https://goodworld.in A website by Madhav Bhope

Suffering and awakening

spiritualism 4552237 1920 1024x739 1

There is a fundamental misconception and often unconscious misconception in human beings. We believe that the world has the ability to make us happy, but this is being withheld from us. And that we regard that as a personal insult that life is doing to us.

 Why is life withholding happiness from me?  Why all these things always happen to me?  Because it’s not happening to others!

 You read their Facebook posts!  They’re all happy!

They’re eating meals. You see pictures of meals. And then you see their happy faces. And not only are they happy, they’re also so good looking.😊.  Everybody’s good looking. What we forget is that it’s the technology of filters and stuff. Everyone can look beautiful using technology.

So people watch that and said wow, these people’s lives are so great.

 My mind is so awful. And then you also pretend to be happy. Because everybody else is pretending.

So, the misconception is, “The world is here to make me happy, but it’s not doing it.”

 And this is a very serious misconception because it makes your whole life miserable.

Because that  means  something  that should be happening is not happening in my life.  It’s just not happening.

But of course, that misconception is that the world is here to make you happy, and it can’t do that. It’s not here to make you happy, it’s here to make you conscious, to awaken you.

Then you realize, ” I was wrong all along. I’ve been complaining uselessly for all these years . I’ve been complaining uselessly for 40 years that’s there’s something wrong with the world.”

But there wasn’t anything wrong at all. Because the world is here to awaken me.

If humans are not challenged, or why just humans, any life form, only grows through being challenged, which means encountering  obstacles and difficulties in their process of growth.

Even plants and animals, all encounter diffficulties. Every life form is precarious, its existence is precarious, and it encounters obstacles to its unfoldment. And that, ultimately, is how evolution happens. Through encountering difficulties, obstacles, challenges.

 Because as you encounter the obstacles and challenges, they seem to block you. And you think life would be much better if I did not have these challenges. But it wouldn’t because you would go to sleep if you did not have challenges.  So having challenges brings about an influx of energy on whatever level, even if it’s physical. And every organism gains new strengths by attempting to overcome these limitations. If you want to become physically stronger, you have to exercise.

( Unless you have a job that is physically hard working andforces you to exert yourself physically. )

Otherwise you have to exercise if you want to grow stronger. You have to lift weights. How does that feel at first? It feels painful. You are making life difficult for your body. Because your body is not going to grow stronger unless you make your the body’s life difficult. Your body would be so relaxed sitting on the on the sofa and watching Netflix. But it’s not going to grow stronger. It’s actually getting weaker because it’s not being challenged. But challenge it, and then there is a demand for added energy and this  just operates on the physical level and there’s a moment when there’s a gap. Exerting yourself and the energy isn’t there yet, so it’s very hard, but at some point the energy comes flooding in because there was a demand for it. And at that point you may actually begin to enjoy the physical movement because of this added energy and suddenly,  strength is increasing and this is just on the physical level. But it can also operate on a psychological level and on a spiritual level.

When you become very unhappy in your life then there is a possibility that the unhappiness causes you to awaken because at some point you realize either because you had a spiritual teacher or  even in some people it happens spontaneously.

The psychological suffering that humans undergo can at some point bring about an awakening when you just can’t stand it anymore.

 And something snaps and suddenly an awakening happens. But it would not have happened if you hadn’t gone through those sometimes years of suffering.

People tell that they  would not have understood the spiritual books or open to anything spiritual if they  had not experienced a serious, very serious illness or an accident or some deep loss in their personal lives.

There would not have been an opening if you had not gone through that suffering. And at some point the suffering awakens you. And really the ultimate purpose of suffering is to awaken.

And then you realize that most suffering is actually unnecessary. It’s actually created by the ‘conditioned entity’- ‘unconscious thought processes’ . Physical pain isn’t suffering. Suffering is a psychological phenomenon. This suffering, can be transcended. If you awaken, you transcend. In other words, you transcend unhappiness. You are no longer unhappy.

 The mind loses its power to make you unhappy because most of your unhappiness is created by the ‘unconscious thought processes’ , not situations. Most of unhappiness is created not by difficult situations that you encounter, but what your mind is  telling you about the difficult situations.

The situation itself is as it is. Then you impose an interpretation on it. The interpretation says this should not be happening. This is awful. Why always to me? Why, why did he do that? That causes the unhappiness and strengthens the fictitious self. is the commentary, the interpretation. And it is an amazing realization that most of your unhappiness is ‘created’!. by your mind.

As you become more present, unhappiness  disappears from your life.

Is it saying  that you will then always be happy? No. It’s not so. Obviously even as your unhappiness leaves you and you become more present, situations arise where you cannot say that you’re happy. Somebody close to you dies. Your father, your mother, or even a child or somebody or something very bad. An accident happens to someone you and you can’t say  I’m still happy.. Sadness will come. And yet, you are not consumed by the sadness. It comes as a wave. And you may weep because somebody close to  you died. There’s still a substratum of peace underneath it.

It may not be called happiness, but it’s deeper than that. There is an all abiding peace underneath it, although there may be tears on the surface.  And you don’t perpetuate emotional pain by continuously thinking about it for months and years. It comes as a wave and then it subsides and even when it’s there, there is still a presence of quietness that you can sense underneath it.

From the talks of Echkart Tolle, the German born spiritual teacher.

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

छोटी रेषा, मोठी रेषा

small line- big line

छोटी रेषा- मोठी रेषा

बऱ्याच वेळी, कुठल्या ना कुठल्या अगदी छोट्याश्या कारणामुळे, मन दुःखी होते, आपल्यासारखे कमनशिबी आपणच, असे वाटू लागते. आपल्याला आपलीच कीव येऊ लागते. त्यासाठी कारण, ज्याला English मध्ये “trigger” म्हणतात, ते, अगदी छोट्यातले छोटे कारण ही पुरेसे होते. अगदी, आपल्याला घरी, रोजच्या वेळी चहा नाही मिळाला, घरातला फॅन बिघडला, आणि मेकॅनिकला फोन करूनही तो वेळेवर आला नाही, आणि त्याच वेळी, सुट्टीचा दिवस असूनही, आपली आवडती मॅच सोडून आपल्याला ते काम करावे लागले, इ. कोणतेही कारण या दुःखी होण्याला पुरेसे होते. आपली कोणालाच पर्वा नाही. आपण किती कष्ट करतो याची कोणाला जाणीव नाही,. इ. इ. एकदा विचारांची गाडी सुरू झाली, आणि तिला जर रोकले नाही, तर ती कुठपर्यंतही भरकटत जाऊ शकते.

ज्या  माणसांना  आयुष्यात सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतात, सगळे व्यवस्थित चाललेले असते, अशांना विशेषतः असे प्रसंग खूप येतात. कारण खरे दुःख काय ते कधी पाहण्याचे, अनुभवण्याचे काम पडलेले नसते. खरे पाहिले  तर आपण जे जीवन आज जगतो, ते कुणाचे तरी स्वप्न असू शकते. कल्पना करा. आपण सकाळीच घरातून बायकोशी भांडून, रागारागाने, नाष्टा न करता, कार घेऊन, ऑफिसला निघालो आहोत. रस्त्याने एक जण हातगाडीवर माल भरून, उन्हाचा चटका असतांनाही, विकायला निघालेला आहे. त्याच्याकडे स्वतःचे घर नाही, भाड्याच्या छोट्याश्या जागेत राहतो आहे, नवरा बायको दोघे काम करतात, लहान दोन छोट्याशा मुलांना शेजारणीच्या हवाली करून निघालेले आहेत. तो जो हातगाडीवाला आहे, तो आपल्याकडे बघतांना, आपल्यासारखे होण्याचे स्वप्न बघत नसेल कशावरून? आपण मस्त एसी गाडीत ऑफिसला चाललो आहोत. एक दिवस आपल्यासारखे घर, गाडी इ. असावे हे त्याचे स्वप्न असू शकते.

लहान मुलें कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला दाखवायला आणतात आणि आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरतात. त्यांना वाटत असते, की ही गोष्ट, दुसऱ्याच्या डोळ्याच्या जितक्या जवळ नेऊ, तितकी त्याला चांगली, स्पष्ट दिसेल. पण मग आपण ती गोष्ट, तो कागद, धोड्या अंतरावर धरतो, मग तो कागद किंवा ती गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आयुष्यातही असेच असते. एखाद्या गोष्टीत आपण जितके लिप्त होतो, एकरूप होतो, तितके आपले perspective म्हणजे योग्यपणे जाणून घेण्याची क्षमता कमी होते, आणि आपण त्या बाबतीत स्वतःकडे अलिप्तपणे बघू शकत नाही. जेंव्हा त्या गोष्टीत आणि आपल्यात थोडे अंतर ठेवून पाहण्याची जाण येते, त्यावेळी कुठलीही गोष्ट, म्हणजेच वस्तू, व्यक्ति, परिस्थिती आपल्याला एवढी व्याकुळ नाही करू शकत.

या बाबतीत एक गोष्ट वाचण्यात आली. आपण एखाद्या वेळी क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होतो, अशावेळी ही गोष्ट आठवून बघावी.

एकदा एक राजकुमार आणि त्याचे 5-7 मित्र घोड्यावरून असेच फिरायला निघाले होते. रस्त्याने काही गुजर स्त्रिया दूध, दही, ताक इत्यादीची विक्री करायला निघाल्या होत्या.

राजकुमाराला भगवान श्रीकृष्णासारखे गोपींची छेड काढण्याची लहर आली. त्याने विचार केला यांचे मटके फोडू, आणि नंतर यांना त्याचे पैसे देऊन देऊ! आणि त्याने गमती गमतीत त्या गुजर स्त्रियांचे मटके, दगड मारून, फोडले. त्या स्त्रिया रडू लागल्या.

पण त्यातील एक गुजरी अशी होती, की जिचे मडके फुटले, दूध दही ताक सांडले, तरी ती काहीच बोलली नाही, उलट हसू लागली.  तेंव्हा राजकुमार तिला म्हणाला, तुला काहीच वाटले नाही का? तू रडत का नाहीस? गुजरी म्हणाली, महाराज, माझी कहाणी फार मोठी आहे. मी ताक सांडल्याचा काय शोक करू? राजकुमारने तिला तिची कहाणी सांगण्याविषयी आग्रह केला, तेंव्हा ती सांगू लागली.

मी अमुक एका शहरातील नगरसेठची पत्नी होते, मला एक छोटेसे मूल होते. सेठ धन कमविण्यासाठी दुसऱ्या प्रदेशात दूर गेले होते. त्या नगराच्या राजाची नीयत खराब होती. माझे सुंदर रूप पाहून राजाची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्याने मला निरोप पाठवला की अमुक दिवशी मला भेटायला ये. तू केंव्हा येशील याचे उत्तर दे. मी त्याला थोडे थांबण्याची विनंती केली, पतीला चिठ्ठी पाठवली आणि त्याला सगळे कळवून लवकर येण्याविषयी सांगितले. पति आला, त्याला सगळा वृत्तान्त सांगितला, मग आम्ही दोघांनी मिळून विचार केला, की काय करावे? पतीने सांगितले, तू राजाला वेळ दे. मी राजाला वेळ देऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले, पण ही अट घातली की त्याच्या आसपास मैलभर कोणीही नसावे. राजा तयार झाला. आम्ही दोघे पति पत्नी घरून निघालो. मी तलवार घेऊन निघाले. पति त्या जागेपासून जवळच एका पडक्या घरात लपून बसला. राजा आला, तेंव्हा मी मोठी हिम्मत करून, राजाला तलवारीने मारून टाकले, आणि धावत पतीजवळ गेले. पाहते तर तेथे पतीला विषारी सापाने दंश केला होता, आणि तो तिथे मरून पडला होता. मग मी एकटीच तिथून पळाले, कारण सापडले असते, तर मला लोकांनी मारून टाकले असते. मूल माझे, घरीच राहिले.

पुढे पळता पळता जंगल लागले, तिथे डाकू भेटले, त्यांनी मला पकडले. माझे सगळे दागिने ओरबाडून घेतले, आणि मला एका वेश्येच्या घरी नेऊन विकून टाकले. आता मी तिथे राहू लागले. तिकडे आमच्या गावात दुसरा राजा झाला. त्याने माझ्या मुलाचा सांभाळ करून त्याला मोठे केले. तो माझा मुलगा मोठा होऊन तिथेच नोकरी करू लागला. इकडे वेश्यान्च्या संगतीत राहून मीही तेच काम करू लागले. एके दिवशी माझा मुलगा माझ्याकडे आला, आणि रात्रभर राहिला. मला नंतर शंका आली म्हणून सकाळी मी त्याला ओळख विचारली, तेंव्हा त्याने नांव पत्ता सांगितला, तेंव्हा कळाले की हा माझाच मुलगा! मला स्वतःची अत्यंत किळस आली, दुःख झाले, की मी कोण होते आणि कुसंगतीने काय झाले. पंडित लोकांना विचारले की असे पाप झाले, तर काय करावे. त्यांनी सांगितले, चिता पेटव आणि त्या आगीत जाऊन बैस. मनात विचार अला, की चिता पेटवली आणि त्यात जाऊन बसले, तर नंतर अस्थि गंगेत कोण टाकेल? म्हणून गंगा किनाऱ्यावर जाऊन, लाकडे एकत्र करून, चिता रचून त्यावर बसले आणि ती पेटवली. लाकडे जळू लागली. इतक्यात गंगेला पूर आला. आग विझली, मी बेशुद्ध झाले, आणि एका लाकडाच्या ओंडक्यासोबत वाहत वाहत दूर एका गावाच्या किनाऱ्यावर जाऊन पोंचले. त्या गावात गुज्जर लोकांची वस्ती होती.  त्यांनी मला वाचवले, आणि माझ्यावर उपचार केले आणि नंतर त्यांनीच माझा सांभाळ केला. आता या गुज्जर लोकांचे दही दूध ताक विकून आपला उदर निर्वाह करते.!

आता तूच सांग राजा, मटका फुटून ताक सांडले, तर त्याचा काय शोक करू?

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

 

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

तसेच आपले न जाणो याआधी किती जन्म झाले आहेत, आणि प्रत्येक जन्मात काय काय दशा झाली आहे.. हे सगळे कितीदा मिळाले आणि कितीदा गेले. यापुढे छोट्याश्या गोष्टींची काय आणि किती चिंता करायची!

 

 

 

 

 

 

 

Go to our Amazon Shop to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

   यही कथा हिन्दी में 

अब छाछ को सोच कहा कर है!

 

एक राजकुमार था| उसके पाँच-सात मित्र घोड़ों पर घूम रहे थे| वहाँ बहुत-सी गूजर-स्त्रियाँ दूध, छाछ, दही आदि की बिक्री करने को जा रहीं थीं|

 

राजकुमार को भगवान् श्रीकृष्ण की याद आ गयी कि वे दूध-दही लूटा करते थे तो हम भी आज वैसा ही करें| एक तमाशा कर लें, फिर उनको दाम दे देंगे| राजकुमार और उसके साथियों ने उनके मटके फोड़ दिये| गूजरियाँ बेचारी रोने लगीं|

 

उनमें से एक गूजरी ऐसी थी, जिसका मटका फूट गया, छाछ बिखर गयी, फिर भी वह हँस रही थी! राजकुमार ने उससे पूछा कि तू रोयी नहीं, क्या बात है? उसने कहा कि महाराज! मेरी बात बहुत लम्बी है! मैं छाछ गिरने का क्या शोक करूँ? राजकुमार ने उससे कहा कि अपनी बात सुनाओ| वह कहने लगी-

 

मैं अमुक शहर के एक सेठ की पत्नी थी और मेरी गोद में एक बालक था| वे सेठ कमाने के लिये दूसरे देश में चले गये| वहाँ के राजा की नियत खराब थी| मेरी छोटी अवस्था थी और सुन्दर रूप था| राजा ने मेरे पर खराब दृष्टि कर ली और कहा कि अमुक दिन तेरे को आकर मिलना ही पड़ेगा, तुम कब आओगी, जवाब दो| मैंने कहा कि अभी ठहरो| मैंने अपने पति को पत्र भेजा कि जल्दी आओ, मेरे पर ऐसी आफत आयी है| पति आ गया| उससे सारी बात कही और आपस में सलाह की कि क्या किया जाय? सेठ ने कहा तुम राजा को समय दे दो| मैंने राजा के पास समाचार भेज दिया कि आप शहर के बाहर अमुक जगह रात में आ जाओ, पर शर्त यह है कि उस स्थान के मिल भर नजदीक में कोई अन्य व्यक्ति न रहे| राजा ने स्वीकार कर लिया| हम दोनों पति-पत्नी घर से निकल गये कारण कि यहाँ टिक नहीं सकेंगे| मैं रात्रि में वहाँ तलवार लेकर गयी| पति को एक टूटे-फूटे मकान (खँडहर)-में छिपने के लिये कह दिया| जब राजा आया तो मैंने तलवार से उसको मार दिया और भागकर पति के पास गयी| वहाँ जाने पर मैंने पति को मरा हुआ पाया! उसको जहरीले साँप ने काट लिया था| फिर तो मैं अकेली वहाँ से भागी कि अगर पकड़ी गयी तो लोग मेरे को मार देंगे| लड़का पीछे छूट गया|

 

आगे भागते हुए जंगल आ गया तो वहाँ डाकू मिल गये| उन लोगों ने मेरे को पकड़ लिया, मेरे सब गहने छीन लिये और वैश्या के घर ले जाकर बिक्री कर दिया| अब मैं वहाँ रहने लगी| उधर दूसरा राजा बैठा तो उसने मेरे लड़के को पालकर बड़ा किया| मेरा लड़का वहीं राज्य में नौकरी करने लगा| इधर वेश्याओं के संग के प्रभाव से मैं भी वैश्या हो गयी| एक बार वह लड़का मेरे यहाँ आया और रातभर रहा| मेरे को वहम हो गया कि यह कौन है? सुबह होते ही पूछा तो उसने अपना नाम पता बताया, तब पता लगा कि अरे! यह तो मेरा ही बेटा है! मेरे को बड़ी ग्लानि, बड़ा दुःख हुआ कि मैं क्या थी और कुसंग के प्रभाव से क्या हो गयी! पण्डितों से पूछा कि ऐसा पाप किसी से हो जाय तो क्या करे? उन्होंने बताया कि चिता जलाकर आग में बैठ जाय| विचार आया कि चिता में बैठ जाऊँगी तो पीछे से गंगा जी में फूल कौन डालेगा? इसलिये गंगा के किनारे लकड़ियाँ इकट्ठी करके बैठ गयी और आग लगा दी| लकड़ियाँ जलने लगीं| इतने में पीछे से बाढ़ आ गयी| आग बूझ गयी और एक लकड़ी पर बैठ-बैठ एक गाँव-के किनारे पहुँच गयी| उस गाँव में गूजर बसते थे| अब वहाँ उनकी चीज बिक्री करके काम चलाती हूँ| आज छाछ लेकर आयी थी| छाछ गिर गयी तो अब इसकी चिन्ता क्या करूँ?

 

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

 

जीवन में ऐसी घटनाएँ घटी है, क्या-क्या दशा हुई है, अब थोड़े-से नुकसान में क्या चिन्ता करूँ? ऐसी बातें तो होती रहती हैं और बीतती रहती हैं| अब छाछ गिर गयी तो क्या हो गया! हमारे न जाने कितने जन्म हुए हैं और उनमें क्या-क्या दशा हुई है! उनमें कभी बेटा मर गया, कभी पति मर गया, कभी पत्नी मर गयी| कभी धन आया, कभी धन चला गया| ये सब कई बार मिले और कई बार बिछुड़े| हवा चलती है तो कहाँ-कहाँ का फूस आकर इकट्ठा हो जाता है और दूसरे झोंके में अलग हो जाता है| इसमें नयी बात क्या हो गयी! संसार में सब आने-जाने वाले हैं| इनके लिये क्या चिन्ता करें?

 

 

 

 

 

Adi Shankaracharya & Samarth Ramdas आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास

Shankara & Samartha

Adi Shankaracharya and Samartha Ramdas

आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास 

 

लेखक: श्री पांडुरंग देशपांडे 

आपल्या देशात संत आणि महापुरुषांची कमी नाही. त्याबाबतीत आपला देश हा खूप भाग्यवान आहे. त्यापैकी काही सत्पुरुष ही ‘अवतार’ या श्रेणीमध्ये येतात. इसवी सनाच्या 8 व्या आणि नवव्या शतकात होऊन गेलेले, आदि शंकराचार्य हे अवतार या श्रेणीत येतात. आपण त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानतो. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येणाऱ्या अनेक शतकांत उपयोगी पडणारे कार्य करून ठेवले आहे. तसेच त्यामानाने अलिकडच्या काळात झालेले दुसरे सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास. रामदास हेही मारूतीचा अवतार आहेत असे आपण मानतो.

रामदासांनी त्या काळात अत्यंत आवश्यक असे समाज प्रबोधनाचे आणि शक्ति उपासनेचे  कार्य तर केलेच. पण व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालून, सामान्यातल्या सामान्याला परमार्थ सोपा करून सांगितला.

समर्थ रामदासांनी मुख्यतः जरी भक्तिमार्ग प्रशस्त केला असला, तरी त्यांच्यावर आदि शंकराचार्य यांच्या अद्वैत मार्गाचाही खूप प्रभाव होता.

लग्नमंडपात ‘सावधान ‘ शब्द ऐकून पळालेले नारायण काही दिवसांनी पंचवटी,नाशिक येथे आले. तिथे ते सुरुवातीला राम मंदिरात आणि नंतर शंकराचार्यांच्या  आश्रमात राहिले असावेत. .तिथेच  सेवा  करताना त्यांना आचार्यांच्या कार्याचा परिचय झाला असावा.

आचार्यांचे स्तोत्र वाङ्मय व  त्यांचे ‘प्रकरण’ ग्रंथ, विशेषतः हस्तामलक, शुकाष्टक, अद्वैतानुभूती,पंचीकरण, आत्मबोध,शतश्लोकी  वगैरेंचे अध्ययन या मठात प्रारंभी त्यांनी केले असावे. संस्कृत भाषेचा परिचय करून घेऊन गीता,भागवत रामायण, महाभारत,योगवासिष्ठ वगैरे ग्रंथांचे त्यांनी श्रवण,अध्ययन केले असावे. संगीताचे ज्ञानही त्यांनी करून घेतले असावे.  त्यामुळेच रागज्ञान, तालज्ञान इत्यादि विषयी त्यांचे दासबॊधामध्ये उल्लेख आले आहेत.

मठात राहत असताना त्यांनी आचार्यांची स्तोत्रे,भगवदगीता आत्मसात केली.आद्य शंकराचार्यांच्या वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या कार्याचाही त्याच्या मनावर पूर्ण ठसा उमटला आहे असे समर्थ साहित्य वाचताना आपणास जाणवते. ‘त्वं तत्वमसि’ या तेथील महावाक्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम आपणाला  दासबोधात दिसतो.

‘समर्थप्रताप ‘ या ग्रंथात श्री गिरिधरस्वामींनी त्या दोघांमधील साम्य दाखविले आहे:

समर्थ अवतार निरोपमा / आचार्य स्वामींची साजे उपमा /

ब्रह्मचर्याश्रमी  परमहंसमहिमा / ब्राह्मण्यरक्षणी अवतारु //

ब्रह्मसूत्र आचार्यदेवी रक्षिले / ब्रह्मआरण्य समर्थदेवे संरक्षिले /

कलयुगीं संन्यासग्रहण आश्चर्ये चालविले/ विचार संन्यास समर्थांचे //

आचार्यस्वामी शंकरमूर्ती / समर्थस्वामी महारूद्रमूर्ती /

आत्मलिंग आत्माराममूर्ती / दक्षिणामूर्ती दक्षिणे  //

अद्वैत आणि भक्ती हे समर्थानी मांडलेले प्रमुख सिद्धांत आहेत.

अद्वैताच्या दृष्टीने पहिले तर मायावाद आणि निर्गुणाचा पुरस्कार या दृष्टीने समर्थ आचार्यांच्या जवळ वाटतात. समर्थांनी आचार्यांचा कर्मसंन्यास स्वीकारलेला नाही आणि ज्ञानापेक्षा भक्तीला त्यांनी अधिक महत्व दिलेले आहे.समर्थांचे मायाब्रह्माचे निरूपण पहिले की आचार्यांचा मायावाद त्यांनी  स्वीकारला आहे याची खात्री पटते. मायेच्या रूपाचा आणि कार्याचा अगोदर छडा लावावा लागतो .

आधी मिथ्या उभारावे  /मग ते वोळखोन सांडावे /

पुढे सत्य ते स्वभावे / अंतरी बाणे // (दास. ७.३.४ )

शंकराचार्यांनीही आपल्या ब्रह्मसूत्रभाष्याचा प्रारंभ अध्यासाच्या (Superimposition) विवेचनाने  केला आहे.

समर्थ पंचवटीतील ज्या शंकरमठात राहत होते तो स्वरूपसंप्रदाय मठ तत्कालीन द्वारिकापीठाच्या अधिकाराखाली होता. त्या द्वारिकापीठाचे आद्य आचार्य हस्तामलक  होते. प्रत्येक मठात

  • नाव व कार्यक्षेत्र ( पश्चिम,पू्र्व ,उत्तर आणि दक्षिण),
  • त्याचे आचार्य,क्षेत्र,देव,देवता,संप्रदाय (स्वरूप,प्रकाश,आनंद व चैतन्यमय),
  • त्या मठाचा वेद(अनुक्रमे साम,ऋक्,अथर्व आणि यजुस्) व
  • महावाक्य (तत्वमसि,प्रज्ञानं ब्रह्म,अयतात्मा ब्रह्म व अहं ब्रह्मास्मि)

आद्य शंकराचार्यांनी अनुशासित करून दिले होते.

आपण द्वारका,पुरी ,बदरिकाश्रम,व शृंगेरी  ही आद्य पीठे जाणतोच. याशिवायही अजून तीन पंथाचे-आम्नायांचे मठ आहेत.

या मठात राहून, शिकूनच समर्थानी आपल्या स्वतंत्र बुद्धीने आपल्या कुळात  चालत असलेल्या रामोपासनेचा तसेच रामाचा दास असलेल्या एकनिष्ठ मारुतीचा  समावेश करून आपला स्वतंत्र नवा ‘स्वरूप’ संप्रदाय उभारला. त्यांनी आचार्यांच्या मठ अनुशासनातील वरील  सर्व संकल्पनांचा उपयोग करून घेतला आहे हे त्यांच्या दासबोधाच्या (आपण सर्व पठण करत असलेल्या) आत्मनिवेदनपर ओव्यांतून व्यक्त होतात…

हनुमंत आमची कुळवल्ली  / राममंडपा वेला गेली /  श्रीरामभजने फळली /रामदास बोले या नावे //

आमुचे कुळी हनुमंत /हनुमंत आमुचे दैवत /तयवीण आमुचा परमार्थ /सिद्धीते ना पावे सर्वथा //

साह्य आम्हांसी हनुमंत /आराध्यदैवत श्री रघुनाथ / श्रीगुरुश्रीराम समर्थ /काय उणे दासासी  //

दाता  एक रघुनंदन / वरकड लंडी देई कोण /तया सोडोन आम्ही जन जे /कोणा प्रति मागावे //

म्हणोनि आम्ही रामदास /श्रीरामचंद्रानी आमुचा विश्वास /कोसळोनि पडो हे आकाश /आणिकाची वास ना पाहू //

स्वरूपसंप्रदाय अयोध्यामठ / जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत / मारुती उपासना नेमस्त /वाढविला परमार्थ रामदासी //

नवा अयोध्यामठ,देव रघुनाथ,देवता जानकी ,नेमस्त (ब्रह्मचारी)मारुतीसारखी उपासना आहे… अशा नव्या परमार्थपर ‘स्वरूप ‘संप्रदायाची समर्थानी स्थापना करून लोकप्रबोधन आणि उद्धाराचे मोठे कार्य  दासबोध इत्यादि साहित्यलेखन करून हाती घेतले  आणि ‘ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशा जयघोषाने  अवघा भारतवर्ष  चेतनामय करून   टाकला !  आचार्य शंकरांसारखेच त्यांनीही देशभर भ्रमण केले आणि नंतर हिंदुस्थानभर हजार मठ उभारले व लोकांना  उपासनामार्गाला लावले.

सनातन धर्माच्या या दोन महान अवतारी सत्पुरुषांना मनोभावे वंदन!

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.

The Story of the 10th Man

story of the 10th man

The story of the 10th Man- दहाव्या माणसाची गोष्ट

वेद आणि उपनिषदांत त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितले आहेत. काही काही सिद्धांताना “ महावाक्य” असे म्हणतात. त्यातील छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसि अर्थात, “तूच ते ब्रम्ह आहेस” हे खूप प्रसिद्ध आहे. 

उपनिषदांतील हे सिद्धांत आपल्या आचार्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींद्वारे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. 

चौदाव्या शतकात विद्यारण्य  स्वामी हे तत्त्वचिंतक होऊन गेले. त्यांनी उपनिषदांतील सिद्धांतावर “पंचदशी” ही टीका लिहिली. त्यात त्यांनी एका मजेदार गोष्टीद्वारे एक मोठे तत्व विषद करून सांगितले आहे.

एकदा दहा मित्र जंगल भ्रमणासाठी निघाले होते. जंगलातून जाता जाता एके ठिकाणी त्यांना एक नदी लागली. नदी चांगलीच खोल होती. त्या नदीतून आपण सर्वजण पलीकडच्या तीरावर सुरक्षित पोंचू की नाही, याविषयी त्या सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली.  तरी सगळे मित्र एकमेकांचे हात धरून कसेबसे नदीच्या पैलतीरावर पोंचले. 

पैलतीरावर आल्यानंतर त्या सर्वांनी ठरवले, की आपण सगळे आलोत की नाही हे एकदा मोजून पाहू. 

ते सर्व गोल करून उभे राहिले. मग त्यातील एकाने त्याच्या डाव्या बाजूपासून मोजायला सुरूवात केली- एक-दोन-तीन- चार..असे करत करत त्याने नऊ पर्यंत मोजले आणि त्याच्या उजव्या हाताच्या मित्रापर्यंत येऊन थांबला. तो एकदम चमकून म्हणाला, “अरे देवा, आपण निघालो तेंव्हा दहा होतो. आणि आता फक्त नऊच आहोत. एक जण कमी आहे! हाय रे दैवा! आपल्यापैकी एक जण बुडाला वाटते.” 

त्याच्या बाजूचा मित्र म्हणाला “ अरे, थांब, थांब. तू नीट मोजले नसशील. मी मोजतो.” असें म्हणून त्यानेही त्याच पद्धतीने मोजले, आणि अर्थातच ते नऊच भरले. आता त्याची खात्री झाली. मग एकेक करत बाकीच्या सर्व मित्रांनी त्याच पद्धतीने मोजले आणि सर्वांची गणती नऊच भरली. तेंव्हा ते सर्व खाली बसून मोठमोठ्याने रडू लागले आणि आपल्यातील एकजण बुडाला म्हणून शोक करू लागले. 

तिकडून एक पांथस्थ चालला होता. त्यांचे रडणे ऐकून तो थांबला, आणि काय झाले म्हणून विचारू लागला. 

तेंव्हा सर्व मित्रांनी त्यांचे रडण्याचे कारण सांगितले. तो वाटसरू हुशार होता. त्याने पट्कन मोजून पाहिले तेंव्हा त्याला दहा लोक दिसले. मग तो त्या सर्वांना म्हणाला, “ शांत व्हा, शोक करू नका. तुमच्यातील कोणीही बुडाले नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा.” 

तेंव्हा ते मित्र त्याला म्हणाले, “तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? तुम्ही आम्हाला दहावा मित्र दाखवा, तर आम्ही विश्वास ठेवू”. 

मग त्या वाटसरूने त्यातील पहिल्या मित्राचा हात धरून त्याला पुन्हा मोजायला सांगितले. एक- दोन करीत तो जेंव्हा नवव्या पर्यंत आला, तेंव्हा मग त्या वाटसरूने त्याचा हात धरून त्या मित्राकडे स्वतः कडे वळविला, आणि म्हणाला, “ त्वं दशमस्ति” तूच तो दहावा आहेस. त्याबरोबर त्या मित्राला परम आनंद झाला आणि  “सापडला, सापडला, दहावा सापडला!” असे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. त्या वाटसरूने एकेक करीत त्या दहाही मित्रांना अशा प्रकारे त्यांच्यातील कोणी हरवला नसल्याची खात्री करून दिली. 

वरील उदाहरणात, वास्तविक, दहावा कुठे गेलेलाच नव्हता, आणि मोजणारा स्वतःच तो होता. पण तो स्वतः ला सोडून सगळ्यांना मोजत होता. 

 

वरील उदाहरणात मनुष्याच्या अध्यात्मिक वाटचालीतील 7 टप्पे आहेत.

  1. Ignorance- अज्ञान- नदीच्या अलीकडील तीरावर असतांना, पुढील मार्गाबद्दल काहीच माहीत नसणे.
  2. Covering of the truth- आवरण. दुसऱ्या टप्प्यात नदीच्या दुसऱ्या तीरावर आल्यावर, एकजण कमी आहे असे वाटणे. म्हणजेच, खरे तर सत्यावर आलेले आवरण.
  3. Suffering- -born out of the first 2 विक्षेप: म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यांमुळे निर्माण झालेले दुःख.
  4. Indirect knowledge- परोक्षज्ञान. जेंव्हा त्याला इतर कुणी( अर्थात गुरु किंवा तत्सम ज्ञानी पुरुष) सत्य परिस्थिती सांगतो, तेंव्हा त्यावर तो विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो.
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान. म्हणजे जेंव्हा त्याला स्वतःला त्या सत्याचा अनुभव येतो.
  6. Removal of sufferning/sorrow-दुःख निवृत्ती. सत्याचा अनुभव आल्यानंतर दुःख नाहीसे होते.
  7. Bliss- – happiness- तृप्ति- त्यानंतर त्याला करण्यासारखे काही राहत नाही. तो कृतकृत्य होतो.

वरील उदाहरण रामकृष्ण मठाचे  स्वामी सर्वप्रियानंद यांच्या प्रवचनातून वेचून, इथे प्रस्तुत केले आहेत. तसेच इतर काही स्रोतांचा इथे वापर केला आहे. 

काहीतरी सकस वाचूयात.
उन्नतीच्या मार्गावर चालूयात!

The story of the 10th Man.

In the Vedas and Upanishads, some eternal principles are stated. These are are called  “Mahavakyas”, meaning the “great phrases.” Of these, the “Tattvamsi” of the Chhandogya Upanishad, which means “You are that Brahma”, is very famous.

These principles in the Upanishads have been explained by various scholars in the ancient times in a very simple manner through some stories.

The 14th century scholar Vidyaranya swami had written a book called “Panchadashi” in which he explains the principle very lucidly with the help of an interesting story.

Once ten friends were passing through a forest.  On their way through the forest, at one point they came across a river. The river was quite deep. They all doubted whether all of them would be able to reach the other end safely.  So all the friends held each other’s hands and somehow reached the other end of the river.

After coming to the other end, they all decided to count their numbers to ensure that none of them was left out.

They all stood in a circle. Then one of them started counting from his left side—  one-two-three, four..In doing so, he counted upto nine and reached for his right-hand friend. Then he stopped as there were no more to be counted. He was terrifed and said, “Oh my God, we were ten when we started. And now we’re only nine. One less!  One of us seems to have drowned!.”

The friend next to him said ” Oh, wait, wait. Perhaps you have not counted properly. Let me count.”  So he counted the same way, and to his horror, it was nine again! So he was also convinced and joined the first friend and started yelling. Then, one by one, all the other friends counted in the same way, and all counted nine. Then they all sat down and started crying loudly and mourning the death of one of them. 

There was a passerby walking from there. Hearing them cry, he paused, and began to ask what had happened.

Then all the friends told him the reason for their grief.  The passerby was a normal person and he could clearly see that there were 10 of them.. Then he said to them, ” Calm down, don’t mourn. None of you have drowned, trust me.”

Then the friend said to him, how can I trust you? If you show us the tenth friend, we’ll believe it.

Then the passerby grabbed the hand of his first friend and asked him to count again. When he came to the ninth, counting from one, two etc,  then the passerby took his hand and turned it to the friend himself, and said, “You are the tenth.” It suddenly dawned on to the first friend that no one was lost and he himself was the 10th one.  With that, the friend was overjoyed and said, “Found, found, tenth found!” So he started dancing with joy. One by one, the passerby convinced all ten friends that none of them had been lost and in fact they were the 10th friend.

The above story depicts 7 stages in the spiritual life of a person.

7 stages in the story of the 10th man

  1. Ignorance- अज्ञान 
  2. Covering of the truth-आवरण 
  3. Suffering- विक्षेप -born out of the first 2. projection of imagined tragedy
  4. Indirect knowledge-परोक्ष ज्ञान 
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान 
  6. Removal of suffering/sorrow-दुःखनिवृत्ती 
  7. Bliss- – happiness-तृप्ति 

The above story and its explanation is sourced from the discourses of Swami Sarvapriyananda of Ramkrishna Math and some other sources.

Let us read something healthy and walk on the path of self realization.

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product 

Interesting story of parrot पोपटाची गोष्ट

story of parrot

Story of parrot

एकदा एक पोपट पकडणारा पारधी होता.  त्याने जंगलात एक पाण्याचे छोटेसे कुंड बनवले होते. त्यावर एक लाकडाची दांडी आडवी ठेवली होती. तिच्यावर पोपट बसला, की ती दांडी उलटी होत असे. पोपट जेंव्हा खाली बघत असे तेंव्हा चहूबाजूनी त्याला खोल पाणी दिसत असे. त्यामुळे पोपट त्या दांडीला घट्ट पकडून ठेवत असे. मग तो पारधी येऊन त्या पोपटाला पकडून नेऊन बाजारात विकत असे. 

हे दृश्य पाहून एका दयाळू माणसाला’ त्या पकडल्या जाणाऱ्या पोपटांची दया आली. त्याने एक पोपट घेतला, आणि त्याला शिकवले- “हे बघ पोपटा, जिथे पाण्याचे असे कुंड असेल, तिथे जायचे नाही.”

तेंव्हा पोपटाने ते पाठ करून तो तसेच म्हणू लागला. मग माणसाने  त्याला सांगितले, की “तिथे आडवी दांडी असेल, तिच्यावर बसायचे नाही”. पोपटाने  ते पण पाठ केले. मग माणसाने  त्याला शिकवले-  “चुकून बसलाच, तर उडून जायचे! उडून गेलास  तर पकडला जाणार नाहीस”. पोपटाने तेही पाठ केले आणि तसेच म्हणू लागला.  असे शिकवून दयाळू माणसाने  पोपटाला  सोडून दिले.  त्या पोपटाने इतर पोपटांनाही हे शिकविले. 

नंतर एके दिवशी पुन्हा त्या पारध्याने पाण्याच्या कुंडावर आडवी दांडी ठेवली.  तो शिकवलेला  पोपट उडत उडत तिथे गेला, आणि त्या आडव्या दांडीवर बसला! आणि तोंडाने म्हणू लागला, “पाण्याच्या कुंडीवर जायचे नाही, आडव्या दांडीवर बसायचे नाही, बसले तरी  उडून जायचे, म्हणजे आपण पकडले जात नाही.”

पण प्रत्यक्षात काही त्या पोपटाने ती दांडी सोडली नाही. खाली पाणी  दिसत होते, आणि त्याला पाण्यात बुडून मरण्याची  भीती वाटत होती. दांडी सोडली तर आपण उडू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. 

तेवढ्यात पारधी येऊन त्या पोपटाला पकडून घेऊन गेला. 

अशीच काहीशी अवस्था आपली सर्वांची तर नाही? 

याच प्रकारे वानराला  पकडणारे लोक, एका अरुंद तोंडाच्या घड्यात चणे ठेवून देतात. वानर येते आणि हात घड्यात घालून ते चणे मुठीमध्ये घेऊन बाहेर काढू बघते. पण मूठ बांधलेली असल्याने ती अरुंद तोंडातून बाहेर येऊ शकत नाही, आणि वानर चणे सोडत नाही. वानर पकडणारा येऊन सहज त्याला पकडून घेऊन जातो.

परोपदेश बेलायाम् सर्वे शिष्टा भवन्ति  हि |

विस्मरन्ति   तत्सर्वं स्वकार्ये समुपस्थिते |

 

 

नारायण, नारायण!

सुख दुःख की परिभाषा

shriram

प्रत्येक परिस्थिति- साधन सामग्री- कल हमने देखा कि

सुख-दुःखकी एक परिभाषा यह हुई कि सुख नाम हुवा बाहरकी अनुकूल सामग्री का और दुःख नाम हुवा बाहरकी सामग्रीके अभाव का. 

दूसरी वास्तविक परिभाषा सुख-दुःखकी यह है कि जिसके मन मे हर समय प्रसन्नता ‘रहती है-वही सुखी है. 

चाहे उसके पास बाहरी सामग्री कम है अथवा नही है या बहुत अधिक है, पर जिसके मनमे चिंता-फिकर नही है, वही सुखी है. 

बाहरकी सामग्री अत्यधिक मात्रा मे रहते हुवे भी हृदय जलता है, मनमे दुःख-संताप है, तो वह दुःखी ही है 

अब मन मे प्रश्न उठता है कि  किसी के यहाँ चोरी हुवी, किसी को किसीने चोट पहुंचाई, नुकसान किया,या अपमानित किया, तो दूसरा व्यक्ति दुःख देनेवाला हुवा न? फिर यह कैसे कहा गया कि दुःख देनेवाला कोई दूसरा नहीं है? 

इसका उत्तर यह है कि दूसरे व्यक्ति दुःखदायी  परिस्थिति तो पैदा करते है, किन्तु उस परिस्थितिमे  दुःखी होना अथवा न होना, यह अपने हाथ की बात है। कोई भी हमे दुःखी होनेके लिए बाध्य नहीं कर सकता। दुःखकी परिस्थिति देनेमे जो दूसरे निमित्त बनते है, वह हमारे प्रारब्ध का फल है; परन्तु  हर परिस्थितिमे हम प्रसन्न रह सकते है।  

सुख की सामग्री और दुःख की सामग्री दोनों ही भगवतप्राप्तिकी  साधन सामग्री है। फ़रक  इतना है कि दुःखदायी  परिस्थिति जल्दी कल्याण करनेवाली है। क्योंकि दुःखदायी परिस्थितिमे भगवान याद आते है.

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय ॥- संत कबीर 

स्वामी रामसुखदासजी महाराजके ‘कल्याणकारी प्रवचनों से 

 

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product