https://goodworld.in A website by Madhav Bhope

Hanuman Chalisa Quiz

hanuman-2

जब आप क्विज़ शुरू करेंगे, तो पहली स्क्रीन जो आप देखेंगे उसे हनुमान चालीसा क्विज़- परिचय कहा जाता है। पहले दोहे के शब्द हल्के अक्षरों में दिखाई देंगे।  यादृच्छिक, वे  बिना किसी क्रम के आएंगे। उदाहरण के लिए-

श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।

ये सभी शब्द ऊपर दिए गए हैं। आपको शब्दों को अपनी उंगली से सही क्रम में खींचकर सही स्थानों पर रखना होगा। यदि शब्द का स्थान सही है तो वह वहां फिट होगा, अन्यथा नहीं। यदि उपरोक्त श्लोक के सभी शब्द सही स्थान पर हैं, तो आपको बधाई संदेश प्राप्त होगा, पूरा श्लोक पुनः लिखा जाएगा, तथा अगले श्लोक पर जाने के लिए अगला श्लोक(Next Shloka) नामक बटन दिखाई देगा। इस पर क्लिक करके आप अगले श्लोक पर चले जाएंगे और अगले श्लोक के शब्द आपके सामने उसी प्रकार प्रकट हो जाएंगे। इस तरह आप कुल 40 चौपाये पूरे कर सकते हैं। अंत में 

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप”

 

यह संदेश दिखाई देगा और आपको हनुमान चालीसा पूरी करने के लिए बधाई संदेश प्राप्त होगा। साथ ही, पूरी हनुमान चालीसा को एक ही स्थान पर पढ़ने के लिए एक बटन भी आएगा। इस पर क्लिक करके आप पूरी चालीसा एक ही स्थान पर पढ़ सकते हैं।

तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Hanuman Chalisa Quiz- Introduction या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत सुरुवातीच्या दोह्याचे शब्द येतील.  random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ-

श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि

यातील सर्व शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील  श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढील श्लोकावर गेले, की  पुन्हा पुढील श्लोकाचे शब्द त्याच प्रकारे तुमच्यासमोर येतील. अशा प्रकारे तुम्ही एकूण ४० चौपाया  पूर्ण करू शकता. शेवटी “

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप

हा मेसेज येईल आणि तुम्ही हनुमान चालीसा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनपर मेसेज येईल. तसेच पूर्ण हनुमान चालीसा  एका ठिकाणी वाचण्यासाठी एक बटन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण चालीसा एके ठिकाणी वाचू शकता.  

When you start the quiz, the first screen will appear to you – Hanuman Chalisa Quiz- Introduction. In it, the words of the first couplet will appear in faded letters. Random, that is, in no order. For example –

Shriguru Charan Saroj Raj Nij Manu Mukur Sudhari.

Baranau Raghuvar Vimala Jasu Jo Dayaku Phala Chari

All the words in this are given above. You have to drag the words in the correct order with your finger and place them in their correct places. If the place of the word is correct, it will fit there, otherwise it will not fit. If all the words of the above verse are placed in the correct place, you will get a congratulatory message, the entire verse will be rewritten, and a button called Next Shloka will appear to go to the next verse. By clicking on it, you will go to the next verse, or again the words of the next verse will appear in front of you in the same way. In this way, you can complete a total of 40 verses. Finally, “

Pavan Tanay Sankat Haran, Mangal Murti Roop.

Ram Lakhan Sita Sahit, Hridaya Basahu Sur Bhup”

This message will appear and a congratulatory message will appear for completing Hanuman Chalisa. Also, a button will appear to read the complete Hanuman Chalisa in one place. By clicking on it, you can read the complete Chalisa in one place.

Hanuman Chalisa Quiz

Hanuman Chalisa Quiz

हनुमान चालीसा

 

 श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार ।

बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।

 

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥

राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२॥

महावीर विक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुंडल कुँचित केसा ॥४॥

हाथ वज्र औ ध्वजा बिराजे ।

काँधे मूँज जनेऊ साजे ॥५॥

शंकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जग वंदन ॥६॥

विद्यावान गुणी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मनबसिया ॥८॥

सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥९॥

भीम रूप धरि असुर संहारे ।

रामचंद्र के काज सवाँरे ॥१०॥

लाऐ संजीवन लखन जियाए ।

श्री रघुबीर हरषि उर लाए ॥११॥

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावै ।

अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥१३॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कवि कोविद कहि सके कहाँ ते ॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा ।

राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र विभीषण माना ।

लंकेश्वर भये सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र योजन पर भानू ।

लील्यो ताहि मधुर फ़ल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही ।

जलधि लाँघि गए अचरज नाही ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रक्षक काहू को डरना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।

तीनहूं लोक हाँक ते काँपै ॥२३॥

भूत पिशाच निकट नहि आवै ।

महावीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरे सब पीरा ।

जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५॥

संकट तें हनुमान छुडावै ।

मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम राय सिर ताजा ।

तिनके काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।

सोइ अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारों जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु संत के तुम रखवारे ।

असुर निकंदन राम दुलारे ॥३०॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा हो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अंतकाल रघुवरपुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त ना धरई ।

हनुमत सेई सर्व सुख करई ॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६॥

जै जै जै हनुमान गोसाई ।

कृपा करहु गुरु देव की नाई ॥३७॥

जो शत बार पाठ कर जोई ।

छूटहि बंदि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़े हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥४०॥

 

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥॥

 

Gita chapter 15 quiz

geeta 15

Click the Title “Gita chapter 15 quiz” above- if you can’t see the  Quiz

क्विझ खाली आहे   ⇓

स्वार्थ आणि परमार्थ- मनोरंजना बरोबर परमार्थ- श्रीमद्भगवद्गीतेचा १५ वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप लोकांना पाठ आहे. आपल्याला तो पाठ नसेल, आणि पाठ करायचा असेल तर- खालील कोडे सोडवत रहा- थोडेच दिवसात पूर्ण अध्याय सहज पाठ होईल. तो पर्यन्त खालील दिलेला अध्याय वाचून, त्याप्रमाणे सोडवला तरी चालेल. आपणही सोडवा- इतरांनाही द्या!

अध्याय १५ – पुरुषोत्तम योग

श्रीभगवानुवाच|

ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १५-१॥

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ १५-२॥

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा
अश्वत्थमेनं सुविरूढमूलं असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ १५-३॥

ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ १५-४॥

निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञै- र्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ १५-५॥

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५-६॥

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ १५-७॥

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ १५-८॥

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५-९॥

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १५-१०॥

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५-११॥

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५-१२॥

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५-१३॥

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १५-१४॥

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५-१५॥

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १५-१६॥

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १५-१७॥

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १५-१८॥

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १५-१९॥

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ १५-२०॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५॥

खालील शब्द आपल्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवा. एक श्लोक झाल्यावर पुढील श्लोक येईल. पूर्ण २० श्लोक झाल्यावर पूर्ण अध्याय येईल. 

संकल्पना आणि निर्मिती- माधव भोपे 
Bhagavad Gita Chapter 15 Quiz

Bhagavad Gita Chapter 15 Quiz

उतनूरचे दिवस-3-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

image (17)

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (३ )*

उतनूर मध्ये आमच्या स्टेट बँके व्यतिरिक्त आदीलाबाद जिल्हा केंद्रीय मध्यवर्ती बँक (ADCC) व सरस्वती ग्रामीण बँक अशा दोनच अन्य बँका होत्या. त्यापैकी ADCC बँक ही अनागोंदी कारभार व पर्याप्त निधीच्या अभावी कायमची बंद पडण्याच्या मार्गावर होती तर सरस्वती ग्रामीण बँक ही स्टेट बँकेद्वाराच पुरस्कृत (sponsored) असल्याने तशी बरीचशी आमच्या अंकीतच होती.

सरस्वती ग्रामीण बँकेची शाखा आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या अगदी समोरच होती. पुरेसा व कार्यक्षम स्टाफ नसल्याने या ग्रामीण बँकेचा उतनूर परिसरात केवळ नाममात्रच बिझिनेस होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या बँकेत राजकुमार रेड्डी नावाचे नवीन शाखाधिकारी आल्यापासून परिस्थिती बदलली होती.

सहा फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, सावळा रंग आणि सदैव हसमुख चेहरा असलेले राजकुमार रेड्डी एक हुशार व तडफदार अधिकारी होते. सर्वांशी आदराने व हसून खेळून बोलण्याच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली होती. ते अतिशय कष्टाळू होते व आपल्या बँकेचा बिझिनेस वाढावा यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असायचे.reddy-2

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शाखेतील फिल्ड ऑफिसर सूर्यकुमार बाबू यांचा पुलीमडगु गावात कर्ज वसुलीसाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचून गेले होते. पर्यायाने बँकेच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. शाखेत नवीन स्टाफ येण्यास तयार नव्हता. कर्जवसुली ठप्प झाल्याने अनुत्पादित कर्जाचे (NPA- Non Performing assets) प्रमाणही खूप वाढले होते.

राजकुमार रेड्डी साहेबांना शाखेच्या वाढत्या NPA ची चिंता सतावत होती. फिल्ड ऑफिसर नसल्याने त्यांनी स्वतःच कर्जवसुली साठी खेडोपाडी जाण्यास सुरवात केली. कर्जदारांना नियमित कर्जफेडीचे फायदे गोड शब्दांत समजावून सांगत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. पाहता पाहता कर्ज वसुलीचे प्रमाण वाढले आणि शाखेचा NPA झपाट्याने कमी झाला.

रोज सकाळी सहा वाजता रेड्डी साहेब रिकव्हरी साठी बाहेर पडून साडेनऊ पर्यंत घरी परत येत असत. मग जेवण करून साडेदहा वाजता ते शाखेत येऊन बसायचे. दुपारी एक वाजता ते पुन्हा कर्जवसुली साठी बाहेर पडायचे आणि चार साडेचार वाजेपर्यंत शाखेत परत यायचे. स्टाफ शॉर्टेज असल्याने खेडोपाडी जाताना ते नेहमी एकटेच जात. कुणालाही सोबत नेत नसत.

राजकुमार रेड्डी साहेब स्वतः जरी काळे सावळे असले तरी त्यांची बायको मात्र भरपूर गोरी तसेच सौंदर्यवती सुद्धा होती. रेड्डी साहेबांना मुलबाळ नव्हते. आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या वरच्या भागातच ते नवरा बायको रहायचे. रोज संध्याकाळी रेड्डी साहेब बायकोला घेऊन गावात मोटर सायकलवर फिरायचे तेंव्हा त्या देखण्या जोडीकडे सारे गावकरी कौतुकानं बघायचे.image (17)

कर्जवसुली समाधानकारक होऊन NPA आटोक्यात आल्यावर शाखेचे डिपॉझिट वाढविण्यावर जोर देण्यास रेड्डी साहेबांनी सुरवात केली. आमची बँक सरकारी बँक असल्याने उतनूर परिसरातील बहुतांश खातेदारांची डिपॉझिट्स आमच्या स्टेट बँकेतच होती. स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी बँकांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याज देण्याची रिझर्व्ह बँकेने ग्रामीण बँकांना परवानगी दिली होती. या गोष्टीचा आक्रमक प्रचार करीत रेड्डी साहेबांनी स्टेट बँकेतील डिपॉझिट्स आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली. लोकांनी आमच्या बँकेतून आपली जमा राशी काढून ती ग्रामीण बँकेत ठेवण्यास सुरवात केली. बघता बघता आमचे बरेच खातेदार त्यांच्या डिपॉझिट्स सह ग्रामीण बँकेत शिफ्ट झाले.

रेड्डी साहेबांच्या ह्या ऍग्रेसिव्ह बँकिंग मुळे स्टेट बँकेशी असलेल्या त्यांच्या मधुर संबंधात कडवटपणा निर्माण झाला होता. असं असलं तरी त्यांच्याशी असलेली माझी मैत्री मात्र कायम होती. रोज सकाळी एकाच वेळी आम्ही दोघेही इंस्पेक्शन व कर्ज वसुली साठी गावाबाहेर निघायचो. योगायोगाने आमची दत्तक गावेही एकाच रस्त्यावर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलातील गावे स्टेट बँकेकडे तर उजव्या बाजूच्या जंगलातील गावे ग्रामीण बँकेकडे, अशी दत्तक गावांची विभागणी होती.

नेहमीप्रमाणेच आजही दुपारी एक वाजता आम्ही दोघे रिकव्हरी साठी एकत्रच निघालो होतो. मला आज बिरसाई पेटच्या डावीकडील जंगलात पाच किलोमीटर अंतरावरील “भूपेट” या गावात जायचे होते. तर रेड्डी साहेबांना बिरसाई पेट च्या उजवीकडील जंगलात आठ किलोमीटर अंतरावरील “अल्लमपल्ली” या गावात जायचे होते. आम्ही दोघेही आपल्या ह्या गावांमध्ये पहिल्यांदाच जात होतो. तसंच ही दोन्ही गावं नक्षल्यांचा मुक्त वावर असलेली धोकादायक गावं असल्यामुळे दुपारी चार वाजण्यापूर्वीच व्हिजिट आटोपून बिरसाईपेट बस स्टॉप पाशी परत यायचे असे ठरवले.image (10)

बिरसाईपेट उतनूर पासून अकरा किलोमीटर दूर असलेलं रस्त्याला अगदी लागून असलेलं गाव होतं. तिथपर्यंत आम्ही तिघेही (मी, रेड्डी साहेब व प्युन रमेश) आपापल्या मोटार सायकलींवर आलो. तिथल्या बस स्टॉप नजीकच्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो असतांनाच आम्हाला बिक्षुपती भेटला. “पाथा उतनूर” (old utnoor) नावाच्या छोट्याशा गावात राहणारा बिक्षुपती गावोगाव सायकलींवर फिरून चादरी, सतरंज्या, ब्लॅंकेट्स हप्त्याने विकायचा. त्याचा व्यवहार पाहून नुकतंच त्याला दहा हजार रुपयांचं कर्ज मी मंजूर केलं होतं. रेड्डी साहेबांशी बिक्षुपतीची ओळख करून दिली. चहा घेतल्यावर बिक्षुपती बिरसाईपेट गावात गेला तर आम्ही आपाल्याला गावांकडे निघालो.

भूपेट गावात आमचे फक्त दहा बाराच कर्जदार होते. त्यांची भेट घेऊन थोडीफार वसुली करून तीन वाजण्यापूर्वीच आम्ही बिरसाईपेटला परतलो आणि रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो. मी झाडाखाली बसून इंस्पेक्शन रजिस्टर लिहून काढत होतो तर रमेश गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करीत होता. दरम्यान बिक्षुपती ही बिरसाईपेट मधील विक्री आटोपून आमच्या समोरूनच सायकल दामटीत पुढील गावाकडे निघून गेला. साडे चार वाजले तरी अद्याप रेड्डी साहेबांचा पत्ता नव्हता.

अखेर पाच वाजले. उंच वृक्षांच्या सावल्या लांबून अंधार पडायला सुरुवात झाली. रोजची कॅश स्टीच करणे, नोटांचे बंडल बांधणे, कॅश स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे ही कामे देखील रमेशलाच करायची असल्याने तो उतनूरला परतण्याची घाई करू लागला. मला मात्र रेड्डी साहेबांना न घेताच उतनूरला परत जाणे मनाला पटत नव्हते. शेवटी साडेपाच वाजता रमेशला एकट्यालाच बँकेची मोटारसायकल घेऊन उतनूरला परतण्यास सांगून मी तिथेच रेड्डी साहेबांची वाट पहात थांबलो.

त्याकाळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे रेड्डी साहेब नेमके कुठे आहेत हे समजण्यास मार्ग नव्हता. अल्लमपल्ली गावातून उतनूरकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. बिरसाईपेट गावाचे सरपंच हनमांडलू गारु मला सोबत करीत बस स्टॉप वर थांबले होते. त्यांच्याजवळ मोटारसायकल असल्याने यदाकदाचित रेड्डी साहेबांची भेट न झाल्यास मला उतनूर पर्यंत सोडून देण्याचे त्यांनी कबूल केले होते.

संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रस्त्यावरची वाहतूक मंदावली. गावकरी आपापल्या घरी परत गेले. गिऱ्हाईक नसल्याने बस स्टॉप वरील हॉटेलवालाही हॉटेल बंद करून आपल्या घरी गेला. आता तिथे फक्त मी आणि सरपंच हनमांडलू गारु असे दोघेच उरलो होतो. चादर विक्रेता बिक्षुपतीही अद्याप परतताना दिसला नसल्याने त्याबद्दल सरपंचांना विचारले असता.. “बिक्षुपतीचे भरपूर नातलग या परिसरातील विभिन्न गावांत रहात असल्याने विक्री करताना जिथे संध्याकाळ होईल त्याच गावात आपल्या नातेवाईकाकडे तो रात्रीचा मुक्काम करतो..” असे त्यांनी सांगितले.

साडेसात वाजता उतनूर मधील माझा सहकारी प्रसन्ना, मला परत नेण्यासाठी बँकेची मोटारसायकल घेऊन आला. रेड्डी साहेबांचा अद्यापही काहीच ठावठिकाणा नव्हता. आठ वाजता त्या मार्गावर रात्री गस्त घालणारी उतनूर पोलिसांची जीप (Patrolling vehicle) तिथे आली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर असं एकट्या दुकट्यानं उभं राहणं धोक्याचं असल्याचं सांगून त्यांनी आम्हाला हटकलं, तेंव्हा आम्ही त्यांना रेड्डी साहेबांबद्दल सांगितलं. एवढ्या रात्री जंगलात शिरून त्यांचा शोध घेणं खूप रिस्की असल्याचं सांगून त्यांनी आम्हालाही ताबडतोब उतनूरला परतण्यास सांगितलं. नाईलाजानं रात्री नऊच्या सुमारास आम्ही उतनूरला परतलो.

एव्हाना रेड्डी साहेबां बद्दलची बातमी साऱ्या गावभर पसरली होती. आमच्या बँकेसमोर गावकऱ्यांचा घोळका जमला होता. शेजार पाजारच्या बायका रेड्डी साहेबांच्या बायकोला धीर देत होत्या. गाडी पंक्चर झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे कदाचित साहेबांना अल्लमपल्ली गावातच मुक्काम करावा लागला असेल असे सांगून लोक रेड्डी साहेबांच्या पत्नीची समजूत घालत होते. रात्री दहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेड्डी साहेबांची “मिसिंग कम्प्लेन्ट” नोंदवली.

त्या दिवशी आम्ही स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी बँकेत जमून रात्रभर जागत राहून रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो होतो. ग्रामीण बँकेचा स्टाफ ही आमच्या सोबतच होता. काही प्रतिष्ठित गावकरी, ADCC बँकेचे कर्मचारी व दोन पोलीस कॉन्स्टेबल देखील थोड्या वेळासाठी तिथे येऊन गेले. रेड्डी साहेबांची पत्नी सुद्धा अधून मधून बँकेत येऊन जात होती. पहाटे सहा वाजता सशस्त्र पोलिसांच्या दोन जीप रेड्डी साहेबांच्या शोधार्थ अल्लमपल्ली फॉरेस्ट कडे निघाल्या.

अल्लमपल्ली गावापर्यंत जाऊन पोलिसांच्या या दोन्ही जीप सकाळी दहापर्यंत उतनूरला परत आल्या. रेड्डी साहेब अल्लमपल्ली गावात आलेच नसल्याचे तेथील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या नंतर दुपारी बारा वाजता, त्या भागातील हिरापूर गावाजवळ एक मोटारसायकल अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचे तेथील गावकऱ्यांनी उतनूर पोलिस स्टेशनला कळविले. ताबडतोब रिकामी जीप पाठवून पोलिसांनी ती मोटारसायकल ग्रामीण बँकेकडे आणवून घेतली. ती रेड्डी साहेबांचीच मोटारसायकल होती.

रेड्डी साहेबांसोबत निश्चितच काहीतरी घातपात झालेला दिसत होता. हिरापूर जंगलात त्या मोटारसायकल पासून काहीच अंतरावर पोलिसांना एक पॅन्ट शर्ट व बुटांचा जोड ही फेकून दिलेला दिसला. तोही पोलिसांनी सोबत आणला होता. ते कपडे व बूट रेड्डी साहेबांचेच असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

राजकुमार रेड्डी साहेबांची ती जळालेली मोटारसायकल व बूट, कपडे पाहताच त्यांच्या पत्नीचा आतापर्यंत कसाबसा राखलेला धीर संपला. अशुभाच्या आशंकेने त्यांनी हंबरडा फोडून विलाप करण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून जमलेल्या साऱ्यांचेच काळीज पिळवटून निघत होते. ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज बँक बंदच ठेवली होती. थोड्याच वेळात ग्रामीण बँकेचे आदीलाबाद येथील रिजनल मॅनेजर आपल्या सोबत लीड बँक मॅनेजर साहेबांना घेऊन उतनूरला हजर झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बँकेभोवती जमलेल्या जमावास पांगवून तिथे पोलीस बंदोबस्त वाढविला. रेड्डी साहेबांना शेवटचे पाहणारे आम्हीच असल्याने माझी व रमेशची पोलिसांनी कसून चौकशी केली. आदीलाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षकही उतनूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना वारंवार सूचना देत तपास कार्याचा अपडेट घेत होते. अल्लमपल्ली व हिरापूरचे संपूर्ण जंगल पोलिसांनी पिंजून काढले होते. परंतु अद्यापही रेड्डी साहेबांचा कसलाही थांगपत्ता लागत नव्हता.

कदाचित नक्षलवाद्यांनी रेड्डी साहेबांचे अपहरण करून त्यांना महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात नेले असावे असा पोलिसांचा कयास होता. तसे असेल तर खंडणीसाठी तरी त्यांचा फोन येईल याचीच पोलीस वाट पहात होते. परंतु दुपारचे चार वाजले तरी अद्याप तसा कुठलाही फोन आला नव्हता.

दिवस मावळू लागला तशीतशी रेड्डी साहेबांच्या परतण्याची आशा देखील मावळू लागली. त्यांच्या पत्नीची दयनीय अवस्था तर बघता बघवत नव्हती. पतीची आठवण काढून रडता रडता दु:खातिरेकाने ती विलापिता वारंवार बेशुद्ध पडत होती.

पाच वाजण्याच्या सुमारास कमरेला मळकंसं धोतर गुंडाळलेला एक जाडजूड उघडाबंब माणूस गर्दीतून वाट काढीत बँकेत आला. त्याचा चेहरा धुळीने माखलेला होता. माझ्याकडे पहात तो म्हणाला..

“नमस्ते साब..!”image (15)

आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी त्या माणसाकडे निरखून बघितलं.. तो काय..

“अरे..! रेड्डी साब.. आप ? और इस हालत में..?”

माझ्या तोंडून आनंदाने व आश्चर्याने वरील उद्गार बाहेर पडले.

माझे ते शब्द ऐकून सर्वांच्याच नजरा त्या माणसाकडे वळल्या. ते रेड्डी साहेबच आहेत याची खात्री झाल्यावर बँकेत सर्वत्र आनंदाची एक लहर पसरली. जो तो त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी धडपडू लागला. रेड्डी साहेबांच्या पत्नीला ही बातमी समजताच ती धावतच बँकेत आली आणि सर्वांदेखत तिने आपल्या पतीला घट्ट मिठी मारली. आनंदातिरेकाने तिच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला होता. रेड्डी साहेब व त्यांची पत्नी.. या दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्यांचं ते प्रेमभरीत उत्कट मिलन पाहून आम्हालाही गहिवरून आलं.

थोड्या वेळाने भानावर आल्यावर रेड्डी साहेबांच्या पत्नीने त्यांना घरी नेऊन आधी स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्यांना पोटभर खाऊ पिऊ घालून हसतमुखाने त्यांना ती बँकेत घेऊन आली. तोपर्यंत उतनूरचे पोलीस ठाणेदारही त्यांचा जबाब घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपले होते. आम्ही सारे ही त्यांची हकीकत ऐकण्यास अत्यंत उत्सुक होतो. रेड्डी साहेबांनी माझ्याकडे पहात बोलायला सुरुवात केली.

“काल दुपारी दीडच्या सुमारास माझ्या स्टेट बँकेच्या या मित्राला ‘चार वाजेपर्यंत इथेच परत येतो..’ असं सांगून बिरसाईपेट हून मी अल्लमपल्लीच्या दिशेने निघालो. सुमारे पाच किलोमीटर आत गेल्यावर एका ठिकाणी जंगलातील तो रस्ता दोन वेगळ्या दिशांना विभागला गेला होता. त्या रस्त्याने पहिल्यांदाच जात असल्याने नक्की कुठल्या दिशेने जावे याचा अंदाज न आल्याने नेमक्या चुकीच्याच दिशेने जंगलात जाण्यास मी सुरवात केली.

बराच वेळ झाला तरी कुठलेही गाव किंवा वस्ती दिसेना, तेंव्हा आपण रस्ता चुकल्याची मला खात्री झाली. गाडी वळवून माघारी परत फिरण्याचा विचार करीत असतानाच खाकी रंगाचा पॅन्ट शर्ट घातलेले दोन बंदूकधारी तरुण रस्त्याच्या कडेला उभे असलेले मला दिसले. ते फॉरेस्ट गार्ड असावेत असं वाटून मी त्यांच्याकडे अल्लमपल्लीच्या रस्त्याबद्दल चौकशी केली. हा हिरापूर कडे जाणारा रस्ता आहे असं सांगून अल्लमपल्लीचा रस्ता तर मागेच राहिला असं त्यांनी सांगितलं.

त्या दोघांचे आभार मानून मी मागे फिरलो. मात्र तेवढ्यात कुठूनतरी खुणेची एक कर्कश्श शीळ जंगलात घुमली. मला अनामिक धोक्याची जाणीव झाली. पाहता पाहता आजूबाजूच्या जंगलातून हिरव्या रंगाच्या गणवेशातील आठ दहा बंदूकधारी बाहेर पडून त्यांनी मला घेरून टाकलं. मला मोटारसायकल वरून खाली उतरवून पायवाटेने त्यांनी मला खोल जंगलात नेलं.

तिथे एका ठिकाणी नक्षलवाद्यांचा तळ होता. त्यांच्या कमांडरने माझी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. माझे आयडेंटिटी कार्ड दाखवूनही मी बँक मॅनेजर आहे यावर काही केल्या त्याचा विश्वास बसत नव्हता. गाडीचे लॉग बुक, इंस्पेक्षन रजिस्टर वगैरे त्याने दूर भिरकावून दिले. माझ्या दणकट शरीरयष्टीकडे पाहून मी पोलीस अधिकारीच असल्याचा त्याचा पक्का गैरसमज झाला होता. माझ्याबद्दल त्या कमांडरने खूप बारकाईने चौकशी केली. माझे जन्मगाव, शिक्षण, नोकरी इत्यादीचा तपशील जाणून घेऊन त्याची खातरजमा करण्यासाठी ट्रान्समिटर मार्फत ती माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवली.

माझे अंगावरचे कपडे काढून घेऊन तिथल्याच एका झाडाला त्या नक्षल्यांनी मला रात्रभर बांधून ठेवलं. माझे कपडे जंगलात फेकून देऊन माझी मोटारसायकल जाळून टाकण्याचाही कमांडरने आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला. माझा “फैसला” उद्या सकाळी होईल.. असं सांगून ते सारे झोपायला निघून गेले.

सकाळी तिथला तळ हलवून व दोरीने माझे हात पाठीमागे बांधून अनवाणी पायी चालवत त्यांनी मला तेजपूरच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. पोलिसांनी जंगलात माझा शोध घेण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांना खबर मिळाली होती. अधून मधून वॉकी टॉकी आणि ट्रान्समिटर वर बोलून ते माझ्या बद्दल वरिष्ठांकडून सूचना घेत होते. अद्याप माझ्या बद्दल हाय कमांड कडे पाठविलेली माहिती त्यांच्याकडून व्हेरिफाय झाली नव्हती.

सकाळचे दहा वाजून गेले होते. जसा जसा वरिष्ठांकडून माझी माहिती व्हेरिफाय करण्यास उशीर होत होता तसा तसा आमच्या सोबत जंगलात पायपीट करणाऱ्या त्या नक्षली दलम् च्या कमांडरचा राग व अधिरपणा वाढत होता. अखेरीस, बहुदा कमांडरच्या सततच्या विचारणेला वैतागून त्यांच्या हाय कमांडने माझ्या भवितव्याचा निर्णय त्या नक्षली कमांडरवरच सोपवला.

त्या कमांडरला तर माझ्या लोढण्या पासून कधीचीच सुटका हवी होती. त्याने मला पुन्हा झाडाला बांधून माझे हात पाय तोडून शीर धडावेगळे करण्याचा निष्ठूरपणे आदेश दिला. त्यानुसार चालता चालता मधेच थांबून तिथल्याच एका झाडाला मला बांधून टाकण्यात आले. मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली. जगण्याची आशा तर मी केंव्हाच सोडून दिली होती.

हातात कुऱ्हाड आणि कत्ती घेऊन निर्विकार चेहऱ्याचे दोन क्रूरकर्मा नक्षली जणू हे नित्यकर्मच असल्याच्या अविर्भावात माझ्या समोर उभे राहिले. त्यापैकी एका नक्षल्याने माझ्यावर घाव घालण्यासाठी कुऱ्हाड उंचावली. माझ्या सर्व संवेदना बधिर झाल्या होत्या. मी डोळे गच्च मिटून घेतले.

त्या नक्षल्याचा वर गेलेला हात बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने नवल वाटून मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तो नक्षली कान देऊन कसला तरी कानोसा घेत होता. काल ऐकली होती तशी खुणेची शीळ पुन्हा जंगलात घुमली. त्या पाठोपाठ जंगलातून एका माणसाला धरून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला कमांडर पुढे आणण्यात आले. मला त्या माणसाची फक्त पाठच दिसत होती.

कमांडरने आदेश दिल्यावर त्या माणसाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पट्टी काढताच त्या माणसाने कमांडरला सॅल्युट ठोकला. कमांडरची त्या माणसाशी चांगलीच जान पहचान असावी. कारण कमांडरने त्याला आदराने आपल्या शेजारी बसवून घेतले. त्यानंतर त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो कालच ओळख झालेला चादर सतरंजी विकणारा बिक्षुपती होता. बहुदा तो नक्षल्यांचा खबऱ्या असावा. सुरवातीला त्याने मला ओळखलेच नाही. मात्र नंतर कमांडरने माझ्याबद्दल माहिती सांगताच त्याला माझी ओळख पटली. तो कमांडरला म्हणाला..

“मी ओळखतो ह्यांना. मी खात्रीनं सांगतो, हे नवीन आलेले ग्रामीण बँकेचे मॅनेजरच आहेत.”image (19)

बिक्षुपतीच्या त्या उद्गारांनी जणू चमत्कारच झाला. त्या कमांडरने माझी माझी ताबडतोब सुटका करण्याचा आदेश दिला. माझी क्षमा मागून तो म्हणाला.. “बँकवाल्यांशी आमचं कसलंही वैर नाही. केवळ तुम्ही पोलीस असल्याचा संशय असल्यानेच सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला देहदंड देण्याचे मी ठरवले होते. तुम्ही आता या बाजूने सरळ चालत जा. सुमारे दोन तास चालल्यावर तुम्हाला उतनूर कडे जाणारा रस्ता सापडेल..”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी निमूटपणे त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो. बिक्षुपतीचे साधे आभार मानण्याचेही धैर्य आणि त्राण माझ्यात उरले नव्हते. माझ्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. त्या निर्मनुष्य जंगलात एखाद्या वनमाणसा सारखा वाट काढीत मी चाललो होतो. वाटेत एका उध्वस्त झोपडी समोर वाळत टाकलेलं फाटक मळकं धोतर काढून घेऊन मी ते कमरेला गुंडाळून घेतलं.

काल पासून पोटात अन्नाचा कण ही नसल्याने मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे चालताना अनेकदा सावली पाहून तिथे थांबून मी विश्रांती घेत होतो. अशा प्रकारे कशीबशी मजल दर मजल करीत अगदी विरुद्ध दिशेने एकदाचा मी उतनूर गावात प्रवेश केला.”

रेड्डी साहेबांचे बोलणे संपले. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच ते या जिवावरच्या संकटातून बचावले होते.

बिक्षुपती हा नक्षल्यांप्रमाणेच पोलिसांचा ही खबऱ्या होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही.

या घटने नंतर ग्रामीण बँकेच्या मॅनेजमेंटने रेड्डी साहेबांची ताबडतोब अन्यत्र बदली केली. परंतु रेड्डी साहेबांनी नम्रपणे ही बदली नाकारली आणि आपल्याला उतनूरलाच राहू द्यावे अशी वरिष्ठांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व शाखेची प्रगती करण्यासाठी आपले उतनूरला राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. विशेष म्हणजे रेड्डी साहेबांच्या पत्नीनेही आपल्या पतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.

असे हे कर्तव्यनिष्ठ राजकुमार रेड्डी साहेब पुढे ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-2-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

dense forest

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (२)*

*पुलीमडगुचा हल्लेखोर वाघ..*

दुसरा दिवस उजाडला. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच रमेश स्नान, देवपूजा आटोपून कपाळाला उभं गंध लावून बँकेची मोटारसायकल घेऊन माझ्या दारात हजर झाला. गाडीच्या अर्धवट तुटलेल्या पत्र्याच्या डिक्कीतून पुलीमडगु व आसपासच्या गावांतील कर्जदारांची माहिती असलेले जाडजूड इन्स्पेक्शन रजिस्टर डोकावत होते. मी सुद्धा स्नान, चहा ई. आटोपून तयारच होतो. दहा वाजेपर्यंत परत येतो, असं घरी सांगून आम्ही निघालो. ramesh

तसं पाहिलं तर उतनूर पासून पुलीमडगु गावाचं अंतर फक्त दहा किलोमीटर एवढंच होतं. परंतु काटेकुटे, खाच खळग्यांनी भरलेल्या कच्च्या, ओबडधोबड आणि निर्मनुष्य रस्त्याने जाताना ते छोटंसं अंतरही खूप मोठं वाटत होतं. नागपूर ते निर्मल या महामार्गावरील गुढीहतनूर या गावापासून उतनूर कडे जाण्यासाठी जो फाटा फुटतो त्या मार्गावर इंद्रवेल्ली आणि शामपूर या दोन गावांच्या मध्ये थोडं आडबाजूला हे पुलीमडगु गांव होतं. हा संपूर्ण भाग तुरळक वस्तीचा व आदिवासी बहुल असून गर्द वनराईनं वेढलेल्या भीषण दऱ्यादुऱ्यांचा तसंच क्रूर नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेला म्हणून कुख्यात होता.dense forest

पुलीमडगु गावात बेधडक दिवसा ढवळ्या वाघ येतो आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत जंगलात घेऊन जातो.. अशी त्या पंचक्रोशीत वंदता होती. त्यामुळे सहसा त्या गावांत एकटं दुकटं जायला कुणीही धजावत नसे. त्यातून हे गांव दाट जंगलात वसलेलं आणि थोडं आडबाजूला असल्याने त्या गावचे रहिवासी वगळता अन्य कुणीही त्या गावाकडे चुकूनही फिरकत नसत. पूर्वी हे गाव सरस्वती ग्रामीण बँकेच्या कार्यक्षेत्रात होतं. मात्र एका दुर्दैवी घटनेनंतर त्या बँकेने लीड बँकेकडे हे कार्यक्षेत्र बदलून मागितलं. त्यांची विनंति मान्य करून लीड बँकेने पुलीमडगु हे गांव स्टेट बँकेला पुनःआवंटीत (re-allot) केलं होतं.

आम्ही पुलीमडगु गावात प्रवेश केला तेंव्हा तिथल्या रस्त्यांवर काही बेवारस कुत्री सोडली तर अन्य कुणीही दिसत नव्हतं. सर्व घरांच्या व झोपड्यांच्या खिडक्या आणि दारं आतून बंद होती. गावात जेमतेम तीस चाळीस घरं असावीत. रमेशला गावातील वेड्यावाकड्या रस्त्यांची चांगलीच माहिती असल्याचं दिसत होतं. अतिशय शिताफीने वाटेतील खड्डे, खाच खळगे, चिखल, नाल्या चुकवत उभ्या आडव्या बोळांतून तो मोटार सायकल दामटीत होता.village

आम्ही एखाद्या घरासमोरून पुढे गेल्यावर त्या घरातील लोक खिडक्या दारं किंचित किलकिली करून आमच्याकडे चोरून पहात असावेत असा उगीचंच भास होत होता. डाकूंची टोळी गावात शिरते तेंव्हा गावातील लोक जसे घाबरून दारं खिडक्या घट्ट बंद करून घरात दडून बसतात तसंच काहीसं तिथलं वातावरण वाटत होतं.

आख्खं गाव ओलांडून रमेशने गावापासून दूर, अगदी टोकाला असलेल्या एका एकलकोंड्या घरासमोर गाडी उभी केली. दगडी बांधकाम असलेल्या त्या छोट्याश्या बैठ्या घरावरील नवी कोरी इंग्रजी कौलं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती.roof tiles

घराभोवती बांबू व वाळलेल्या काट्याकुट्यांचं मजबूत, उंच कुंपण होतं. घरासमोर अंगणात एक मध्यम आकाराची गोल, पक्की विहीर होती. ती विहीर नुकतीच खणलेली असावी. कारण विहिरीच्या खोदकामातून निघालेल्या दगडांचा ढिगारा अंगणात अजूनही तसाच पडलेला होता. गाडीवरून खाली उतरून रमेशने हाक मारली..village house

” वेंकन्ना…! ओ ssss वेंकन्ना..!”

घरामागील उंचवट्यावरून पांढऱ्या रंगाचं आदिवासी पध्दतीचं मुंडासं घातलेलं एक डोकं हळूच दगडी भिंतीबाहेर डोकावलं. लांबवरून बराच वेळ रमेशला निरखून पाहिल्यानंतर मग कुठे त्या मुंडासंवाल्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर ओळख पटल्याचं हास्य उमटलं. लगबगीनं धावतच येऊन त्यानं कुंपणाचं लाकडी फळ्यांचं फाटक उघडलं.venkanna

“आत या साहेब..” तो तेलगू भाषेत म्हणाला.

सफेद धोतर आणि खादीची बिन बाह्यांची बंडी घातलेला वेंकन्ना एक मध्यम उंचीचा किरकोळ शरीरयष्टी असलेला सामान्य शेतकरी वाटत होता. आम्ही त्याच्या घरात गेलो. बैठकीच्या खोलीत असलेल्या लाकडी सोफ्यावर बसायला सांगून त्यानं आम्हाला पिण्यासाठी आंतून तांब्याभर पाणी आणून दिलं.

“हे बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर.. महाराष्ट्रातून आले आहेत. यांना तेलगू भाषा येत नाही..”

रमेशने वेंकन्नाला तेलगूतून माझा थोडक्यात परिचय करून दिला.

“पर्वा लेदू.. ! (हरकत नाही..No problem.)” वेंकन्ना म्हणाला.. “हमको थोडा थोडा हिंदी भी आता है..”

त्यानंतर हिंदीतूनच आमच्या गप्पा सुरु झाल्या.

रमेशनं सांगितलं की वेंकन्ना हा पुलीमडगु गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असून गेली अनेक वर्षे तो गावचा सरपंच देखील आहे. पोलीस, फॉरेस्ट खातं, ITDA, मंडल परिषद अशा सर्व सरकारी खात्यांमध्येही त्याचं चांगलंच वजन आहे. सध्या त्याचं स्वतःचंच कर्ज खातं थोडं थकीत असलं तरी एरव्ही मात्र तो बँकेला कर्जवसुलीत खूप सहकार्य करतो.

रमेशचं असं बोलणं चालू असतानाच तिथल्या लाकडी अलमारीतून पाच हजार रुपये काढून ते मला देत वेंकन्ना म्हणाला..

“कालच आदीलाबादचे व्यापारी इथल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनीच दिलेले हे पैसे माझ्या कर्ज खात्यात जमा करून घ्या. आणि, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. गावातील सर्वच शेतकऱ्यांकडे मक्याचे पैसे आलेले आहेत. तुम्ही मला इथल्या थकबाकीदारांची नावं सांगा. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाता येईल..”

त्यानंतर वेंकन्नाला घेऊन आम्ही गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडे गेलो. वेंकन्नाचा गावात खूप मान आणि दरारा होता. ईरन्ना, भीमन्ना, सोमू, राजय्या, नरसय्या, लच्छन्ना अशा गावातील बऱ्याच थकीत कर्जदारांकडून त्या दिवशी भरपूर कर्ज वसुली झाली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वेंकन्ना आम्हाला पुन्हा त्याच्या घरी घेऊन गेला. मुलांच्या शिक्षणासाठी वेंकन्नाची पत्नी तिच्या माहेरी करीमनगर इथं रहात असल्याने वेंकन्ना त्या घरात एकटाच रहात होता. त्याने बनवलेला चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्याच्या घरामागील आमराई व फळबाग पहात हिंडत होतो.

वेंकन्नाचे घर गावापासून थोडे दूर एका टोकाला होते. त्याच्या घरामागील चिंच, आवळा, आंबा आणि मोहाची काही झाडे सोडली तर तिथूनच गर्द सागवृक्षांचे जंगल सुरू होत होते. घराला तिन्ही बाजूंनी बांबू व काट्यांचे उंच, भक्कम कुंपण असले तरी या मागील भागाला मात्र कुंपण नव्हते.

जंगलकडील या बाजूस एक पाच फूट उंचीचा आकर्षक नैसर्गिक उंचवटा होता आणि तिथूनच खोल जंगलात जाण्यासाठी एक पायवाट सुद्धा होती. मी त्या उंचवट्याला पाठ टेकून उभा राहिलो. माझं फक्त डोकंच त्या खांद्याएवढ्या उंच उंचवट्याच्या वरती होतं. सहज मान मागे वळवून पाहिलं तर तिथून ती जंगलात जाणारी रहस्यमय पायवाट अगदी जवळच दिसत होती. मला तसं उभं राहिलेला पाहून वेंकन्ना घाबरून मोठ्याने ओरडला..

“साब, उधर वैसा खड़े मत रहो.. इधर आ जाओ.. वहां खतरा है..!”

मी बुचकळ्यातच पडलो. खतऱ्या सारखं तर तिथं काहीच दिसत नव्हतं. मी अवतीभवती काळजीपूर्वक आणि शोधक नजरेने नीट निरखून पाहिलं. माझ्या पाठीमागे खांद्यापर्यंत तर तो नैसर्गिक उंचवटाच होता. आजूबाजूला आंब्याची, चिंचेची झाडं होती. जवळपास कुठेही विहीर, तलाव, दलदल, मधमाशांचं पोळं किंवा खोल दरी सुद्धा नव्हती. हां, मागे जंगल होतं खरं.. पण ते तिथून तीस चाळीस फुटांवरून सुरू होत होतं.

“आप पहले इधर आ जाओ..! फिर समझाता हूँ आपको..!”

वेंकन्नाने पुन्हा ओरडून मला खाली बोलावल्यावर अनिच्छेनेच त्या उंचवट्या पासून दूर होत मी त्याच्याकडे गेलो.

“दो साल पहले सूर्यकुमार बाबू उस टीले के पास ठीक उसी तरह खड़े थे, जैसे अभी अभी आप खड़े थे..”

वेंकन्ना गंभीर स्वरात म्हणाला.

“सूर्यकुमार..? कौन सूर्यकुमार ?”

मी विचारलं. तेंव्हा रमेशनं सांगितलं की सूर्यकुमार हा उतनूरच्या सरस्वती ग्रामीण बँकेचा एक तडफदार, धाडसी फिल्ड ऑफिसर होता. पूर्वी पुलीमडगु गाव ग्रामीण बँकेकडे दत्तक असल्याने कर्जमंजुरी पूर्वक निरीक्षण (Pre-sanction inspection) तसेच कर्जवसुली साठी सूर्यकुमार नेहमीच या गावात येत असे. तसंच तो निसर्गप्रेमी असल्याने जंगलात भटकणं त्याला खूप आवडत असे. पुलीमडगु लगतच्या जंगलातही तो बरेचदा फिरायला जात असे.

एकदा असाच नियमित कर्जवसुलीसाठी पुलीमडगु गावात आला असता याच उंचवट्याला पाठ टेकून तो उभा असतांनाच एका प्रचंड मोठ्या वाघाने अचानक पाठीमागून येऊन त्याचं डोकंच धरलं आणि तसाच फरफटत त्याला जंगलात घेऊन गेला. दोन दिवसांनी जागोजागी लचके तोडलेलं त्याचं शिरविरहीत धड खोल जंगलातील एका तलावाजवळ आढळून आलं.

रमेशनं असंही सांगितलं की त्या घटनेनंतर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुलीमडगु गावात जाण्यास नकार दिला आणि जिल्हा अग्रणी बँकेकडे हे गाव अन्य बँकेकडे दत्तक देण्याची विनंती केली. अशा तऱ्हेने हे गाव आमच्या स्टेट बँकेकडे दत्तक आले होते.

हकनाक बळी पडलेल्या सूर्यकुमार बाबूची हकीकत ऎकल्यावरही रमेश आणि वेंकन्नाच्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता बाजूच्या उतारावरून मी त्या उंचवट्यावर चढलो. मागील पन्नास साठ फुटांच्या त्या जागेला कसलेही कुंपण नव्हते. त्यातील जंगलात जाणारा आठ दहा फुटांचा रस्ता सोडला तर बाकी सगळीकडे जाडजूड बुंध्याचे एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेले उंच, दाट साग वृक्ष होते. तिथून कोणत्याही प्राण्याला आत येणे खूप अवघड होते. हे निरीक्षण करून मी खाली उतरलो.

तेलगू भाषेत वाघाला जसं “व्याघ्रम” म्हणतात तसंच “पुली” असंही म्हणतात. आपल्याकडे वाघलगाव, वाघोली, वाघदरा, वाघजाई (जाळी) या नावाची जशी गावं असतात तसंच हे “पुलीमडगु”. यातील “पुली” म्हणजे वाघ आणि “मडगु” म्हणजे गाव, असंच मी समजत होतो.

मात्र काही दिवसांनी तेलगू भाषेत “मडगु” शब्दाचा अर्थ “तलाव” (lake) असा होतो, अशी ज्ञानात भर पडली. त्यावरून “वाघ जिथे पाणी प्यायला येतो तो तलाव” म्हणजे “पुलीमडगु” (मराठीत वाघतळं) असा योग्य अर्थ मी लावला. त्यानुसार त्या गावाच्या जवळपास कुठेतरी पाण्याचा तलाव आहे का याबद्दल चौकशी केली असता वेंकन्नाच्या घरामागील जंगलात एक किलोमीटर अंतरावर तसं एक मोठं तळं असल्याचीही माहिती मिळाली.

गुढी हतनूर ते उतनूर या मार्गावरील धानोरा, केसलापूर, इंद्रवेली, आंधळी, दसनापूर, खंडाळा, उमरी, शामपुर, नागापूर अशी जवळ जवळ सर्वच गावांची नावं जरी ओळखीची आणि मराठी वळणाची वाटत असली तरी प्रत्यक्षात त्या गावांत कुणालाही मराठी भाषा येत नाही. इंग्रजांपूर्वी आदिवासी गोंड राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या या भूभागात प्रामुख्याने गोंड, कोलम, चेंचू, गडाबा, बैगा आणि मुंडा ह्या आदिम आदिवासी प्रजातीच्याच लोकांची वस्ती आहे. खोल जंगलात, डोंगरकपारीच्या आणि दऱ्या खोऱ्यांच्या आश्रयाने राहणारे हे आदिवासी क्वचितच रस्त्याकडे फिरकतात. पराकोटीचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुपोषण यांनी ग्रासलेला हा भूमिपुत्रांचा समाज अतिशय भोळा आणि अल्पसंतुष्ट आहे.

पोटापुरतंच धान्य पिकवावं, लाज झाकण्या पुरतंच वस्त्र ल्यावं, तेल, मीठ, मिरचीच्या खर्चापुरता जंगलातून मध, डिंक गोळा करावा आणि कवडीमोल भावानं तो स्थानिक व्यापाऱ्यांना विकावा, मोहाची फुलं गोळा करून त्याची चविष्ट दारू तयार करावी, टोकदार बांबूचे भाले, गावठी धनुष्यबाण आणि पाळलेल्या अजस्त्र रानटी कुत्र्यांच्या मदतीने हरीण, ससे, रानडुक्कर यांची शिकार करावी, रात्री आगीवर ही शिकार भाजावी आणि मोहाची दारू प्राशन करून चांदण्या रात्री डफाच्या साथीवर शेकोटी भोवती फेर धरून नृत्य करीत मस्तीत जगावं असा त्या भाबड्या आदिवासींचा नित्य जीवनक्रम होता.

काही आदिवासी विडी उद्योगासाठी लागणारा तेंदू पत्ता गोळा करून तो नागपूर, नांदेड, निझामाबाद, जालना येथून येणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना विकत असत. वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याच साथीने उच्च प्रतीचे अस्सल सागवानी तसेच शिसवी व चंदनाचे लाकूड यांचीही चोरटी वाहतूक काही आदिवासी अत्यल्प मोबदल्यात करीत असत. या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षित व्हावे, त्यांचे जीवनमान उंचावून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे जे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जात त्याचा बहुतांश हिस्सा राजकीय नेते, सरकारी नोकरशहा आणि स्थानिक व्यापारी परस्परांच्या संगनमताने गिळंकृत करून टाकीत असत.

आदिवासींचा कष्टाचा आणि हक्काचा पैसा लुबाडून व्यापारी, पुढारी आणि सरकारी बगल बच्चे गब्बर होत चालले होते. आदिवासींना या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांना प्रस्थापितां विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारी नक्षलवाद्यांची माओवादी हिंसक विचारसरणी या संपूर्ण परिसरात चांगलीच फोफावली होती.

रस्ते, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन अशा दळण वळण आणि संदेश वहन सुलभ करणाऱ्या सरकारी खात्यांना या नक्षली लोकांचा तीव्र विरोध होता. या सोयींमुळेच आदिवासींची पिळवणूक करणारे भांडवलदार व्यापारी त्यांच्या पर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांना लुबाडतात अशी नक्षली विचारसरणी होती. तसेच पोलिस या भांडवलदारांना, प्रस्थापितांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवितात म्हणून पोलिसांशीही त्यांचे वैर होते.

नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळावी म्हणून ज्याप्रमाणे पोलिसांनी सामान्य आदिवासी जनतेत आपले खबरे पेरून ठेवले होते, अगदी तसेच नक्षलवाद्यांनी देखील प्रत्येक गावात आपले गुप्तहेर नेमलेले होते. या खबऱ्यांना व गुप्तहेरांना पोलिसांकडून तसंच नक्षलवाद्यांकडून भरपूर पैसा पुरविला जात असे.

काही चलाख, अतिधूर्त, संधीसाधू आदिवासी हे आपला जीव धोक्यात घालून, एकाच वेळी पोलिस व नक्षली, ह्या दोघांचेही विश्वासू खबरे म्हणून काम करीत आणि अशारितीने दोन्हीकडून भरपूर पैसा मिळवीत असत.

पुलीमडगु गावाचा प्रधान उर्फ सरपंच वेंकन्ना हाही असाच एक डबल एजंट होता.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्य कुमार बाबू याला वाघानं ओढून नेण्यापूर्वी आणि नंतरही गावातील काही दुर्दैवी गावकऱ्यांना ओढून नेऊन वाघानं त्यांचा बळी घेतला होता. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासठी गावात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वाघाच्या प्राणघातक हल्ल्याची शिकार व्हावं लागलं होतं. वाघाच्या दहशतीमुळे पुलीमडगु गावातील शाळेत शिक्षक येईनासे झाल्यामुळे ती शाळाही कायमचीच बंद पडली होती.

पुलीमडगुला मी जेंव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा वेंकन्नाच्या घरामागील पन्नास साठ फुटांच्या जंगला कडील भागाला जर काटेरी तारांचे उंच कुंपण घातले तर वाघाचे गावात येणे कायमचे बंद होईल असे मला वाटले. त्यामुळे मी वेंकन्नाला तसे सुचवतांच “त्यासाठी खूप मोठा खर्च येईल..” असे तो म्हणाला.

योगायोगाने त्याचवेळी आमच्या उतनूर स्टेट बॅंके भोवतीचे तारेचे जुने कुंपण काढून टाकून त्याजागी नवीन पक्क्या विटांचे कंपाउंड बांधण्याचे काम सुरू होते. काढून टाकलेल्या जुन्या गंजलेल्या लोखंडी काटेरी तारांचा भला मोठा ढिगारा बँकेमागे पडला होता. मॅनेजर साहेबांची परवानगी घेऊन मी त्या जुन्या तारा वेंकन्नाला देण्याची व्यवस्था केली. वेंकन्नाही मोठ्या आनंदाने त्या तारा आपल्या बैलगाडीत टाकून घरी घेऊन गेला.

त्या नंतर काही दिवसांनी पुन्हा पुलीमडगु गावात गेलो असता वेंकन्नाच्या घरामागील भागाला काटेरी तारांचे उंच कुंपण घातलेले पाहून समाधान वाटले. त्या जंगलात जाणाऱ्या पायवाटेला तर काटेरी तारे सोबतच जाडजूड लाकडी फळ्याही लावून मजबूत तटबंदी केली असल्याने तो वाघाच्या येण्याजाण्याचा मार्ग तर आता दृष्टीसही पडत नव्ह्ता.

त्यानंतर बरेच दिवस पुलीमडगु गावात वाघाच्या हल्ल्याची एकही घटना घडली नाही. वाघाची भीती नाहीशी झाल्यामुळे कामानिमित्त गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ वाढली होती. बंद पडलेली गावातील शाळा ही आता पूर्ववत सुरू झाली होती. मात्र आजकाल गावात सशस्त्र नक्षलवादी कमांडर उर्फ “अन्ना”, सर्रास उघडपणे वावरत असल्याची कुजबुजही आसपासच्या गावातील लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत असे.

एकदा सकाळी सहा वाजता बँकेच्या कामानिमित्त प्युन रमेशला सोबत घेऊन उतनूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शामपुर गावात कर्जवसुली संदर्भात एक बड्या कस्टमरला भेटण्यासाठी गेलो होतो. सुदैवाने आदीलाबादला निघालेला तो शामपुरचा कस्टमर त्याच्या घरा समोरच भेटला आणि आम्हाला पाहतांच ताबडतोब घरात जाऊन त्याने आपला कर्ज परतफेडीचा हप्ता सुद्धा आम्हाला आणून दिला.

मी घड्याळात पाहिलं तर त्यावेळी सकाळचे फक्त पावणे सातच वाजले होते. शामपुर गावात आता अन्य कोणतंही काम उरल नव्हतं. इथून पुलीमडगु गाव फक्त पाच किलोमीटर दूर होतं. त्यामुळे त्या गावात जाऊन वेंकन्नाला सहजच भेटून यावं असं ठरवलं.

तेलंगाणा, आंध्र प्रदेश मध्ये मुख्य रस्त्याला जिथे एक किंवा अनेक फाटे फुटतात, त्या ठिकाणाला (मग ती चौफुली असो वा टी पॉईंट), एक्स- रोड (X-Road) असे म्हणतात. पुलीमडगु गावाकडे जाणाऱ्या एक्स-रोड वरील एका छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. हॉटेलातील डुगडुगणाऱ्या बाकड्यावर बसून आम्ही चहा घेत असतानाच रमेशने सहज मागे बघितलं आणि तो एकदम दचकला. माझा हात गच्च दाबून धरत तो हलकेच कुजबुजला..

“साब, पिछे अन्ना लोग बैठे है..! झटसे पलटकर पिछे मत देखो.. उनको डाउट आएगा.. आयडियासे, धीरे धीरे देखो..”utnoor

रमेशने एवढं जतावून सांगितलं तरी “अन्ना” मंडळींना पाहण्याची माझी उत्सुकता एव्हढी जबरदस्त होती की उतावीळपणे झटकन मान मागे वळवून मी त्यांच्याकडे बघितलंच. मागील टेबलावर आर्मी सारख्या हिरव्या रंगाचा, जाड कापडाचा पॅन्ट शर्ट घातलेले अत्यंत बेफिकीर चेहऱ्याचे, रापलेल्या काळ्या रंगाचे दोन तरुण चहा पित पित आपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या डोक्यावर खाणीतील कामगार वापरतात तशी काळपट हिरव्या रंगाची मेटलची गोल कॅप होती. कमरेला कापडी बेल्ट व पायात मिलीटरीचे जाडजूड भक्कम बूट घातलेल्या त्या दोघांनीही भरीव, झुपकेदार मिशा ठेवल्या होत्या.

ते दोघेही गप्पांत एवढे गुंगले होते की त्यांना आसपासचं भानच नव्हतं. अर्थात त्यामुळे त्यांचं अगदी जवळून आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची आयती संधीच मला मिळाली. दोघांच्याही पाठीवर सॅक सारखी थैली बांधलेली असावी, कारण बाहेरून त्या सॅकचे खांद्यावरील पट्टे दिसत होते. त्यांच्या शर्ट पॅन्टला वरपासून खालपर्यंत भरपूर खिसे होते. एका “अन्ना” ने आपली लांब नळीची रायफल बाकड्याला टेकवून उभी केलेली होती तर दुसऱ्याच्या खांद्याला आखूड नळीची ऑटो लोडेड कार्बाईन गन लटकत होती. नंतर रमेशने सांगितले की, त्यांच्या पाठीवरील थैलीत तसेच शर्ट पॅन्टच्या मोठमोठया फुगीर खिशात वॉकी टॉकी, ट्रान्समिटर सेट, काडतुसे, हँड ग्रेनेड्स व डायनामाईटच्या कांड्या ठेवलेल्या असतात.

चहा पिऊन ते दोघे “अन्ना” काउंटरच्या दिशेने गेले. खांद्याला कार्बाईन गन लटकवलेला अन्ना हॉटेल मालकाला चहाचे पैसे देत असतानाच दुसरा अन्ना आपली जड रायफल घेऊन तिथे आला. त्याच्या दुसऱ्या हातात पांढऱ्या कापडाचं एक छोटंसं गाठोडं होतं. गोल आकाराच्या त्या गाठोड्यातून लाल रक्त बाहेर टपकत होतं. हॉटेल मालकानं त्या गाठोड्याकडे पहात विचारलं..

“काय आहे त्याच्यात..?”

डोळे बारीक करून, गंभीर, खुनशी स्वरात तो अन्ना म्हणाला..

“मुंडकं..!”

त्याचं हे उत्तर ऐकून हॉटेलमधील आम्हा सर्वांच्याच अंगावर भीतीने सरकन काटाच आला. तो हॉटेल मालकही घाबरून थोडासा चरकला. कुठून आपण ही नसती चौकधी केली, असं त्याला वाटलं. थरथर कापतंच त्यानं गळ्यात दाटून आलेला आवंढा कसाबसा गिळला. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून एकदम गडगडाटी विकट हास्य करीत तो अन्ना म्हणाला..

“अरे ! ऐसे डरो नहीं..!”

आणि मग ते रक्त टपकणारं गाठोडं उंच करून हॉटेल मालकाच्या डोळ्यांपुढे नाचवीत तो म्हणाला..

“माणसाचं नाही, बकऱ्याचं मुंडकं आहे ह्याच्यात..! काल आमच्या “क्रांती दलम्” चे एरिया कमांडर आले होते पुलीमडगु कॅम्प मध्ये.. त्यांच्यासाठी कापलं होतं हे बकरं..!”

असं म्हणून पुन्हा दणदणीत राक्षसी हास्य करीत हॉटेलच्या बाहेर पडून ते आपल्या मोटर सायकलवर स्वार झाले आणि नागापूर जंगलाच्या दिशेने निघून गेले.

अशारितीने अन्ना लोकांचं पहिलं वहिलं दर्शन मला झालं होतं. रमेशने सांगितलं की, पोलिसां कडून त्वरित ओळखलं जाण्याची भीती असल्याने हे अन्ना लोक असा युनिफॉर्म घालून व शस्त्रं घेऊन कधीही एकट्या दुकट्याने जंगला बाहेर पडत नाहीत. ते नेहमी सामान्य वेशांतच जनतेत वावरतात. कधी कधी नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याची बनावट तक्रार घेऊन ते चक्क पोलीस ठाण्यातही जातात आणि पोलिसांच्या तयारीचा व पुढील हालचालींचा अंदाज घेतात.

काही काळ थांबलेला पुलीमडगु गावातील वाघाचा जीवघेणा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला होता. दोन गावकरी व तीन पोलिसांचे शीर धडावेगळं केलेले क्षतविक्षत देह तेथील जंगलात आढळून आले होते. जनतेच्या वाढत्या आक्रोशामुळे पत्रकारांनी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणी कसून पाठपुरावा केल्याने पोलिसांनी नक्षल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेंकन्ना जरी पोलिसांचा खबऱ्या असला तरी नक्षल्यांनाही तोच आश्रय देतो व पोलिसांबद्दल बित्तंबातमी पुरवून त्यांना मदतही करतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे वेंकन्नाला अटक करून पोलिसांनी त्याची रवानगी लॉकअप मध्ये केली होती.

लवकरच जादा कुमक मागवून पोलिसांनी पुलीमडगु जंगल परिसरात व्यापक सर्च कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं. नक्षलवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त करण्यात आले. त्या दरम्यान झालेल्या चकमकींत काही नक्षली ठार झाले तर बरेचसे पकडलेही गेले. उरलेले नक्षलवादी छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातील दाट जंगलात पळून गेले.

पोलिसांनी वेंकन्नाच्या घराची कसून झडती घेतली तेंव्हा त्याच्या घरात जमिनीखाली पुरलेला दारुगोळा, शस्त्रे, माओवादी क्रांतिकारी साहित्य व छुपा ट्रान्समिटर आढळून आला. अनेक कुख्यात नक्षली कमांडर्स सोबत असलेले त्याचे फोटोही पोलिसांना सापडले. त्यावरून वेंकन्ना हा जुना, प्रशिक्षित व हार्ड कोअर नक्षली असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. मात्र त्यानंतर अल्पावधीतच नक्षलींसाठीच्या सरकारी “आत्मसमर्पण योजने”त सहभागी होऊन धूर्त वेंकन्नाने नाममात्र शिक्षा भोगून आपली सुटका करून घेतली.

पुलीमडगु गावातील काही कस्टमर एकदा उतनूरला बँकेत आले असता त्यांनी सांगितलं की ज्या ज्या पोलिसांना व गावकऱ्यांना वेंकन्ना बद्दल संशय येत असे त्यांना नक्षल्यांच्या मदतीने वेंकन्ना यमसदनाला पाठवीत असे आणि वाघाने ओढून नेले असा कांगावा करीत असे. प्रत्यक्षात वेंकन्ना व्यतिरिक्त अन्य कुणीही त्या वाघाला आपल्या डोळ्यांनी कधी पाहिलं नव्हतं.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्यकुमारला जंगलात फिरण्याचा छंद होता. असंच फिरत असताना एकदा त्याने पुलीमडगुच्या जंगलातील नक्षल्यांचा तळ पहिला आणि त्या तळावर वेंकन्नाला नक्षल्यांशी हास्यविनोद करतानाही पाहिलं. ही गोष्ट त्याने काही गावकऱ्यांच्याही कानावर घातली. वेंकन्नाला हे समजताच आपले बिंग फुटू नये म्हणून नक्षल्यांकरवी बिचाऱ्या सुर्यकुमारचा त्याने हकनाक बळी घेतला.

पुलीमडगुच्या गावकऱ्यांच्या तोंडून हे वास्तव ऐकताच स्वार्थी, दुष्ट वेंकन्ना बद्दल आम्हा सर्वांच्या मनात तीव्र चीड, तिरस्कार व घृणा निर्माण झाली.

त्या गावकऱ्यांनी अशीही माहिती पुरवली की, वेंकन्नाने घरामागील जंगलाकडे जाणाऱ्या वाटेला फळ्या व काटेरी तारांचे जे कुंपण लावले होते तेही प्रत्यक्षात फसवेच होते. सहजपणे हातांनी उचलून तो कुंपणाचा भाग बाजूला ठेवता येत असे. वेंकन्ना रोज रात्री ते कुंपण बाजूला करून नक्षल्यांसाठी जंगलचा रस्ता खुला करून ठेवत असे.

पुलीमडगु भागातील नक्षल्यांचा तात्पुरता बिमोड झाला असला तरी जीवावर उदार झालेले, झुंजार व अतिशय चिवट नक्षली असे सहजासहजी हार मानणारे नव्हते. आत्मसमर्पण केलेल्या वेंकन्नावर तर त्यांचा विशेष राग होता. वेंकन्नाने पोलिसांना पुरवलेल्या अचूक माहितीमुळेच त्या भागातील नक्षल्यांचे मजबूत जाळे पोलीस एवढ्या सहजपणे उध्वस्त करू शकले, असा त्यांचा संशय होता.

“विश्वासघातकी वेंकन्नाला लवकरच गद्दारीची सजा दिली जाईल..” अशा आशयाच्या ठळक लाल अक्षरातील घोषणा लवकरच पुलीमडगुच्या घराघरांवर लिहिलेल्या दिसू लागल्या. नक्षलवादी त्या भागात पुन्हा सक्रिय होऊ लागल्याचीच ती चिन्हे होती.

घाबरलेल्या वेंकन्नाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. वेंकन्नाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुलीमडगु गावात एक पर्मनंट चौकीच स्थापित केली.

एके दिवशी नक्षल्यांनी हँड ग्रेनेड्सचा तुफान मारा करून वेंकन्नाचे घर उध्वस्त करून टाकले. सुदैवाने वेंकन्ना त्यावेळी गावातील पोलीस चौकीतच बसला असल्याने त्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. मात्र आता तो सावध झाला. पुलीमडगु गाव कायमचे सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. गावातील आपली जमीन व राहते घर येईल त्या किमतीला त्याने विकून टाकले. तसंच आमच्या बँकेत येऊन आपल्या बचत खात्यातील सर्व पैसे काढून घेऊन त्याने खाते बंद केले.

“आजच दुपारी पोलीस बंदोबस्तात करीम नगरला कायम वास्तव्यासाठी जाणार आहे..”

असेही आमचा निरोप घेताना तो म्हणाला.

उतनूर-करीमनगर रोड वरील निर्मल- मंचेरियाल बॉर्डर जवळील इंधनपल्ली फाट्यापर्यंत पोलीसांनी वेंकन्नाला आपल्या जीपने सोडले. वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ त्याला घेण्यासाठी इंधनपल्ली पर्यंत आले होते. पोलिसांचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबियांसह वेंकन्ना करीमनगरला जाणाऱ्या बसमध्ये बसला.

त्याच दिवशी संध्याकाळी वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ आक्रोश करीत उतनूर पोलीस स्टेशन मध्ये आली. इंधनपल्लीहून थोडं पुढे जाताच सशस्त्र नक्षलवाद्यांनी बस अडवून वेंकन्नाला जबरदस्तीने खाली उतरवून घेतल्याचे ते सांगत होते. पोलिसांनी ताबडतोब इंधनपल्लीच्या ग्रे-हाउंड (Greyhound) नावाच्या नक्षल विरोधी स्पेशल टास्क फोर्सशी संपर्क साधून त्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली आणि वेंकन्नाचा तांतडीने शोध घेण्यास सांगितले.

त्यानंतर दोन दिवस वेंकन्नाचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

1873124 death

तिसऱ्या दिवशी वेंकन्नाचा छिन्नविच्छिन्न, रक्तबंबाळ, शीर विरहित देह पुलीमडगु गावातील त्याच्या उध्वस्त घरावर फेकून दिलेला आढळून आला..

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-1-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tiger at night

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories-at-Utnoor-1

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (१)*

उतनूरचा अवघा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला होता. उंच सखोल डोंगर दऱ्यांच्या मधून जाणाऱ्या अरुंद, निर्मनुष्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या हिरव्यागार पानांचे विशाल उत्तुंग सागवृक्ष होते.

teak forest

 भर दुपारी या सागवृक्षांच्या गर्द सावल्या रस्त्यावर पडल्या की सूर्य प्रकाश अंधुक होऊन संध्याकाळ झाल्याचा भास होत असे. हिंस्त्र, रानटी पशुंचा या जंगलात मुक्त वावर असल्याने त्यांच्या भयामुळे दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी मंदावत असे. संध्याकाळ नंतर तर कुणीही या रस्त्याने जाण्याचे धाडस करीत नसे.utnoor-8

उतनूरला येऊन मला आता दोन महिने होत आले होते. इथल्या शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणात मी आता चांगलाच रमलो होतो. फक्त दीड ते दोन किलोमीटर लांब रुंद पसरलेल्या त्या छोट्याशा गावाची लोकसंख्या जेमतेम दहा हजार इतकी असावी. तालुक्याचे ठिकाण असल्याने राज्य सरकारच्या सर्व विभागांची कार्यालये तिथे होती. वनक्षेत्र असल्याने फॉरेस्ट खाते तसेच आदिवासी क्षेत्र असल्याने “एकात्मिक आदिवासी विकास संस्था” (Integrated Tribal Development Agency – ITDA) यांची कार्यालयेही त्या गावात होती.

उतनूरच्या ITDA कडे गावातील बराच मोठा भूभाग होता, ज्यावर बोटॅनिकल गार्डन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन व ससे प्रजनन (rabbit breeding) असे विविध प्रकल्प राबविले जात. माझा अडीच वर्षांचा मुलगा चि. अनिशला खेळण्यासाठी पांढऱ्याशुभ्र सशांची दोन गोजिरवाणी पिल्ले येथीलच ससे पालन केंद्रातून मी विकत आणली होती.two white rabbits

मी रहात असलेल्या घराला कंपाऊंड वॉल असली तरी कंपाउंडच्या चारी बाजूला भरपूर मोकळी जागा होती. या जागेत वावरणारे नाग, साप, विंचू असे अनेक विषारी, घातक प्राणी नेहमीच कंपाऊंडच्या गेट मधून आत घुसून अंगणात तसेच दरवाज्या समोरील पायऱ्यांवर निर्धास्तपणे पहुडलेले दिसायचे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे जितके आनंददायी तितकेच धोकादायक सुद्धा आहे याची जाणीव होत होती.

सशाची पिल्ले आणण्यापूर्वी चि. अनिश साठी एक मांजराचं पिल्लूही मी घरी आणलं होतं. शेजारीच राहणाऱ्या माझ्या घरमालकाकडे पूर्वीपासूनच एक धिप्पाड कोंबडी पाळलेली होती. त्याच सुमारास घरमालकाचा मुलगा एकदा जंगलातून मोराचं अंडं घेऊन आला. त्या पाळलेल्या कोंबडीने ते अंडं उबवलं आणि एक देखणं मोराचं पिल्लू त्यातून बाहेर आलं.hen

घराच्या गच्चीवर भलं मोठं पाण्याचं टाकं होतं. वेगवेगळ्या जातीचे मासे, खेकडे, विचित्र दिसणारे बेडूक त्या टाक्यात होते. रस्त्याच्या कडेने जात असलेली कासवाची तीन पिल्लेही एकदा घरमालकाच्या त्या मुलाने उचलून आणून त्या टाकीतील पाण्यात सोडली होती. घराभोवतीच्या अंगणात गोडलिंब, शेवगा, गुलमोहर अशी झाडे तसेच गुलाब, चाफा, केवडा, मोगरा, कर्दळी आणि विविधरंगी आकर्षक रानटी फुलांची झाडे होती. निसर्गातील अवघा फ्लोरा आणि फौना (flora & fauna) जणू आमच्या त्या छोट्याशा जागेत एकवटला होता.

जवळपासच्या शेतांतील गलेलठ्ठ उंदीर रोजच रात्री घराच्या व्हेंटिलेटरच्या खिडकीतून आत घुसून खुडबुड करायचे. त्यांच्या मागोमाग त्यांची शिकार करण्यासाठी साप, नाग व रानमांजरं सुद्धा कंपाऊंड मध्ये शिरायची. एकदा एक दहा फूट लांबीचा जाडजूड काळा कभिन्न नाग घरामागील बाथरूम जवळ दिसून आला. आसपास राहणाऱ्या सर्व लोकांनी आरडाओरडा करीत जमून त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते जनावर खूपच चपळ होते. आम्हा सर्वांचे लाठ्या काठ्यांचे प्रहार चुकवीत क्षणार्धात तो नाग एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विजेच्या वेगाने सळसळत जायचा. कधी चिडून फणा काढून “हिस्स” असा फुत्कार सोडायचा तर कधी एखाद्या फुलांच्या कुंडीमागे बेमालूमपणे असा निपचित पडून राहायचा की जणू तो हवेतच विरून अदृश्यच झाला असावा असा भास व्हायचा. अखेरीस सगळ्यांना गुंगारा देऊन तो भुजंग अंगणातच कुठेतरी काट्याकुट्यात जो दडून बसला तो शेवटपर्यंत कुणालाच सापडला नाही.

माझा एलटीसी (Leave Travel Concession) चा ब्लॉक 15 डिसेंम्बरला expire होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात फिरून येण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच सुमारास माझे आई, वडील, भाऊ व वहिनी आपल्या मुलांसह मला भेटण्यासाठी उतनूरला आले होते. तेंव्हा त्यांनाही सोबत घेऊनच ही दक्षिण भारताची सहल करावी असे ठरवले. त्यानुसार प्रवासासाठी गावातीलच एक टेम्पो ट्रॅक्स गाडी ठरवली आणि येत्या रविवारी दुपारी बारा वाजता उतनूर हून निघून संध्याकाळ पर्यंत हैदराबादला पोहोचायचे असा प्लॅन केला.

ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारचे बारा वाजण्यापूर्वीच जेवणं खाणं आटोपून आम्ही सारे गाडीची वाट पहात बसलो. मात्र, सकाळी सर्व्हिसिंग साठी आदीलाबादला गेलेली गाडी संध्याकाळ झाली तरी उतनूरला परत आली नव्हती. शेवटी वाट पाहून कंटाळून आम्ही रात्रीची जेवणंही उरकून घेतली. रात्री आठ वाजता गाडी गावात परतली. गाडीच्या मागच्या दरवाजाचे काम अजूनही अर्धवटच राहीले असल्याने तो उघडाच ठेवावा लागत होता. त्यामुळे सोमवारी पुन्हा आदीलाबादला जाऊन दरवाजाचे हे काम पूर्ण करावे आणि मंगळवारी प्रवासाला निघावे किंवा आजच लगेच हैदराबादला निघावे आणि दरवाजाचे राहिलेले काम उद्या म्हणजे सोमवारी हैदराबाद इथेच करून घ्यावे असे दोन पर्याय ड्रायव्हर कृष्णाने आमच्यापुढे ठेवले.

आधीच मोठ्या मुश्किलीने मला आठ दिवसांची सुट्टी मंजूर झाली होती. त्यामुळे इथे थांबून दिवस वाया घालवण्यापेक्षा आत्ता लगेच निघून उद्या सकाळपर्यंत हैद्राबादला पोहोचावे असा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता आम्ही गावातून निघालो. मी समोरच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. गावापासून जेमतेम दोन किलोमीटर दूर गेल्यावर लगेच तुरळक जंगलाला सुरवात झाली. छान टिपूर चांदणं पडलं होतं. त्याच्या चंदेरी प्रकाशात रस्ता उजळून निघाला होता. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली होती. नोव्हेंबर महिना असला तरी थंडीला अजून सुरवात झालेली नव्हती. बाहेरील वातावरण उबदार आणि अत्यंत सुखद होतं. लहान मुलांची बडबड आणि आमच्या आपसातील गप्पा ह्याच्या नादात आम्ही दाट किर्र, निबिड भयाण जंगलात कधी प्रवेश केला ते ध्यानातही आलं नाही.

जंगलातील त्या सुनसान रस्त्यावरून आमची गाडी सुसाट वेगाने पळत होती. गाडीचा मागील दरवाजा उघडाच असल्याने त्यातून अधून मधून वारा आत घुसत असे. बाहेर एवढा मिट्ट काळोख होता की गाडीच्या लांबवर जाणाऱ्या प्रकाश झोतात दिसणारा निर्मनुष्य रस्ता सोडला तर आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. आपण एखाद्या अतिखोल, अंधाऱ्या विवरातून किंवा कधीही न संपणाऱ्या एकाकी,भीषण काळोख्या बोगद्यातूनच प्रवास करीत आहोत असा भास होत होता. बाहेर सर्वत्रच अस्वस्थ, भयावह आणि गूढ शांतता पसरली होती. मुलांची बडबड आणि आमच्या गप्पा आता आपोआपच थांबल्या होत्या. फक्त चालत्या गाडीच्या इंजिनाचा आवाजच त्या भयाण शांततेचा भंग करीत होता.forest

आमच्या गाडीचा ड्रायव्हर कृष्णा हा अंदाजे पंचवीस वर्षे वयाचा हसमुख, उमदा तरुण होता. आतापर्यंत तो ही आमच्या गप्पांत अधून मधून भाग घेत होता, प्रवासातील मनोरंजक अनुभव, किस्से आम्हाला सांगत होता. मात्र हे घोर घनदाट जंगल सुरू होताच तोही निःशब्द होऊन अतिशय सावध नजरेने अवतीभवती पहात काळजीपूर्वक गाडी पुढे नेत होता. एखादा धांदरट, घाबरट ससा मधेच टुणकन उडी मारून रस्ता ओलांडून जायचा तर कधी एखादा बुटकासा कोल्हा तिरप्या मानेने गाडीकडे पहात पहात चपळाईने रस्ता क्रॉस करून पलीकडच्या झाडीत अदृश्य व्हायचा. कितीतरी छोटे मोठे साप नागमोडी वळणं घेत लगबगीने वळवळत गाडीच्या चाकांना चुकवत बाजूच्या काळोखात गडप व्हायचे तर माकडे, हरीण, मोर यासारखे प्राणी रस्त्याच्या कडेला थांबून आमची गाडी निघून जायची वाट पहात असलेले दिसायचे.

रस्ता जसा जसा जास्त दाट अरण्यातून जात होता तशी तशी रातकिड्यांची किरकिर वाढलेली जाणवत होती. दूर जंगलातून रानटी कुत्रे, लांडगे, तरस यांच्या टोळ्यांचे भेसूर आवाजातील हेल काढून एकसुरात सामूहिक रडणे, ओरडणे ऐकू येत होते. उंच झाडाच्या फांदीवर बसलेला एखादा टिटवी सारखा पक्षी साऱ्या आसमंतात घुमणारी कर्णकटु सांकेतिक शीळ घालायचा तेंव्हा तो कुणाला तरी इशारा करतोय किंवा आम्हाला सावध तरी करतोय असं वाटायचं. अचानक मधूनच अनोळख्या जंगली श्वापदाचा जीवघेणा आर्त चित्कार कानावर पडायचा आणि काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आपण विनाकारणच जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी अशा सुनसान भीतीदायक जंगलातून प्रवास करण्याचा मूर्खपणाचा निर्णय का घेतला याचा आम्हा सर्वांनाच आता मनोमन पश्चाताप होत होता.

आमच्या डोळ्यांतील झोप तर पार उडाली होती. मुलंही कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यानं समोरच्या डांबरी रस्त्यावर नजर खिळवून भयमिश्रित कुतूहलाने श्वास रोखून बसली होती. काहीतरी आगळं वेगळं, अप्रत्याशित, अकल्पित घडणार आहे किंवा पहायला तरी मिळणार आहे अशी अंतर्मन सतत सूचना देत होतं. आम्ही जिथून जात होतो तो अवघा परिसरच मंतरलेला, जादूने भारलेला, फसवा, मायावी वाटत होता..

अचानक अनुभवी कृष्णाच्या सावध नजरेनं दूर अंतरावरील सागवृक्षांच्या विशाल पानांमागची कसली तरी हालचाल टिपली. गाडीचा वेग कमी करत त्यानं रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली. रस्त्यावर कुणीच नव्हतं. मी कृष्णाला काही विचारणार इतक्यात त्यानं तोंडावर बोट ठेवीत मला शांत राहण्याची खूण केली. त्यानंतर तब्बल तीन चार मिनिटं आम्ही सारे तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता, कसलीही हालचाल न करता रिकाम्या रस्त्याकडे पहात तसेच आपल्या जागी बसून होतो. डोळे फाडफाडून बघितलं तरी आम्हाला कुठेही काहीच दिसत नव्हतं. कृष्णाची नजर मात्र उजव्या बाजूच्या खोलगट जंगलाकडेच रोखलेली होती. अशीच आणखी दोन तीन मिनिटं स्तब्धतेत गेली. माझा संयम आता सुटू लागला होता..

“आपण कशासाठी थांबलो आहोत इथं..?”

अखेर न राहवून मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या वहिनींनी अस्पष्ट, कुजबुजत्या हलक्या सुरात विचारलंच..

कृष्णानं मागे वळून दोन्ही हात जोडून त्यांना “अजिबात बोलू नका.. शांत राहून पुढे पहात रहा..” अशी बोटानंच खूण केली. तोच..

बाजूच्या खोलगट भागातून दमदार मंदगती पावले टाकीत एक रुबाबदार, अंगावर काळे पिवळे पट्टे असलेला, धष्टपुष्ट वाघ हळूहळू प्रगट झाला. आमच्या गाडीकडे नजर रोखून डौलदार चालीत आपलं एक एक ठाम पाऊल अगदी सावकाशपणे उचलीत अंदाजे आठ ते नऊ फूट लांबीचं ते राजबिंडं जनावर रस्त्याच्या मध्यभागी येऊन आमच्याकडे एकटक पहात स्तब्ध उभं राहिलं. त्याचा पिंगट, तांबूस, तपकिरी पिवळा रंग गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रकाशात सोन्यासारखा चमचमत होता. त्यावरील दाट काळ्या रंगाचे तिरपे उभे पट्टे तर अतिशयच खुलून दिसत होते. शौर्य आणि सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला तो जंगलचा अनभिषिक्त राजा एखाद्या अप्रतिम अलौकिक शिल्पासारखा आमच्या पुढे उभा होता. अनिमिष नेत्रांनी, अवाक् होऊन आम्ही सारे ते दृश्य पहात होतो. ब्युटी क्वीन काँटेस्ट मधील सौंदर्यवती तरुणी रॅम्प वॉक करताना थोडंसं चालून क्षणभर थांबते आणि मग वळून परत फिरण्याआधी कमरेवर हात ठेवून एक पोझ देते ना, अगदी तस्साच तो वाघ आम्हाला पोझ देतो आहे असंही क्षणभर वाटून गेलं.tiger at night

तो धिप्पाड देखणा वाघ गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रखर प्रकाश झोतासमोर सिनेमातील एखाद्या हिरो सारखा स्टायलिशपणे आम्हाला आव्हान देत उभा होता. अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांवर एवढा सर्च लाईट सारखा पॉवरफुल प्रकाश पडूनही त्याचे डोळे दिपून गेल्याचे अजिबात जाणवत नव्हते.tiger staring

त्यावरून त्याला अशा प्रकाशाची सवय असावी असे वाटत होते. अद्यापही तो डोळे मोठे करून आमच्या गाडीकडेच निरखून पहात होता. मनात विचार आला.. त्या वाघाला गाडीत बसलेले आम्ही सारे दिसत असू का ?

त्या वाघाच्या अशा अचानक रस्त्यावर येण्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातही एक अनोखा बदल घडून आल्याचा भास होत होता. पक्ष्यांचा कलकलाट, किलबिलाट, प्राण्यांचे हुंकार, चित्कार अचानक थांबले होते. रातकिड्यांची किरकिरही आता ऐकू येत नव्हती. एवढंच काय, सळसळत वाहणारा रानवारा देखील अगदी स्तब्ध, थंड झाला होता. जणू जंगलातील सारे प्राणी, पक्षी, कीटक, जंतू, वृक्ष, वनस्पती आणि वारा देखील श्वास रोखून आता पुढे काय होतंय याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत असं वाटत होतं.

आम्हा सर्वांचे डोळे त्या व्याघ्रराजा वर घट्ट खिळले असले तरी ड्रायव्हर कृष्णाची सावध नजर मात्र अवती भवतीचा कानोसा घेत होती. कुणाला नकळत माझ्या हाताला हलकासा चिमटा घेऊन त्यानं मला त्याच्या जवळ सरकण्याची खूण केली. त्यानुसार मी त्याच्या जवळ सरकल्यावर तो माझ्या कानात कुजबुजत म्हणाला..

“किसीं को समझे बगैर, आपकी बाजूवाले साईड मिरर में झांक के, रस्तेके पीछे की ओर देखो.. और प्ली sss ज, मुंह बिल्कुल बंद रख्खो.. किसी को कुछ भी पता न चले..”

डाव्या बाजूला सरकून मी साईड मिरर मध्ये डोकावलं. तिथे मला काहीतरी हालचाल दिसली. दोन तीन लहान मोठ्या आकृत्या रस्त्यावर बसल्या सारखं दिसत होतं. ते नेमकं काय आहे याची नीट, स्पष्ट कल्पना न आल्यामुळे अभावितपणे मी चक्क मान मागे वळवून गाडीच्या मागील बाजूच्या रस्त्याकडे बघितलं. गाडीचा मागचा नादुरुस्त दरवाजा तसाच सताड उघडा होता. त्यावेळी तिथे मला जे दृश्य दिसलं ते पाहून भीतीने माझी बोबडीच वळली.

आमच्या गाडीच्या मागे जेमतेम पंचवीस तीस फुटांवर एक अजस्त्र आकाराची वाघीण आपल्या दोन लहान बछड्यांसहित आरामात रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसली होती. एवढंच नाही तर त्या वाघिणीच्या मागील बाजूने आणखी दोन मध्यम आकाराचे तरुण वाघ खालच्या खोलगट जंगलातून रस्त्याच्या दिशेने येत होते. जणू त्या वाघाच्या संपूर्ण फॅमिलीनेच आम्हाला पूर्णपणे घेरून टाकलं होतं.

बापरे ! गाडीच्या मागच्या भागात बायका आणि लहान मुलं बसलेली आहेत आणि दुर्दैवाने गाडीचा मागील दरवाजा बिघडला असल्याने बंद करता येत नाहीए.. चुकून आमच्यापैकी कुणी मागे पाहिलं आणि हे दृश्य पाहून त्यांनी आरडा ओरडा केला तर ? ही क्रूर, चपळ श्वापदं आमच्या गोंगाटानं जर बिथरली तर केवळ एका झेपेतच ती आमच्या पर्यंत पोहोचू शकतील या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

सुदैवाने मी व ड्रायव्हर कृष्णा वगळता गाडीतील अन्य सर्वजण समोर दिसणाऱ्या त्या दिव्य व्याघ्रमूर्ती कडे एकटक पाहण्यात एवढे गुंग होऊन गेले होते की आणखी कुठेही पाहण्याचे त्यांना भानच नव्हते. माझी घाबरलेली अवस्था कृष्णाने ओळखली. अर्थात आंतून तोही माझ्या इतकाच घाबरलेला असावा. तरीही मला धीर देत हलकेच कुजबुजत तो म्हणाला..

“सब्र रखो साब..! सिर्फ शांति बनाए रखो.. सब ठीक हो जाएगा..!”

एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेले गाडीतील आम्ही आणि तो वाघ.. जणू परस्परांना जोखत होतो, दुसऱ्याच्या शक्तीचा, संयमाचा, पुढील हालचालीचा अंदाज घेत होतो. पलीकडून, वाट अडवून उभा असलेल्या त्या वाघाच्या मागून, विरुद्ध दिशेने एखादी गाडी यावी आणि आमची या डेड लॉक मधून सुटका व्हावी असाच मनोमन देवाचा धावा करीत होतो. जसाजसा वेळ निघत चालला होता तसातसा माझा धीरही सुटत चालला होता. गाडीच्या मागे जमा झालेलं वाघाचं ते आख्खं कुटुंब आत्ता नेमकं काय करतं आहे हे पाहण्याचं तर किंचितही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. भीतीनं व्याकुळ होऊन गाडी तशीच पुढे दामटण्याची ड्रायव्हर कृष्णाला मी कासावीस नजरेनंच विनंती केली. मात्र कृष्णा कडे जबरदस्त संयम होता. कदाचित यापूर्वीही अशा प्रसंगांतून तो गेलेला असावा. “धीर धरा.. शांत रहा.. मी आहे ना..” अशी त्याने डोळे व हातांनी मला खूण केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडीतील स्त्रिया आणि मुलं यांनी देखील आतापर्यंत जे सावध, घट्ट मौन धारण केलं होतं ते सुद्धा खरोखरीच कौतुकास्पदच होतं.

आमच्या सुदैवाने वाघालाच आता या स्टेलमेटचा कंटाळा आला असावा. पुढील पाय लांबवून कंबर झुकवून शरीराला आळोखे पिळोखे देत त्याने एक दीर्घ आळस दिला. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव बदलून त्याजागी दुष्ट, क्रूर, हिंस्त्र, शिकारी भाव दिसू लागले. थोडं पुढे सरकून तो रस्त्याच्या कडेला गेला आणि अचानक त्यानं आपला रोख गाडीच्या दिशेनं केला. तो आता आमच्यावर हल्ला करण्याच्याच तयारीत आहे अशी माझी जवळ जवळ खात्रीच झाली. त्याचवेळी जवळच्या झाडावरील माकडांनी अचानक भयसूचक गोंगाट करायला सुरुवात केली. कुण्या अनोळखी पक्ष्याची भयावह, थरकांप उडवणारी किंकाळी सदृश कर्णभेदक तान लकेर एकाएकी आसमंतात घुमली. अचानक माजलेल्या या कोलाहलामुळे त्या वाघाचे लक्ष जरासे विचलित झाले. हाच इशारा, हीच योग्य वेळ समजून अगदी त्याचवेळी कृष्णाने एक्सलरेटर दाबून भरधाव वेगानं गाडी पुढे काढली.

त्यानंतर सतत तासभर, एखादं भूत पाठीमागे लागल्यागत, जराही मागे वळून न पाहता, वारं प्यालेल्या वासरा सारखा कृष्णा गाडी पुढे पुढे दामटीत होता. नंतर जाणवलं की नोव्हेंबरच्या त्या थंडीतही गाडीतील आम्ही सारे जण भीतीने घामाघूम झालो होतो. अतिनिकट, खुल्या व्याघ्रदर्शनाच्या त्या विलक्षण रोमांचक, जिवंत अनुभवामुळे एखादं दुष्ट स्वप्न पाहिल्यागत आम्ही सारे इतके भयचकित, मुग्ध, अबोल बनलो होतो की त्या घटनेबद्दल साधी चर्चा करण्याइतकी हिम्मत देखील आम्हा कुणामध्येच उरली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी हैद्राबादला पोहोचल्यावर सर्वप्रथम गाडीचा मागील दरवाजा तातडीने रिपेअर करून घेतला.

श्रीशैल्यम्, तिरुपती, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम्, उटी, म्हैसूर, बेंगलोर, हैद्राबाद अशी आठ दहा दिवसांची दक्षिण भारत सहल आटोपून उतनूरला परतलो. नंतर सहज एकदा आमचा बँकेतील अष्टपैलू व हरहुन्नरी प्युन रमेशला उतनूरच्या जंगलातील व्याघ्र दर्शनाबद्दल सांगितलं तेंव्हा तो म्हणाला..

“यहाँ जंगलमें रात के समय शेर का दिख जाना तो आम बात है। लेकिन यहां एक गांव ऐसा भी है जहाँ शेर दिनदहाड़े गांव में घुस जाता है। हमारे कुछ पुराने कर्जदार उस गांव में रहते है। चलो, कल हम आप को उस गांव में ले चलते है..! और.. सच कहूं तो साब, आपने अब तक “असली शेर” तो देखा ही नही है.. !!”

“असली शेर ? मैं कुछ समझा नही..?”

बुचकळ्यात पडून मी विचारलं..

त्यावर गूढ हसत रमेश म्हणाला..

“असली शेर याने “अन्ना..” ! वो खूंखार नक्सलाईट लोग, जिनका सिर्फ नाम सुनते ही इस पूरे एरिया के लोगोंको सांप सूंघ जाता है.. उन से भी मुलाकात होगी आपकी कभी ना कभी.. लेकिन फिलहाल.. याने की कल.. हम चलेंगे शेरों के गांव.. पुलीमडगु.. !!”

(क्रमशः 2)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-19 LAST episode शेवटचे प्रकरण

salute

अनेक वळणांनी जाणाऱ्या  उत्कंठावर्धक कथेचा हा अंतिम भाग- श्री अजय कोटणीस यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केलेला.. ………………………………………….

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. या लेखमालेतील हे शेवटचे प्रकरण आज येथे , या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत 

Mind blowing experiences of a Banker-19 

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(अंतिम भाग : 19)

रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची माझी मागणी न्यायाधीशांनी सपशेल फेटाळून लावल्यामुळे मी अंतर्यामी खूप निराश झालो. खरं म्हणजे या नवीन आलेल्या न्यायाधीशांकडे उतावीळपणे लगेच अशी मागणी करून मी तशी चूकच केली होती. पण आता त्याला इलाज नव्हता.

मात्र त्यानंतर लवकरच या नवीन न्यायाधीशांनाही आमच्या केसची सत्य परिस्थिती कोर्टातील अन्य न्यायाधिश तसेच वकिलांकडून समजली आणि त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला. आता त्यांनीही सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांची सक्त झाडाझडती घ्यायला सुरुवात केली.

“कशाच्या आधारे बँक कर्मचाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार समजून तुम्ही पोलिसांत तक्रार केली ?” या न्यायमूर्तींनी विचारलेल्या थेट प्रश्नाचे उत्तर फिर्यादी सौ. रत्नमाला बोडखे यांच्याकडे नव्हते. त्या निरुत्तर होऊन तशाच मख्खपणे उभ्या राहिल्या. न्यायाधीशांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर “मला यातले काहीही ठाऊक नसून माझे पती सुखदेव यांनी जिथे जिथे सांगितले तिथे तिथे मी सह्या केल्या..” असे सांगून त्या गप्प बसल्या.woman in witness box

साहजिकच न्यायाधीशांनी नंतर सुखदेवला हाच प्रश्न विचारला. त्यावर सुखदेवने संतप्त होऊन न्यायाधीशांनाच अद्वातद्वा बोलणे सुरू केले.

“आरोपींना तसंच मोकळं सोडून तुम्ही फिर्यादीलाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुमची वागणूक अत्यंत पक्षपातपूर्ण आहे. आम्हाला बँक कर्मचाऱ्यांचा संशय आला म्हणूनच त्यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. मी एका वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून मागासवर्गीय आहे. तुम्ही मला किंवा माझ्या कुटुंबियांना असे नसते गैरवाजवी प्रश्न विचारून विनाकारण त्रास दिलात तर मी खुद्द तुमच्या विरुद्धही विविध कायद्यां अंतर्गत पोलिसांत तक्रार करायला मागेपुढे पाहणार नाही..”

सुखदेवचा मानसिक तोल आता पुरता ढळल्यासारखे दिसत होते. तो वाट्टेल ते बरळत होता. मात्र हे नवीन न्यायाधीशही चांगलेच खमके होते. सुखदेवच्या धमक्यांनी जराही दबून न जाता ते म्हणाले..

“खुशाल पाहिजे तिथे तक्रार करा. मी ही मागासवर्गीयच आहे. असल्या पोकळ धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. उलट, खोटी तक्रार करून पोलिसांचा व न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याबद्दल मीच तुमच्याविरुद्ध कठोर action घेऊ शकतो. आसनस्थ न्यायाधीशांना धमक्या देऊन न्यायालयाची बे-अदबी केल्याबद्दल तुम्हाला ताबडतोब अटक करण्याचा याक्षणीच मी आदेशही देऊ शकतो..”

न्यायमूर्तींचा हा रौद्र अवतार बघून सुखदेवचे वकील भयभीत झाले. सुखदेवच्या वतीने त्यांनी न्यायाधीशांची परोपरीने क्षमा मागितली. सुखदेवही आता भानावर आला होता. न्यायाधीशांना दुखावून आपण भली मोठी घोडचूक करून ठेवली आहे याची त्याला जाणीव झाली. सारवासावर करत तो म्हणाला..

“प्रकृती अस्वास्थ्य, कौटुंबिक कलह आणि आर्थिक विवंचना यामुळे आलेल्या अतीव निराशेमुळे गेले काही दिवस माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. आणि त्यामुळेच आपल्याशी दुर्वर्तन करण्याचा घोर अपराध मघाशी माझ्या हातून घडला आहे. माझ्या ह्या उद्दाम, अरेरावीच्या वर्तना बद्दल मी लज्जित असून आपली क्षमा याचना करीत आहे. आपण उदार अंतःकरणाने मला माफ करावे..”court scene

सुखदेव कसलेला अभिनेता तर होताच. पश्चाताप झाल्याचे ढोंग त्याने उत्तम वठवले. न्यायाधीशांवर त्याच्या या माफी मागण्याच्या वरवरच्या नाटकाचा कितपत परिणाम झाला हे जरी समजू शकले नाही तरी त्यांनी आपल्या बेअदबीचा मुद्दा जास्त ताणून धरला नाही.

परिस्थिती पाहून त्यावेळी सुखदेवने न्यायाधीशांसमोर नमतं घेतलं असलं तरी त्याचा दिर्घद्वेषी, शीघ्रकोपी, खुनशी स्वभाव मध्येच उफाळून येत असे. अशावेळी न्यायाधीशांशी त्याची अनेकदा शाब्दिक खडाजंगी होत असे. एकदा चिडून न्यायाधीश त्याला म्हणाले की

“तुम्ही कसंही वागलात तरी आम्ही काहीच करू शकत नाही असं समजू नका. तुमच्या कार्यालयाला सांगून त्यांच्यातर्फे आम्ही तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो..”

त्यावर निर्लज्जपणे हसत सुखदेव म्हणाला..

“मी केंव्हाच नोकरीतून ऐच्छिक निवृत्ती (VRS) घेतली असून आता तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही..”

तब्बल आठ वर्षे न्यायालयात हा खटला चालू होता. या दरम्यान केसशी संबंधित आम्हा सर्वांच्या आयुष्यात अनेक बऱ्यावाईट घटना घडून आल्या.

वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार रितसरपणे नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुणं सोडून मी औरंगाबादलाच कायमचा स्थायिक झालो. वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याची एक मोठी शस्त्रक्रिया वगळता माझी प्रकृती तशी ठीकठाकच होती. अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब आणि गुडघेदुखी या सारख्या कायमस्वरूपी साथीदारांना काळजीपूर्वक सांभाळत मी आपलं “हॅपी अँड हेल्दी (?) रिटायर्ड लाईफ” जमेल तसं एन्जॉय करीत होतो.

रवीशंकरच्या आईचे पूर्वीच कॅन्सरने निधन झाले होते. त्या पाठोपाठ त्याच्या सुस्वभावी, प्रेमळ पत्नीचेही ऐन तरुण वयात हार्ट अटॅकने दुःखद निधन झाले. त्याची दोन गोंडस लहान मुले आईविना पोरकी झाली. त्यांची केविलवाणी अवस्था बघून रविशंकर अक्षरशः सैरभैर झाला होता. या केसमुळे आपण महाराष्ट्रात अडकून पडलो.. शक्य असूनही आपल्याला बिहारमधील आपल्या गावी बदली करून घेता असली नाही.. तसंच केसच्या तणावामुळेच आपल्या पत्नीचे हृदय कमजोर बनले व आपणच तिच्या अकाली मृत्यूला जबाबदार आहोत अशी खंत तो वारंवार बोलून दाखवीत असे.

रहीम चाचांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या रकमेचा बराच मोठा हिस्सा जास्त परताव्याचा आशेने एका बोगस चिट फंडात गुंतवला होता. एक दिवस तो चिट फंड बुडाला आणि रहीम चाचा आपली जन्मभराची पुंजी त्यात गमावून बसले. प्राप्त निवृत्ती फंडापैकी उरली सुरली रक्कम त्यांनी एका जवळच्या गरजू नातेवाईकाला अल्पकाळासाठी उसनी म्हणून दिली होती. मात्र त्या नातेवाईकानेही तोंडाला पाने पुसल्यामुळे रहीम चाचांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. म्हातारपणाचा एकमेव आधार असलेली पैशांची उबच नाहीशी झाल्यामुळे आता कुटुंबाचे पालनपोषण आणि गलितगात्र वार्धक्यरुपी कडाक्याच्या थंडीचा मुकाबला कसा करायचा ही चिंता त्यांना रात्रंदिवस सतावत होती. अंधःकारमय भविष्यकाळाबद्दलची एक अनामिक भीती त्यांच्या भकास डोळ्यांतील भयाण नजरेत सदैव जाणवत असायची.

दिल्लीला एकत्र कुटुंबात राहणारी सैनीची पत्नी सासरच्यांच्या रोजच्या भांडणांना कंटाळून मुलाबाळांसह हरियाणातील आपल्या माहेरी निघून गेली होती. तिची समजूत घालण्यासाठी बिचारा सैनी निलंग्याहून दिल्ली, हरियाणा अशा सतत चकरा मारून बेजार झाला होता. कधी एकदा ही केस संपते आणि आपण हरियाणातील आपल्या गावाकडे आपली बदली करून घेऊन आपल्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट, सुरळीत बसवतो असं त्याला झालं होतं.

सुखदेवच्या वाया गेलेल्या आवारा मुलानं आपल्या शौकाखातर एक सेकंड हँड कार घेतली होती. दुर्दैवाने त्याच्या हातून त्या कारचा अपघात झाला आणि त्यात जखमी झालेल्या व्यक्तींना भली मोठी नुकसान भरपाई देणे सुखदेवला भाग पडले. माजी स्वातंत्र्य सैनिक असलेले सुखदेवचे म्हातारे वडीलही या दरम्यान वार्धक्यामुळे निधन पावले होते. काही अज्ञात, आकस्मिक कारणामुळे सुखदेवने आपली गावातील दोन एकर जमीन तसंच घरातील बरंचसं सोनं नाणं विकल्याचंही ऐकिवात होतं.

रुपेशचे आई वडील दुर्धर आजारामुळे दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळून बसले होते. त्याचा एकुलता एक मुलगाही खूपच अशक्त, किरकिरा आणि मंदबुद्धी निघाला होता. मुलाचा सांभाळ, सासू सासऱ्यांची सेवा, पाळलेल्या जनावरांची देखभाल, शेतीची कामं.. हे सारं करून करून रूपेशची सहनशील पत्नी कंटाळली होती. शेवटी वैतागून एके दिवशी मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली, ती पुन्हा न येण्यासाठीच. तसंही रुपेश जेलमध्ये गेल्यापासून त्याच्या कुटुंबाला साऱ्या गावानं जवळ जवळ वाळीतच टाकलं होतं.

कोर्टात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले सर्व फौजदारी खटले त्वरित निकाली काढावेत असा हायकोर्टाचा आदेश निघाल्यामुळे आमच्या केसचा निकाल आता लवकरच लागेल अशी चिन्हे दिसत होती.

आमच्या केसमधील सर्व साक्षी पुरावे संपल्यामुळे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला अंतिम युक्तिवाद (final argument) सादर करावा अशी न्यायाधीशांनी सूचना केली.

फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या हतोत्साही (half hearted) फायनल ऑर्ग्युमेंट मध्ये काहीच दम नव्हता. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींना योग्य ती शिक्षा व्हावी अशी गुळमुळीत मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती.

आमचे वकील ॲड. मनोहर यांनी आपल्या अंतिम युक्तिवादांत, हा संपूर्ण खटलाच बनावट असल्याचे सांगून पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात दाखवलेली बेपर्वाई, मुख्य आरोपी जयदेव खडकेला पकडण्यात त्यांना आलेले अपयश, गुन्ह्यात सहभागी असलेल्या रुपेश सारख्या गुन्हेगाराला संरक्षण देण्याच्या पोलिसांचा प्रयत्न, फिर्यादी सुखदेवच्या कुटुंबियांची संशयास्पद वर्तणूक आणि आरोपी बँक कर्मचाऱ्यांचे स्वच्छ चारित्र्य ह्या सर्व बाबी उत्तमरीत्या अधोरेखित करून केवळ व्यक्तिगत आकसापोटीच फिर्यादीने हा खटला दाखल केला असल्याचे कोर्टात प्रभावीपणे प्रतिपादन केले.

तत्पूर्वी न्यायमूर्तींनी “आरोपींपैकी कुणाला आपल्या बचावार्थ काही सांगायचे आहे काय ?” असे विचारले असता मी म्हणालो..

“आरोपींचा गुन्ह्यामागील हेतू (motive), गुन्हेगारांचा पूर्वेतिहास (track record), प्रथमदर्शनी पुरावा (primafacie evidence) व परिस्थितीजन्य पुरावा (circumstancial evidence) यापैकी कोणतीही गोष्ट आमच्याविरुद्ध सिद्ध करण्यात पोलिसांना घोर अपयश आलेले आहे. हा संपूर्ण खटलाच धादांत खोटा आहे याबद्दल कुणाच्याही.. अगदी पोलिसांच्याही, मनात तिळमात्र शंका नाही. आदरणीय न्यायमूर्ती या खटल्याचा काय निकाल देतील हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. मात्र माझी त्यांना अशी नम्र विनंती आहे की जर या खटल्यातून आमची निर्दोष मुक्तता करण्याचे न्यायमूर्तींनी ठरविले तर कृपया निकाल देताना “सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता” असे न म्हणता “पूर्णपणे निर्दोष असल्याने सन्मानपूर्वक मुक्तता” अशा शब्दांचा आवर्जून उपयोग करावा.”

माझी ही विनंती ऐकल्यावर न्यायमूर्तींनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

पुढील सोमवारी खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल असे घोषित करून न्यायमूर्तीनी कोर्टाचे कामकाज तहकूब केले आणि आम्ही सारे आपापल्या गावी परतलो.

त्यानंतर जेमतेम दोनच दिवस उलटले असता सुखदेवच्या वकिलांनी आम्हा चौघा आरोपींशी फोनवरून संपर्क साधून “सोमवारच्या निकालात न्यायमूर्ती तुम्हाला शिक्षा ठोठावणार असून तत्पूर्वीच आम्हाला प्रत्येकी फक्त वीस हजार रुपये दिल्यास आम्ही तडजोड करून आत्ताच खटला मागे घेण्यास तयार आहोत..” असा निरोप दिला. आश्चर्य म्हणजे त्या पाठोपाठ रुपेशच्या वकिलांनीही आमच्याशी संपर्क साधून अगदी तसाच निरोप दिला. फरक एवढाच की रुपेशचे वकील प्रत्येकी फक्त दहा हजार रुपये घेऊन तडजोड करण्यास तयार होते.

अत्यंत घाबरट आणि उतावळ्या स्वभावाच्या रहीम चाचांनी तर लगेच हुरळून जाऊन खटल्यातून मुक्तता होण्याच्या आशेने त्यांना पैसे देण्याचे आनंदाने कबूलही केले. मात्र माझ्याशी संपर्क करून जेंव्हा त्यांनी विरोधी पक्षाच्या वकिलांना पैसे देण्याचा आपला निर्णय सांगितला तेंव्हा महत्प्रयासाने मी त्यांची समजूत काढली आणि त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त केले.

होता होता पुढील सोमवार उजाडला. आज आमच्या केसचा निर्णय होणार होता. ठीक अकरा वाजता न्यायमूर्ती आपल्या डायसवर येऊन बसले आणि त्यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण निकालात जागोजागी न्यायमूर्तींनी पोलिसांच्या सदोष तपासावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. रुपेश जगधनेच्या तपासात जाणूनबुजून ढिलाई करून त्याला मदत केल्याबद्दल संबंधित जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी जाब विचारून त्यांच्याविरुद्ध उचित ती कार्यवाही करावी अशी देखील न्यायमूर्तींनी सूचना केली. वैयक्तिक आकस किंवा धमकी देऊन पैसे उकळणे अशा हेतूनेच बोडखे कुटुंबीयांनी बँक कर्मचाऱ्यांवर हा खटला दाखल केल्याचे दिसते असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी नोंदविले. सरतेशेवटी न्यायमूर्ती म्हणाले..

*”अभियोक्ता पक्ष (वादी), विरोधी (प्रतिवादी) पक्षा वरील आरोप सिद्ध करण्यात संपूर्णतः अयशस्वी ठरल्यामुळे आरोपी रुपेश जगधने व तथाकथित आरोपी जयदेव खडके वगळता अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ही मुक्तता सन्माननीय मुक्तता (honourable acquital) असून या मुक्ततेविरुद्ध उच्च न्यायालयाच्या विशेष परवानगी शिवाय फिर्यादी पक्षाला वरच्या कोर्टात अपील करता येणार नाही. रुपेश जगधनेचीही सबळ व पुरेशा पुराव्या अभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच फरारी आरोपी जयदेव खडके याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्याचेही पोलिसांना निर्देश देण्यात येत आहेत.”*court

न्यायमूर्तींनी निकालाचे वाचन संपविल्यावर खटल्यातील आम्ही चौघा निर्दोष आरोपींनी एकमेकांचे अभिनंदन केले. हळव्या रहीम चाचांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. वारंवार दोन्ही हात उंचावून आकाशाकडे पहात ते खुदाचा शुक्रिया अदा करीत होते. आमचे वकील ॲड. मनोहर तसेच कोर्टातील सर्व वकील वृंदाने आणि कर्मचारी वर्गानेही आमचे अभिनंदन केले. तब्बल दहा वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीच्या आमच्या न्यायासाठीच्या अथक, चिवट लढ्याची अखेर आज यशस्वी सांगता झाली होती.

काही अंशी या केसमुळेच आपली पत्नी गमावून बसलेल्या रविशंकर व सैनी यांच्या अंतर्यामी खिन्न चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेल्या हास्यात एक करुण, उदास झाक दिसून येत होती. त्यांच्याकडे पाहिल्यावर Justice delayed is justice denied ही उक्ती खरी असल्याची प्रचिती येत होती.

कोर्टाबाहेर आल्यावर आमचे वकील ॲड. मनोहर व आम्ही चौघांनी राजू चहावाल्याच्या आग्रहास्तव त्याच्या टपरीवर चहा घेतला. नंतर एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या रस्त्याने निघून गेले. रेल्वेची वेळ होत आल्याने मीही रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे निघालो. स्टेशनवर आल्यावर रेल्वे कॅन्टीन जवळील झाडाखालच्या बाकावर बसून गाडीची वाट पहात असतानाच सुखदेव बोडखे माझ्या दिशेने येताना दिसला.

“मनःपूर्वक अभिनंदन साहेब..!”

माझ्या जवळ येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करीत तो म्हणाला. त्याच्या आजच्या बोलण्यात नेहमीसारखा विखार, उपहास, उपरोध किंवा कुत्सितपणा नव्हता.

“धन्यवाद आणि नमस्कार ! या बसा..”waiting

मी प्रत्युत्तरादाखल त्याला नमस्कार करून बाकावर शेजारी बसण्याची विनंती केली. बाकाच्या एका टोकाला संकोचत अंग चोरून बसत तो म्हणाला..

“साहेब, तुम्ही जिंकलात मी हरलो.. आज तुमची क्षमा मागायला आलोय इथे. तुमची काहीही चूक नसतांना तुम्हाला खूप त्रास दिलाय मी. माफ करा मला..”

सुखदेवच्या नजरेतील नेहमीचा बेरकीपणा नाहीसा होऊन त्या जागी प्रामाणिक पश्चाताप दिसत होता. त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो..

“जाऊ द्या हो, चालायचंच.. त्या जुन्या गोष्टी झाल्या. मी केंव्हाच विसरलोय सगळं.. ! पण एक गोष्ट मात्र अजून समजली नाही की, मी तुमचा असा कोणता घोर अपराध केला होता की ज्यामुळे तुमचा माझ्यावर एवढा प्रचंड राग होता ?”

माझ्या या प्रश्नावर शरमेनं खाली मान घालून तो म्हणाला..

“बदनामीची, पोलिस कंप्लेंटची, अटकेची भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याची मला सवयच लागली होती. तुम्ही पांढरपेशे कर्मचारी पोलिसांना व बदनामीला खूप घाबरता. त्यामुळे एखाद्या क्षुल्लकशा चुकीबद्दल किंवा हलगर्जीपणा बद्दल वरिष्ठांकडे व पोलिसांत तक्रार करण्याची केवळ धमकी देऊन मी बँक कर्मचारी, शिक्षक तसेच अन्य अनेक सरकारी खात्यांतील कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी भरपूर पैसे लुबाडले होते. आजपर्यंत कुणीही मला पैसे देण्यास विरोध केला नव्हता. त्यामुळे मला माझ्या दुष्ट, खुनशी, विकृत बुद्धीचा प्रचंड अहंकार झाला होता. तुम्ही मात्र माझ्यापुढे झुकण्यास ठाम नकार दिलात. त्यामुळे माझा अहंकार डिवचला गेला. कोणत्याही प्रकारे तुम्हाला माझ्यापुढे झुकण्यास भाग पाडायचेच असा मी टोकाचा, हट्टी निर्धार केला. तुमची बदनामी करण्यासाठी मी पोलीस, पत्रकार, वकील तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनाही हाताशी धरलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही साऱ्यांना पुरून उरलात. तुम्हाला घाबरवण्यासाठी मी पोलीस कंप्लेंट केली खरी पण पुढे त्यातच मी फसलो. पोलिसांनी मला ओरबाडून ओरबाडून संपूर्ण लुटलं. माझी जमीन, घरातील सगळं सोनं नाणं या पोलिसांची कधीच न भागणारी पैशांची भूक भागविण्यासाठी मला विकावं लागलं. मी या प्रकरणात आता पुरता कफल्लक झालो आहे. आणि माझा गर्व, माझा अहंकार.. ? तो तर केंव्हाच कापरासारखा उडून नाहीसा झाला आहे.”

एखाद्या शक्तीहीन, म्हाताऱ्या, थकलेल्या सिंहासारखा सुखदेव असहाय्य आणि केविलवाणा भासत होता.

“असं आहे तर मग गेल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या वकिलांकरवी तडजोड करण्याची ऑफर देऊन आमच्याकडे पैशाची मागणी का केलीत ?”

माझा हा प्रश्न सुखदेवला अपेक्षितच असावा. खाली घातलेली मान क्षणभरही वर न करता तो म्हणाला..

“वकिलांना त्यांची फी देण्यासाठी माझ्याकडे तसेच रुपेश कडेही काहीच पैसे उरले नव्हते. त्यामुळे “आमची थकलेली फी वसूल करण्यासाठी तुमच्या नावाने आम्ही बँकवाल्यांकडे तडजोडीची ऑफर देऊन पैसे मागितले तर चालेल का ?” असं आम्हा दोघांच्या वकिलांनी आम्हाला विचारलं, तेंव्हा नाईलाजानं त्यांना आम्ही होकार दिला..”

सुखदेवचं हे स्पष्टीकरण पटण्यासारखंच होतं. त्याचं सांत्वन करीत म्हणालो..

“जाऊ द्या..! झालं गेलं गंगेला मिळालं.. !! माझा कुणावरही कसलाही राग नाही. मात्र यापुढे कुणा निरपराधाला चुकूनही असा विनाकारण त्रास देऊ नका एवढीच तुमच्या कडून अपेक्षा करतो. तुमच्या आईवडिलांनी केवढ्या प्रेमानं तुमचं नाव ‘सुखदेव’ असं ठेवलं असेल. मात्र तुमच्या चुकीच्या वर्तनामुळे तुम्ही लोकांना दुःख देणारे ‘दुखदेव’ च ठरलात. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा दृष्टिकोन, तुमचं वर्तन बदला. अन्यायाने, अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा कधीही खरं सुख आणि आनंद देत नाही, हे ध्यानात ठेवा. आपला स्वभाव बदला. लोकांवर प्रेम करणारे, त्यांना सुख देणारे ‘सुखदेव’ बनून मातापित्यांनी दिलेलं नाव सार्थक करा.”

माझा उपदेश शांतपणे ऐकून सुखदेवने होकारार्थी मान डोलावली.

आमच्या केसशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्न, ज्यांची उत्तरे सुखदेवकडे निश्चितच असावी, माझ्या डोक्यात अद्यापही घोंगावत होते. सुखदेवकडून त्यांचा उलगडा करून घ्यावा असा क्षणभर मला मोहसुद्धा झाला. पण आता या सगळ्या कटू आठवणी विसरुन या प्रकरणावर कायमचा पडदा टाकायचा असं ठरवून मी तो मोह आवरला.

तोच.. दूरवरून स्टेशनकडे येणाऱ्या ट्रेनचा हेड लाईट चमकला. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ, लगबग सुरू झाली. मीही माझ्या बाकावरून उठलो. सुखदेवनं माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातात गच्च धरला आणि गदगदत्या स्वरात म्हणाला..

“तुम्हाला विनाकारण दिलेल्या त्रासाबद्दल मी तुमची मनापासून क्षमा मागतो. माझ्यावर दया करा आणि मोठ्या मनानं मला माफ करा..”

बोलता बोलता अचानक तो खाली वाकला आणि चक्क माझ्या पायावर त्यानं आपलं डोकं टेकलं. त्याच्या या अनपेक्षित कृतीनं अचंबित होऊन मी भांबावून गेलो. कसंबसं त्याला उठवून उभं केलं. किंचित मागे सरुन तो म्हणाला..

“कधीही आपला संयम जराही ढळू न देता अत्यंत शांतपणे तुम्ही ज्या धीराने एकूण सर्व विपरीत परिस्थितीला इतका दीर्घ काळपर्यंत अतिशय समर्थपणे आणि सदैव प्रसन्न मुद्रेने जे तोंड दिलंत त्याला खरंच तोड नाही. मी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला चढविला, अनेक कुटील डावपेचही लढवले पण तुम्ही कधीही न डगमगता अतिशय स्थिर बुद्धीने माझा मुकाबला केलात आणि शेवटी माझा डाव माझ्यावरच उलटवलात. तुमच्या या शांत, संयमी, सुसंस्कृत आणि स्थिर बुद्धीच्या विजयी लढ्याला माझा मनापासून सलाम.. !!”

ताठ उभं राहून उजव्या हाताचा तळवा आपल्या कपाळासमोर नेत सुखदेवनं मला कडक मिलिटरी सॅल्युट ठोकला.salute

एव्हाना माझी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली होती. एखाद्या पुतळ्यागत सलामीच्या पोझ मध्ये स्थिर उभ्या असलेल्या सुखदेवकडे पुन्हा पुन्हा वळून पहातच मी गाडीत शिरलो.

गाडी प्लॅटफॉर्म वरून हलली. मी दरवाजातच उभा होतो. सुखदेव माझ्याकडे पहात अजूनही त्याच पोझमध्ये निश्चलपणे उभा होता. प्लॅटफॉर्म वरील अंधुक प्रकाशातही त्याच्या डोळ्यातील अश्रू स्पष्टपणे चकाकताना दिसत होते.

हळूहळू गाडीनं वेग पकडला. मी पार दिसेनासा होईपर्यंत माझ्याकडे एकटक पहात सुखदेव प्लॅटफॉर्मवर अजूनही तशाच अवस्थेत स्तब्धपणे उभा होता..

(समाप्त)

(संपूर्ण काल्पनिक)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १८ भाग त्यांनी प्रसारित केले होते. या त्यांच्या चित्त थरारक दीर्घ कथेचे हे शेवटचे प्रकरण……………………………