https://goodworld.in A website by Madhav Bhope

लोकसभा निवडणूक 2024

voting 2024 2

आम्ही मतदान केले. तुम्ही ? We have voted for Indian democracy. Have You?

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

How to behave with elders-ससुराल की नीति

How to behave with elders

एक लड़की विवाह करके ससुराल में आयी|

घर में एक तो उसका पति था, एक सास थी और एक दादी सास थी|

वहाँ आकर उस लड़की ने देखा कि दादी सास का बड़ा अपमान, तिरस्कार हो रहा है!

छोटी सास उसको ठोकर मार देती, गाली दे देती|

यह देखकर उस लड़की को बड़ा बुरा लगा और दया भी आयी! उसने विचार किया कि अगर मैं सास से कह कहूँ कि आप अपनी सास का तिरस्कार मत किया करो तो वह कहेगी कि कल की छोकरी आकर मेरे को उपदेश देती है, गुरु बनती है!

अतः उसने अपनी सास से कुछ नहीं कहा| उसने एक उपाय सोचा| वह रोज काम-धंधा करके दादी सास के पास जाकर बैठ जाती और उसके पैर दबाती|

जब वह वहाँ ज्यादा बैठने लगी तो यह सास को सुहाया नहीं| एक दिन सास ने उससे पूछा कि ‘बहु! वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की ने कहा कि ‘बोलो, काम बताओ!’ सास बोली कि ‘काम क्या बतायें, तू वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की बोली कि ‘मेरे पिता जी ने कहा था कि जवान लड़कों के साथ तो कभी बैठना ही नहीं, जवान लड़कियों के साथ भी कभी मत बैठना; जो घर में बड़े-बूढ़े हों, उनके पास बैठना, उनसे शिक्षा लेना| हमारे घर में सबसे बूढ़ी ये ही हैं, और किसके पास बैठूँ?

मेरे पिताजी ने कहा था कि वहाँ हमारे घर की रिवाज नहीं चलेगी, वहाँ तो तेरे ससुराल की रिवाज चलेगी| मेरे को यहाँ की रिवाज सीखनी है, इसलिये मैं उनसे पूछती हूँ कि मेरी सास आपकी सेवा कैसे करती है?

’ सास ने पूछा कि ‘बुढ़िया ने क्या कहा?’ वह बोली कि ‘दादी जी कहती हैं कि यह मेरे को ठोकर नहीं मारे, गाली नहीं दे तो मैं सेवा ही मान लूँ!’

सास बोली कि ‘क्या तू भी ऐसा ही करेगी?’ वह बोली कि ‘मैं ऐसा नहीं कहती हूँ, मेरे पिता जी ने कहा कि बड़ों से ससुराल की रीति सीखना!’


सास डरने लग गयी कि मैं अपनी सास के साथ जो बर्ताव करुँगी, वही बर्ताव मेरे साथ होने लग जायगा!

एक जगह कोने में ठीकरी इकट्ठी पड़ी थीं|     सास ने पूछा-‘बहू! ये ठीकरी क्यों क्यों इकट्ठी की हैं?’
लड़की ने कहा-‘आप दादी  जी को ठीकरी में भोजन दिया करती हो, इसलिये मैंने पहले ही जमा कर ली|’


‘तू मेरे को ठीकरी में भोजन करायेगी क्या?’


‘मेरे पिता जी ने कहा कि तेरे वहाँ की रीति चलेगी|’


‘यह रीति थोड़े ही है!’


‘तो आप फिर आप ठीकरी मैं क्यों देती हो?’


‘थाली कौन माँजे?’


‘थाली तो मैं माँज दूँगी|’


‘तो तू थाली में दिया कर, ठीकरी उठाकर बाहर फेंक|’

अब बूढ़ी माँजी को थाली में भोजन मिलने लगा|

सबको भोजन देने के बाद जो बाकी बचे, वह खिचड़ी की खुरचन, कंकड़ वाली दाल माँ जी को दी जाती थी| लड़की उसको हाथ में लाकर देखने लगी|

सास ने पूछा-‘बहू! क्या देखती हो?’


‘मैं देखती हूँ कि बड़ों को भोजन कैसा दिया जाय|’


‘ऐसा भोजन देने की कोई रीति थोड़े ही है!’


‘तो फिर आप ऐसा भोजन क्यों देती हो?’


‘पहले भोजन कौन दे?’


‘आप आज्ञा दो तो मैं दे दूँगी|’


‘तो तू पहले भोजन दे दिया कर|’


‘अच्छी बात है!’


अब बूढ़ी माँ जी को बढ़िया भोजन मिलने लगा| रसोई बनते ही वह लड़की ताजी खिचड़ी, ताजा फुलका, दाल-साग ले जाकर माँ जी को दे देती| माँ जी तो मन-ही-मन आशीर्वाद देने लगी|

माँ जी दिनभर एक खटिया में पड़ी रहती| खटिया टूटी हुई थी| उसमें से बन्दनवार की तरह मूँज नीचे लटकती थी| लड़की उस खटिया को देख रही थी|

सास बोली कि ‘क्या देखती हो?’
‘देखती हूँ कि बड़ों को खाट कैसे दी जाय|’
‘ऐसी खाट थोड़े ही दी जाती है! यह तो टूट जाने से ऐसी हो गयी|’
‘तो दूसरी क्यों नही बिछातीं?’
‘तू बिछा दे दूसरी|’
‘आप आज्ञा दो तो दूसरी खाट बिछा दूँ!’


अब माँ जी के लिए निवार की खाट लाकर बिछा दी गयी|

एक दिन कपड़े धोते समय वह लड़की माँ जी के कपड़े देखने लगी| कपड़े छलनी हो रखे थे|

सास ने पूछा कि ‘क्या देखती हो?’


‘देखती हूँ कि बूढों को कपड़ा कैसे दिया जाय|’


‘फिर वही बात, कपड़ा ऐसा थोड़े ही दिया जाता है? यह तो पुराना होने पर ऐसा हो जाता है|’


‘फिर वही कपड़ा रहने दें क्या?’
‘तू बदल दे|’


अब लड़की ने माँ जी का कपड़ा चादर, बिछौना आदि सब बदल दिया| उसकी चतुराई से बूढ़ी माँ जी का जीवन सुधर गया! अगर वह लड़की सास को कोरा उपदेश देती तो क्या वह उसकी बात मान लेती? बातों का असर नहीं पड़ता, आचरण का असर पड़ता है| 

प्रयत्नांती परमेश्वर

Screenshot 20240403 092528 Google

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager

 

 

 

 

व्हावी ऐसी होळी जेणे मुक्तीची दिवाळी

Holi

खालील रचना आज होळीच्या निमित्ताने एका WhatsApp ग्रुपवर आली आणि खूप आवडली. 

त्यामुळे ती इथे देत आहे. 

सदरील रचनेचा इंटरनेट वर शोध घेतला असता, यू ट्यूब वर सदरील रचना गायलेला एक व्हिडीओ ही मिळाला, त्याची लिंक येथे देत आहे, मूळ यू ट्यूब क्रिएटर यांना त्याबद्दल काही हरकत नसेल असे गृहित धरून. 

तसेच ही रचना संत जनाबाईंची आहे असे प्रथमदर्शनी वाटते, पण वरील व्हिडीओच्या कॉमेंट्स मध्ये खुद्द क्रिएटरनी  केलेल्या खुलाशाप्रमाणे, ही रचना डॉक्टर प्रसाद वाळिंबे यांची आहे . तर त्यांचीही परवानगी गृहित धरून सर्वांपर्यंत ही रचना पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

 

 

कराया साजरा ।
होलिकेचा सण ।
मनाचे स्थान ।
निवडीले ।।

ऐसे ते स्थान ।
साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले ।
केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला ।
अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे।
लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची।
रास भली ।।

गुरुकृपा तैल ।
रामनाम घृत ।
अर्पिले तयात ।
ऐसे केले ।।

रेखिली भोवती । 
सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी ।
शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी ।
तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले ।
झाली कृपा ।।

दिधली तयाते।
विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती ।
षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत ।
वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ ।
नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।।

 

होळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

Six of the mirror- story of feedback

woman looking in mirror- Image by storyseta on Freepik

SIX OF THE MIRROR AND FOUR OF MINE

What is a feedback?

I have often heard that people improve if they are given a proper feedback. But what is a feedback? Is it a skill? Or art?

If it is skill, then I can cultivate it through practice. All it needs is to understand and master the skills involved. However, if it is an art, I think I shall have to add some inner part of myself to those skills. May be this part is my intuitive self or the sixth sense. Reflecting upon what giving or feedback is, let me look at it both as a skill and an art.

Six qualities of mirror

I have often heard that giving of feedback is like being a mirror to another person. How does the mirror give feedback? Let me give a detailed thought to this simile.

Man looking in mirror

1. Specific

First, when I stand in front of the mirror, I see some grey hair on my head. The mirror is not vague; it doesn’t say that there is something disturbing about my appearance. In fact, the mirror is so specific that it tells exactly which part of the hair has greyed and to what extent. So, the first still that the mirror seems to be using in giving the feedback is that it is very specific as against being vague and general.

And what do I do when I give a feedback? Is it so specific? What efforts do I take to make it specific? I think, I tell people in the office, somebody asks me to clarify it, which is very rare, I specify only up to a point and not fully. Yes, I have to improve in this area. I must tell my subordinates; for instance, that the recommendation make in their note should be the logical conclusion of the preceding paragraphs. And at home, I can tell my wife that when the guests are entertained, it is the continuing sight of used cups and plates in the drawing room that upsets me.

2. Non judgmental

Secondly, I notice that the mirror just reflects me, or describes me the way I look. This is important in as much as its feedback is neither evaluative nor judgmental. While showing my grey hair the mirror does not say to me that I am becoming old. It is for me to understand what my grey hair means. The mirror has no meaning to give, no judgement to pass. When I give a feedback to the subordinate in the office, when he has failed to do some work assigned to him, for instance, I do feel like calling him useless. Do I refrain form evaluation, judging? I think I am always tempted to evaluate, when work is not done. I may say, “You are not efficient”. This is surely evaluation him negatively. Could I tell him, for instance, that I needed the information from him today, and it has not come? And at home, instead of telling my daughter, she is oversensitive (which is evaluative) I could tell her that whenever I am angry, she immediately starts sobbing.

3. Non-directing

Thirdly, after showing me my grey hair, I find that the mirror is totally silent. It is absolutely non-directing about my subsequent action and it has no advice to give me. When pointing out to my daughter that she has watched TV longer than she planned, I don’t refrain from voicing my expectation to her. I have an emotional involvement in her and I have also a father’s role. But will I at least reduce my need to direct her as she grows up? I don’t feel sure.

4. Immediate

Fourthly, I observe that the mirror gives immediate feedback as distinct from a delayed one. This brings to my mind that many times I postpone giving feedback to my colleagues or subordinates without a strong reason. When I give it after a lapse of time, I create uncomfortable feelings in them and they replay, “Why didn’t you tell then?” I cannot accept that every feedback can be given immediately. But if I am postponing, am I doing so consciously and for a valid reason?

5. Genuine

Fifthly, I am impressed by a less noticed characteristic of the mirror, it always gives me a genuine feedback. It never has a hidden agenda. I cannot claim that I am always free from ulterior motives when I give a feedback to others. Particularly, when I give a positive feedback, I discover after reflection that I was guided by some desire to please. My motive sometimes can even be manipulating for a future advantage. Many times my ulterior motive while giving the feedback to another person has been to seek his or her acceptance of me. My hidden agenda could be of this type.  It is possible that I must have exaggerated my positive feedback in that process and bordered on sycophancy unwittingly. Even in giving a negative feed back, I could be sometimes, at least unconsciously, settling my past scores.

6.Whole

The mirror, sixthly, has a very unique character. It gives feedback on the whole of my person as far as it can see; my grey hair, my dress, my physical stature and even my moods as writ on the face. It doesn’t select some aspect of myself and tell me only about that aspect. I am amused that when I give feedback to my wife or a person in the office, I speak only about one aspect at a time, and more funnily, it is the negative one. I do observe on the breakfast table that the omelette is salty but ignore to say the cup of tea is really great that day.

These six qualities of the mirror are indeed laudable and howsoever difficult they may be, I would like to imbibe them – making my feedback specific, Descriptive, non – directing, immediate, Genuine and giving it on the Whole Person. I think it could be possible by practice. I know this practice is not very easy, but I can surely make an attempt at acquiring this bunch of skills and check on myself frequently.

Four of mine

But even if I acquire these skills someday, I don’t think I will be satisfied with that much. For, the mirror is a lifeless object and I feel myself different and perhaps greater than the mirror. Even an apt simile is useful up to a certain point. Beyond that, it may cease to be a source of learning. I can’t say that the mirror has everything that is necessary for giving a proper feedback. By taking the help of the mirror, I have examined feedback only as a bunch of some useful technical skills. Let me now turn to examine, what, as a living person, I can add of myself to these skills and perhaps convert them into an art.

1.Assessment of receptivity

It is important for me that I relate to the receiver of my feedback also as a living person. For this, first of all, I can use my assessment of the receptivity of the receiver of my feedback. The mirror can’t do this. My use of this judgement would necessitate my considering the mood of the receiver, his acceptance of me as a person and the time and place that I choose when I give him my feedback. If I don’t use such assessment, even my positive feedback may turn the receiver hostile towards me. I remember I had profusely praised my Professor of Economics for her classes in the presence of the College Principal and other Professors without caring to know how that would provoke her colleagues. She later pulled me up for my insensitivity. As regards negative feed back, it would be damaging to the receiver and ultimately to my relationship with him in the absence of my assessment about his receptivity. For instance, if he is under some tension and I tell him that his grammar is wrong, he would surely be justified in asking me to mind my own business.

2. Respect

Secondly, I think I can bring forth my respect for the other person when I give him feedback. I don’t think the mirror can ever acquire this quality. I think I can always remind myself that the receiver of my feedback has a capacity to use it. I don’t have to advise him about what to do with my feedback. Even if I have a valuable advice to give, I must check the temptation of giving it. For, I can respect his freedom to make use of my feedback. Therein lay his opportunity to grow. And by doing this, I am not “allowing” him to grow. Who am I to “allow” anyone to grow? All I am doing is preventing myself from blocking his growth when I refrain from giving him my advice.

3. Concern

The third important thing I can add to my feedback is my concern for the receiver. The lifeless mirror can’t have such concern. How do I communicate my concern to the other person? I think I don’t have to bother about it; for, if it exists, it will get communicated. May be non-verbally and may be even without my awareness. All I need to ensure is that such concern genuinely exists in me. Yet, in spite of my concern for him I am not going to insist that he should modify his behaviour according to what I think.

4.Intimacy

The fourth and the most important thing I can do is to take the opportunity to develop intimacy with the other person when I give him a feedback. The poor mirror can’t think of such opportunity. When I give a feedback to another person, I am in fact touching him. When I do that I myself am receiving his touch at that time. When my right palm touches my left palm, is not the left palm touching the right too? Every feedback, then, gives an opportunity to exchange touch, come closer and feel intimate. With that, the mutual trust grows, concern deepens, affection increase. I and the other person take off our masks voluntarily, one after another and see each other better, clearer and surer. Oh, how rejuvenating that would be!

Thus, adding myself to the mirror’s skills of giving feedback would mean acknowledging the receiver as a living person and using my Assessment of the Receptivity of the receiver, activating my Respect for him, acting out my Concern for him and taking feedback as an Opportunity to develop intimacy with him.

Six of the mirror and four of mine. I think that would be a creative combination.

 

Credit- State Bank Academy, Gurugram

If you like the post, you can subscribe to my blog for reading more such posts.

To share this on Facebook, whatsapp etc. please click on the respective icons below.

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

श्रोता दशसहस्रेषु

श्रोता दशसहस्रेषु

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः।

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।।

२०२३ हे वर्ष पाहता पाहता संपले, आणि आपण २०२४ च्या उंबरठ्यावर उभे आहोत. नवीन वर्षाचे अनेकांचे अनेक संकल्प असतात. त्यातील किती तडीस जातात हा भाग निराळा. पण संकल्प करण्यातही एक वेगळीच मजा असते.

नवीन वर्षापासून, जमेल तितके लिहिते व्हावे, हा संकल्प उत्पन्न झाला. अर्थात, आपण लिहिते झाल्यावर, ‘वाचते’ व्हावे असा संकल्प घेणारे काही महाभाग ही असावेत, ही अपेक्षा अगदीच काही गैरलागू नाही. हा विषय मनात आल्यावर, वरील संस्कृत सुभाषित आयतेच आठवले. अर्थात, त्या सुभाषितात, वक्ता, आणि दाता यांचे गुणगान केले आहे. “शंभरात एखादाच शूर असतो, हजारात एखादाच पण्डित असतो, वक्ता (येथे उत्तम वक्ता अभिप्रेत असावा) दहा हजारात एखादाच असतो, तर ‘दाता’ मात्र दुर्मिळ असतो “वा, न, वा”- म्हणजे असतो किंवा असत नाही”, असा या सोप्या सुभाषिताचा सोपा अर्थ. पण आजकालची परिस्थिती पाहून, “वक्ता भवति प्रत्येकः, श्रोता भवति वा न वा” असे म्हणण्यासारखी परिस्थिती दिसून येते. हा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. म्हणूनच, ‘लिहिते’ झाल्यानंतर ‘वाचते’ होणारे वाचक ही असावे लागतात हे ओघानेच आले.अर्थात, स्वान्तः सुखाय लिहिले तर मग ती काळजी राहणार नाही. असो.

Good listening is the first step of good communication.

नवीन वर्षामध्ये या आणि अशा बऱ्याच विषयांवर बोलण्यासाठी भेटूयात.

सगळ्यांना, नवीन वर्ष २०२४ हे आत्मानुभूतीचे जावो!

-माधव भोपे