाली होती. वेदांचे ज्ञान हे फक्त काही उच्च वर्णीय लोकांपुरतेच मर्यादित ठेवले गेले होते, असे आपल्याला सांगितले गेले. पण छान्दोग्योपनिषदात आलेल्या या गोष्टीवरून असे दिसून येते, की जात किंवा कुळ याचा विचार न करता विद्यार्थ्याची योग्यता पाहून ज्ञान दिले जात असे. आणि योग्यता ठरविण्याचा अधिकार हा तितक्याच ज्ञानी, अधिकारी आणि निःस्वार्थ गुरूंकडे असे.

दुसरे असे, की शिक्षण देण्याची कोणती पद्धत अवलंबायची हे सुद्धा, कोणती पद्धत कोणाला सूट होईल हे ठरवून त्याप्रमाणे आचार्य highly individualized पद्धत वापरत.

आश्रमात वेदांचा अभ्यास करतांना घोकंपट्टी तर असेच, आणि ती आवश्यकही असे. पण त्याचबरोबर ‘प्रात्यक्षिक’ शिक्षणावर अधिक भर असे.

वरील गोष्टीमध्ये, अनेक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सत्यकामला जे ज्ञान मिळाले, ते कदाचित आश्रमात राहून मिळाले नसते. वरील गोष्टीतील- वायूदेव, अग्निदेव, सूर्यदेव यांनी येऊन सत्यकामला ज्ञान देण्याचे प्रसंग आपण जरी बाजूला ठेवले, तरी इतक्या दिवसांच्या निसर्गाच्या सान्निध्यानंतर आणि चिंतनानंतर सत्यकामला आतून ज्ञान ‘स्फुरले’ असे तर आपण मानूच शकतो. कारण ‘ज्ञान’ हे बाहेरून मिळवायचे नसते, तर ते आपल्या आतच असते हीच तर वेदांची शिकवण आहे. आजकाल आपण बाहेरून, पुस्तकांतून आणि गूगल मधून जे ‘ज्ञान’ मिळवितो, ते ‘ज्ञान’ नव्हे, तर ‘माहिती’ म्हणजेच information असते.

यापुढील लेखात आपण वेदातील काही संज्ञांची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.

आपल्याला हा विषय आवडला असेल, त्यात रस येत असेल, तर अवश्य कळवा, म्हणजे अजून पुढे लिहायला उत्साह येईल.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic Knowledge-1

four vedas

A glimpse of Vedic Knowledge-1 

वेदांची झलक

काही वर्षांपूर्वी यू ट्यूब वर एक व्हीडिओ पाहण्यात आला- व्लादिमीर यातसेन्को (Vladimir Yatsenko) असे नांव असलेल्या, रशियन माणसाचा तो व्हीडिओ होता.

व्हीडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. ( एप्रिल 2015 चा). त्याचे शीर्षक होते- Introduction to Vedas- Part-1. काही भागांमध्ये हा व्हीडिओ होता. सांगणारा माणूस इंग्लिश मध्ये बोलत होता. त्याचा वेष जरी पाश्चात्य असला, तरी तो एखादा  ऋषितुल्य भारतीय वाटत होता.

 या व्हीडिओमध्ये, एखाद्या भारतीयालाही नसेल, इतकी सखोल माहिती तो आपल्या वेदांबद्दल सांगत होता. व्हीडिओ ऐकल्यानंतर मला खूप नवीन गोष्टी कळल्या. मी भारतीय असून, आणि तथाकथित उच्च कुळात जन्म घेतलेला असूनही, मला त्यातील बहुतेक गोष्टींचे शून्य ज्ञान होते. त्यामुळे माझीच मला लाज वाटली. आपण स्वतःला भारतीय म्हणवतो, आणि वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसते.  आणि हा रशियन माणूसच नाही, तर अक्षरशः शेकडो, हजारो इतर देशांतील, इतर धर्मीय जिज्ञासू, तिथे राहून किंवा भारतात येऊन, आपल्या ज्ञानाचा अभ्यास करतात, आपले पूर्ण आयुष्य सनातन संस्कृतीला वाहून घेतात, असे मला त्यानंतर समजू लागले. आणि असे अनेक लोक- स्त्री, पुरुष, धांडोळा घेतांना दिसू लागले.

या सर्व गोष्टी आपण इतरांसोबत शेअर केल्या पाहिजेत असे प्रकर्षाने वाटू लागले. आता हा ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे यातील काही गोष्टी, वाचकांसोबत शेअर करायचा विचार आहे.

हा विषय trending म्हणजे पटकन कोणाला आकर्षित करणारा नाही. त्यामुळे किती लोकांच्या वाचण्यात येईल हे माहित नाही. पण आपल्या आनंदासाठी, अशा  काही विषयांची मांडणी करतांना, आपलीच त्या विषयाची उजळणी होते आणि वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते, म्हणून हा लेखन प्रपंच करणार आहे.

या लेखांमध्ये आपल्याला काही गोष्टींची आणि काही शब्दांची तोंडओळख होणार आहे-

  1. वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत- श्रुति म्हणजे काय, स्मृति म्हणजे काय, वेदांचे भाग- संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि उपनिषद म्हणजे काय, त्रैविद्या म्हणजे काय, प्रस्थानत्रयी म्हणजे काय.
  1. पुरातन काळापासून आजपर्यंत वेद अत्यंत शुद्ध स्वरूपात कोणत्या पद्धतीने जतन केले गेले, भारताच्या कुठल्याही भागात गेले तरी वेदांचे शब्द आणि स्वर अगदी अचूक एकसारखे कसे येतात, याबद्दल माहिती
  2. द्याौ,  पृथ्वी, अंतरिक्ष या संकल्पना,
  3. अग्निहोत्र, किंवा यज्ञ करतांना निरनिराळे कर्म कर्ते – होतार, अध्वर्यू आणि उद्गातृ किंवा उद्गात्र आणि ब्राह्मण आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या.

प्रस्थानत्रयी –

वरील विषयाची चर्चा सुरू करण्याआधी प्रस्थानत्रयी म्हणजे काय याबद्दल थोडे समजून घेणे आवश्यक आहे.

या शब्दाचा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला नाही. पण आपल्याला केंव्हा ना केंव्हा इथून ‘प्रस्थान’ करायचे आहे- म्हणजे जायचे आहे- तर ते- आपल्या ‘मूळ गावाला’   जाणे सुलभ व्हावे म्हणून जे ग्रंथ सहायक आहेत असे तीन ग्रंथ म्हणून प्रस्थानत्रयी म्हणत असावेत असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत होते.  पण मला एका ठिकाणी खालील अर्थ बघायला मिळाला-

प्रस्थानत्रयी

सनातन धर्मात असे मत आहे की कोणाला कुठला सिद्धांत सिद्ध करायचा असेल तर त्याला तीन प्रस्थानांमधून जावे लागेल. ते तीन प्रस्थान म्हणजे- श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान. तर आपल्याकडे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन रचना श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणून ओळखल्या जातात.

श्रुति म्हणजे आपल्या ऋषिंना त्यांच्या ध्यान अवस्थेत ज्या ज्ञानाची ‘जाणीव’ झाली, जो ‘शब्द’ त्यांना ध्यानाच्या अवस्थेत ऐकू आला- तो शब्द किंवा ते शब्द म्हणजे श्रुति. म्हणजेच ‘वेद’. वेद हे अपौरुषेय आहेत असे जे म्हणतात ते त्याचमुळे. वेद हे कोणी ‘रचले’ नाहीत किंवा बनवले नाहीत, तर ते ‘स्फुरले’. म्हणून ते अपौरुषेय. आणि त्या प्रत्येक वेदांतील शेवटचा आणि अत्यंत सारगर्भ असलेला भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदें अनेक आहेत, पण आद्य शंकराचार्यांनी ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, बृहदारण्यक आणि  छान्दोग्योपनिषद् या १०   मुख्य उपनिषदांवर भाष्य लिहिले आहे.

तर उपनिषद हे प्रस्थानत्रयीमधील प्रथम म्हणजे ‘श्रुति प्रस्थान’ म्हणून ओळखले जातात.

स्मृति म्हणजे आठवणीतून लिहिलेले इतर साहित्य. मग त्यात भगवद्गीता आली, सगळे शास्त्र आले, दर्शन, योगसूत्र, सांख्य, रामायण, महाभारत इत्यादि रचना आल्या.

प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर कुठल्या तरी निष्कर्षाला पोंचणे, याला ‘न्याय’ म्हणतात. ब्रह्मसूत्र हे स्वतः वेदव्यास (बादरायण) यांनी रचलेले आहे. आणि ते ‘न्याय’ या संज्ञेत येते.    त्यात उपनिषदांतील इतस्ततः विखुरलेले ज्ञान एका ठिकाणी आणून, ५५५ ‘सूत्रां’ मध्ये क्रमवार आणि पद्धतशीर एकत्र केले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्राने त्याची सुरुवात होते, आणि प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर ‘ब्रह्म’ म्हणजे काय याचे विवेचन केलेले आढळते.

भारतवर्षात जेंव्हा कुठल्याही आचार्यांना आपले मत मांडायचे असेल, तेंव्हा त्यांनी प्रथम या प्रस्थानत्रयींवर भाष्य करून आपले मत मांडणे अपेक्षित असे. आद्य शंकराचार्य यांनी या तिन्हींवर आपले भाष्य लिहिले आहे. निम्बार्काचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्यांनीही या प्रस्थानत्रयींवर भाष्य केले आहे.

यापुढील लेखात आपण वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरच्या एका लेखात आपण छांदोग्योपनिषदात आलेली सत्यकाम जाबाल याची अत्यंत रोचक कथा पाहणार आहोत.

वरील सर्व विषयांवर मला मिळालेली माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहे. या विषयात रस असणाऱ्या वाचकांनी येणारे लेख नक्की वाचावे.

माधव भोपे

Gita Quiz-2 -Simple quiz on Gita 12th Chapter

12 chapter

 

।। अथ द्वादशोऽध्यायः ।।
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

भगवंताने गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या 33 आणि 34 व्या श्लोकांमध्ये ज्ञानयोगाचे महत्त्व सांगितले, नंतर पाचव्या अध्यायाच्या 16, 17 व्या आणि 24 ते 26 या श्लोकांमध्ये, सहाव्या अध्यायाच्या 24 ते 28 या श्लोकांमध्ये आणि आठव्या अध्यायाच्या 11 ते 13 व्या श्लोकांमध्ये निर्गुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व विषद केले.

 

सहाव्या अध्यायाच्या 47 व्या श्लोकात साधक भक्ताचा महिमा सांगितला, आणि सातव्या अध्यायापासून ते 11 व्या अध्यायापर्यंत जागोजागी ‘अहम्, माम्’ आदि पदांद्वारे विशेष रूपाने सगुण साकार आणि सगुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व सांगितले. शेवटी 11 व्या अध्यायाच्या 54 आणि 55 व्या श्लोकात अनन्य भक्तीचा महिमा आणि फळाचे वर्णन केले.

 

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥ मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ११-५५ ॥

 

वरील सर्व वर्णन ऐकून अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की सगुण परमेश्वराची उपासना करणारे आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे? या जिज्ञासेतूनच अर्जुनानाने भगवंताला प्रश्न विचारला-

 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? ॥ १२-१ ॥

 

इथे  एवं या शब्दाने 11 व्या अध्यायातील 55 व्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा भक्तांबद्दल अर्जुन विचारत आहेत.

 

श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।2।।

 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥

 

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ।।3।।

संनियम्येन्द्रिग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ।।4।।

 

परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥ १२-३, १२-४ ॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहविद्भिरवाप्यते ।।5।।

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ॥ १२-५

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।6।।

परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।7।।

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ।।8।।

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥

अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।।9।।

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।10।।

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ।।11।।

जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ॥ १२-११ ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।12।।

मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ॥ १२-१२ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।13।।

जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; ॥ १२-१३ ॥

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद् भक्तः स मे प्रियः ।।14।।

तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे., ॥१२-१४ ॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ।।15।।

ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१५ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद् भक्तः स मे प्रियः ।।16।।

ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१६ ॥

यो न ह्यष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।।17।।

जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥ १२-१७ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ।।18।।

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते ॥ १२-१८ ॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।19।।

ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥ १२-१९ ॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तिं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।।20।।

परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥ १२-२० ॥

ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः

Gita Quiz- गीतेवर आधारित प्रश्नोत्तरें

bhagavad-gita-quiz

भगवद्‌गीता हा प्राचीन भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील असलेला हा ग्रंथ ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.


सुमारे ५००० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.


महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५ व्या अध्याया पासून ते ४२ व्या अध्यायापर्यन्त संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.


गीतेतील असलेले ७०० श्लोक खालीलप्रमाणे १८ अध्यायांत सांगितले आहेत:


अध्याय शीर्षक श्लोक
अर्जुनविषादयोग ४७
सांख्ययोग(गीतेचे सार) ७२
कर्मयोग ४३
ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) ४२
कर्मसंन्यासयोग २९
आत्मसंयमयोग ४७
ज्ञानविज्ञानयोग ३०
अक्षरब्रह्मयोग २८
राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) ३४
१० विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) ४२
११ विश्वरूपदर्शनयोग ५५
१२ भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) २०
१३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३४
१४ गुणत्रयविभागयोग २७
१५ पुरुषोत्तमयोग २०
१६ दैवासुरसंपद्विभागयोग २४
१७ श्रद्धात्रयविभागयोग २८
१८ मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) ७८
  एकूण श्लोक ७००

गीतेची सुरुवात

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥“ या श्लोकापासून होते, आणि शेवट

‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम

या श्लोकाने होते. अशा पासून सुरू होऊन र्म ने संपणाऱ्या ७०० श्लोकांमध्ये पूर्ण धर्माचे सार आले आहे असे म्हटले तरी हरकत नाही.

जीवनविषयक तत्वज्ञान गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे काही काहीजण खालीलप्रमाणेही वर्गीकरण करतात-

कर्मयोग (अध्याय १-६)

भक्ती योग (अध्याय ७-१२)

ज्ञान योग (अध्याय १३-१८)


गीतेची अठरा नावे

गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी।।
अर्धमात्रा चिदानन्दा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी पराऽनन्ता तत्त्वार्थज्ञानमंजरी।।
इत्येतानि जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः।
ज्ञानसिद्धिं लभेच्छीघ्रं तथान्ते परमं पदम्।।

 


गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानन्दा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनन्ता और तत्त्वार्थज्ञानमंजरी (तत्त्वरूपी अर्थाच्या ज्ञानाचे  भंडार) या प्रकारे  (गीतेच्या) अठरा नावांना जो मनुष्य स्थिर मनाने नित्य जप करताो, तो शीघ्र ज्ञानसिद्धि आणि अंती परम पदाला प्राप्त होतो.


आज गीताजयंतीच्या शुभमुहूर्तापासून आपण श्रीमद् भगवद् गीतेवर आधारित क्विझ सुरू करीत आहोत.

आपला वेळ सत्कारणी लागण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन व्हावे या हेतूने हे क्विझ सुरू करीत आहोत.

आपण सर्वांनी वरील लेख पूर्ण वाचला असेल तर मग चला, आपण वरील लेखावर आधारित असलेल्या खालील प्रश्नांची उत्तरें देऊ यात.

Suffering and awakening

spiritualism 4552237 1920 1024x739 1

There is a fundamental misconception and often unconscious misconception in human beings. We believe that the world has the ability to make us happy, but this is being withheld from us. And that we regard that as a personal insult that life is doing to us.

 Why is life withholding happiness from me?  Why all these things always happen to me?  Because it’s not happening to others!

 You read their Facebook posts!  They’re all happy!

They’re eating meals. You see pictures of meals. And then you see their happy faces. And not only are they happy, they’re also so good looking.😊.  Everybody’s good looking. What we forget is that it’s the technology of filters and stuff. Everyone can look beautiful using technology.

So people watch that and said wow, these people’s lives are so great.

 My mind is so awful. And then you also pretend to be happy. Because everybody else is pretending.

So, the misconception is, “The world is here to make me happy, but it’s not doing it.”

 And this is a very serious misconception because it makes your whole life miserable.

Because that  means  something  that should be happening is not happening in my life.  It’s just not happening.

But of course, that misconception is that the world is here to make you happy, and it can’t do that. It’s not here to make you happy, it’s here to make you conscious, to awaken you.

Then you realize, ” I was wrong all along. I’ve been complaining uselessly for all these years . I’ve been complaining uselessly for 40 years that’s there’s something wrong with the world.”

But there wasn’t anything wrong at all. Because the world is here to awaken me.

If humans are not challenged, or why just humans, any life form, only grows through being challenged, which means encountering  obstacles and difficulties in their process of growth.

Even plants and animals, all encounter diffficulties. Every life form is precarious, its existence is precarious, and it encounters obstacles to its unfoldment. And that, ultimately, is how evolution happens. Through encountering difficulties, obstacles, challenges.

 Because as you encounter the obstacles and challenges, they seem to block you. And you think life would be much better if I did not have these challenges. But it wouldn’t because you would go to sleep if you did not have challenges.  So having challenges brings about an influx of energy on whatever level, even if it’s physical. And every organism gains new strengths by attempting to overcome these limitations. If you want to become physically stronger, you have to exercise.

( Unless you have a job that is physically hard working andforces you to exert yourself physically. )

Otherwise you have to exercise if you want to grow stronger. You have to lift weights. How does that feel at first? It feels painful. You are making life difficult for your body. Because your body is not going to grow stronger unless you make your the body’s life difficult. Your body would be so relaxed sitting on the on the sofa and watching Netflix. But it’s not going to grow stronger. It’s actually getting weaker because it’s not being challenged. But challenge it, and then there is a demand for added energy and this  just operates on the physical level and there’s a moment when there’s a gap. Exerting yourself and the energy isn’t there yet, so it’s very hard, but at some point the energy comes flooding in because there was a demand for it. And at that point you may actually begin to enjoy the physical movement because of this added energy and suddenly,  strength is increasing and this is just on the physical level. But it can also operate on a psychological level and on a spiritual level.

When you become very unhappy in your life then there is a possibility that the unhappiness causes you to awaken because at some point you realize either because you had a spiritual teacher or  even in some people it happens spontaneously.

The psychological suffering that humans undergo can at some point bring about an awakening when you just can’t stand it anymore.

 And something snaps and suddenly an awakening happens. But it would not have happened if you hadn’t gone through those sometimes years of suffering.

People tell that they  would not have understood the spiritual books or open to anything spiritual if they  had not experienced a serious, very serious illness or an accident or some deep loss in their personal lives.

There would not have been an opening if you had not gone through that suffering. And at some point the suffering awakens you. And really the ultimate purpose of suffering is to awaken.

And then you realize that most suffering is actually unnecessary. It’s actually created by the ‘conditioned entity’- ‘unconscious thought processes’ . Physical pain isn’t suffering. Suffering is a psychological phenomenon. This suffering, can be transcended. If you awaken, you transcend. In other words, you transcend unhappiness. You are no longer unhappy.

 The mind loses its power to make you unhappy because most of your unhappiness is created by the ‘unconscious thought processes’ , not situations. Most of unhappiness is created not by difficult situations that you encounter, but what your mind is  telling you about the difficult situations.

The situation itself is as it is. Then you impose an interpretation on it. The interpretation says this should not be happening. This is awful. Why always to me? Why, why did he do that? That causes the unhappiness and strengthens the fictitious self. is the commentary, the interpretation. And it is an amazing realization that most of your unhappiness is ‘created’!. by your mind.

As you become more present, unhappiness  disappears from your life.

Is it saying  that you will then always be happy? No. It’s not so. Obviously even as your unhappiness leaves you and you become more present, situations arise where you cannot say that you’re happy. Somebody close to you dies. Your father, your mother, or even a child or somebody or something very bad. An accident happens to someone you and you can’t say  I’m still happy.. Sadness will come. And yet, you are not consumed by the sadness. It comes as a wave. And you may weep because somebody close to  you died. There’s still a substratum of peace underneath it.

It may not be called happiness, but it’s deeper than that. There is an all abiding peace underneath it, although there may be tears on the surface.  And you don’t perpetuate emotional pain by continuously thinking about it for months and years. It comes as a wave and then it subsides and even when it’s there, there is still a presence of quietness that you can sense underneath it.

From the talks of Echkart Tolle, the German born spiritual teacher.

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys