https://goodworld.in A website by Madhav Bhope

new1

New Year 2025 Greeting Card Generator

New Year 2025 Greeting Card Generator

Happy New Year 2025!

May the new year bring you peace, joy, and prosperity!

- Your Name

Importance of 30th December for India- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ३० डिसेंबरचे महत्त्व

bose1

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ३० डिसेंबरचे महत्त्व

भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले हे आपण सर्व जाणतो. पण त्याआधी, स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न, वेगवेगळ्या देशभक्तांनी आपआपल्या परीने सुरू ठेवले होते. आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहिती असेल, की आजपासून बरोबर ८१ वर्षांपूर्वी, ३० डिसेंबर १९४३ रोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने, म्हणजेच आझाद हिंद सरकारने, अंदमान आणि निकोबार बेटांवर, पोर्ट ब्लेअर येथे अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर भारतीय ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती.Flag-Point-in-Port-Blair

Independence League आणि Indian National Army (INA) ची स्थापना

बंगालमधील क्रांतिकारक रास बिहारी बोस हे डिसेंबर १९१२ मध्ये तत्कालीन वाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्यावरील खुनी हल्ल्याचे सूत्रधार होते. ते ब्रिटिश सरकारकडून होणारी अटक टाळण्या साठी, जपानला गेले, आणि तिथून आपले प्रयत्न चालू ठेवले. नंतर ते जपानमध्येच स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी, तत्कालीन जपान सरकारला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्याविषयी तयार केले. त्यांनी तिथे मार्च १९४२ मध्ये Indian Independence League ची स्थापना केली. तसेच Indian National Army (INA) या नांवाने सशस्त्र सेना उभारायला सुरुवात केली. या लीगच्या जून १९४२ मध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत, सुभाषचंद्र बोस यांना तिचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी त्यानंतर Indian National Army (INA) म्हणजेच आझाद हिंद सेना या नांवाने त्या सेनेत अनेक लोकांना सामील केले. ब्रह्मदेश आणि मलेशिया येथील भारतीय युद्धकैद्यांना या सेनेत सैनिक म्हणून घेण्यात आले.

सुभाषचंद्र बोस यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा

सुभाषचंद्र बोस यांनी, टोकियो मध्ये, जून १९४३ मध्ये, ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकून लावण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, भारताच्या पूर्वेकडील भाग ताब्यात घेण्यासाठी सैनिक कृति करण्याची घोषणा केली. त्यानंतर ते जपानच्या ताब्यात असलेल्या सिंगापूरमध्ये आले आणि तिथे त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी आपल्या स्वतंत्र भारताच्या सरकारची घोषणा केली आणि काही मंत्र्यांची, आणि सैन्य अधिकाऱ्यांचीही ही नियुक्ती केली. विशेष म्हणजे या सरकारला, तत्कालीन ७  देशांनी मान्यता सुद्धा दिली होती- जर्मनी, जापान, इटली, क्रोएशिया, थायलंड, ब्रह्मदेश आणि फिलिपाईन्स. ही एक मोठी राजनीतीक उपलब्धि होती. त्यांच्या सरकारने चलनी नोटा, पोस्ट स्टॅम्पस, छापायला सुरुवात केली, कायदे बनवायला सुरुवात केली.azad hind currency

अंदमान येथे तिरंगा ध्वज फडकविला

दुसऱ्या महायुद्धाच्या त्या काळात, जपानने ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या अंदमान आणि निकोबार या बेटांवर ताबा मिळविला होता. जपानने, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वतंत्र भारताचे सरकार म्हणून मान्यता दिली असल्याने, अंदमान आणि निकोबार ही बेटें त्यांच्या ताब्यात देण्याचे ठरवले.

आणि त्याप्रमाणे, ३० डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने (आझाद हिंद सरकार) अंदमान आणि निकोबार बेटांवर, अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर  भारतीय तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सार्वभौमत्वाची घोषणा केली. (याआधी सुभाषचंद्र बोस भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष होते, तेंव्हा, त्या पक्षाने, चरखा असलेला तिरंगा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच ध्वज येथे फडकविण्यात आला.) tiranga

अर्थात, नंतरच्या काळात घडलेल्या घटनांमुळे, दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची सरशी झाली. जर्मनी, जपान यांची पीछेहाट झाली. जपानला शरणागती पत्करावी लागली. त्या धामधुमीत एका छोट्या बॉम्बर विमानातून नेताजी आणि त्यांचे काही सहकारी जात असतांना, त्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला.

तर ३० डिसेंबर १९४३ ची ही कहाणी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणाकोणाचे आणि कसे योगदान होते हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणून हा माहिती प्रपंच.

वरील माहिती ही आंतरजालाच्या विविध स्रोतांतून एकत्र करून एका ठिकाणी गुंफली आहे.

माधव भोपे 

G.K.Quiz-Political India

india map1

Take this interesting quiz about Indian States-just to brush up your information about current affairs. 

This quiz can also be useful to some extent for those who are preparing for competitive exams. 

Ustad Zakir Hussain

Zakir-Hussain

ज्येष्ठ तबलावादक आणि शास्त्रीय संगीतकार झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

झाकीर हुसेन यांना हृदयविकार होता. गेल्या आठवड्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १५ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला.

अभिनेतेही होते झाकीर हुसेन

शास्त्रीय संगीतकार, तबलावादक असलेले झाकीर हुसेन अभिनेतेही होते. तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकलेल्या झाकीर हुसेन यांनी १२ सिनेमात काम केलं होतं. त्यांनी १९८३ मध्ये आलेल्या हीट अँड डस्ट या ब्रिटिश सिनेमात शशि कपूर यांच्यासोबत काम केलं होतं. हा त्यांचा डेब्यू सिनेमा होता.

झाकीर हुसेन यांचे वडिलही होते तबलावादक

९ मार्च १९५१ मध्ये झाकीर यांचा जन्म झाला होता. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये तीन ग्रॅमी अवॉर्डसह पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यांचे वडील उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी हेदेखील तबलावादक होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत झाकीर यांनीही शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.

वयाच्या ११व्या केलेला पहिलं कॉन्सर्ट

झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट केला होता. त्यांच्या त्या परफॉर्मेन्सने सर्वांनाच हैराण केलं होतं. त्यांनी पुढे वयाच्या १२व्या वर्षापासून त्यांच्या वडिलांसोबत कॉन्सर्टला जाण्यास सुरुवात केली होती.

२०१६ मध्ये झाकीर यांना माजी राष्ट्रपदी बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय संगीतकार ठरले.

झाकीर हुसेन यांचं कुटुंब

उस्ताद झाकीर हुसेन यांनी Antonia Minnecola यांच्याशी 1978 साली लग्न केलं होतं. त्या कथ्थक डान्सर होत्या. तसंच कथ्थक शिक्षिकाही होत्या. तसंच त्या झाकीर यांच्या मॅनेजर म्हणूनही काम पाहत होत्या. झाकीर यांना दोन मुली आहेत.

 

दत्त जन्माची कथा Shri Guru Dattatreya

datta-2

Shri Guru Dattatreya दत्त जन्माची कथा

आज दि. 14 डिसेंबर- आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा- या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.

महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले.

दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9 व्या आणि 10 व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे.

दत्तात्रेय नांवाची कथा  

तसेंच श्रीमद्भागवतात आले आहे की पुत्र प्राप्तिच्या इच्छेने महर्षि अत्रींनी व्रत केले तेंव्हा ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’ मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला देऊन दिले आहे, असे म्हणून भगवान विष्णूच अत्रीच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले, आणि ‘दत्तो’ म्हणून दत्त आणि अत्रिपुत्र झाल्यामुळे आत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नांव प्रसिद्ध झाले.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

दत्तांच्या जन्माची कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई. पवन तिच्यापुढे नम्र होई. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.

पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तिमुळे तिचे नाव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री ‘ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारदमुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला.

त्रैमूर्ति म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी आप आपल्या पत्नीला समजविण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकेनात. त्यामुळे आपआपल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परिक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्त्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. आणि ते तिघे भर दुपारी अत्रिमुनींच्या आश्रमात आले.

अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले, आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेंव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली, की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे

अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे ओळखले. अत्रि मुनि नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून, त्यांचे पांदतीर्थ या ब्राह्मणांवर शिंपडले, त्यामुळे ती तिघे सहा महिन्यांची बालकें होऊन रांगू लागली.

datta-1

अनुसूयेने  त्यांच्या इच्छेप्रमाणे करून, त्यांना स्तनपान करविले. आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपविले. अत्रिमुनी परत आल्यानंतर तिने सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. अत्रीमुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली.  स्वर्गलोकात तीन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली.  तेव्हा अत्रिमुनींनीं पुन्हा गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा- विष्णु- महेश, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग!” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक ( ब्रह्मा – विष्णु- महेश ) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे  राहू देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तीन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले.

मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण।ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.

दत्तात्रेयांचे रूप आणि त्याचा अर्थ

datta-3

दत्तात्रेय जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम फिरत असले, तरी त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे उंबराचा वृक्ष होय. त्यांचे रूप म्हणजे केसांवर जटाभार, सर्व अंगावर विभूति, व्याघ्रांबर वस्त्र म्हणून नेसलेले, तसेंच त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि 4 कुत्रे, काखेला झोळी, असे ‘अवधूत’ दत्त विश्वाच्या कल्याणासाठी फिरत असतात. त्यांच्या सोबत असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे स्वरूप समजले जाते. किंवा लोकांच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू. तसेंच त्यांच्या सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तसेंच त्यांच्या हातात असणारे त्रिशूल म्हणजे तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि एका हातात असलेले सुदर्शन चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे, म्हणजे ते कालातीत आहेत. तसेंच एका हातात असलेला शंख म्हणजे ॐ ध्वनिचे प्रतीक आहे. तसेंच त्यांनी अंगावर फासलेले भस्म म्हणजे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेले भिक्षापात्र म्हणजे ‘दान’ करण्याचे प्रतीक आहे. मनुष्यमात्राला, आपल्याजवळील वस्तू इतरां सोबत वाटून खाण्याचा संदेश आहे. एका हातात असलेली जपमाळ ही नामस्मरणाचे महत्त्व सांगते.

सर्व संप्रदायांमध्ये दत्तात्रेय

दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहेत. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

 

संकलन- goodworld.in

 

डी. गुकेश: जगातील सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता – भारताचा अभिमान

109495961 1

डी. गुकेश: जगातील सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता आणि भारतीय बुद्धिबळासाठी महत्त्वाचा टप्पा

केवळ 18 व्या वर्षी, डी. गुकेश यांनी 2024 च्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदावर विजय मिळवत जागतिक बुद्धिबळातील आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाची नोंद केली आहे. त्यांनी चीनच्या विद्यमान विश्वविजेते डिंग लिरेन यांना 14 सामन्यांच्या मालिकेत 7.5–6.5 ने पराभूत केले. यामुळे गुकेशने 1985 साली 22 व्या वर्षी गॅरी कास्पारोवने प्रस्थापित केलेला सर्वात तरुण चॅम्पियन होण्याचा विक्रम मोडला.

गुकेश यांचा यशाचा प्रवास

डी. गुकेश यांचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्यात बुद्धिबळाची आवड होती. त्यांच्या आई-वडिलांनी, डॉ. रजनीकांत आणि डॉ. पद्मा, त्यांची बुद्धिबळाच्या खेळात आवड विकसित होण्यासाठी आधार दिला. केवळ 7 व्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली.

गुकेश यांनी वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर पदवी मिळवून इतिहास घडवला. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत वडिलांच्या वैद्यकीय क्षेत्रातील मेहनतीबरोबर त्यांचा स्वतःचा परिश्रमही मोलाचा ठरला.

प्रेरणा आणि प्रशिक्षण

भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी गुकेश यांना मोठ्या प्रमाणावर प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रशिक्षक यांनी त्यांच्या खेळातील महत्त्वाचे पैलू बळकट केले. त्यांच्या यशस्वीतेमध्ये तांत्रिक सल्ला, कुटुंबीयांचा पाठिंबा, आणि विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनुभवाचा मोठा वाटा होता.

जागतिक विजेतेपदाची गाथा

2024 च्या सामन्यात डिंग लिरेन यांच्याविरुद्ध गुकेश यांनी कठोर संघर्ष केला. सामन्याच्या 3 व्या आणि 11 व्या खेळांमध्ये गुकेश यांनी विजय मिळवला. अंतिम निर्णायक 14 व्या सामन्यात गुकेश यांनी आपली तंत्रसिद्धता दाखवत ऐतिहासिक विजय मिळवला.

भारतीय बुद्धिबळासाठी महत्त्वाचा टप्पा

गुकेश यांच्या विजयामुळे भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. भारतात बुद्धिबळाची नवी पिढी, ज्यात आर. प्रज्ञानानंद, निहाल सरीन यांचा समावेश आहे, जागतिक स्तरावर ठसा उमटवत आहे.

प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व

गुकेश यांचा प्रवास भारतीय तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. मेहनत, चिकाटी, आणि योग्य मार्गदर्शनाच्या साहाय्याने मोठमोठे लक्ष्य गाठणे शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

निष्कर्ष

डी. गुकेश यांचे जागतिक विजेतेपद हा केवळ वैयक्तिक विजय नसून भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर गौरवले असून अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.