https://goodworld.in A website by Madhav Bhope

अंगलट येऊ शकणारे साहस

adult man with grumpy expression 1308 133857

आजकाल समाजाभिमुख असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आणि ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि करोनाच्या नंतर तर, वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्याही, जेंव्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होत्या, तेंव्हा, काही प्रमाणात का होईना, पण ह्यूमन इंटरअॅक्शन एकमेकांसोबत होत असेल. पण आता, ते प्रमाण ही कमी झाले आहे. असो. हा काळाचा महिमा आहे.  

बँकेतील माझ्या कार्यकाळापैकी, जवळ जवळ नव्वद टक्के काळ, ‘समाजाभिमुख’ असण्यात गेला. त्यामुळे अनेक धडे शिकायला मिळाले. अहंकाराचे कंगोरे, घासून घासून गुळगळीत करावे लागले. लवचिकपणा अंगी बाणवावा लागला. काय करावे, आणि काय करू नये, याचे धडे, प्रत्यक्ष अनुभवातून मिळत गेले. असाच एक किस्सा, येथे सांगावासा वाटतो. त्यावेळी मी अजिंठा या गावी फील्ड ऑफिसर (क्षेत्र अधिकारी) म्हणून होतो. मी आणि माझा मॅनेजर, असे दोघेच अधिकारी, आणि ३-४ जणांचा स्टाफ तिथे होतो. अजिंठा इथे सरपंच ‘चाउस’ होते, आणि त्यांचा भयंकर दरारा होता. भले भले सरकारी अधिकारी त्यांना टरकून असत. मी एक वर्षांनंतर अजिंठ्यालाच मॅनेजर म्हणून राहिलो, त्यावेळी त्यांच्याशी यशस्वीपणे चांगले संबंध ठेवता आले, आणि तेही कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता, पण तो किस्सा पुढे कधीतरी.

मला का कुणास ठाऊक, पण शक्य असूनही पैसे न भरणारे, विशेषतः पैसेवाले असून कर्ज न फेडणाऱ्या थकबाकीदारांबद्दल फार राग असे. आणि एखादा हट्टी कर्जदार, असा असला, की त्याचे खाते वसूल करणे हे मला वैयक्तिक आव्हान वाटत असे. तरुण रक्त होते, आणि कुठल्याही परिणामांची  परवा वाटत नव्हती. त्यामुळे कोणतेही साहस करायला काहीच वाटत नसे.

आमच्या शाखेची मुख्य कर्जे शेतीविषयक होती. पण काही कर्जे ही व्यापाऱ्यांना खेळते भांडवल इत्यादिसाठी ही होती. त्यातील बँकेपासून अगदी जवळ, कोपऱ्यावर असणारे एक कापड दुकानासाठी एक लाखाचे कर्ज होते. त्या माणसाचे नांव असेच काही पठाण वगैरे होते. तो त्याच्या खात्यात मूळ  रक्कम तर जाऊदे, व्याजही अजिबात भरत नव्हता. दुकान त्याचे चांगले चालत होते.images 29 मी अनेकदा त्याच्या दुकानात चकरा मारून त्याला सारखे विनवीत होतो, की कमीत कमी व्याज भरून, खाते नविनीकरण करून घ्या, स्टॉक स्टेटमेंट द्या, इत्यादि. पण तो प्रत्येक वेळी गोड बोलून नुसतेच हो हो म्हणत असे. त्याला अनेक नोटिसा पाठवून झाल्या. शेवटी एक नोटिस वकिलातर्फेही पाठवली. पण त्याच्यावर ढिम्म परिणाम नव्हता. शेवटी मी त्याला, तुमच्या दुकानाचा लिलाव करू, अशीही नोटिस पाठवली. पण त्याच्यावर काही परिणाम नव्हता. ही गोष्ट साधारण १९९१-९२ सालची आहे. तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने मला फारच राग येत होता. अशातच एके दिवशी, मी आणि माझे मॅनेजर, एका शेतावर, पाहणी करायला गेलो होतो. तो शेतकरी बहुतेक त्या दुकानदाराचा ओळखीचा असावा असा माझा कयास होता. त्याचा बिझनेस ही होता. आमची तिथली पाहणी झाल्यावर मी त्याला म्हणालो, 38499 original“ आपसे एक बात करनेकी थी.  ये ऐसा कापड दुकान है. वो हम नीलाम करने  जा रहे है. अगर आपके जानकारी मे, कोई उसे लेनेवाला हो, तो बताइये.”.  हा माझा पूर्ण आगाऊपणा होता. वास्तविक माझे मॅनेजर सोबत होते. ते काही बोलले असते तर गोष्ट वेगळी. पण माझा स्वभाव अशा गोष्टी वैय्यक्तीक आव्हान म्हणून घेण्याचा असल्यामुळे, काहीही करून हे खाते वसूल करायचेच, अशी जिद्द होती. मी त्या माणसाजवळ मुद्दामहून बोललो, जेणे करून की त्याने त्याच्या त्या ओळखीच्या मित्राला सांगावे, आणि त्याच्या लक्षात आम्ही किती सिरीयस आहोत, हे यावे. तो माणूस काही बोलला नाही. आम्ही बँकेत परत आलो.

त्या घटनेनंतर एक दोन दिवस झाले. मी त्यावेळी अजिंठा गावाच्या बाहेर, अगदी एका बाजूला एक चार खोल्यांचा वाडा होता, त्यातील दोन खोल्यांत फॅमिली मुलांसकट राहत होतो. इतर दोन खोल्यांमध्ये आमचे Head Cashier राहत होते. त्या दिवशी बँकेतून घरी येऊन, नंतर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर, तिन्ही सांजेच्या अंधारात, मी वाड्यातील अंगणात बाजेवर एकटाच बसलो होतो. त्यावेळी वाड्याच्या  दरवाजातून तो दुकानदार ‘पठाण’ “ अंदर आऊ क्या साब?” असे म्हणून आत आला. अशा वेळी अनपेक्षितपणे त्याला असा घरी आलेला पाहून मला क्षणभर काहीच समजले नाही. पण दुसऱ्याच क्षणी मी स्वतःला सावरून, अरे, आइये, आईए पठाण साब! आओ, बैठो! असे म्हणून त्याचे अगदी तोंड भरून स्वागत केले. बाजूलाच बसायला त्याला खुर्ची दिली. आतमध्ये जाऊन, त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि घरात चहा टाकायला सांगितला. आधी तो बिचकत बिचकत बोलत होता. त्याचे डोळे भिरभरत होते. आधीच मोठे असलेल्या  त्याच्या डोळ्यांत एक लाल झाक दिसत होती. पण मी त्याच्याशी अगदी जिवलग मित्र असल्यासारखा बोलत होतो. आणि हळू हळू त्याचे डोळे स्थिर झाले. रिलॅक्स झाले. आणि तोही तितक्याच आत्मीयतेने बोलू लागला. बोलण्यात मी चुकूनही त्याच्या दुकानाच्या थकबाकीचा विषय येऊ दिला नाही. धंदा कसा चाललाय, शेती काय म्हणते आहे, इत्यादि विषयांवर बोलत राहिलो. तोही त्याच्या अडचणी सांगत राहीला. चहा आला. आम्ही दोघांनी चहा घेतला. आणि मग एका क्षणी तो एकदम उठून उभा राहिला, आणि म्हणाला, “अच्छा, खुदा हाफिज, साब! चलता हूं!” मग थोडे थांबून, त्याने डोळे बारीक करून विचारले, “क्या साब, आप हमारा शॉप नीलाम करने वाले है बोलके सुने. क्या बात है?” माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. मी त्याला म्हणालो, “देखो भाई, नोकरी है. बँक के टार्गेट रहते है. मेरी तुम्हारी कोई पर्सनल दुशमनी तो है नही. लेकिन बोलना पडता है. आप बुरा मत मानिये. मै आपको दोस्त की हैसियत से दरखवास्त करूंगा कि आपने अगर पैसे भर दिये तो अच्छा रहेगा. इसके उपर आपकी मर्जी!”

“साब, आज हम दोनोकी किस्मत अच्छी है. बहुत अच्छी बात हुई. आपसे बात करके अच्छा लगा. लेकिन कुछ ऐसी  वैसी  बात होती, तो न जाने आज क्या हो जाता.” इतका वेळ त्याने त्याचा एक हात पाठीमागे ठेवलेला होता. तिकडे इशारा करून तो म्हणाला, “आज मैं खमिस के अंदर  ये डण्डा साथ में लेके आया था. मैं बहुत गुस्से में था. न जाने क्या हो जाता.!”  अच्छा साब, चलता हूँ, खुदा हाफिज!” असे म्हणून तो बाहेरच्या अंधारात दिसेनासा झाला.

तो गेल्यावर मी बराच वेळ सुन्न होऊन तो गेला त्या दिशेकडे पहात होतो. त्यादिवशी असे तसे काही न बोलता, अगदी योग्य तेच, योग्य त्या टोनमध्ये, न कळतच माझ्या तोंडून निघाले होते, आणि अशा वेळी परमेश्वरच आपल्याला बुद्धि देतो, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला.  माझ्या ‘त्या शेतावरील’  बोलण्याचा त्याच्यावर अपेक्षित परिणाम न होता, उलटाच परिणाम झालेला दिसत होता. आणि तो तावातावात थेट माझ्या घरी येऊन ठेपला होता.  त्यादिवशी मी एक धडा शिकलो. अगदी टोकाचे कोणाला बोलायचे नाही, कायद्याने जे होईल ते करायचे, पण कोणाला दुखवेल असे बोलायचे नाही, हा धडा या प्रसंगाने मला शिकायला मिळाला.

पोस्ट स्क्रिप्ट: त्या कर्जाचे पुढे काय झाले, ही उत्सुकता असेल. तर आम्ही नंतर रीतसर नोटिसा वगैरे पाठवून, कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केस चालत राहिली. आणि मी तिथे असेपर्यंत तरी ते कर्ज काही वसूल होऊ शकले नाही.

 

अशाच अजून काही ‘साहसांच्या’ कथा यथावकाश पुढील भागांत .

 

आला पाऊस !

rain 5115710 1280

आला पाऊस !

पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते. 

खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले  खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला आहे)

आला पह्यला पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परमय

माझं मन गेलं भरी0aeaa44d540b5bffa4807e13a15be10f

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवार भिजले

नदी नाले गेले भरीsmall waterfall rain forest rock river ecology beautiful nature 49442 674

आला पाऊस पाऊस’

आता धूमधडाक्यानं

घर लागले गयाले

खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस

ललकारी ते ठोकत

पोरं निघाले भिजत

दारी चिल्लाया  मारतimages 26

आला पाऊस पाऊस

गडगडाट करत

धडधड करे छाती

पोरं दडले घरात

आता उगू दे रे शेतं

आला पाऊस पाऊस

वऱ्हे येऊ दे रे रोपं

आता फिटली हाऊसgrass 7089807 1280

येता पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी  

आता खा रे वडे भजे

घरांमधी बसा दडी

देवा पाऊस पाऊस

तुझ्या डोयातले आंस

दैवा तुझा रे हारास

जीवा तुझी रे मिरास !

बहिणाबाई चौधरी 

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 

 

 

 

कठिण शब्दांचा अर्थ:

पह्यला= पहिला

धरत्रीचा परमय= धरित्रीचा परिमळ, म्हणजेच सुगंध

गयाले= गळायला 

खारी= पिवळी चिक्कन माती

वाहीसन= वाहून

चिल्लाया= आरोळ्या

वऱ्हे= वर

हाऊस= हौस

घरांमधी बसा दडी= घरात दडी मारून बसा

तुझ्या डोयातले आंस= तुझ्या डोळ्यातले अश्रू

हारास= लिलाव

 

लोकसभा निवडणूक 2024

voting 2024 2

आम्ही मतदान केले. तुम्ही ? We have voted for Indian democracy. Have You?

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

How to behave with elders-ससुराल की नीति

How to behave with elders

एक लड़की विवाह करके ससुराल में आयी|

घर में एक तो उसका पति था, एक सास थी और एक दादी सास थी|

वहाँ आकर उस लड़की ने देखा कि दादी सास का बड़ा अपमान, तिरस्कार हो रहा है!

छोटी सास उसको ठोकर मार देती, गाली दे देती|

यह देखकर उस लड़की को बड़ा बुरा लगा और दया भी आयी! उसने विचार किया कि अगर मैं सास से कह कहूँ कि आप अपनी सास का तिरस्कार मत किया करो तो वह कहेगी कि कल की छोकरी आकर मेरे को उपदेश देती है, गुरु बनती है!

अतः उसने अपनी सास से कुछ नहीं कहा| उसने एक उपाय सोचा| वह रोज काम-धंधा करके दादी सास के पास जाकर बैठ जाती और उसके पैर दबाती|

जब वह वहाँ ज्यादा बैठने लगी तो यह सास को सुहाया नहीं| एक दिन सास ने उससे पूछा कि ‘बहु! वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की ने कहा कि ‘बोलो, काम बताओ!’ सास बोली कि ‘काम क्या बतायें, तू वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की बोली कि ‘मेरे पिता जी ने कहा था कि जवान लड़कों के साथ तो कभी बैठना ही नहीं, जवान लड़कियों के साथ भी कभी मत बैठना; जो घर में बड़े-बूढ़े हों, उनके पास बैठना, उनसे शिक्षा लेना| हमारे घर में सबसे बूढ़ी ये ही हैं, और किसके पास बैठूँ?

मेरे पिताजी ने कहा था कि वहाँ हमारे घर की रिवाज नहीं चलेगी, वहाँ तो तेरे ससुराल की रिवाज चलेगी| मेरे को यहाँ की रिवाज सीखनी है, इसलिये मैं उनसे पूछती हूँ कि मेरी सास आपकी सेवा कैसे करती है?

’ सास ने पूछा कि ‘बुढ़िया ने क्या कहा?’ वह बोली कि ‘दादी जी कहती हैं कि यह मेरे को ठोकर नहीं मारे, गाली नहीं दे तो मैं सेवा ही मान लूँ!’

सास बोली कि ‘क्या तू भी ऐसा ही करेगी?’ वह बोली कि ‘मैं ऐसा नहीं कहती हूँ, मेरे पिता जी ने कहा कि बड़ों से ससुराल की रीति सीखना!’


सास डरने लग गयी कि मैं अपनी सास के साथ जो बर्ताव करुँगी, वही बर्ताव मेरे साथ होने लग जायगा!

एक जगह कोने में ठीकरी इकट्ठी पड़ी थीं|     सास ने पूछा-‘बहू! ये ठीकरी क्यों क्यों इकट्ठी की हैं?’
लड़की ने कहा-‘आप दादी  जी को ठीकरी में भोजन दिया करती हो, इसलिये मैंने पहले ही जमा कर ली|’


‘तू मेरे को ठीकरी में भोजन करायेगी क्या?’


‘मेरे पिता जी ने कहा कि तेरे वहाँ की रीति चलेगी|’


‘यह रीति थोड़े ही है!’


‘तो आप फिर आप ठीकरी मैं क्यों देती हो?’


‘थाली कौन माँजे?’


‘थाली तो मैं माँज दूँगी|’


‘तो तू थाली में दिया कर, ठीकरी उठाकर बाहर फेंक|’

अब बूढ़ी माँजी को थाली में भोजन मिलने लगा|

सबको भोजन देने के बाद जो बाकी बचे, वह खिचड़ी की खुरचन, कंकड़ वाली दाल माँ जी को दी जाती थी| लड़की उसको हाथ में लाकर देखने लगी|

सास ने पूछा-‘बहू! क्या देखती हो?’


‘मैं देखती हूँ कि बड़ों को भोजन कैसा दिया जाय|’


‘ऐसा भोजन देने की कोई रीति थोड़े ही है!’


‘तो फिर आप ऐसा भोजन क्यों देती हो?’


‘पहले भोजन कौन दे?’


‘आप आज्ञा दो तो मैं दे दूँगी|’


‘तो तू पहले भोजन दे दिया कर|’


‘अच्छी बात है!’


अब बूढ़ी माँ जी को बढ़िया भोजन मिलने लगा| रसोई बनते ही वह लड़की ताजी खिचड़ी, ताजा फुलका, दाल-साग ले जाकर माँ जी को दे देती| माँ जी तो मन-ही-मन आशीर्वाद देने लगी|

माँ जी दिनभर एक खटिया में पड़ी रहती| खटिया टूटी हुई थी| उसमें से बन्दनवार की तरह मूँज नीचे लटकती थी| लड़की उस खटिया को देख रही थी|

सास बोली कि ‘क्या देखती हो?’
‘देखती हूँ कि बड़ों को खाट कैसे दी जाय|’
‘ऐसी खाट थोड़े ही दी जाती है! यह तो टूट जाने से ऐसी हो गयी|’
‘तो दूसरी क्यों नही बिछातीं?’
‘तू बिछा दे दूसरी|’
‘आप आज्ञा दो तो दूसरी खाट बिछा दूँ!’


अब माँ जी के लिए निवार की खाट लाकर बिछा दी गयी|

एक दिन कपड़े धोते समय वह लड़की माँ जी के कपड़े देखने लगी| कपड़े छलनी हो रखे थे|

सास ने पूछा कि ‘क्या देखती हो?’


‘देखती हूँ कि बूढों को कपड़ा कैसे दिया जाय|’


‘फिर वही बात, कपड़ा ऐसा थोड़े ही दिया जाता है? यह तो पुराना होने पर ऐसा हो जाता है|’


‘फिर वही कपड़ा रहने दें क्या?’
‘तू बदल दे|’


अब लड़की ने माँ जी का कपड़ा चादर, बिछौना आदि सब बदल दिया| उसकी चतुराई से बूढ़ी माँ जी का जीवन सुधर गया! अगर वह लड़की सास को कोरा उपदेश देती तो क्या वह उसकी बात मान लेती? बातों का असर नहीं पड़ता, आचरण का असर पड़ता है| 

प्रयत्नांती परमेश्वर

Screenshot 20240403 092528 Google

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager

 

 

 

 

व्हावी ऐसी होळी जेणे मुक्तीची दिवाळी

Holi

खालील रचना आज होळीच्या निमित्ताने एका WhatsApp ग्रुपवर आली आणि खूप आवडली. 

त्यामुळे ती इथे देत आहे. 

सदरील रचनेचा इंटरनेट वर शोध घेतला असता, यू ट्यूब वर सदरील रचना गायलेला एक व्हिडीओ ही मिळाला, त्याची लिंक येथे देत आहे, मूळ यू ट्यूब क्रिएटर यांना त्याबद्दल काही हरकत नसेल असे गृहित धरून. 

तसेच ही रचना संत जनाबाईंची आहे असे प्रथमदर्शनी वाटते, पण वरील व्हिडीओच्या कॉमेंट्स मध्ये खुद्द क्रिएटरनी  केलेल्या खुलाशाप्रमाणे, ही रचना डॉक्टर प्रसाद वाळिंबे यांची आहे . तर त्यांचीही परवानगी गृहित धरून सर्वांपर्यंत ही रचना पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

 

 

कराया साजरा ।
होलिकेचा सण ।
मनाचे स्थान ।
निवडीले ।।

ऐसे ते स्थान ।
साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले ।
केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला ।
अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे।
लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची।
रास भली ।।

गुरुकृपा तैल ।
रामनाम घृत ।
अर्पिले तयात ।
ऐसे केले ।।

रेखिली भोवती । 
सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी ।
शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी ।
तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले ।
झाली कृपा ।।

दिधली तयाते।
विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती ।
षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत ।
वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ ।
नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।।

 

होळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.