I am an enthusiastic blogger. Want to share my thoughts, experiences and learning with the world. Looking at life with an open mind, always eager to learn new things and expect people around me to be equally enthusiastic too.
पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते.
खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला आहे)
एकदा अकबर बादशहा जंगलात शिकारीला गेला. बरोबर पुष्कळ लोक होते. पण दैवयोगाने, अकबर जंगलात कुठे तरी भटकला आणि त्याच्या सोबतचे लोक खूप लांब राहिले.
अकबर बराच पुढे गेल्यावर त्याला एक शेत दिसले. एंव्हाना त्याला खूप भूक आणि तहान लागली होती आणि तो दमला होता. अकबर त्या शेतात पोंचला, आणि त्या शेताचा मालक जो एक अत्यंत गरीब शेतकरी होता, त्याला म्हणाला, “बाबा रे, मी तहानेने आणि भुकेने अगदी व्याकुळ झालो आहे. काही खायला मिळाले, आणि प्यायला थंडगार पाणी मिळाले तर खूप उपकार होतील.” अकबराने त्याला आपण बादशहा आहोत असे काही संगितले नाही. फक्त म्हणाला, “मी राज्याचा माणूस आहे.”
शेतकरी जरी अगदी गरीब होता, पण माणुसकी त्याची जिवंत होती. तो म्हणाला, “ ठीक आहे. आमच्यासाठी तर तुम्ही आमचे मालकच आहात. काही काळजी करू नका.” असे म्हणून शेतकर्याने राजाला थंड पाणी दिले, शेतात असलेल्या ऊसाचा थंडगार रस दिला, आणि आपल्याजवळच्या गाठोड्यातील भाकरीही दिली. नंतर त्याने झाडाखाली खाटेवर चादर अंथरुन राजाला थोडा आराम करायची विनंती केली. राजा अगदी खुष झाला. त्याला शेतकर्याने दिलेल्या वस्तू अमृतासमान वाटल्या.
बादशहा जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा शेतकर्याला म्हणाला, “तुला जर काही काम पडले तर दिल्लीला जरूर ये, आणि मला भेट. माझे नांव अकबर आहे. दिल्लीला आल्यावर कोणालाही विचार.”
“नाही तर थांब, तुझ्याजवळ कागद आणि कलम असेल तर आण. मी तुला लिहून देतो.”
आता शेतात कुठला कागद आणि कुठली कलम! तो शेतकरी बिचारा अनपढ होता. त्याच्या शेतात एक फुटलेला मातीचा घडा होता. तो त्याने बादशहासमोर ठेवला, आणि कुठून तरी एक पांढरा चुनखडीचा तुकडा घेऊन आला, आणि बादशहासमोर ठेवला. बादशहाने त्या घड्याच्या तुकड्यावर आपले नाव लिहिले आणि सही केली. “मला भेतायला येशील तेंव्हा हे घेऊन ये” म्हणून संगितले. शेतकरी हो म्हणाला, आणि तो लिहिलेला तुकडा आपल्या झोपडीत ठेवून दिला.
तो तुकडा तिथे बरेच वर्ष पडून राहिला. मग एके वर्षी खूप दुष्काळ पडला, शेती अजिबात पिकली नाही, गुरढोरांना प्यायला पाणीही मिळेना. त्यावेळी त्या शेतकर्याच्या बायकोला ही घटना आठवली, आणि ती शेतकर्याला म्हणली, “तो दिल्लीचा कोणी माणूस आला होता ना? त्याच्याकडे एकदा जाऊन तरी पहा. काही मदत मिळते का ते?”
पत्नीने वारंवार म्हटल्यावर शेतकरी तो घड्याचा तुकडा घेऊन दिल्लीला पोंचला.
दिल्लीला गेल्यावर रस्त्याने त्याने लोकांना विचारले, “अकबरीये का घर कौन-सा है?” बादशहा अकबराचे नांव ऐकून, काही लोकांनी त्याला राजवाड्याचा रस्ता दाखविला. तिथे गेल्यावर तो शेतकरी म्हणतो,
“अकबरीये का घर यही है कया?”
द्वारपालांनी रागावून म्हटले, “कोण आहेस तू? बोलायची काही अक्कल आहे का नाही?”
तो शेतकरी तर आपल्या गावरान भाषेत बोलला होता. त्याने आपल्या जवळील तो घड्याचा तुकडा दाखविला, आणि संगितले, “जाऊन त्याला सांगा, एक जण तुला भेटायला आला आहे.”
बादशहाची सही बघून द्वारपाल चक्रावून गेला. त्याने बादशहाला जाऊन संगितले, “महाराज, एक ग्रामीण आपणास भेटायला आला आहे. बोलण्याची अजिबात अक्कल नाही. पण त्याने हा घड्याचा तुकडा दिला आहे.”
तो तुकडा पाहिल्यावर अकबराला तो सर्व प्रसंग आठवला,आणि तो म्हणाला, “जा, घेऊन या त्याला.”
खेडूत आत आला. बादशहाला उंच सिंहासनावर बसलेला पाहून तो म्हणाला, “ओ अकबरीये! तू तो बहुत ऊंचा बैठा है!”
बादशहा त्याला म्हणाला, “आओ भाई! बैठो!”
असे म्हणून बादशहाने त्याला बसवले, आणि म्हणाला, “तू थोडा वेळ बैस. माझ्या नमाजचा समय झाला आहे. मी नमाज पढून घेतो.”
आता शेतकरी पाहतो तो बादशहाने एक कापड अंथरले, त्यावर बसतो आहे, उठतो आहे, अजून काय काय करतो आहे. अकबराचे नमाज पढून झाल्यावर शेतकऱ्याने विचारले, “हे तू काय करीत होतास?”
बादशहा म्हणाला, “परवरदिगार परमेश्वराची बंदगी करत होतो.”
शेतकरी म्हणाला, “मला समजले नाही”
त्यावर बादशहा म्हणाला, “तो ईश्वर आहे ना? सर्वशक्तिमान? त्याची हाजरी भरत होतो.”
“किती वेळा करतो?”
“दिवसातून पाच वेळा”
“पाच वेळा, उठतो, बसतो, हे सर्व करतो? का?”
“ज्याने हे सर्व वैभव दिले आहे, त्याची हाजरी भरतो.”
शेतकरी म्हणाला, “ मी तर एकदाही हाजरी भरत नाही, तरीही त्याने मला सर्व काही दिले आहे आणि देतो आहे. तुला पाच वेळा हाजरी भरावी लागते? अच्छा, जय रामजी की! मी चाललो.”
तेंव्हा बादशहाने विचारले, “का आला होतास?”
“माझ्या पत्नीने सांगितले, की दिल्लीला जाऊन भेटून ये, इथे आल्यावर दिसले, तुला स्वतःला पाच वेळा नमाज पढावा लागतो. जेंव्हा तुलाच तो परमात्मा देतो, तर मी तुझ्याजवळ काय मागू?”
“अरे बाबा, तुला पाहिजे असेल ते माग!”
“नाही, तुला एवढ्या मुश्किलीने जे मिळते, ते मी मोफतमध्ये कसे घेऊ?”
असे म्हणून शेतकरी तिथून तडक निघाला, आणि घरी आला.
घरी आल्यावर बायकोने विचारले, “काय झाले? त्या दिल्लीच्या माणसाने काही मदत केली का?”
शेतकरी म्हणाला, “आपल्या देवाची आठवण करूयात, तोच सगळ्यांना सगळे देतो. आता त्या राज्याच्या माणसाला काय मागायचे, जो की स्वतःच मागून खातो? म्हणून देवावर भरवसा ठेवूयात, त्याचे नांव घेऊयात, बस्स!”
इकडे काही चोर चोरी करायला निघाले होते. ते चोर त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर लपून हे सर्व संभाषण ऐकत होते.
बायको म्हणत होती, “दिल्लीला गेले आणि काही आणले नाही.” शेतकरी तिला समजावत होता. त्यावर ती वैतागून म्हणत होती, काही कमवून तरी आणायचे. त्यावर शेतकरी म्हणाला, “आता तर तो सर्व शक्तिमान भगवान देईल तेंव्हाच घेऊ. मी तर सर्व त्याच्यावर सोडले आहे.”
“अहो देवावर सोडले आहे ते ठीक आहे, पण काही कामधंदा तर करा!”
“कामधंदा न करता ही धन मिळते, पण मी ते घेत नाही. आता तर ठाकूरजीची मर्जी असेल तर ते घरबसल्या देतील. काही चिंता करू नकोस, पाऊस येईल, शेती पिकेल, सर्व काही ठीक होईल. मी आता देवावर पूर्ण भरोसा ठेवला आहे. देवाचे देण्याचे खूप मार्ग आहेत. आणि त्याने मनात आणले तर तो छप्पर फाडून ही देतो!”
“ऐक. आजचीच गोष्ट तुला सांगतो. मी नदीवर गेलो होतो. नदीला पूर आला होता. किनारा दिसत नव्हता. मी तिथे हात धुवायला गेलो, तेंव्हा तिथे मला एक भांडे दिसले. ते आधी वाळूत गाडलेले असावे, पण पावसामुळे उघडे पडले असावे. मी जवळ जाऊन पाहिले तर एक झाकण लावलेला एक गडू होता. मी झाकण उघडून पाहिले, तर आत खूप सोने, नाणे भरलेले दिसले. पण मी विचार केला, की हे आपले नाही, आपल्याला नको. परमेश्वर स्वतः देईल तेंव्हा घेऊ!. मी त्याचे झाकण लाऊन ठेवले आणि वापस आलो.
बायकोने त्याला विचारले, “कुठे? कोणत्या जागी?”
तर शेतकऱ्याने तिला सांगितले, अशा अशा एका जागी, एक असे असे झाड आहे, त्याच्या बाजूला.
इकडे चोर त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. चोरांनी विचार केला, “हा शेतकरी तर पागल आहे! असे सहजासहजी मिळालेले धन कोणी सोडते का? आपण तर तिकडेच जाऊ! इतर कुठे चोरी करायला गेलो तर पकडले जाण्याची भीती! त्यापेक्षा हा फुकटचा माल घेऊ!”
असा विचार करून चोर त्या ठिकाणी गेले. पत्ता त्यांनी ऐकला होताच. आता त्या शेतकऱ्याकडून त्या गडूचे झाकण लावतांना चूक झाली होती, आणि झाकण काही पक्के लागले नव्हते. थोडेसे उघडे राहिले होते. त्या उघड्या राहिलेल्या जागेतून एक साप त्याच्या आत जाऊन बसला होता. चोरांनी ते झाकण उघडताच, सापाने जोरात फूत्कार मारला. तेंव्हा घाबरून चोरांनी झाकण जोरात बंद करून टाकले.
चोरांनी आता असा विचार केला, की नक्कीच त्या शेतकऱ्याने आपल्याला पाहिले असेल, आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने ही खोटी कहाणी बनवून आपल्या बायकोला सांगितली असेल. या गडूच्या आत न जाणो कितीतरी विषारी साप आणि विंचू भरलेले असतील. आता एक काम करू. त्या शेतकऱ्याला अद्दल घडवण्यासाठी हा गडू त्याच्याच घरात जाऊन उपडा करून देऊ, म्हणजे ते सर्व साप विंचू त्यालाच चावतील!
असा विचार करून, त्या गडूच्या तोंडाला एक फडके बांधून, ते शेतकऱ्याच्या घराकडे गेले. शेतकरी आणि त्याची बायको झोपले होते. चोरांनी घराचे छप्पर फाडून, त्यातून तो गडू उपडा केला आणि पळून गेले. इकडे तो गडू पडल्यानंतर पहिल्यांदा तो साप खाली पडला, आणि त्याच्यावर ते सर्व दागिने, मोहरा, वगैरे आणि नंतर तो जड असलेला गडू त्या सापावर जोरात पडला आणि साप त्याखाली दाबून मरून गेला.
त्या सर्व आवाजाने शेतकरी नवरा बायको जागे होऊन पाहतात, तर साप मरून पडलेला, आणि सर्व घरात सोने नाणे आणि दागिने विखुरलेले!
भगवान देता है तो छप्पर फाडके! ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ झाली.!
वरील गोष्ट अर्थात, काल्पनिक आहे, आणि देवावर श्रद्धा ठेवली तर देव कश्याही प्रकारे पालन पोषण करतोच, हे दाखवण्यासाठी फक्त तेवढे उदाहरण दिले आहे. यात, अकर्मण्यतेची भलावण करण्याचा, गोष्ट सांगणाऱ्याचा अजिबात हेतू नाही. त्यामुळे गोष्टीतील उदाहरण फक्त तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात घ्यावे. वरील गोष्ट ही स्वामी रामसुखदासजी यांनी, आपल्या प्रवचनात, एक उदाहरण म्हणून सांगितली आहे.
बऱ्याच वेळी, कुठल्या ना कुठल्या अगदी छोट्याश्या कारणामुळे, मन दुःखी होते, आपल्यासारखे कमनशिबी आपणच, असे वाटू लागते. आपल्याला आपलीच कीव येऊ लागते. त्यासाठी कारण, ज्याला English मध्ये “trigger” म्हणतात, ते, अगदी छोट्यातले छोटे कारण ही पुरेसे होते. अगदी, आपल्याला घरी, रोजच्या वेळी चहा नाही मिळाला, घरातला फॅन बिघडला, आणि मेकॅनिकला फोन करूनही तो वेळेवर आला नाही, आणि त्याच वेळी, सुट्टीचा दिवस असूनही, आपली आवडती मॅच सोडून आपल्याला ते काम करावे लागले, इ. कोणतेही कारण या दुःखी होण्याला पुरेसे होते. आपली कोणालाच पर्वा नाही. आपण किती कष्ट करतो याची कोणाला जाणीव नाही,. इ. इ. एकदा विचारांची गाडी सुरू झाली, आणि तिला जर रोकले नाही, तर ती कुठपर्यंतही भरकटत जाऊ शकते.
ज्या माणसांना आयुष्यात सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतात, सगळे व्यवस्थित चाललेले असते, अशांना विशेषतः असे प्रसंग खूप येतात. कारण खरे दुःख काय ते कधी पाहण्याचे, अनुभवण्याचे काम पडलेले नसते. खरे पाहिले तर आपण जे जीवन आज जगतो, ते कुणाचे तरी स्वप्न असू शकते. कल्पना करा. आपण सकाळीच घरातून बायकोशी भांडून, रागारागाने, नाष्टा न करता, कार घेऊन, ऑफिसला निघालो आहोत. रस्त्याने एक जण हातगाडीवर माल भरून, उन्हाचा चटका असतांनाही, विकायला निघालेला आहे. त्याच्याकडे स्वतःचे घर नाही, भाड्याच्या छोट्याश्या जागेत राहतो आहे, नवरा बायको दोघे काम करतात, लहान दोन छोट्याशा मुलांना शेजारणीच्या हवाली करून निघालेले आहेत. तो जो हातगाडीवाला आहे, तो आपल्याकडे बघतांना, आपल्यासारखे होण्याचे स्वप्न बघत नसेल कशावरून? आपण मस्त एसी गाडीत ऑफिसला चाललो आहोत. एक दिवस आपल्यासारखे घर, गाडी इ. असावे हे त्याचे स्वप्न असू शकते.
लहान मुलें कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला दाखवायला आणतात आणि आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरतात. त्यांना वाटत असते, की ही गोष्ट, दुसऱ्याच्या डोळ्याच्या जितक्या जवळ नेऊ, तितकी त्याला चांगली, स्पष्ट दिसेल. पण मग आपण ती गोष्ट, तो कागद, धोड्या अंतरावर धरतो, मग तो कागद किंवा ती गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आयुष्यातही असेच असते. एखाद्या गोष्टीत आपण जितके लिप्त होतो, एकरूप होतो, तितके आपले perspective म्हणजे योग्यपणे जाणून घेण्याची क्षमता कमी होते, आणि आपण त्या बाबतीत स्वतःकडे अलिप्तपणे बघू शकत नाही. जेंव्हा त्या गोष्टीत आणि आपल्यात थोडे अंतर ठेवून पाहण्याची जाण येते, त्यावेळी कुठलीही गोष्ट, म्हणजेच वस्तू, व्यक्ति, परिस्थिती आपल्याला एवढी व्याकुळ नाही करू शकत.
या बाबतीत एक गोष्ट वाचण्यात आली. आपण एखाद्या वेळी क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होतो, अशावेळी ही गोष्ट आठवून बघावी.
एकदा एक राजकुमार आणि त्याचे 5-7 मित्र घोड्यावरून असेच फिरायला निघाले होते. रस्त्याने काही गुजर स्त्रिया दूध, दही, ताक इत्यादीची विक्री करायला निघाल्या होत्या.
राजकुमाराला भगवान श्रीकृष्णासारखे गोपींची छेड काढण्याची लहर आली. त्याने विचार केला यांचे मटके फोडू, आणि नंतर यांना त्याचे पैसे देऊन देऊ! आणि त्याने गमती गमतीत त्या गुजर स्त्रियांचे मटके, दगड मारून, फोडले. त्या स्त्रिया रडू लागल्या.
पण त्यातील एक गुजरी अशी होती, की जिचे मडके फुटले, दूध दही ताक सांडले, तरी ती काहीच बोलली नाही, उलट हसू लागली. तेंव्हा राजकुमार तिला म्हणाला, तुला काहीच वाटले नाही का? तू रडत का नाहीस? गुजरी म्हणाली, महाराज, माझी कहाणी फार मोठी आहे. मी ताक सांडल्याचा काय शोक करू? राजकुमारने तिला तिची कहाणी सांगण्याविषयी आग्रह केला, तेंव्हा ती सांगू लागली.
मी अमुक एका शहरातील नगरसेठची पत्नी होते, मला एक छोटेसे मूल होते. सेठ धन कमविण्यासाठी दुसऱ्या प्रदेशात दूर गेले होते. त्या नगराच्या राजाची नीयत खराब होती. माझे सुंदर रूप पाहून राजाची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्याने मला निरोप पाठवला की अमुक दिवशी मला भेटायला ये. तू केंव्हा येशील याचे उत्तर दे. मी त्याला थोडे थांबण्याची विनंती केली, पतीला चिठ्ठी पाठवली आणि त्याला सगळे कळवून लवकर येण्याविषयी सांगितले. पति आला, त्याला सगळा वृत्तान्त सांगितला, मग आम्ही दोघांनी मिळून विचार केला, की काय करावे? पतीने सांगितले, तू राजाला वेळ दे. मी राजाला वेळ देऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले, पण ही अट घातली की त्याच्या आसपास मैलभर कोणीही नसावे. राजा तयार झाला. आम्ही दोघे पति पत्नी घरून निघालो. मी तलवार घेऊन निघाले. पति त्या जागेपासून जवळच एका पडक्या घरात लपून बसला. राजा आला, तेंव्हा मी मोठी हिम्मत करून, राजाला तलवारीने मारून टाकले, आणि धावत पतीजवळ गेले. पाहते तर तेथे पतीला विषारी सापाने दंश केला होता, आणि तो तिथे मरून पडला होता. मग मी एकटीच तिथून पळाले, कारण सापडले असते, तर मला लोकांनी मारून टाकले असते. मूल माझे, घरीच राहिले.
पुढे पळता पळता जंगल लागले, तिथे डाकू भेटले, त्यांनी मला पकडले. माझे सगळे दागिने ओरबाडून घेतले, आणि मला एका वेश्येच्या घरी नेऊन विकून टाकले. आता मी तिथे राहू लागले. तिकडे आमच्या गावात दुसरा राजा झाला. त्याने माझ्या मुलाचा सांभाळ करून त्याला मोठे केले. तो माझा मुलगा मोठा होऊन तिथेच नोकरी करू लागला. इकडे वेश्यान्च्या संगतीत राहून मीही तेच काम करू लागले. एके दिवशी माझा मुलगा माझ्याकडे आला, आणि रात्रभर राहिला. मला नंतर शंका आली म्हणून सकाळी मी त्याला ओळख विचारली, तेंव्हा त्याने नांव पत्ता सांगितला, तेंव्हा कळाले की हा माझाच मुलगा! मला स्वतःची अत्यंत किळस आली, दुःख झाले, की मी कोण होते आणि कुसंगतीने काय झाले. पंडित लोकांना विचारले की असे पाप झाले, तर काय करावे. त्यांनी सांगितले, चिता पेटव आणि त्या आगीत जाऊन बैस. मनात विचार अला, की चिता पेटवली आणि त्यात जाऊन बसले, तर नंतर अस्थि गंगेत कोण टाकेल? म्हणून गंगा किनाऱ्यावर जाऊन, लाकडे एकत्र करून, चिता रचून त्यावर बसले आणि ती पेटवली. लाकडे जळू लागली. इतक्यात गंगेला पूर आला. आग विझली, मी बेशुद्ध झाले, आणि एका लाकडाच्या ओंडक्यासोबत वाहत वाहत दूर एका गावाच्या किनाऱ्यावर जाऊन पोंचले. त्या गावात गुज्जर लोकांची वस्ती होती. त्यांनी मला वाचवले, आणि माझ्यावर उपचार केले आणि नंतर त्यांनीच माझा सांभाळ केला. आता या गुज्जर लोकांचे दही दूध ताक विकून आपला उदर निर्वाह करते.!
आता तूच सांग राजा, मटका फुटून ताक सांडले, तर त्याचा काय शोक करू?
हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-
देशान्तरे विधिवशाद गणिकां च याता|
पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा
शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||
नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|
मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|
सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|
महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||
तसेच आपले न जाणो याआधी किती जन्म झाले आहेत, आणि प्रत्येक जन्मात काय काय दशा झाली आहे.. हे सगळे कितीदा मिळाले आणि कितीदा गेले. यापुढे छोट्याश्या गोष्टींची काय आणि किती चिंता करायची!
Go to our Amazon Shop to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.
एक राजकुमार था| उसके पाँच-सात मित्र घोड़ों पर घूम रहे थे| वहाँ बहुत-सी गूजर-स्त्रियाँ दूध, छाछ, दही आदि की बिक्री करने को जा रहीं थीं|
राजकुमार को भगवान् श्रीकृष्ण की याद आ गयी कि वे दूध-दही लूटा करते थे तो हम भी आज वैसा ही करें| एक तमाशा कर लें, फिर उनको दाम दे देंगे| राजकुमार और उसके साथियों ने उनके मटके फोड़ दिये| गूजरियाँ बेचारी रोने लगीं|
उनमें से एक गूजरी ऐसी थी, जिसका मटका फूट गया, छाछ बिखर गयी, फिर भी वह हँस रही थी! राजकुमार ने उससे पूछा कि तू रोयी नहीं, क्या बात है? उसने कहा कि महाराज! मेरी बात बहुत लम्बी है! मैं छाछ गिरने का क्या शोक करूँ? राजकुमार ने उससे कहा कि अपनी बात सुनाओ| वह कहने लगी-
मैं अमुक शहर के एक सेठ की पत्नी थी और मेरी गोद में एक बालक था| वे सेठ कमाने के लिये दूसरे देश में चले गये| वहाँ के राजा की नियत खराब थी| मेरी छोटी अवस्था थी और सुन्दर रूप था| राजा ने मेरे पर खराब दृष्टि कर ली और कहा कि अमुक दिन तेरे को आकर मिलना ही पड़ेगा, तुम कब आओगी, जवाब दो| मैंने कहा कि अभी ठहरो| मैंने अपने पति को पत्र भेजा कि जल्दी आओ, मेरे पर ऐसी आफत आयी है| पति आ गया| उससे सारी बात कही और आपस में सलाह की कि क्या किया जाय? सेठ ने कहा तुम राजा को समय दे दो| मैंने राजा के पास समाचार भेज दिया कि आप शहर के बाहर अमुक जगह रात में आ जाओ, पर शर्त यह है कि उस स्थान के मिल भर नजदीक में कोई अन्य व्यक्ति न रहे| राजा ने स्वीकार कर लिया| हम दोनों पति-पत्नी घर से निकल गये कारण कि यहाँ टिक नहीं सकेंगे| मैं रात्रि में वहाँ तलवार लेकर गयी| पति को एक टूटे-फूटे मकान (खँडहर)-में छिपने के लिये कह दिया| जब राजा आया तो मैंने तलवार से उसको मार दिया और भागकर पति के पास गयी| वहाँ जाने पर मैंने पति को मरा हुआ पाया! उसको जहरीले साँप ने काट लिया था| फिर तो मैं अकेली वहाँ से भागी कि अगर पकड़ी गयी तो लोग मेरे को मार देंगे| लड़का पीछे छूट गया|
आगे भागते हुए जंगल आ गया तो वहाँ डाकू मिल गये| उन लोगों ने मेरे को पकड़ लिया, मेरे सब गहने छीन लिये और वैश्या के घर ले जाकर बिक्री कर दिया| अब मैं वहाँ रहने लगी| उधर दूसरा राजा बैठा तो उसने मेरे लड़के को पालकर बड़ा किया| मेरा लड़का वहीं राज्य में नौकरी करने लगा| इधर वेश्याओं के संग के प्रभाव से मैं भी वैश्या हो गयी| एक बार वह लड़का मेरे यहाँ आया और रातभर रहा| मेरे को वहम हो गया कि यह कौन है? सुबह होते ही पूछा तो उसने अपना नाम पता बताया, तब पता लगा कि अरे! यह तो मेरा ही बेटा है! मेरे को बड़ी ग्लानि, बड़ा दुःख हुआ कि मैं क्या थी और कुसंग के प्रभाव से क्या हो गयी! पण्डितों से पूछा कि ऐसा पाप किसी से हो जाय तो क्या करे? उन्होंने बताया कि चिता जलाकर आग में बैठ जाय| विचार आया कि चिता में बैठ जाऊँगी तो पीछे से गंगा जी में फूल कौन डालेगा? इसलिये गंगा के किनारे लकड़ियाँ इकट्ठी करके बैठ गयी और आग लगा दी| लकड़ियाँ जलने लगीं| इतने में पीछे से बाढ़ आ गयी| आग बूझ गयी और एक लकड़ी पर बैठ-बैठ एक गाँव-के किनारे पहुँच गयी| उस गाँव में गूजर बसते थे| अब वहाँ उनकी चीज बिक्री करके काम चलाती हूँ| आज छाछ लेकर आयी थी| छाछ गिर गयी तो अब इसकी चिन्ता क्या करूँ?
हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-
देशान्तरे विधिवशाद गणिकां च याता|
पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा
शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||
नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|
मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|
सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|
महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||
जीवन में ऐसी घटनाएँ घटी है, क्या-क्या दशा हुई है, अब थोड़े-से नुकसान में क्या चिन्ता करूँ? ऐसी बातें तो होती रहती हैं और बीतती रहती हैं| अब छाछ गिर गयी तो क्या हो गया! हमारे न जाने कितने जन्म हुए हैं और उनमें क्या-क्या दशा हुई है! उनमें कभी बेटा मर गया, कभी पति मर गया, कभी पत्नी मर गयी| कभी धन आया, कभी धन चला गया| ये सब कई बार मिले और कई बार बिछुड़े| हवा चलती है तो कहाँ-कहाँ का फूस आकर इकट्ठा हो जाता है और दूसरे झोंके में अलग हो जाता है| इसमें नयी बात क्या हो गयी! संसार में सब आने-जाने वाले हैं| इनके लिये क्या चिन्ता करें?
आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥ यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥ पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥ विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥ नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥
विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥ प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥ येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥ आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥ शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥ तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥ कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥ एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥ तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥ येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥ म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥ वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥ एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥
पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥ अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥ चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥ महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला हे चरण म्हणून गुलाल फुले टाकावीत.
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥ नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥ वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥ जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥ अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥ वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥ सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥ सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥ तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥
आपल्या देशात संत आणि महापुरुषांची कमी नाही. त्याबाबतीत आपला देश हा खूप भाग्यवान आहे. त्यापैकी काही सत्पुरुष ही ‘अवतार’ या श्रेणीमध्ये येतात. इसवी सनाच्या 8 व्या आणि नवव्या शतकात होऊन गेलेले, आदि शंकराचार्य हे अवतार या श्रेणीत येतात. आपण त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानतो. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येणाऱ्या अनेक शतकांत उपयोगी पडणारे कार्य करून ठेवले आहे. तसेच त्यामानाने अलिकडच्या काळात झालेले दुसरे सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास. रामदास हेही मारूतीचा अवतार आहेत असे आपण मानतो.
रामदासांनी त्या काळात अत्यंत आवश्यक असे समाज प्रबोधनाचे आणि शक्ति उपासनेचे कार्य तर केलेच. पण व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालून, सामान्यातल्या सामान्याला परमार्थ सोपा करून सांगितला.
समर्थ रामदासांनी मुख्यतः जरी भक्तिमार्ग प्रशस्त केला असला, तरी त्यांच्यावर आदि शंकराचार्य यांच्या अद्वैत मार्गाचाही खूप प्रभाव होता.
लग्नमंडपात ‘सावधान ‘ शब्द ऐकून पळालेले नारायण काही दिवसांनी पंचवटी,नाशिक येथे आले. तिथे ते सुरुवातीला राम मंदिरात आणि नंतर शंकराचार्यांच्या आश्रमात राहिले असावेत. .तिथेच सेवा करताना त्यांना आचार्यांच्या कार्याचा परिचय झाला असावा.
आचार्यांचे स्तोत्र वाङ्मय व त्यांचे ‘प्रकरण’ ग्रंथ, विशेषतः हस्तामलक, शुकाष्टक, अद्वैतानुभूती,पंचीकरण, आत्मबोध,शतश्लोकी वगैरेंचे अध्ययन या मठात प्रारंभी त्यांनी केले असावे. संस्कृत भाषेचा परिचय करून घेऊन गीता,भागवत रामायण, महाभारत,योगवासिष्ठ वगैरे ग्रंथांचे त्यांनी श्रवण,अध्ययन केले असावे. संगीताचे ज्ञानही त्यांनी करून घेतले असावे. त्यामुळेच रागज्ञान, तालज्ञान इत्यादि विषयी त्यांचे दासबॊधामध्ये उल्लेख आले आहेत.
मठात राहत असताना त्यांनी आचार्यांची स्तोत्रे,भगवदगीता आत्मसात केली.आद्य शंकराचार्यांच्या वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या कार्याचाही त्याच्या मनावर पूर्ण ठसा उमटला आहे असे समर्थ साहित्य वाचताना आपणास जाणवते. ‘त्वं तत्वमसि’ या तेथील महावाक्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम आपणाला दासबोधात दिसतो.
‘समर्थप्रताप ‘ या ग्रंथात श्री गिरिधरस्वामींनी त्या दोघांमधील साम्य दाखविले आहे:
समर्थ अवतार निरोपमा / आचार्य स्वामींची साजे उपमा /
अद्वैत आणि भक्ती हे समर्थानी मांडलेले प्रमुख सिद्धांत आहेत.
अद्वैताच्या दृष्टीने पहिले तर मायावाद आणि निर्गुणाचा पुरस्कार या दृष्टीने समर्थ आचार्यांच्या जवळ वाटतात. समर्थांनी आचार्यांचा कर्मसंन्यास स्वीकारलेला नाही आणि ज्ञानापेक्षा भक्तीला त्यांनी अधिक महत्व दिलेले आहे.समर्थांचे मायाब्रह्माचे निरूपण पहिले की आचार्यांचा मायावाद त्यांनी स्वीकारला आहे याची खात्री पटते. मायेच्या रूपाचा आणि कार्याचा अगोदर छडा लावावा लागतो .
आधी मिथ्या उभारावे /मग ते वोळखोन सांडावे /
पुढे सत्य ते स्वभावे / अंतरी बाणे // (दास. ७.३.४ )
शंकराचार्यांनीही आपल्या ब्रह्मसूत्रभाष्याचा प्रारंभ अध्यासाच्या (Superimposition) विवेचनाने केला आहे.
समर्थ पंचवटीतील ज्या शंकरमठात राहत होते तो स्वरूपसंप्रदाय मठ तत्कालीन द्वारिकापीठाच्या अधिकाराखाली होता. त्या द्वारिकापीठाचे आद्य आचार्य हस्तामलक होते. प्रत्येक मठात
नाव व कार्यक्षेत्र ( पश्चिम,पू्र्व ,उत्तर आणि दक्षिण),
त्याचे आचार्य,क्षेत्र,देव,देवता,संप्रदाय (स्वरूप,प्रकाश,आनंद व चैतन्यमय),
त्या मठाचा वेद(अनुक्रमे साम,ऋक्,अथर्व आणि यजुस्) व
महावाक्य (तत्वमसि,प्रज्ञानं ब्रह्म,अयतात्मा ब्रह्म व अहं ब्रह्मास्मि)
आद्य शंकराचार्यांनी अनुशासित करून दिले होते.
आपण द्वारका,पुरी ,बदरिकाश्रम,व शृंगेरी ही आद्य पीठे जाणतोच. याशिवायही अजून तीन पंथाचे-आम्नायांचे मठ आहेत.
या मठात राहून, शिकूनच समर्थानी आपल्या स्वतंत्र बुद्धीने आपल्या कुळात चालत असलेल्या रामोपासनेचा तसेच रामाचा दास असलेल्या एकनिष्ठ मारुतीचा समावेश करून आपला स्वतंत्र नवा ‘स्वरूप’ संप्रदाय उभारला. त्यांनी आचार्यांच्या मठ अनुशासनातील वरील सर्व संकल्पनांचा उपयोग करून घेतला आहे हे त्यांच्या दासबोधाच्या (आपण सर्व पठण करत असलेल्या) आत्मनिवेदनपर ओव्यांतून व्यक्त होतात…
हनुमंत आमची कुळवल्ली / राममंडपा वेला गेली / श्रीरामभजने फळली /रामदास बोले या नावे //
नवा अयोध्यामठ,देव रघुनाथ,देवता जानकी ,नेमस्त (ब्रह्मचारी)मारुतीसारखी उपासना आहे… अशा नव्या परमार्थपर ‘स्वरूप ‘संप्रदायाची समर्थानी स्थापना करून लोकप्रबोधन आणि उद्धाराचे मोठे कार्य दासबोध इत्यादि साहित्यलेखन करून हाती घेतले आणि ‘ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशा जयघोषाने अवघा भारतवर्ष चेतनामय करून टाकला ! आचार्य शंकरांसारखेच त्यांनीही देशभर भ्रमण केले आणि नंतर हिंदुस्थानभर हजार मठ उभारले व लोकांना उपासनामार्गाला लावले.
सनातन धर्माच्या या दोन महान अवतारी सत्पुरुषांना मनोभावे वंदन!
लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.
pandurang deshpande
लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.