https://goodworld.in A website by Madhav Bhope

Devichi-Ashtake-4 नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

devi

  नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

श्रीमुळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई

नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।धृ।।

 

जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी सगुणरुपखाणी

जय मंगल वरदायिनी, सर्वकल्याणी

जय महिषासुरमर्दिनी, राजनांदिंनी, पंकजपाणी

हे भार्गवजननी मला पाव निर्वाणी

जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तू होई ।।१।।नको।।

 

कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची

ही दुर्लभ नरतनु आता जाति वायाचि

शिर झाले पांढरे फटक, लागली चटक, अधिक विषयाचि

कशि होइल मजला भेट तुझ्या पायाची

ये धावत तरी तातडी, घालि तू उडी, पाहसी काई ।।२।।नको।।

 

तुजवाचुन मज दूसरा, नसे आसरा, जगी जगदंबे

तू भवानी, मजवर कृपा करी अविलंबे

सोन्याचा ऊगवी दिवस, करितो नवस, सकळारंभे

मी भरिन ओटी नारळी, केळि, डाळिंबे

मी अनाथ दीन केवळ, माझी कळकळ, येउ दे काही ।।३।।नको।।

 

मी थोर पतित पातकी, माझी इतुकि, अर्जी ऐकावी

एकदा कसेही करून भेट मज द्यावी

तू देणार नाहीस हाणुन, आलो मी म्हणुन, तुझ्या या गावी

म्हणे विष्णुदास ही किर्ति जगामध्ये गावी

धिर नाही आता पळघडी, म्हणुन येवढी, सुटली घाई

नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।४।।

 

—–00000—–

 

devichi-ashtake-3 देवीची अष्टके-3-आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?

goddess and devotee

 

आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?

 

आई, तुझ्या मी दर्शनासि योग्य नाही का ? । रेणुके, तू दींनांची नससी माय का ? ।।धृ।।

जवळ आलियासि म्हणसि हो पलीकडे

लागलि ही सवय तुला का अलीकडे

कोणाची आस धरून मी जाउ कुणीकडे

श्रुतिपदास लवितीस व्यर्थ शाई कां ? ।।१।।

 

हा भवानी म्यां तुलाचि देह अर्पिला

त्यजुनि अन्नपाणि रानि निंब वर्पिला

अपमान, मान, राग, लोभ सर्व निर्पिला

अजुनि कां न भेट देसी लपसि बाई कां? ।।२।।

 

कां अजून सुप्रसन्न चित्त होई ना

कां अजून या दीनचि कीव येई ना

कां अजून ऊर उलूनि जीव जाई ना

शिर फुटोनि होईनाचि राइ राइ कां? ।।३।।

 

काय म्हणावे अवतार कृत्य संपले

काय म्हणावे शितळ चंद्रबिंब तापले

काय म्हणावे दुष्ट नष्ट दैव आपुले

काय म्हणावे जगविताचि वांझ गाई कां? ।।४।।

 

पापिष्ट दुष्ट मरतो त्यासि काय मारणे

पुण्यश्लोक तरतो त्यासि काय तारणे

त्रिदोष दोषीयांसि जहर काय चारणे

यांत आहे तरी सुजाण, भलि भलाई का ? ।।५।।

 

माझे अपराध काही आठवू नको

आपुले तु सदय ह्रदय बाटवू नको

व्याघ्रमंदिरासि वत्स पाठवू नको

विष्णुदास म्हणे न येच ऐकु काही कां ? ।।६।।

—–00000—– 

Devichi ashtake Nijlis Ka renuke देवीची अष्टके-2 .निजलीस का रेणुके!

renuka

निजलीस का रेणुके!

निजलीस कां रेणुके ! ।।धृ।।

माझ्या आयुष्याची लूट । काळे केली सांगू कुठ ।

नको जाऊ झोपी उठ । मुळपीठ नायके ।।निज।।१।।

मनाजी हा आत्मद्रोही । घर भेदील कां डोही ।

याचे कर्म तुज बाई । का नाही ठाऊके ।।निज।।२।।

कामक्रोधादिक सहा । शत्रू चंड मुंड महा ।

सिंहारूढ होउनि पहा । जय महाकालिके ।।निज।।३।।

अनाथांचा प्रतीपक्ष । धरूनिया मज रक्ष ।

नीज ब्रिदाकडे लक्ष । दे मोक्षदायके ।।निज।।४।।

अपराधी मी वरिष्ठ । कृपा करणे तुज इष्ट ।

विष्णुदास एकनिष्ठ । म्हणे गोष्ट आयके ।।निज।।५।।

—–00000—–

Navratri Devi Ashtake नवरात्रीतील देवीची अष्टके

devi-1

ekvira devi

नित्याची प्रार्थना 

अंबे एक करी उदास न करी भक्तास हाती धरी ।

विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ॥

चित्ती मोद करी भुजा वर करी ध्यातो तुला अंतरी ।

वाचा शुद्ध करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ॥ १ ॥

माते एकविरे मला वर दे दे तू दयासगरे ।

माझा हेतु पुरे मनात न उरे संदेह माझा हरे ।।

जेणे पाप सरे कुबुद्धि विसरे ब्रम्ही कधी संचरे ।

देई पूर्णपणे भवाम्बुधि तरे ऐसे करावे त्वरे ।। २ ।।

अनाथासी अंबे नको विसरू वो ।

भव: सागरी सांग कैचा तरू वो ।

अन्यायी जरी मी तुझे लेकरू वो ।

नको रेणुके दैन्य माझी करू वो ।। ३ ।।

मुक्ताफलै: कुंकुमपाटलांगी ।

संधेव तारा निकरेर्विभाती ।

श्रीमूलपीठाचलचूडिकाया ।

तामेकवीरा शरणं प्रपद्ये ।। ४ ।।

सखे दु:खिताला नको दूखवू वो ।

दीना बालकाला नको मोकलू वो ।

ब्रीदा रक्षि तू आपुल्या श्रीभवानी ।

ही प्रार्थना ऐकुनी कैवल्यदायिनी ।। ५ ।।

।। बोल भवानी की जय ।।

—–00000—–

बारा राशींचे बारा स्वभाव 12 Zodiac signs nature

rashi featured image

बारा राशींचे बारा स्वभाव

12 zodiac signs nature

खूप वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांचे  ‘भविष्यावर बोलू काही’, आणि ‘राशीचक्र’, यासारखे टीव्ही शोज मराठी टीव्ही चॅनेल्स वर खूप लोकप्रिय झाले होते. राशीभविष्य या विषयावर हलक्या फुलक्या भाषेत दिलेली माहिती श्रोत्यांना खूप आवडत असे. त्यामुळे राशीभविष्य या विषयाविषयी लोकांना वाटणारी एक प्रकारची भीती असायची ती कमी होण्यास मदत झाली.

माणसाचे भविष्य घडविणे हे त्याच्या हातात असते, असे कर्तृत्ववान लोकांचे मानणे असते, आणि ते अगदी खरे आहे. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांचे म्हणणे असे असते, की या शास्त्राचा उपयोग माणसाला सतर्क करण्यासाठी होऊ शकतो.

अर्थात, या विषयावरील विविध मतांमध्ये आपल्याला जायचे नाही.

पण ढोबळ मानाने पहायचे झाल्यास ज्या काही विषयांवर जवळ जवळ सर्व ज्योतिषकारांचे एकमत आढळते, ते म्हणजे विशिष्ट राशींचे विशिष्ट स्वभाव. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसानेही आपल्या आजूबाजूस पाहिल्यास यातील काही गोष्टी खूप प्रमाणात लागू पडतात असे दिसते. सगळ्याच गोष्टी लागू पडत नाहीत. पण काही राशींचे स्वभाव अगदी ठळकपणे दिसून येतात उदा. कन्या राशीचा चिकित्सक आणि शंकेखोर स्वभाव- घराला लावलेले कुलूप तीन तीनदा ओढून बरोबर लागले आहे की नाही ते पाहणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्ति देखण्या, रसिक आणि चैनी असलेल्या बर्‍याच प्रमाणात दिसतात. नेतृत्व गुण आणि अहंकार असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला दिसतात. अजून एक गोष्ट म्हणजे, कोणत्या राशीचा शरीराच्या कुठल्या भागावर अंमल जास्त असतो, आणि त्या त्या राशीच्या लोकांना जास्त करून त्याच अवयवांचे त्रास हे प्रामुख्याने होतात, हे नमूद केलेल्यानुसार खूप प्रमाणात जुळते.  त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांनी त्या त्या अवयवांची जास्त काळजी घेतल्यास पुढे होणारा त्रास ते टाळू शकतील.

बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूची माणसे आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी वागतात. काही वेळा आपण केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतात, कारण नसतांना आपल्याशी डूख धरतात, तेंव्हा असे का होते, ते असे का वागतात, हे जेंव्हा समजत नाही.

अशा वेळी , हा राशींच्या स्वभावाचा चार्ट पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या वागण्याची संगती काही प्रमाणात लागू शकते- जन्मतःच जो स्वभाव व्यक्ति घेऊन आलेली असते, त्याप्रमाणे ती वागते.

सर्वसाधारणपणे बारा राशींची स्वभाव वैशिष्ट्यें खाली  दिली आहेत. आपल्या आजूबाजूला पाहिले तर या पैकी बहुतेक स्वभाव वैशिष्ट्यें त्या त्या राशींच्या लोकांसोबत खूप प्रमाणात जुळतांना आढळतात.

एकेका राशीत पुन्हा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे,त्यानुसार स्वभावात फरक दिसू शकतो. पण एक सहज छंद म्हणून जर आपण हे गुणधर्म ताडून पाहिले तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.

रासस्वभाव वैशिष्ठ्ये
मेषधाडसी, धडपडे, रागीट, अविचारी, उतावळे, धैर्यवान, पराक्रमी, पुरुषी अहंभाव बाळगणारे, बेभान, लढाऊ, दिलदार, अतिरेकी वृत्तीचे, अति प्रेम करणारे..
वृषभभोगी, चैनी, कलंदर स्वभाव, परिश्रमी, मिरवण्याची हौस असलेले, रसिक, स्तुतिप्रिय, स्त्रीजित, सौन्दर्यवादी, सर्जनशील, गीतसंगीत आवड असणारे.
मिथुनअस्थिर, पोरकट, घाबरट, कचखाऊ, गोडबोले, मनकवडे, मिस्किल, कृश शरीर, वाक् चातुर्य, चांगली स्मरणशक्ती असणारे.
कर्कबोलका चेहरा, संवेदनशील, चंचल, चपळ , चिडचिडे, प्रवासाची आवड असणारे, हळवे(रडके), स्त्रीवश, आतिथ्यशील, सेवाभावी
सिंहमानी, अभिमानी, शूर, गिर्यारोहक, हेकेखोर, स्पष्टवक्ता, धीरोदात्त, बेडर, दुराग्रही, हुकूमशहा, ताठर, अहंमन्य
कन्यासंकोची, सेवाभावी, शंकेखोर, कवीमनाचे, दातृत्व, भित्र्या स्वभावाचे, व्यवस्थित, अतिकाळजी करणारे, काटकसरी, दुसर्‍याला न दुखावणारे, लाजाळू
तूळउत्तम सल्लागार, धनवान, जुगारी प्रवृत्तीचे, व्यवहार चतुर, संधीचा फायदा घेणारे, जगन्मित्र, व्यापारी व व्यावसायिक वृत्तीचे, शांत, कलावंत, मृदू भाषी, हिशेबी वृत्ती, जोखीम घेणारे.
वृश्चिकमुत्सद्दी, मेहनती, भेदक वृत्तीचे, महत्त्वाकांक्षी, क्रूर, पाताळयंत्री, निश्चयी वृत्तीचे, अबोला धरणारे, धारदार बोलणारे, छिद्रान्वेषी
धनुमजबूत शरीर, मैदानी खेळांची आवड असणारे, आशावादी, आनंदी, तेजस्वी, स्तुतिप्रिय, बेदरकार, बेजबाबदार, धरसोड वृत्तीचे, धार्मिक
मकरचिवट, सहनशील, मितव्ययी, दीर्घोद्योगी, कडवट, तुसडे, न्यायनिष्ठुर, राजकारणी, आत्मकेंद्रित, स्वावलंबी, जिद्दी, वास्तववादी, वाक् चातुर्याचा अभाव असणारे, शिस्तप्रिय, तडफदार.
कुंभमानवतावादी, समजाभिमुख, नवमतवादी, संशोधक, दुसर्‍याला अक्कल शिकवणारे, संग्राहक वृत्तीचे, आत्ममग्न, विक्षिप्त, अलिप्त, निरुत्साही, प्रगल्भ बुद्धिवंत, वैराग्य वृत्तीचे, ध्येयवेडे, गंभीर.
मीनअंतःस्फूर्ति, भूतदयावादी, दूरदर्शी, स्वप्नदर्शी, आळशी, परावलंबी, गोंधळी, सोशीक, पापभीरू, अपयशाची भीती वाटणारे, नमते घेणारे, प्रसन्न चेहरा.

आता एखादा मनुष्य त्याच राशीत का जन्म घेतो?- तर प्रत्येकजण आपले पूर्वकर्म बरोबर घेऊन येतो, आणि गेल्या जन्मीचे हिशोब या जन्मी पूर्ण करतो- आणि  या जन्माच्या कर्मांनी नवीन जन्माची तयारी करतो! असो.

तसेंच प्रत्येक राशीच्या लोकांना शरीराच्या कुठल्या भागाचे रोग होण्याची शक्यता असते हे खालील चार्ट पाहिला तर समजू शकते. त्या त्या राशीच्या लोकांनी त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेंच त्या त्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या दैवताची उपासना करावी हेही खालील चार्ट मध्ये दिलेले आहे.

एकेका राशीचा एकेक स्वामी असतो, म्हणजे त्या राशीवर त्या त्या ग्रहाचा अंमल असतो असे मानले जाते.

सूर्य आणि चंद्र हे प्रत्येकी एका राशीचे स्वामी आहेत. सूर्य सिंह राशीचा तर चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे.

मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे प्रत्येकी 2-2 राशींचे स्वामी आहेत.

रासराशीस्वामीनक्षत्रउपास्य देवताशरीरावर अम्मलStrong Pointsआनंदमय जीवनासाठी
मेषमंगळअश्विनी व भरणी नक्षत्राचे प्रत्येकी 4 चरण व कृत्तिका नक्षत्राचा 1 चरणगणपती, कुलदेवता, मनोवांछित देवताडोके, कवटी, केस, कपाळधडाडी आणि धडपडी वृत्तिउतावीळ व अविचारी पणावर मात करावी॰
वृषभशुक्रकृत्तिका नक्षत्राचे 3, रोहिणीचे 4, मृग नक्षत्राचे पहिले 2 चरणलक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताचेहरा, घसा, दात, तोंड, डोके, गळाकष्टाळू वृत्ति व एकाग्रताचैनी व दिखाऊ वृत्तीला आवर घालावा.
मिथुनबुधमृग नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण, पुनर्वसूचे पहिले 3 चरण.विष्णू, कुलदेवता, मनोवांछित देवतावाणी, मान, खांदे, कान, नर्व्हस सिस्टिम, श्वसन विकारबोलण्याची कला आणि भाषा प्रभुत्त्वकचखाऊ वृत्ती व अस्थिरपणा सोडावा.
कर्कचंद्रपुनर्वसू नक्षत्राचे शेवटचे 1 चरण, पुष्य नक्षत्राचे 4 चरण, आश्लेषा नक्षत्राचे 4 चरणशंकर, कुलदेवता, मनोवांछित देवताहृदय, स्तन, छाती, रक्तसमर्पण भाव व चपळपणाचंचलपणा व हळवेपणावर ताबा मिळवावा.
सिंहसूर्यमघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा नक्षत्राचे 4 चरण, उत्तरा नक्षत्राचा 1 चरणखंडोबा, सूर्य, कुलदेवता, मनोवांछित देवताकुक्षी, शरीराचे नाभीचक्र, पाठ, पाठीचा कणातत्त्वनिष्ठा आणि मनाचा कणखरपणाअहंकारी व हेकेखोर वृत्तीवर नियंत्रण ठेवावे.
कन्याबुधउत्तरा नक्षत्राचे 3, हस्ता नक्षत्राचे 4 चरण, चित्रा नक्षत्राचे 2 चरण.विठ्ठल रुखमाई, कुलदेवता, मनोवांछित देवताकंबर, त्वचा, पोट, जठर, गर्भाशयधोरणीपणा आणि कौशल्यापूर्ण नियोजनअतिविचार व अतिचौकशा करू नयेत.
तूळशुक्रचित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाति नक्षत्राचे 4 चरण, विशाखा नक्षत्राचे 3 चरण.महालक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताओटीपोट, नितंब, बस्ती, मूत्राशय, स्त्रीबीज, पुंबीजउच्च अभिरुचि आणि व्यावसायिक दृष्टिकोनसंधीसाधू व हिशेबी वृत्तीला काबूत ठेवावे.
वृश्चिकमंगळविशाखा नक्षत्राचा शेवटचा 1 चरण, अनुराधा नक्षत्राचे 4 आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4 चरण.शंकर, कुलदेवता, मनोवांछित देवतागुदद्वार, गुह्येंद्रिय, स्नायू संस्थामर्मज्ञ व महत्त्वाकांक्षीगूढ आणि खुनशी वृत्तीचा त्याग करावा.
धनुगुरूमूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे 4 चरण, उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरणश्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतामांड्या, सायटिका, यकृत, मेद(चरबी)सामर्थ्य व आशावादगाफील व बेदरकार वृत्तीला लगाम घालावा.
मकरशनिउत्तराषाढा नक्षत्राचे 3 चरण, श्रवण नक्षत्राचे 4, धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण.मारुति, कुलदेवता, मनोवांछित देवताशरीरातील सर्व सांधे व हाडे, विशेषतः गुडघेजिद्दी व वास्तववादी वृत्तिकडवट व न्याय निष्ठूर वृत्तीवर विजय मिळवावा.
कुंभशनिधनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण, शततारका नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा भाद्रपदाचे 3 चरण.श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवताडावा कान, पोटर्‍या, घोटेनवमतवाद आणि उच्च बुद्धिमत्ताविक्षिप्त व अलिप्त वृत्तीवर अंकुश ठेवावा.
मीनगुरूपूर्वा भाद्रपदाचा 1 चरण, उत्तरा भाद्रपदाचे 4 चरण, रेवती नक्षत्राचे 4 चरण.लक्ष्मीनारायण, श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतापावले, तळवे, डावा डोळा, घामाद्वारे उत्सर्जनअंतः स्फूर्ति आणि दूरदर्शी वृत्तीऐषारामी व स्वप्नाळू वृत्तीला मुरड घालावी.

मला स्वतःला ज्योतिष या विषयाची काही माहिती नाही, त्यामुळे या विषयातील विद्वान मंडळींची आधीच माफी मागतो.

सदरील माहिती ही केवळ मनोरंजन या स्वरूपात घ्यावी अशी विनंती आहे. आणि यात दिलेली माहिती, आपल्या स्वतःच्या स्वभावाला, किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या (ज्यांच्या राशी आपल्याला माहित आहेत) स्वभावाशी ताडून पाहून, हे कितपत लागू होते हे आपणच ठरवावे.

आपल्याला आवडल्यास इतरांनाही जरूर शेअर करावे.

या विषयी आपले अनुभव असतील ते comments मध्ये नक्की कळवा. तसेच आपले विचार ही comments  मध्ये लिहून कळवा.

माधव भोपे 

ring
SILVERSPOT JEWEL 925 Sterling Silver Blue Sapphire Birth stone (Pisces, Taurus, Virgo, Libra, Sagittarius)

Memories of Ganesh Utsav आठवणीतील सात्त्विक गणेश उत्सव

lord-ganesha

आठवणीतील गणेश उत्सव

महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे पूर्वीचे स्वरूप 

Memories of Ganesh Utsav in Maharashtra

आपल्या goodlifehub.in या वेबसाइट वर मागील वर्षी हा लेख प्रकाशित केला होता. या लेखाची प्रासंगिकता आजही कायम आहे. त्यामुळे या लेखात काही समयोचित बदल करून तो आता goodworld.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

यावर्षी  गणेश चतुर्थी बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणरायांचे आगमन धूम धडाक्यात झाले.  यावर्षी पाऊस ही सगळीकडे छान झाला, पिकें चांगली आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, जनावरांना चारा आणि पाणी  मुबलक झाले आहे, त्यामुळे सर्व आनंदात आहेत.   10 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आजकाल सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. अशा वेळी, आम्ही लहान असतांना गणेश उत्सवाचे स्वरूप कसे होते, हे जसे आठवेल तसे वर्णन करण्याचा प्रयत्न या लेखात  केला आहे.

आठवणीतील गणेश उत्सव

आजपासून 50-55 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव हा खूपच साधा आणि सात्त्विक होता. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची, शहराची, आपली आपली एक वेगळी परंपरा असे. त्या त्या भागातील आजूबाजूची गावेही तीच परंपरा पाळत. गणेशोत्सव जवळ आला की हौशी गणेश मंडळे कामाला लागत. काही नवीन गणेश मंडळेही स्थापन होत. पण या सगळ्यात हौशी मंडळीच असत. गणेशोत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. वर्गणीची, counterfoil असलेली पावती पुस्तके छापून घेतली जात. मोठाली मंडळे अशी अनेक पावती बुकें छापीत, आणि कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या पावती पुस्तकांसह वर्गणी गोळा करण्याच्या कामाला लागत. वर्गणीच्या आकड्याबद्दल प्रेमळ आग्रह असे, पण कुठेही धाक दपटशा किंवा जबरदस्ती नसे. दुकानदार लोकांकडूनही वर्गणी गोळा केली जाई. छोटी छोटी बाल गणेश मंडळेही असत. त्यांच्या छोट्या कार्यकर्त्यांनाही कौतुकाने अल्पशी वर्गणी दिली जात असे. ते त्यातच खूष असत.images 29

गणपती बसवण्यासाठी कोणाची तरी बैठक, किंवा ओसरी ही बऱ्याच वेळा पुरे होई. मोठाली मंडळे स्टेज उभारीत. पण ते स्टेज कधीच रहदारीला अडथळा करणारे नसे. शक्यतो एका बाजूला लावले जाई.

मला हिंगोलीचा गणेशउत्सव आठवतो. तेंव्हा मी सहावी सातवी इयत्तेत होतो. गल्लीतील गणेश मंडळा तर्फे कार्यकर्ता म्हणून इतरांबरोबर मीही वर्गणी गोळा करायला जायचो. लोकांकडून नगदी पैसे वर्गणी म्हणून घेतांना खूप थ्रिल वाटायचे.

हिंगोली बऱ्यापैकी मोठे शहर होते. तिथे बरीच गणेश मंडळे असत. गणेश उत्सवामधील मुख्य कार्यक्रम दोन प्रकारचे असत. एक म्हणजे निरनिराळी गणेश मंडळे गाण्यांच्या स्पर्धा आयोजित करत. त्यात सिने गीत, भावगीत, भक्तीगीत, सर्व प्रकारची गीते चालत असत. संध्याकाळी 8 च्या नंतर या स्पर्धा सुरू होत, त्या रात्री 11 किंवा 12 वाजेपर्यंत चालत. 

या स्पर्धामध्ये मुख्य करून शिशु किंवा तरुण वर्गाचाच सहभाग असे. त्यातील काही काही गाणारे छान गात आणि मग ते खूप प्रसिद्ध होत. ते रोज किंवा दिवसा आड वेगवेगळ्या गणेश उत्सवां च्या स्पर्धांमध्ये भाग घेत आणि हमखास पाहिले किंवा दुसरे बक्षिस मिळवत. ही बक्षिसे शेवटच्या दिवशी जाहीर केली जात. तसेच रसिक प्रेक्षक त्यांना त्यांच्या गाण्यावर खूष होऊन 1 रुपया पासून 10 किंवा वीस रुपयांपर्यंत बक्षिसे ही देत. ही बक्षिसे लगेच स्टेजवर अँकर द्वारे जाहीर केली जात. काही काही मुले अशी प्रोत्साहनपर खूप रक्कम मिळवीत.640px Prathamesh Lagate

 हिंगोली येथील स्टेशन मास्टर चा मुलगा, “ऐ माँ  तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी” हे गाणे खूप छान म्हणायचा. एक अकबर नावाचा मुसलमानाचा साधारण 18-20 वर्षांचा मुलगा होता.(त्या काळी असे स्पष्टपणे म्हणण्यात काही वावगे वाटत नसे. सर्व जण अत्यंत मिळून मिसळून राहत).  तो पांढरी शुभ्र पॅन्ट आणि तसाच पांढरा शर्ट घालून येई. तो जास्त करून देशभक्तिपर गीते म्हणायचा. त्यातील एक गीत, ‘नौ जवानों भारत की तकदीर बना दो- फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो” हे गाणे,  अॅक्शन सहित म्हणायचा. त्याला ही खूप  बक्षिसें मिळत. .

ते गाणे साधारण मला आठवते तसे इथे देत आहे

नौजवानों भारत की तकदीर बना दो 

नौजवानों भारत की तकदीर बना दो 

फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो

फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो

छोड़के सारे भेदभावको समझो देश को अपना

समझो देश को अपना,

रह ना जाए देख अधूरा कोई सुंदर सपना

कोई सुंदर सपना

हम भारत के वासी क्यों हों दुनिया में शर्मिन्दा

देश के कारण मौत भी आए फिर भी रहेंगे ज़िन्दा

जय-जय हिन्द के नारों से धरती को हिला दो

फूलों के इस …

अपने साथ है कैसे-कैसे बलवानों की शक्ति

श्री जवाहर लाल की हिम्मत बापू जी की भक्ति

देश का झण्डा जग में ऊँचा करके दिखा दो

फूलों के इस ..

मला आत्ता गूगल करता करता कळाले की वरील गीत हे १९५५ साली रिलीज झालेल्या कुंदन नांवाच्या देशभक्तिपर चित्रपटातील आहे. 

ते असे आदर्शवादाचे आणि स्वप्नाळू पणाचे दिवस होते. आजकालच्या भयानक वास्तवतेत तो  आदर्शवाद पाल्या पाचोळया सारखा उडून गेला आहे, हे दारुण सत्य आहे. 

असो. तर   त्यांचे पाहून माझ्यासारख्यालाही कधी कधी स्पर्धेत भाग घ्यावासा वाटे. मग स्पर्धेत नाव नोंदवून आल्यावर, आपण ही तसेच गात आहोत, सगळे जण टाळ्या वाजवीत आहेत. आपला पाहिला नंबर आला आहे, इत्यादि स्वप्न रंगविण्यात 2-3 दिवस बरे जात. त्याकाळी लोकप्रिय सिनेमांच्या गाण्याची, घडी घातलेली छोटी छोटी 3-4 पानांची पुस्तके, 20-25 पैशांना मिळत. मग ती आणून त्यातून गाणे पाठ केले जाई. ते गाणे, अर्थातच, फ्लॉप होई, हे काही वेगळे सांगावयास नको. 

देखावे 

असो. तर अशा या गाण्याच्या स्पर्धा होत. दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निरनिराळे देखावे, ज्यांना ‘झाकी’ म्हणत. निरनिराळी मंडळे वेगवेगळ्या झाक्या (देखावे) बनवीत. हे देखावे बनवायला कोणीही व्यावसायिक मंडळी नसत, तर मंडळाचेच उत्साही कार्यकर्ते असत. कधी भारत पाक युद्धाचा देखावा केला जाई, तर कुठे पुराणातील एखाद्या कथेचा देखावा केला जाई.

maxresdefault 2 काही सामाजिक उद्बोधनपर देखावे केले जात. यातील बहुतांश देखावे ‘स्थिर’ असत. पण काही काही मंडळे ‘हालते’ देखावे करत. असे देखावे बघायला तूफान गर्दी उसळे. काही काही देखाव्यात, कोणी तरी, गणपतीच्या पाया पडतो आहे आणि गणपती त्याला आशीर्वाद देतो आहे, असा देखावा- आणि त्यात गणपतीचा मेकअप करून एखादा मुलगा उभा असे. तो सारखा सारखा आशीर्वाद देण्यासाठी हात वर करी. मग मधून मधून त्याला विश्रांती देण्यासाठी पडदा पाडीत. तो थोडा वेळ आराम करे, आणि पुन्हा गणपतीच्या भूमिकेत जाई. रात्रीच्या वेळी, आपल्या मंडळातली गणपतीची आरती उरकली, की लोक झुंडी झुंडीने देखावे पाहायला बाहेर पडत. पूर्ण शहरभर अनेक देखावे असत. प्रत्येक ठिकाणी लाइट्स चा झगमगाट असे. पण तो खूप जास्त नसे. सगळे देखावे पाहता पाहता रात्रीचे बारा केंव्हा वाजून जात काही कळात नसे. या देखाव्यांची ही स्पर्धा असे आणि परीक्षक मंडळ शहरातील सर्व देखाव्यांची पाहणी करून त्यातून नंबर काढत. ही बक्षिसे ही शेवटच्या दिवशी दिली जात. एके वर्षी आमच्या गल्लीच्या ‘बाल गणेश मंडळाने’ कुठला तरी युद्धाचा देखावा केला होता, ते आठवते. त्यात गल्लीतीलच एक धष्टपुष्ट मुलगा सैनिकाचा वेष घालून, सैनिक झाला होता, आणि हातात बंदूक घेऊन शत्रूला मारीत होता, असा काहीसा देखावा होता. काही काही मोठी गणेश मंडळे खूप भव्य दिव्य असे देखावे करीत.images 35

असो. रोज सकाळ संध्याकाळ आरती होई. गणपतीच्या मंडपात सिनेमाची अचकट विचकट गाणे लावण्याची प्रथा सुरू झालेली नव्हती. खरे तर साऊंड सिस्टम तेंव्हा कोणाकडे नसायची.

काही काही मातब्बर गणेश मंडळे मोठ्या शहरातील ऑर्केस्ट्रा बोलावीत. त्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळे. भरपूर वाद्य वृंदासहित आलेले ते कलाकार, सिनेमाची लोकप्रिय गाणी अगदी हुबेहूब वाजवत.33088a1c85338b85cddd3d212e18

अशा प्रकारे पाहता पाहता दहा दिवस कसे निघून जात कळत नसे. आणि मग गणेश विसर्जनाचा दिवस येई-

गणेश विसर्जन 

गणेश विसर्जन गावाबाहेरील एका मोठ्या तलावात करीत. गावातील मानाचा गणपती ठरलेला असे. संध्याकाळी लवकरच, म्हणजे 8-9 च्या सुमारास विसर्जनाची मिरवणूक निघे. शहरभरातील गणपती आपापल्या ठिकाणाहून निघून, त्या मिरवणुकीत रांगेने सामील होत. बहुसंख्य गणपती हे हातगाडी किंवा सजवलेली बैलगाडी यावर असत. या गाड्यांमध्ये गल्लीतील सगळ्या घरांतील छोटे छोटे गणपतीही दिलेले असत. बहुतेक मिरवणूकींच्या समोर भजनी मंडळे टाळ आणि मृदुंग घेऊन, भजने गात चाललेली असायची. कुठेही गणपतीच्या समोर अचकट विचकट नाच गाणे नसायचे. खूप सात्त्विक वातावरण असायचे. उजेडासाठी पेट्रोमॅक्स च्या ‘बत्त्या’ असायच्या. गर्दी भरपूर असायची, पण अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मिरवणूक चालायची. रात्री बाराच्या आसपास पहिला गणपती तलावावर पोंचायचा. त्याची रीतसर पूजा वगैरे होऊन विसर्जन व्हायचे. मग  एकेक करीत सगळ्या गणपतींचे विसर्जन होत, शेवटच्या गणपतीचे विसर्जन व्हायला सकाळचे 3 ते 4 वाजायचे.  

मेळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, व्याखानमाला  

हिंगोलीनंतर आमची बदली सिल्लोड येथे झाली होती. सिल्लोड हे हिंगोली पेक्षा छोटे गाव होते. मी तोपर्यन्त थोडा मोठा झालो होतो, आणि आठव्या वर्गात गेलो होतो. मला हिंगोलीच्या गणेश उत्सवाचा अनुभव होता. गल्लीतल्या मुलांपुढे त्यामुळे माझी थोडी ‘वट’ होती. मग मी पुढाकार घेऊन आमच्या गल्लीत एक ‘बाल गणेश मंडळ’ सुरू केले. आम्ही राहत असलेल्या वाड्याच्या शेजारी नीलकंठ नावाच्या वकिलांचा मोठा वाडा होता. त्यावरील ओसरी त्यांनी आम्हाला मंडळाचा गणपती बसवायला दिली. आम्ही तिथे छोटेखानी गणपती बसवला.

images 33

सिल्लोड हे औरंगाबाद तालुक्यातील गाव, संगीत मेळयांसाठी खूप प्रसिद्ध होते. सिल्लोडला देखावे वगैरे करायची प्रथा नव्हती. पण मेळे मात्र खूप व्हायचे. कोणी तरी हौशी, संगीताचा जाणकार असलेला माणूस पुढाकार घेऊन मेळा सुरू करी. मग आजूबाजूच्या बऱ्यापैकी आवाज असणाऱ्या आणि बऱ्यापैकी दिसणाऱ्या मुलांना आणि काही प्रमाणात मुलींनासुद्धा, तो आपल्या मेळयात, त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने  सामील करून घेई. मेळयाला छानदार नांव दिले जाई. तबला पेटी वगैरेची जुळवाजुळव केली जाई. आणि महिना महिना आधी त्या मुलांची गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली जाई. काही काही मेळे अनेक वर्षांपासून सुरू होते आणि खूप प्रसिद्ध होते. बहुतेक मेळयांना आपला ड्रेस कोड असे. पण सिल्लोड येथील ‘बापू टेलर’ चा मेळा मात्र खूप प्रसिद्ध होता. त्यांनी युनिफॉर्म ठेवला नव्हता, तर ते त्यांच्या कलाकारांना त्या त्या गाण्याला अनुरूप असा वेष करवीत. जसे की भाजीवाली म्हटले तर नऊवारी साडी, डोक्यावर टोपले, इत्यादि. त्यांच्या या वेगळेपणामुळे तो मेळा खूप तूफान चाले. लांबून लांबून त्यांना बोलावणी येत. औरंगाबादला सुद्धा ते जात. तो आमच्या गावचा मेळा म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटे. सिल्लोड येथील एस टी महामंडळाचा गणपती पण खूप मोठा आणि प्रसिद्ध होता. त्यांची वर्गणीही खूप जमायची. त्यामुळे ते पण मोठे मोठे कार्यक्रम ठेवायचे.

आणखी एक आठवणारी अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे गणपतीच्या काळात बरीच गणपती मंडळे, चांगल्या चांगल्या वक्त्यांची, विद्वानांची अभ्यासपूर्ण व्याख्याने असलेल्या व्याख्यान मालिका ठेवत. त्याला खूप गर्दी होत असे. मला आठवते मी प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत कुंभोजकर यांचे शिवरायांवरील व्याख्यान सिल्लोड येथेच ऐकले होते. त्याकाळी गणपती उत्सवाला दिलेली वर्गणी सार्थकी लागल्यासारखी वाटायची.unnamed  

एखादे वर्षी औरंगाबादला जाण्याचा योग येई. औरंगाबादला मेळे आणि देखावे दोन्ही असत. आणि प्रचंड गर्दी असे. पण त्याकाळी खूप मोठ्या मोठ्या एकापेक्षा एक प्रचंड गणपतींची फॅशन निघाली नव्हती. आणि सगळे काही मर्यादा सांभाळून होत असल्याने त्या काळचे गणपती उत्सव म्हणजे एक आनंद पर्वणी होती हे निःसंशय.

नंतर हळू हळू व्हीडीओ कॅसेटचा जमाना सुरू झाला, आणि गणेश मंडळें 16 एमएम चा पडदा आणून त्यावर पिक्चर ची कॅसेट लावण्यात धन्यता मानू लागली.

आजची परिस्थिती-गेले ते दिवस!

आणखी काही वर्षांनी गणेश उत्सवाचा ताबा ‘समाजसेवक’ मंडळींनी घेतला. हळू हळू त्यात राजकारणी लोकांचा शिरकाव झाला, हे आपण डोळ्यासमोर पाहतोच आहोत. आजकाल गणेशोत्सव जवळ आलाय हे आता रस्त्यारस्त्यावर आणि कोपऱ्या कोपऱ्यावर उभारल्या जाणारे प्रचंड स्टेजेस आणि सेट अप,  तिथे व्यावसायिक कामगारांकडून चालू असणारी ठोकाठोकी, काही ठिकाणी मंडप उभारण्यासाठी चांगल्या डांबरी रस्त्यांवर केलेले मोठे मोठे खड्डे, डीजे चे प्रचंड मोठे बॉक्स इत्यादि गोष्टी दिसायला लागल्यावर समजते. आजकाल लोकांचा देवावरचा भक्तिभाव खूप वाढला आहे हे पाहून भरून येते!!lalbaug maxresdefault 3

असो. यावर्षी श्री गजाननाच्या कृपेने पाऊस खूप छान झाला आहे. धरणेंही सगळी भरली आहेत, आणि आनंदी आनंद आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूयात. या वर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे