https://goodworld.in A website by Madhav Bhope

भूपाळ्या-1 Morning holy prayers in Indian tradition

ganesha ganesh ganapati theresa tahara

Morning holy prayers in Indian tradition

प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध  नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. 

आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल. 

माधव भोपे 

ganapati

भूपाळी श्री गणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा  शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार  साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी  शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

shriram

भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

vitthal-rukhumai

भूपाळी पंढरीची

उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष  हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर  । पैलपार तरतील ॥ ४ ॥

shri vishnu-1

भूपाळी श्रीविष्णूची-1

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥


माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥


केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥


प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥


पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥

shri vishnu-2

भूपाळी श्रीविष्णूची-2  

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥


भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥


सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥


रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥


झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल  ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥


तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥


घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥


मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि  वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥


कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥


गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥


गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥


हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥


निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

Laughter the best medicine थोडे हसूया!

laughter

Laughter the best medicine

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?

😀😀😀

जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

😀😀😀

बायका फार नशीबवान असतात कारण

त्यांना बायका नसतात

😀😀😀

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता

😀😀😀

आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”

😀😀😀

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच

😀😀😞

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….

😀😀😀

बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?

मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?

😀😀😀

लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते

😀😀😀

I-Phone 14 हा लगातार 14 वा  असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीय

😀😀😀

मुलगी : तुझी आठवण येतेय

मुलगा : अजून पगार झाला नाही

मुलगी : अच्छा चल बाय

😀😀😀

तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका

कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते

😀😀😀

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?

😀😀😀

भारत सरकारचा नवीन नियम

ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल

😀😀😀

एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?

मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही

😀😀😀

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे

पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात

😀😀😀

ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

😀😀😀

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस

😀😀😀

news
READ LATEST NEWS HERE

Tough to say TATA to such a Ratan!

ratan tata

tata 1 1

Last speech of Ratan Tata

कदाचित हे सोशल मेडिया वरचे आतापर्यंतचे एकमेव उदाहरण असावे, जेंव्हा की एका उद्योगपतीला भारतातल्या प्रत्येक whatsapp  ग्रुपमध्ये भारतातल्या घराघरातून श्रद्धांजली वाहिली गेली, जणू आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ति गेली असे वाटण्याइतपत प्रत्येकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. अगदी फॅमिली ग्रुप्स मध्येही, रतन टाटांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला गेला.  असे अजातशत्रू होते रतन टाटा!

त्याचे एकमेव कारण म्हणजे माणूस म्हणून रतन टाटा हे एक अत्यंत साधे, निगर्वी, पण त्याचबरोबर उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.

अत्यंत साध्या परिस्थितीतून, आपल्या कर्तृत्त्वाने आभाळएवढी उंची गाठणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रतन टाटा होते.

ते एका प्रकारे एक तत्त्वचिंतक ही होते. आज त्यांच्या स्मृति जागवतांना  त्यांचे काही प्रसिद्ध quotes या निमित्ताने येथे देत आहोत. मला सगळ्यात आवडणारा त्यांचा quote म्हणजे “Don’t  take life so seriously” हा खाली देत आहे.

Perhaps this is the only example of a businessman, whose departure is  being mourned in every household across India, in all political social groups irrespective of  their ideologies and affiliation, Even family whatsapp groups in India saw the sad news of his death posted in the morning as if someone from their family had passed away.  Ratan Tata was such a great human being!

A man with no enemies.

The only reason for this is that Ratan Tata as a human being was a very simple and humble, but at the same time, an  outstanding personality as a prudent businessman.

Ratan Tata was a man who rose skyhigh with his achievements from a very humble background. 

He was also, in a way, a philosopher. Here are some of his famous quotes to commemorate him today. One of my favorite quotes is “Don’t take life so seriously” below.

ratan tata

इतरही त्यांचे सुप्रसिद्ध quotes

खाली देत आहे.

  • “I don’t believe in taking right decisions. I take decisions and then make them right.”
  • “None can destroy iron, but its own rust can. Likewise, none can destroy a person, but their own mindset can.”
  • “Power and wealth are not two of my main stakes.”
  • “The biggest risk is not taking any risk. In a world that is changing quickly, the only strategy that is guaranteed to fail is not taking risks.”
  • “The best leaders are those most interested in surrounding themselves with assistants and associates smarter than they are.”
  • “Never underestimate the power of kindness, empathy, and compassion in your interactions with others.”
  • “Leadership is about taking responsibility, not making excuses.”
  • “Don’t wait for opportunities to come to you, create your own opportunities.”
  • “If you want to walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together.”
  • “I don’t believe in work-life balance. I believe in work-life integration. Make your work and life meaningful and fulfilling, and they will complement each other.”

श्री रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजली !ratan tata tata 2

ratan tata

Ratan Tata's Last speech goes viral

Navdurga Upasana नवदुर्गा उपासना

navdurga upasana

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना

Navdurga Upasana

हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ,  इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने,  चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली जाते. चातुर्मासातील शेवटचा एक महिना, म्हणजे आश्विन महिना (साधारण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे ऑक्टोबर हीट जेंव्हा सुरू झालेली असते), हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यातील संधिकाल असतो. शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने तसाही प्रतिकूल मानला गेला आहे. आणि त्यात भाद्रपद महिना संपल्यावर, आश्विन महिना लागतो तेंव्हा शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होण्याचा काल, म्हणजे ऋतुसंधी, त्यामुळे या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे, आणि पुढे येणाऱ्या अनुकूल काळासाठी म्हणजेच हिवाळ्यासाठी शरीराला तयार करणे, या दृष्टीने दुर्गादेवीच्या नवरात्री व्रताची योजना असावी असे वाटते. या काळात, उपवास करून, ब्रह्मचर्य पालन करून, व्रतस्थ आणि संयमाने राहून, शरीर आणि मन दोन्हींना शुद्ध करून पुढे येणाऱ्या काळात शक्तिसंचय करण्यास तयार केले जाते असे दिसते. म्हणजेच शक्तीची उपासना करायला सुरूवात या काळापासून होते.  

हिंदू धर्मातील सर्व देव, देवी आणि देवता हे, क्वचित काही अपवाद वगळता, शस्त्रधारी आहेत. निसर्गातील प्रत्येक शक्तीचे, शक्तीच्या प्रत्येक रूपाचे, व्यक्तिकरण (personification) केले गेले आहे. तसेच देवीच्या विविध रूपांत शक्तीच्या विविध रूपांचे व्यक्तीकरण केले आहे.

आजपासून सुरू होणारे देवीचे नवरात्र हे म्हणूनच, शक्तीची उपासना आहे.

नवरात्रामध्ये देवीच्या, म्हणजेच शक्तीच्या नऊ रूपांची नवदुर्गांच्या रूपात उपासना केली जाते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत नवदुर्गा  

दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत देवी कवच स्तोत्रातील पुढील श्लोकांमध्ये अनुक्रमे नवदुर्गां ची नावे दिली आहेत –

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं
ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

 शैलपुत्री

shailputri1

दुर्गादेवी  तिच्या पहिल्या रूपात ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखली जाते.  ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. तिला ‘शैलपुत्री’ हे नाव पडले कारण तिचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरात झाला होता. (शैल म्हणजे पर्वत).  नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषारूढा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. काही ठिकाणी तिच्या डाव्या हातात डमरू आहे असेही सांगितले जाते.  तिला सती असेही म्हणतात.

शैलपुत्रीची कहाणी

एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु त्यांचे जावई भगवान शंकर यांना बोलावले नाही. सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जायला उत्सुक  होती. शंकरांनी सतीला समजावले की बोलावणे नसतांना जाणे योग्य नाही. पण सतीचे समाधान झाले नाही. सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली.

 सती दक्ष प्रजापतींकडे पोहोचल्यावर तिची उपेक्षा झाली.  दक्षाने शंकरांबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. यामुळे सतीला खूप राग आला, पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात  योगाग्नीद्वारे  स्वतःला जाळून घेतले.

शंकरांना हे कळल्यावर ते भयंकर रागावले, आणि आपल्या  जटांपासून त्यांनी  वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी त्याला हजारो गणांसह  पाठवले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश केला. हीच  सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. शैलपुत्री पार्वतीजींच्या कठोर तपश्चर्येनंतर, लोककल्याणाच्या भावनेने तिचा भगवान शंकराशी पुन्हा विवाह झाला.

 नवदुर्गांपैकी पहिली आणि सर्वात प्रमुख, शैलपुत्रीला खूप महत्त्व आहे आणि तिचे वैभव अनंत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी, साधकाने मूलाधारावर आपले मन एकाग्र ठेवावे. हा त्यांच्या आध्यात्मिक अनुशासनाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवशी जप करावयाचा मंत्र: ओम शैलपुत्रये नमः.

या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण करावे.

नवदुर्गा मधील इतर नावांविषयी जाणून घेऊयात यापुढील लेखांत त्यासाठी दररोज पुढील लेख नक्की वाचा 

********* माधव भोपे*********

Avoid these vegetables in Rainy Season

[web_stories_embed url=”https://goodworld.in/web-stories/avoid-these-vegetables-in-rainy-season/” title=”Avoid these vegetables in Rainy Season” poster=”https://goodworld.in/wp-content/uploads/2024/09/cropped-images-50.jpeg” width=”360″ height=”600″ align=”none”]