https://goodworld.in A website by Madhav Bhope

How to behave with elders-ससुराल की नीति

How to behave with elders

एक लड़की विवाह करके ससुराल में आयी|

घर में एक तो उसका पति था, एक सास थी और एक दादी सास थी|

वहाँ आकर उस लड़की ने देखा कि दादी सास का बड़ा अपमान, तिरस्कार हो रहा है!

छोटी सास उसको ठोकर मार देती, गाली दे देती|

यह देखकर उस लड़की को बड़ा बुरा लगा और दया भी आयी! उसने विचार किया कि अगर मैं सास से कह कहूँ कि आप अपनी सास का तिरस्कार मत किया करो तो वह कहेगी कि कल की छोकरी आकर मेरे को उपदेश देती है, गुरु बनती है!

अतः उसने अपनी सास से कुछ नहीं कहा| उसने एक उपाय सोचा| वह रोज काम-धंधा करके दादी सास के पास जाकर बैठ जाती और उसके पैर दबाती|

जब वह वहाँ ज्यादा बैठने लगी तो यह सास को सुहाया नहीं| एक दिन सास ने उससे पूछा कि ‘बहु! वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की ने कहा कि ‘बोलो, काम बताओ!’ सास बोली कि ‘काम क्या बतायें, तू वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की बोली कि ‘मेरे पिता जी ने कहा था कि जवान लड़कों के साथ तो कभी बैठना ही नहीं, जवान लड़कियों के साथ भी कभी मत बैठना; जो घर में बड़े-बूढ़े हों, उनके पास बैठना, उनसे शिक्षा लेना| हमारे घर में सबसे बूढ़ी ये ही हैं, और किसके पास बैठूँ?

मेरे पिताजी ने कहा था कि वहाँ हमारे घर की रिवाज नहीं चलेगी, वहाँ तो तेरे ससुराल की रिवाज चलेगी| मेरे को यहाँ की रिवाज सीखनी है, इसलिये मैं उनसे पूछती हूँ कि मेरी सास आपकी सेवा कैसे करती है?

’ सास ने पूछा कि ‘बुढ़िया ने क्या कहा?’ वह बोली कि ‘दादी जी कहती हैं कि यह मेरे को ठोकर नहीं मारे, गाली नहीं दे तो मैं सेवा ही मान लूँ!’

सास बोली कि ‘क्या तू भी ऐसा ही करेगी?’ वह बोली कि ‘मैं ऐसा नहीं कहती हूँ, मेरे पिता जी ने कहा कि बड़ों से ससुराल की रीति सीखना!’


सास डरने लग गयी कि मैं अपनी सास के साथ जो बर्ताव करुँगी, वही बर्ताव मेरे साथ होने लग जायगा!

एक जगह कोने में ठीकरी इकट्ठी पड़ी थीं|     सास ने पूछा-‘बहू! ये ठीकरी क्यों क्यों इकट्ठी की हैं?’
लड़की ने कहा-‘आप दादी  जी को ठीकरी में भोजन दिया करती हो, इसलिये मैंने पहले ही जमा कर ली|’


‘तू मेरे को ठीकरी में भोजन करायेगी क्या?’


‘मेरे पिता जी ने कहा कि तेरे वहाँ की रीति चलेगी|’


‘यह रीति थोड़े ही है!’


‘तो आप फिर आप ठीकरी मैं क्यों देती हो?’


‘थाली कौन माँजे?’


‘थाली तो मैं माँज दूँगी|’


‘तो तू थाली में दिया कर, ठीकरी उठाकर बाहर फेंक|’

अब बूढ़ी माँजी को थाली में भोजन मिलने लगा|

सबको भोजन देने के बाद जो बाकी बचे, वह खिचड़ी की खुरचन, कंकड़ वाली दाल माँ जी को दी जाती थी| लड़की उसको हाथ में लाकर देखने लगी|

सास ने पूछा-‘बहू! क्या देखती हो?’


‘मैं देखती हूँ कि बड़ों को भोजन कैसा दिया जाय|’


‘ऐसा भोजन देने की कोई रीति थोड़े ही है!’


‘तो फिर आप ऐसा भोजन क्यों देती हो?’


‘पहले भोजन कौन दे?’


‘आप आज्ञा दो तो मैं दे दूँगी|’


‘तो तू पहले भोजन दे दिया कर|’


‘अच्छी बात है!’


अब बूढ़ी माँ जी को बढ़िया भोजन मिलने लगा| रसोई बनते ही वह लड़की ताजी खिचड़ी, ताजा फुलका, दाल-साग ले जाकर माँ जी को दे देती| माँ जी तो मन-ही-मन आशीर्वाद देने लगी|

माँ जी दिनभर एक खटिया में पड़ी रहती| खटिया टूटी हुई थी| उसमें से बन्दनवार की तरह मूँज नीचे लटकती थी| लड़की उस खटिया को देख रही थी|

सास बोली कि ‘क्या देखती हो?’
‘देखती हूँ कि बड़ों को खाट कैसे दी जाय|’
‘ऐसी खाट थोड़े ही दी जाती है! यह तो टूट जाने से ऐसी हो गयी|’
‘तो दूसरी क्यों नही बिछातीं?’
‘तू बिछा दे दूसरी|’
‘आप आज्ञा दो तो दूसरी खाट बिछा दूँ!’


अब माँ जी के लिए निवार की खाट लाकर बिछा दी गयी|

एक दिन कपड़े धोते समय वह लड़की माँ जी के कपड़े देखने लगी| कपड़े छलनी हो रखे थे|

सास ने पूछा कि ‘क्या देखती हो?’


‘देखती हूँ कि बूढों को कपड़ा कैसे दिया जाय|’


‘फिर वही बात, कपड़ा ऐसा थोड़े ही दिया जाता है? यह तो पुराना होने पर ऐसा हो जाता है|’


‘फिर वही कपड़ा रहने दें क्या?’
‘तू बदल दे|’


अब लड़की ने माँ जी का कपड़ा चादर, बिछौना आदि सब बदल दिया| उसकी चतुराई से बूढ़ी माँ जी का जीवन सुधर गया! अगर वह लड़की सास को कोरा उपदेश देती तो क्या वह उसकी बात मान लेती? बातों का असर नहीं पड़ता, आचरण का असर पड़ता है| 

प्रयत्नांती परमेश्वर

Screenshot 20240403 092528 Google

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager

 

 

 

 

उन्हाळ्यातील त्रासावर घरगुती उपाय

extreme-heat-man-standing-on-road

Health and Wellness category

गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्र खूप बदलले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढते आहे. यावर्षी तर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच उन्हाळा जाणवायला लागला, आणि आता मार्चच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच, मे महिन्यासारखे ऊन्ह पडते आहे. तापमान 40 डिग्री च्या जवळपास पोचले आहे.

उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागणे, कितीही पाणी पिले तरी तहान न भागणे, डोळे जळजळ करणे, अंगातील शक्ति कमी होणे, पाय दुखणे, लघवीला जळजळ होणे, अन्न पचन नीट न होणे, असे अनेक त्रास या दिवसांमध्ये आपल्यापैकी काही जणांना होतात.

काही दिवसांपूर्वी मीही अशाच काहीश्या त्रासाकरिता आमच्या नेहमीच्या वैद्यांकडे गेलो होतो. त्यांनी एक अत्यंत साधे घरगुती औषध सांगितले. त्याचे नांव षडंगपानीय. त्यात कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात किंवा जडीबूटीच्या दुकानात मिळणारी नेहमीच्या ओळखीची द्रव्ये आहेत.

  1. मुस्ता, म्हणजेच नागरमोथा
  2. पर्पटक म्हणजेच पित्तपापडा
  3. वाळा किंवा ज्याला उशीर असेही म्हणतात (जो आपण थंड पाण्याच्या माठात पूर्वी टाकायचो, ज्याचा सुवास येतो आणि पाण्याला छान चव येते व तहान भागते)
  4. रक्तचंदन (लाल रंगाचे चंदन)
  5. उदीच्य- पांढरे चंदन
  6. सुंठ पावडर

मुस्तपर्पटकोशीरचन्दनोदीच्यनागरै :
शृतशीतं जलं देयं पिपासा ज्वर शान्तये

भैषज्य रत्नावली . . ज्वराधिकार

वरील सर्व चूर्ण प्रत्येकी 20 ग्रॅम घेऊन, साधारण 1200 ml पाण्यामध्ये स्टीलच्या पातेल्यात उकळायचे. उकळून साधारण अर्धे झाले, की खाली काढून, गाळून थंड करून ठेवायचे.

वरील पाणी हे पित्त आणि कफ यांच्या विकारांवर उपयोगी आहे. तसेच वरील कारणामुळे आलेला ज्वर (ताप) ही यामुळे कमी होतो.

वरील पाणी जेंव्हा जेंव्हा तहान लागेल तेंव्हा, किंवा थोड्या थोड्या वेळाने, थोडे थोडे, म्हणजे घोट  घोट पीत राहायचे. मात्र रोज नवीन पाणी तयार करायचे.

मी वरील सर्व पावडर आणून असे पाणी घेतल्यावर खूप छान वाटले. थोड्याश्या पाण्यानेही, उष्णतेमुळे होणारे त्रास लगेच दूर झाले. वरील पाणी हे पाचक ही आहे. शरीरातील आम दोष, म्हणजे न पचलेला किंवा अर्धवट पचलेला जो भाग असतो, तो पचवला जातो.

काही वेळेला, अशा छोट्या छोट्या त्रासाकरिता, आपल्या family vaidya चा सल्ला सहजपणे खूप काम करून जातो. अर्थात त्यासाठी असे family vaidya प्रत्येक कुटुंबासाठी असले पाहिजेत.

अर्थात, वरील माहिती, ही कुठलाही वैद्यकीय सल्ला नाही. आणि मी कुणी जाणकार वैद्यही नाही. पण सोपा उपाय शेअर करावा म्हणून हा प्रपंच केला आहे.

वरील सर्व घटक असलेली तयार पावडरही काही ठिकाणी मिळते. त्यात Amazon वर काही उपलब्ध आहेत. 

पण त्यापेक्षा सर्व पावडर आपल्या जवळच्या दुकानातून आणून त्या एकत्र करून वापरणे जास्त चांगले असे मला वाटते. 

 

Ganesha idol
Ganesha idol
Stepped Stool
Stepping stool
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page

The Story of the 10th Man

story of the 10th man

The story of the 10th Man- दहाव्या माणसाची गोष्ट

वेद आणि उपनिषदांत त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितले आहेत. काही काही सिद्धांताना “ महावाक्य” असे म्हणतात. त्यातील छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसि अर्थात, “तूच ते ब्रम्ह आहेस” हे खूप प्रसिद्ध आहे. 

उपनिषदांतील हे सिद्धांत आपल्या आचार्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींद्वारे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. 

चौदाव्या शतकात विद्यारण्य  स्वामी हे तत्त्वचिंतक होऊन गेले. त्यांनी उपनिषदांतील सिद्धांतावर “पंचदशी” ही टीका लिहिली. त्यात त्यांनी एका मजेदार गोष्टीद्वारे एक मोठे तत्व विषद करून सांगितले आहे.

एकदा दहा मित्र जंगल भ्रमणासाठी निघाले होते. जंगलातून जाता जाता एके ठिकाणी त्यांना एक नदी लागली. नदी चांगलीच खोल होती. त्या नदीतून आपण सर्वजण पलीकडच्या तीरावर सुरक्षित पोंचू की नाही, याविषयी त्या सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली.  तरी सगळे मित्र एकमेकांचे हात धरून कसेबसे नदीच्या पैलतीरावर पोंचले. 

पैलतीरावर आल्यानंतर त्या सर्वांनी ठरवले, की आपण सगळे आलोत की नाही हे एकदा मोजून पाहू. 

ते सर्व गोल करून उभे राहिले. मग त्यातील एकाने त्याच्या डाव्या बाजूपासून मोजायला सुरूवात केली- एक-दोन-तीन- चार..असे करत करत त्याने नऊ पर्यंत मोजले आणि त्याच्या उजव्या हाताच्या मित्रापर्यंत येऊन थांबला. तो एकदम चमकून म्हणाला, “अरे देवा, आपण निघालो तेंव्हा दहा होतो. आणि आता फक्त नऊच आहोत. एक जण कमी आहे! हाय रे दैवा! आपल्यापैकी एक जण बुडाला वाटते.” 

त्याच्या बाजूचा मित्र म्हणाला “ अरे, थांब, थांब. तू नीट मोजले नसशील. मी मोजतो.” असें म्हणून त्यानेही त्याच पद्धतीने मोजले, आणि अर्थातच ते नऊच भरले. आता त्याची खात्री झाली. मग एकेक करत बाकीच्या सर्व मित्रांनी त्याच पद्धतीने मोजले आणि सर्वांची गणती नऊच भरली. तेंव्हा ते सर्व खाली बसून मोठमोठ्याने रडू लागले आणि आपल्यातील एकजण बुडाला म्हणून शोक करू लागले. 

तिकडून एक पांथस्थ चालला होता. त्यांचे रडणे ऐकून तो थांबला, आणि काय झाले म्हणून विचारू लागला. 

तेंव्हा सर्व मित्रांनी त्यांचे रडण्याचे कारण सांगितले. तो वाटसरू हुशार होता. त्याने पट्कन मोजून पाहिले तेंव्हा त्याला दहा लोक दिसले. मग तो त्या सर्वांना म्हणाला, “ शांत व्हा, शोक करू नका. तुमच्यातील कोणीही बुडाले नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा.” 

तेंव्हा ते मित्र त्याला म्हणाले, “तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? तुम्ही आम्हाला दहावा मित्र दाखवा, तर आम्ही विश्वास ठेवू”. 

मग त्या वाटसरूने त्यातील पहिल्या मित्राचा हात धरून त्याला पुन्हा मोजायला सांगितले. एक- दोन करीत तो जेंव्हा नवव्या पर्यंत आला, तेंव्हा मग त्या वाटसरूने त्याचा हात धरून त्या मित्राकडे स्वतः कडे वळविला, आणि म्हणाला, “ त्वं दशमस्ति” तूच तो दहावा आहेस. त्याबरोबर त्या मित्राला परम आनंद झाला आणि  “सापडला, सापडला, दहावा सापडला!” असे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. त्या वाटसरूने एकेक करीत त्या दहाही मित्रांना अशा प्रकारे त्यांच्यातील कोणी हरवला नसल्याची खात्री करून दिली. 

वरील उदाहरणात, वास्तविक, दहावा कुठे गेलेलाच नव्हता, आणि मोजणारा स्वतःच तो होता. पण तो स्वतः ला सोडून सगळ्यांना मोजत होता. 

 

वरील उदाहरणात मनुष्याच्या अध्यात्मिक वाटचालीतील 7 टप्पे आहेत.

  1. Ignorance- अज्ञान- नदीच्या अलीकडील तीरावर असतांना, पुढील मार्गाबद्दल काहीच माहीत नसणे.
  2. Covering of the truth- आवरण. दुसऱ्या टप्प्यात नदीच्या दुसऱ्या तीरावर आल्यावर, एकजण कमी आहे असे वाटणे. म्हणजेच, खरे तर सत्यावर आलेले आवरण.
  3. Suffering- -born out of the first 2 विक्षेप: म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यांमुळे निर्माण झालेले दुःख.
  4. Indirect knowledge- परोक्षज्ञान. जेंव्हा त्याला इतर कुणी( अर्थात गुरु किंवा तत्सम ज्ञानी पुरुष) सत्य परिस्थिती सांगतो, तेंव्हा त्यावर तो विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो.
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान. म्हणजे जेंव्हा त्याला स्वतःला त्या सत्याचा अनुभव येतो.
  6. Removal of sufferning/sorrow-दुःख निवृत्ती. सत्याचा अनुभव आल्यानंतर दुःख नाहीसे होते.
  7. Bliss- – happiness- तृप्ति- त्यानंतर त्याला करण्यासारखे काही राहत नाही. तो कृतकृत्य होतो.

वरील उदाहरण रामकृष्ण मठाचे  स्वामी सर्वप्रियानंद यांच्या प्रवचनातून वेचून, इथे प्रस्तुत केले आहेत. तसेच इतर काही स्रोतांचा इथे वापर केला आहे. 

काहीतरी सकस वाचूयात.
उन्नतीच्या मार्गावर चालूयात!

The story of the 10th Man.

In the Vedas and Upanishads, some eternal principles are stated. These are are called  “Mahavakyas”, meaning the “great phrases.” Of these, the “Tattvamsi” of the Chhandogya Upanishad, which means “You are that Brahma”, is very famous.

These principles in the Upanishads have been explained by various scholars in the ancient times in a very simple manner through some stories.

The 14th century scholar Vidyaranya swami had written a book called “Panchadashi” in which he explains the principle very lucidly with the help of an interesting story.

Once ten friends were passing through a forest.  On their way through the forest, at one point they came across a river. The river was quite deep. They all doubted whether all of them would be able to reach the other end safely.  So all the friends held each other’s hands and somehow reached the other end of the river.

After coming to the other end, they all decided to count their numbers to ensure that none of them was left out.

They all stood in a circle. Then one of them started counting from his left side—  one-two-three, four..In doing so, he counted upto nine and reached for his right-hand friend. Then he stopped as there were no more to be counted. He was terrifed and said, “Oh my God, we were ten when we started. And now we’re only nine. One less!  One of us seems to have drowned!.”

The friend next to him said ” Oh, wait, wait. Perhaps you have not counted properly. Let me count.”  So he counted the same way, and to his horror, it was nine again! So he was also convinced and joined the first friend and started yelling. Then, one by one, all the other friends counted in the same way, and all counted nine. Then they all sat down and started crying loudly and mourning the death of one of them. 

There was a passerby walking from there. Hearing them cry, he paused, and began to ask what had happened.

Then all the friends told him the reason for their grief.  The passerby was a normal person and he could clearly see that there were 10 of them.. Then he said to them, ” Calm down, don’t mourn. None of you have drowned, trust me.”

Then the friend said to him, how can I trust you? If you show us the tenth friend, we’ll believe it.

Then the passerby grabbed the hand of his first friend and asked him to count again. When he came to the ninth, counting from one, two etc,  then the passerby took his hand and turned it to the friend himself, and said, “You are the tenth.” It suddenly dawned on to the first friend that no one was lost and he himself was the 10th one.  With that, the friend was overjoyed and said, “Found, found, tenth found!” So he started dancing with joy. One by one, the passerby convinced all ten friends that none of them had been lost and in fact they were the 10th friend.

The above story depicts 7 stages in the spiritual life of a person.

7 stages in the story of the 10th man

  1. Ignorance- अज्ञान 
  2. Covering of the truth-आवरण 
  3. Suffering- विक्षेप -born out of the first 2. projection of imagined tragedy
  4. Indirect knowledge-परोक्ष ज्ञान 
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान 
  6. Removal of suffering/sorrow-दुःखनिवृत्ती 
  7. Bliss- – happiness-तृप्ति 

The above story and its explanation is sourced from the discourses of Swami Sarvapriyananda of Ramkrishna Math and some other sources.

Let us read something healthy and walk on the path of self realization.

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product 

Interesting story of parrot पोपटाची गोष्ट

story of parrot

Story of parrot

एकदा एक पोपट पकडणारा पारधी होता.  त्याने जंगलात एक पाण्याचे छोटेसे कुंड बनवले होते. त्यावर एक लाकडाची दांडी आडवी ठेवली होती. तिच्यावर पोपट बसला, की ती दांडी उलटी होत असे. पोपट जेंव्हा खाली बघत असे तेंव्हा चहूबाजूनी त्याला खोल पाणी दिसत असे. त्यामुळे पोपट त्या दांडीला घट्ट पकडून ठेवत असे. मग तो पारधी येऊन त्या पोपटाला पकडून नेऊन बाजारात विकत असे. 

हे दृश्य पाहून एका दयाळू माणसाला’ त्या पकडल्या जाणाऱ्या पोपटांची दया आली. त्याने एक पोपट घेतला, आणि त्याला शिकवले- “हे बघ पोपटा, जिथे पाण्याचे असे कुंड असेल, तिथे जायचे नाही.”

तेंव्हा पोपटाने ते पाठ करून तो तसेच म्हणू लागला. मग माणसाने  त्याला सांगितले, की “तिथे आडवी दांडी असेल, तिच्यावर बसायचे नाही”. पोपटाने  ते पण पाठ केले. मग माणसाने  त्याला शिकवले-  “चुकून बसलाच, तर उडून जायचे! उडून गेलास  तर पकडला जाणार नाहीस”. पोपटाने तेही पाठ केले आणि तसेच म्हणू लागला.  असे शिकवून दयाळू माणसाने  पोपटाला  सोडून दिले.  त्या पोपटाने इतर पोपटांनाही हे शिकविले. 

नंतर एके दिवशी पुन्हा त्या पारध्याने पाण्याच्या कुंडावर आडवी दांडी ठेवली.  तो शिकवलेला  पोपट उडत उडत तिथे गेला, आणि त्या आडव्या दांडीवर बसला! आणि तोंडाने म्हणू लागला, “पाण्याच्या कुंडीवर जायचे नाही, आडव्या दांडीवर बसायचे नाही, बसले तरी  उडून जायचे, म्हणजे आपण पकडले जात नाही.”

पण प्रत्यक्षात काही त्या पोपटाने ती दांडी सोडली नाही. खाली पाणी  दिसत होते, आणि त्याला पाण्यात बुडून मरण्याची  भीती वाटत होती. दांडी सोडली तर आपण उडू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. 

तेवढ्यात पारधी येऊन त्या पोपटाला पकडून घेऊन गेला. 

अशीच काहीशी अवस्था आपली सर्वांची तर नाही? 

याच प्रकारे वानराला  पकडणारे लोक, एका अरुंद तोंडाच्या घड्यात चणे ठेवून देतात. वानर येते आणि हात घड्यात घालून ते चणे मुठीमध्ये घेऊन बाहेर काढू बघते. पण मूठ बांधलेली असल्याने ती अरुंद तोंडातून बाहेर येऊ शकत नाही, आणि वानर चणे सोडत नाही. वानर पकडणारा येऊन सहज त्याला पकडून घेऊन जातो.

परोपदेश बेलायाम् सर्वे शिष्टा भवन्ति  हि |

विस्मरन्ति   तत्सर्वं स्वकार्ये समुपस्थिते |

 

 

नारायण, नारायण!

सुख दुःख की परिभाषा

shriram

प्रत्येक परिस्थिति- साधन सामग्री- कल हमने देखा कि

सुख-दुःखकी एक परिभाषा यह हुई कि सुख नाम हुवा बाहरकी अनुकूल सामग्री का और दुःख नाम हुवा बाहरकी सामग्रीके अभाव का. 

दूसरी वास्तविक परिभाषा सुख-दुःखकी यह है कि जिसके मन मे हर समय प्रसन्नता ‘रहती है-वही सुखी है. 

चाहे उसके पास बाहरी सामग्री कम है अथवा नही है या बहुत अधिक है, पर जिसके मनमे चिंता-फिकर नही है, वही सुखी है. 

बाहरकी सामग्री अत्यधिक मात्रा मे रहते हुवे भी हृदय जलता है, मनमे दुःख-संताप है, तो वह दुःखी ही है 

अब मन मे प्रश्न उठता है कि  किसी के यहाँ चोरी हुवी, किसी को किसीने चोट पहुंचाई, नुकसान किया,या अपमानित किया, तो दूसरा व्यक्ति दुःख देनेवाला हुवा न? फिर यह कैसे कहा गया कि दुःख देनेवाला कोई दूसरा नहीं है? 

इसका उत्तर यह है कि दूसरे व्यक्ति दुःखदायी  परिस्थिति तो पैदा करते है, किन्तु उस परिस्थितिमे  दुःखी होना अथवा न होना, यह अपने हाथ की बात है। कोई भी हमे दुःखी होनेके लिए बाध्य नहीं कर सकता। दुःखकी परिस्थिति देनेमे जो दूसरे निमित्त बनते है, वह हमारे प्रारब्ध का फल है; परन्तु  हर परिस्थितिमे हम प्रसन्न रह सकते है।  

सुख की सामग्री और दुःख की सामग्री दोनों ही भगवतप्राप्तिकी  साधन सामग्री है। फ़रक  इतना है कि दुःखदायी  परिस्थिति जल्दी कल्याण करनेवाली है। क्योंकि दुःखदायी परिस्थितिमे भगवान याद आते है.

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय ॥- संत कबीर 

स्वामी रामसुखदासजी महाराजके ‘कल्याणकारी प्रवचनों से 

 

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product