https://goodworld.in A website by Madhav Bhope

Gita Quiz-2 -Simple quiz on Gita 12th Chapter

12 chapter

 

।। अथ द्वादशोऽध्यायः ।।
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

भगवंताने गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या 33 आणि 34 व्या श्लोकांमध्ये ज्ञानयोगाचे महत्त्व सांगितले, नंतर पाचव्या अध्यायाच्या 16, 17 व्या आणि 24 ते 26 या श्लोकांमध्ये, सहाव्या अध्यायाच्या 24 ते 28 या श्लोकांमध्ये आणि आठव्या अध्यायाच्या 11 ते 13 व्या श्लोकांमध्ये निर्गुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व विषद केले.

 

सहाव्या अध्यायाच्या 47 व्या श्लोकात साधक भक्ताचा महिमा सांगितला, आणि सातव्या अध्यायापासून ते 11 व्या अध्यायापर्यंत जागोजागी ‘अहम्, माम्’ आदि पदांद्वारे विशेष रूपाने सगुण साकार आणि सगुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व सांगितले. शेवटी 11 व्या अध्यायाच्या 54 आणि 55 व्या श्लोकात अनन्य भक्तीचा महिमा आणि फळाचे वर्णन केले.

 

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥ मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ११-५५ ॥

 

वरील सर्व वर्णन ऐकून अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की सगुण परमेश्वराची उपासना करणारे आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे? या जिज्ञासेतूनच अर्जुनानाने भगवंताला प्रश्न विचारला-

 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? ॥ १२-१ ॥

 

इथे  एवं या शब्दाने 11 व्या अध्यायातील 55 व्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा भक्तांबद्दल अर्जुन विचारत आहेत.

 

श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।2।।

 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥

 

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ।।3।।

संनियम्येन्द्रिग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ।।4।।

 

परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥ १२-३, १२-४ ॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहविद्भिरवाप्यते ।।5।।

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ॥ १२-५

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।6।।

परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।7।।

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ।।8।।

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥

अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।।9।।

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।10।।

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ।।11।।

जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ॥ १२-११ ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।12।।

मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ॥ १२-१२ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।13।।

जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; ॥ १२-१३ ॥

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद् भक्तः स मे प्रियः ।।14।।

तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे., ॥१२-१४ ॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ।।15।।

ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१५ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद् भक्तः स मे प्रियः ।।16।।

ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१६ ॥

यो न ह्यष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।।17।।

जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥ १२-१७ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ।।18।।

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते ॥ १२-१८ ॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।19।।

ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥ १२-१९ ॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तिं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।।20।।

परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥ १२-२० ॥

ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः

Gita Quiz- गीतेवर आधारित प्रश्नोत्तरें

bhagavad-gita-quiz

भगवद्‌गीता हा प्राचीन भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील असलेला हा ग्रंथ ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.


सुमारे ५००० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.


महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५ व्या अध्याया पासून ते ४२ व्या अध्यायापर्यन्त संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.


गीतेतील असलेले ७०० श्लोक खालीलप्रमाणे १८ अध्यायांत सांगितले आहेत:


अध्याय शीर्षक श्लोक
अर्जुनविषादयोग ४७
सांख्ययोग(गीतेचे सार) ७२
कर्मयोग ४३
ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) ४२
कर्मसंन्यासयोग २९
आत्मसंयमयोग ४७
ज्ञानविज्ञानयोग ३०
अक्षरब्रह्मयोग २८
राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) ३४
१० विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) ४२
११ विश्वरूपदर्शनयोग ५५
१२ भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) २०
१३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३४
१४ गुणत्रयविभागयोग २७
१५ पुरुषोत्तमयोग २०
१६ दैवासुरसंपद्विभागयोग २४
१७ श्रद्धात्रयविभागयोग २८
१८ मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) ७८
  एकूण श्लोक ७००

गीतेची सुरुवात

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥“ या श्लोकापासून होते, आणि शेवट

‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम

या श्लोकाने होते. अशा पासून सुरू होऊन र्म ने संपणाऱ्या ७०० श्लोकांमध्ये पूर्ण धर्माचे सार आले आहे असे म्हटले तरी हरकत नाही.

जीवनविषयक तत्वज्ञान गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे काही काहीजण खालीलप्रमाणेही वर्गीकरण करतात-

कर्मयोग (अध्याय १-६)

भक्ती योग (अध्याय ७-१२)

ज्ञान योग (अध्याय १३-१८)


गीतेची अठरा नावे

गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी।।
अर्धमात्रा चिदानन्दा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी पराऽनन्ता तत्त्वार्थज्ञानमंजरी।।
इत्येतानि जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः।
ज्ञानसिद्धिं लभेच्छीघ्रं तथान्ते परमं पदम्।।

 


गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानन्दा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनन्ता और तत्त्वार्थज्ञानमंजरी (तत्त्वरूपी अर्थाच्या ज्ञानाचे  भंडार) या प्रकारे  (गीतेच्या) अठरा नावांना जो मनुष्य स्थिर मनाने नित्य जप करताो, तो शीघ्र ज्ञानसिद्धि आणि अंती परम पदाला प्राप्त होतो.


आज गीताजयंतीच्या शुभमुहूर्तापासून आपण श्रीमद् भगवद् गीतेवर आधारित क्विझ सुरू करीत आहोत.

आपला वेळ सत्कारणी लागण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन व्हावे या हेतूने हे क्विझ सुरू करीत आहोत.

आपण सर्वांनी वरील लेख पूर्ण वाचला असेल तर मग चला, आपण वरील लेखावर आधारित असलेल्या खालील प्रश्नांची उत्तरें देऊ यात.

LIC Bima Sakhi Yojna-एल.आय.सी ची बीमा सखी योजना

LIC-Bima-Sakhi-Yojana

बीमा सखी योजना- 18 ते 70 वयोगटातील महिलांना एलआयसी एजंट बनण्याची सुवर्णसंधी- सोबत महिना 7000 रूपये स्टायपेण्ड!

दि. 9 डिसेंबर च्या वर्तमानपत्रात “बीमा सखी योजना” या नांवाची, LIC India(भारतीय जीवन बीमा  निगम)ची एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली. या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी हरियानातील पानिपत या शहरी केल्याचे वाचण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात याबद्दल त्या दिवशी LIC तर्फे देण्यात आलेली जाहिरातही वाचण्यात आली.

कुतूहलाने त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्यातील एका वैशिष्ट्याने लक्ष वेधून घेतले- ते म्हणजे यासाठी 18 ते 70 वयापर्यंतच्या, कमीत कमी 10 वी पास असलेल्या महिला पात्र आहेत. LIC अशा प्रकारे 2 लाख महिलांना एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणार आहे असे म्हटले आहे. त्यासाठी निवडलेल्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा रु. 7000 चा स्टायपेण्ड देण्यात आहे- म्हणजे वर्षाचा रु. 84000- दुसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 6000- म्हणजे वर्षाचा रु. 72000 आणि तिसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 5000-म्हणजे वर्षाचा रु. 60000- असा 3 वर्षांचा एकूण रु. 2,16,000 स्टायपेण्ड देण्यात येणार असल्याचे लिहिले आहे- आणि हा 3 वर्षांचा कालावधी हा प्रशिक्षण काळ राहील असे सांगितले आहे. या कालावधीच्या पूर्ततेनंतर संबंधित महिलांना LIC Agent म्हणून काम करता येणार आहे( LIC चे कर्मचारी नव्हे), आणि त्यातील ग्रॅजुएट असलेल्यांना विकास अधिकारी (Development Officer) म्हणून काम करण्याचीही संधी मिळू शकते असे लिहिले आहे.

अजून या योजनेचे पूर्ण तपशील कळू शकले नाहीत. जसे की- या कालावधीत कसे प्रशिक्षण दिले जाईल? आणि कुठे? तसेच LIC च्या संबंधित वेबसाइट वर वरील स्टायपेण्डच्या समोर वर्षभरात 24 पॉलिसीज- म्हणजे साधारण महिन्याला 2 पॉलिसीज कराव्या लागतील असा उल्लेख आहे. त्यामुळे अशा पॉलिसीज जर पूर्ण नाही होऊ शकल्या तर काय, याबद्दल उल्लेख नाही. मात्र केलेल्या पॉलिसीज वर कमिशन वेगळे मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या महिलांना अशा प्रकारच्या कामात रस आहे, थोडे अधिकचे काम करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी यासंदर्भात apply करून बघायला काही हरकत नाही, असे वाटते. आणि त्यासाठी जास्त काहीच कागदपत्र देण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या महितीतील कोणी अशा महिला असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोंचवावी असे वाटते. तसेच  इच्छुक महिलांनी LIC च्या वेबसाइट वर जाऊन apply करावे.

या संदर्भातील सगळे तपशील खाली दिले आहेत.

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, google search वर जाऊन, bima sakhi(इंग्लिश मध्ये) किंवा बीमा सखी (मराठीमध्ये) टाइप करावे. त्यानंतर जे रिजल्ट येतील, त्यात खालील वेबसाइट दिसेल (अगदी पहिल्याच क्रमांकावर नाही, पण वरून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर) https://licindia.in/lic-s-bima-sakhi

त्यावर क्लिक करावे. त्यानंतर खालील स्क्रीन येईल-

 

lic-1 स्क्रीन वर अजून खाली गेल्यानंतर Click here for Bima Sakhi असे एक बटन येईल. त्यावर क्लिक करायचे-lic-3

 

 

त्यांनंतर अर्जाचा खालील स्क्रीन येईल.lic-5

 

त्यात आपली माहिती भरायची. जन्मतारीख टाकतांना ती MM/DD/YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायची आहे, म्हणजे जन्माचा महिना पहिल्यांदा, नंतर जन्मतारीख, आणि नंतर वर्ष. आपल्या मोबाईल नंबरच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. ई -मेल अॅड्रेस असल्यास टाका, नसल्यास ती जागा रिकामी सोडा. त्यानंतरच्या कॉलम मध्ये- Are you related–… इत्यादि मध्ये मात्र No वरती क्लिक करणे आवश्यक आहे- अर्थात त्यासाठी तुम्ही LIC ह्या कुठल्याही एजंट, डेव्ह. ऑफिसर, कर्मचारी, इत्यादींच्या नात्यात येत नसले पाहिजे. 

त्यानंतरच्या कॉलम मध्ये तिथे दिलेला Captcha भरायचा, आणि नंतर सबमिट करायचे.  सबमिट केल्यावर खालील मेसेज येईल- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकेल.

LIC-6 (1)

 

 

 

Test your Arithmetic! Arithmetic quiz

arithmetic quiz
new
Mathematics Quiz body { font-family: Arial, sans-serif; margin: 20px; background-color: #f9f9f9; } .quiz-container { max-width: 800px; margin: auto; padding: 20px; border: 1px solid #ddd; border-radius: 10px; background-color: #ffe6f1; /* Pink background */ } .question { margin-bottom: 15px; } .answers button { display: block; margin: 5px 0; padding: 10px; background-color: #d7ebf9; /* Light blue background */ border: 2px solid #cccccc; cursor: pointer; border-radius: 5px; transition: background-color 0.3s, color 0.3s; color: #000; /* Ensures text is visible on light blue */ width: 100%; /* Adjusts width for smaller screens */ } .answers button:hover { background-color: #b5d9f4; /* Slightly darker blue on hover */ } .correct { background-color: #d4edda; /* Green for correct answers */ border-color: #28a745; color: #155724; } .incorrect { background-color: #f8d7da; /* Red for incorrect answers */ border-color: #dc3545; color: #721c24; } .result { margin-top: 20px; font-weight: bold; color: green; } /* Responsive styles for mobile */ @media (max-width: 768px) { .answers button { font-size: 16px; padding: 12px; } }

Mathematics Quiz

const quizData = [ { question: "What is 5 + 3?", answers: ["6", "7", "8", "9"], correct: "8" }, { question: "What is 12 ÷ 4?", answers: ["2", "3", "4", "5"], correct: "3" }, { question: "What is 7 × 6?", answers: ["42", "36", "48", "40"], correct: "42" }, { question: "What is the square root of 49?", answers: ["5", "6", "7", "8"], correct: "7" }, { question: "What is 15% of 200?", answers: ["20", "25", "30", "35"], correct: "30" }, ]; // Dynamically add 37 more questions for (let i = 1; i { const questionDiv = document.createElement('div'); questionDiv.classList.add('question'); questionDiv.innerHTML = `

${index + 1}. ${data.question}

`; const answersDiv = document.createElement('div'); answersDiv.classList.add('answers'); data.answers.forEach(answer => { const button = document.createElement('button'); button.textContent = answer; button.onclick = () => { if (answer === data.correct) { score++; button.classList.add('correct'); button.innerHTML += " ✓"; // Green tick } else { button.classList.add('incorrect'); button.innerHTML += " ✗"; // Red cross } button.parentElement.querySelectorAll('button').forEach(b => b.disabled = true); }; answersDiv.appendChild(button); }); questionDiv.appendChild(answersDiv); quiz.appendChild(questionDiv); }); // Handle submit submitButton.onclick = () => { const percentage = ((score / quizData.length) * 100).toFixed(2); result.textContent = `Your score: ${score}/${quizData.length} (${percentage}%)`; submitButton.disabled = true; };

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या केरळ सत्याग्रहाची कहाणी

images 40

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केरळ दौऱ्याची प्रेरणादायी कथा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले, ज्यांनी त्यांची सामाजिक समानतेबद्दलची बांधिलकी सिद्ध केली. पण 1936 साली केरळ दौऱ्याशी संबंधित एक कमी ज्ञात घटना त्यांच्या महानतेचे उत्तम उदाहरण आहे.

पार्श्वभूमी: वैकोम सत्याग्रहाचा वारसा

केरळ हे 20व्या शतकाच्या सुरुवातीला जातीय अन्यायाचे केंद्र होते. वैकोम महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दलित आणि निम्न जातीय हिंदूंना प्रवेश नाकारला जात असे. 1924-25 च्या वैकोम सत्याग्रहाने काही रस्ते खुले केले, पण दलितांना मंदिर प्रवेशाचा संपूर्ण अधिकार मिळवून दिला नाही. बाबासाहेब आंबेडकर या घटनांकडे बारकाईने लक्ष देत होते आणि त्यांना वाटले की केवळ प्रतीकात्मक विजयांपलीकडे जाऊन दलितांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे.banner3 6

आंबेडकरांचा केरळ दौरा

1936 च्या जानेवारी महिन्यात बाबासाहेब केरळला गेले. तेथे पुळाया समाजाने (जे उच्चवर्णीयांद्वारे अस्पृश्य मानले जात) आयोजित केलेल्या संमेलनात त्यांनी भाषण दिले. हे संमेलन एर्नाकुलम येथे आयोजित करण्यात आले होते. बाबासाहेबांचा हा दौरा विशेष होता कारण राष्ट्रीय स्तरावरील दलित नेते म्हणून ते पहिल्यांदा केरळला गेले आणि तिथल्या दलितांना स्वाभिमान व आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित केले.IMG 20230323 183442 2 1 750x375 1

प्रभावी भाषण: एक धाडसी कृती

उच्चवर्णीय गटांकडून जोरदार विरोध आणि धमक्या असूनही, एर्नाकुलम येथे बाबासाहेबांचे भाषण प्रभावी ठरले. त्यांनी पुळाया समाजाला फक्त मंदिर प्रवेशासाठी नव्हे, तर संपूर्ण सामाजिक समानतेसाठी लढा देण्याचे आवाहन केले. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि अन्यायकारक परंपरांशी लढण्यासाठी धैर्य हवे, असे ते म्हणाले.

त्यांचे शब्द अत्यंत प्रेरणादायी होते:
“लढाई फक्त मंदिर प्रवेशासाठी नाही, तर तुमचं समतेचं हक्क मिळवण्यासाठी आहे. तुम्ही कुणाच्याही तुलनेत कमी नाही, आणि तुमचा लढा ही असमानतेची मुळे नष्ट करण्यासाठी असायला हवा.”

या भाषणामुळे दलित समाजाला आपल्या हक्कांची जाणीव झाली. त्यांनी फक्त उच्चवर्णीयांनी दिलेल्या अधिकारांवर समाधान मानण्याऐवजी खऱ्या नागरिकत्वाचा आग्रह धरला.

परिणाम: दलित समाजाला मिळालेली प्रेरणा

बाबासाहेबांच्या केरळ दौऱ्यामुळे तेथील दलित चळवळींना नवीन दिशा मिळाली. त्यांच्या विचारांमुळे 1937 च्या गुरुवायूर सत्याग्रहासारख्या पुढील आंदोलनांना चालना मिळाली, ज्याने सर्व हिंदूंना मंदिर प्रवेशाचा आग्रह धरला. पुढे केरळ सरकारने बाबासाहेबांच्या दौऱ्याला राज्याच्या जातीय समतेच्या धोरणांवर परिणाम करणारा ऐतिहासिक प्रसंग म्हणून मान्यता दिली.

निष्कर्ष: न थांबणाऱ्या धैर्याचे प्रतीक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केरळ दौरा त्यांच्या केवळ नेत्याच्या भूमिकेचे नव्हे, तर दूरदृष्टीचा साक्षात्कारही करतो. जीव धोक्यात असल्याची जाणीव असूनही, त्यांनी अत्याचारितांसोबत उभे राहून त्यांना शतकानुशतके चाललेल्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी प्रेरित केले. ही कमी ज्ञात कथा बाबासाहेबांच्या व्यापक प्रभावाची आणि सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांची आठवण करून देते.

Devendra Returns!! देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री!!!

ndevw 201911325872

ते पुन्हा आले!!! 

Devendra 3.0

उद्या 5 वाजता भव्य शपथविधी!!

Devendra Fadnavis 6