https://goodworld.in A website by Madhav Bhope

Renuka Ashtak-13 म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके- रेणुका अष्टक-13

devi image

Renuka Ashtak-13

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-13 

म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके

( वृत्त : पृथ्वी )
श्रीमंत गुणवंत तूं, सदय मंगलालंकृत ।
पसंतिस तुझ्या नये, स्तवन दूबळें प्राकृत ॥
निजस्तवनिं टेकिलीं, पर्दि सहस्त्रही मस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥१॥


अशुद्ध स्तवनाक्षरें, म्हणुनि बोबडीं तोतरीं ।
तुला न रुचती जरी, समुळ हीं खुडीतों तरी ॥
मुकेंचि स्तन चाखितें, आरडतें भुकें बोलकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥२॥


जगीं न मिळली मला, सुशिल संगती वाटती ।
पुढें मज न चालवें, मनिं तुझी भिती वाटती ॥
परंतु तव चिंतनें, विविध जाळिं तूं पातकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥३॥


तुलाचि तुजसारखें, जननि नांव हें शोभलें ।
समान जगिं पाहसी, जड मुढादि ज्ञानी भले ॥
उदंड मज सारखें, पतित तारिले कौतुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥४॥


न देचि निजगुप्त तें, धन पिता कुपुत्रा – करीं ।
जगांत अथवा जसा, निजगृहांत कुत्रा करी ॥
परंतु जननी अधीं, अधिक देत त्या भातुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥५॥


सुपात्रहि न वंचना, करि गुरुहि दत्तात्रय ।
तशीच गृहदैवतें, विविध देति तापत्रय ॥
तुलाचि खळ पातकी, पटति अंध पंगू मुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥६॥


निराश्रित मि लेंकरुं, तरि नको उपेक्षा करुं ।
तुझ्या भुवनिं जिंकिती, हंसति कल्पवृक्षा करुं ॥
कृपामृत झरे सदा, स्त्रवति नित्य आराणुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥७॥


तुझीं विमल पावलें, परम सुकृतें पाहिलीं ।
अनंदसरिता जळीं, विषयवासना वाहिलीं ॥
विशेष मम मस्तकीं, अभयदान दे हस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥८॥


सुकीर्ति तुझि चांगली, अवडली अम्हां गावया ।
अशा धरुन मी अलों, उचित दान मागावया ॥
प्रसादफळ दे असें, सतत विष्णुदासा निकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥९॥

 

 
 

************************************** 

या आधील पदांची लिंक खाली दिलेली आहे. 

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

Renuka Ashtak-3  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

Renuka Ashtak-6  तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

Renuka Ashtak-7  अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

Renuka Ashtak-8  नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8

Renuka Ashtak-9  ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9

Renuka Ashtak-10  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-अष्टक-10

Renuka Ashtak-11 तुला माझा अंबिके ! नमस्कार अष्टक-11

Renuka Ashtak-12 अतां रेणुके ! दुःख माझें निवारी- रेणुका अष्टक-12

Renuka Ashtak-12 अतां रेणुके ! दुःख माझें निवारी- रेणुका अष्टक-12

devi image

Renuka Ashtak-12

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-12

 

वृत्त : ( भुजंगप्रयात )
नमो आदि गौरीसुता एकदंता ।
नमो शारदा सदगुरु ज्ञानदाता ॥
नमो आदिशक्ती महीषासुरारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥१॥


तुला चिंतिल्या पावती मोक्ष प्राणी ।
अशी गर्जना व्यासवाणी पुराणीं ॥
महाद्वाड हा एवढा पापि तारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥२॥


अगा जाहलीसी अनाथाचि आई ।
म्हणूनी तुला प्रार्थितों मी तुकाई ॥
करी कींव कीं गांजिलों संवसारीं ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥३॥


जगन्नायके ! आयके एक आतां ।
उणें काय होतें मला अल्प देतां ॥
बहु जन्मिचा मी तुझा ऊपकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥४॥


अराधीत मी दास तूझा अराधी ।
करावी कृपा त्याहुनी आपराधी ॥
कृपा जोगवा दान मागे भिकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥५॥


नको येउं कोपा कृपादृष्टिं पाहे ।
मला आसरा दूसरा कोण आहे ॥
तुला लाज माझी तुझी आस सारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥६॥


अझूनि कशी पाहसी नीरवाण ।
पहा माझिया दाटला कंठिं प्राण ॥
जिवा त्रासलों पावलों कष्ट भारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥७॥


श्रीदेवि जयदेवि जय जय भवानी ।
महादेवि तूं माय कैवल्यदानी ॥
स्तुती विष्णुदासाचिही आवधारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥८॥

 

************************************** 

उतनूरचे दिवस-4A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tractor-1

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-अ)*

उतनूर पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेलं शामपूर हे गाव मुख्य रस्त्याला अगदी लागून वसलेलं होतं. गावातील बराचसा भूभाग हा सपाट, जंगल विरहित व छान मोकळा मोकळा होता. त्यामुळे त्या गावात अनेक पक्की घरं होती तसंच रस्ते, नाल्या, पथ दिवे, पोस्ट ऑफिस अशा त्या परिसरातील अन्य गावात सहसा न आढळणाऱ्या सोयीही त्या गावात होत्या. आसपासच्या खेड्यांतील प्रवाशांनी तेथील बस स्टँड सदैव गजबजलेलं दिसायचं. बस स्टँड जवळच आठवडी बाजारही भरत असे.

उतनूर आदीलाबाद रस्त्यावरील उतनूर पासून दहा किलोमीटर दूर असलेल्या इंद्रवेल्ली गावापर्यंतचा भाग आमच्या शाखेच्या कार्यक्षेत्रात येत होता. इंद्रवेल्ली हे मंडल क्षेत्र (तालुका) असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचा बोजा नोंदविण्यासाठी तेथील रेव्हेन्यू कार्यालयात वेळोवेळी जावे लागत असे. इंद्रवेल्लीस जातेवेळी शामपूर गावा वरूनच जावं लागायचं.

तसं पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेची शाखा उघडल्यापासून शामपूर गावात आमच्या स्टेट बँकेचा कुठलाही चालू फायनान्स नव्हता. त्यामुळे शामपूर गावात आवर्जून जाण्याचं कधी काम पडलं नाही. तरी देखील तेथील बस स्टँड जवळील ओळीने सलग पंधरा सोळा दुकानं असलेलं एक व्यापारी संकुल जाता येताना नेहमीच लक्ष वेधून घेत असे. “दामोदर बाजार” असं नाव असलेला तो शॉपिंग कॉम्प्लेक्स गावातील कुणा धनाढ्य व्यक्तीचा असावा असाच माझा समज होता. damodar bazaar

गेले काही दिवस आमच्या बँकेत जुनी थकीत कर्जे वसूल करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली होती. सुदैवाने आमच्या शाखेत अशी जुनी थकीत कर्जे फारशी नव्हती. मात्र बुडीत कर्जाच्या यादीत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचं एकच मोठं जुनं खातं दिसत होतं. ते ट्रॅक्टर लोन होतं. मी त्या खात्याबद्दल माहिती काढण्यास सुरवात केली. आधी, सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या कर्जखात्याची कागदपत्रे शोधून काढली. इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा “के. जनार्दन” नावाच्या संपन्न शेतकऱ्याने ट्रॅक्टर व ट्रॉली साठी दीड लाख रुपयांचं कर्ज आमच्या बँकेकडून घेतलेलं दिसत होतं.tractor-1

लोन डॉक्युमेंट्स वर कर्जदाराचा जो फोटो होता त्यावरून हा के. जनार्दन म्हणजे कोट, टाय, हॅट परिधान करणारी आणि बिन दाढीमिशांचा गुळगुळीत चेहरा असलेली पक्की सुटाबुटातली शहरी व्यक्ती वाटत होती.

k janardan

त्या व्यक्तीने बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन “मॅसी फर्ग्युसन” कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली यांची खरेदी केली असल्याचेही कोटेशन व बिलांवरून दिसत होते. प्रामुख्याने शेती तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची आदीलाबादच्या मोंढ्यात वाहतूक करणे हाच कर्जदाराचा मुख्य व्यवसाय होता. इंद्रवेल्ली व आसपासच्या गावात असलेली आपली पंचावन्न एकर जमीन या कर्जासाठी त्याने बँकेला तारण दिली होती. कर्ज कागदपत्रांच्या फाईल वर मोठ्या लाल अक्षरात “Borrower absconding” असं लिहिलेलं होतं.

इंस्पेक्शन रजिस्टर वरील नोंदी नुसार असं दिसतं होतं की कर्ज घेतल्या नंतर अवघ्या दोनच महिन्यांनी कर्जदार इंद्रवेल्ली गाव सोडून अन्य कुठेतरी निघून गेला होता. बँकेत उपलब्ध कागदपत्रांवरून कर्जदाराची फारशी माहिती न मिळाल्याने आता शाखेतील कर्मचाऱ्यांकडूनच काही माहिती मिळते का ते पहावे असा विचार केला. दुर्दैवाने उतनूर शाखेतील एक जुना हेड गार्ड वगळता अन्य शाखेतील सर्वच कर्मचारी फार तर चार पाच वर्षं इतकेच जुने होते. त्यांना कुणालाच या “के.जनार्दन” बद्दल कसलीही माहिती नव्हती.

हेड गार्ड सूर्यपाल स्वामी येत्या सहा महिन्यांतच सेवानिवृत्त होणार होता. त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल काहीतरी अंधुकसं आठवत होतं. ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या या के. जनार्दन वर कुठलं तरी जबरदस्त संकट ओढवलं, त्यात त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडी झाली आणि त्यानंतर हा कर्जदार ट्रॅक्टर सहित बेपत्ता झाला होता. चार पाच वर्षे वाट पाहून बँकेने ते कर्ज खाते प्रतिवादीत कर्जे खात्यास (Protested Bills A/c) वर्ग केलं होतं.

खूप प्रयत्न करूनही या के. जनार्दन चा सध्याचा ठावठिकाणा कोणता आहे ? या बद्दल पत्ता लागू शकला नाही. बँकेकडे तारण असलेल्या जमिनीच्या कागदपत्रांवरून वेगवेगळ्या गावांमध्ये या के.जनार्दन च्या नावाने सुमारे पंचावन्न एकर एवढी जमीन असल्याचे दिसत होते. त्यापैकी पंधरा एकर जमीन इंद्रवेल्ली गावात असल्याने तसेच कर्जदाराचा पत्ताही इंद्रवेल्ली गावातीलच दिला असल्याने मी प्रथम इंद्रवेल्ली गावात जाऊन दिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी चौकशी केली. तेंव्हा, खूप वर्षांपूर्वीच आपले इंद्रवेल्लीचे राहते घर व शेती विकून के. जनार्दन आदीलाबाद येथे शिफ्ट झाल्याचे तेथील रहिवाशांकडून समजले.

बँकेकडे तारण असलेली जमीन कर्जदाराने परस्पर कशी काय विकली ? याबद्दल आश्चर्य वाटलं आणि मनस्वी चीडही आली. के. जनार्दनचं जमिनीचं “पट्टा पासबुक” घेऊन मी इंद्रवेल्ली मंडल रेव्हेन्यू ऑफिसर (MRO) कडे जाऊन धडकलो. मात्र तिथल्या लॅंड रेकॉर्ड मध्ये या के. जनार्दनच्या जमिनीवर आमच्या बँकेच्या कुठल्याही बोजाची नोंदच नव्हती. “निदान आता तरी उर्वरित जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवा..” असा कार्यालयात अर्ज दिला. त्यावर “तुम्ही दहा दिवसांनी भेटा..” असं संबंधित अधिकारी म्हणाला. तिथल्या अनागोंदी कारभारावर चरफडतच निराश मनानं उतनूरला परतलो.

एरवी सदैव माझ्या सोबत राहणारा माझा वाटाड्या, माझा दुभाषी.. प्युन रमेश हा आजारी पडल्यामुळे गेले काही दिवस बँकेत गैरहजर होता. बेपत्ता के. जनार्दन चा शोध लावण्यात त्याची नक्कीच मदत होईल असा माझा विश्वास होता. त्यामुळे तो कामावर पुन्हा रुजू होण्याची मी आतुरतेनं वाट पहात होतो. अखेरीस तब्बल वीस दिवसांची विश्रांती घेऊन ताजातवाना होऊन रमेश ड्युटीवर हजर होताच अधिरपणे त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल विचारलं.

“के. जनार्दन..? ट्रॅक्टर लोन..?”

स्मरणशक्तीला ताण देत नकारार्थी मान हलवीत रमेश म्हणाला.. “नही साब.. पिछले आठ सालोंमें आज तक किसी भी मैनेजर ने या फिल्ड ऑफिसरने इस नाम के किसी भी आदमी का कभी जिक्र नही किया..”

रमेशचं हे उत्तर ऐकून माझा अपेक्षाभंग झाला. माझ्या खिन्न चेहऱ्याकडे पहात रमेश म्हणाला..

“लेकिन.. एक दूसरे “जनार्दन” को मै अच्छी तरह जानता हूं.. यहां पास ही में.. शामपुर में रहता है.. बहुत खतरनाक आदमी है.. गांव में किसी से मेलजोल नही रखता.. बात भी कम करता है.. सब लोग डरते है उस से.. हो सकता है, अन्ना (नक्षली) लोगोंका आदमी हो.. या वो खुद ही कोई शरण आकर सुधरा हुआ रिटायर्ड नक्सली अन्ना हो.. पता नही..”

रमेशचं या जनार्दन बद्दल चांगलं मत दिसत नव्हतं. तरी देखील आणखी एक प्रयत्न करून पहावा म्हणून रमेशला विचारलं..

“क्या हम मिल सकते है इस शामपुर वाले जनार्दन से ? शायद उसे के. जनार्दन के बारेमे कुछ मालूमात हो..”

काहीशा अनिच्छेनंच खोल उसासा सोडत रमेश म्हणाला..

“ठीक है..! आप कहते है तो आज ही शाम को मिलेंगे उन से..! वैसे भी अपने जनरेटर का पेट्रोल खतम होने को आया है.. नागापुर पेट्रोल बंक पर भी स्टॉक नही है.. अब तो शामपुर से ही पेट्रोल लाना पड़ेगा..”

संध्याकाळी पेट्रोलच्या रिकाम्या कॅन घेऊन आम्ही शामपुर कडे निघालो. “दामोदर बाजार” कॉम्प्लेक्स जवळ येताच रमेशने त्या ओळीनं बांधलेल्या पंधरा सोळा दुकानांच्या मधोमध असलेल्या एका अरुंद बोळीत गाडी घातली. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस एक जुनाट, दगडी, प्रशस्त वाडा होता. रमेशने त्या वाड्याच्या भक्कम लाकडी दरवाजाची कडी वाजवली.

“कोण..?”

आतून तेलगू भाषेत करड्या आवाजात विचारणा झाली..

“मी.. रमेश.. स्टेट बँक..”

रमेशनं थोडक्यात आपला परिचय दिला. थोड्या वेळानं एका गंभीर, करारी मुद्रेच्या उंच माणसानं दार उघडलं. धारदार नाक, कपाळाला लाल-काळा गंध बुक्का, डोक्यावर कडक इस्त्रीची टोकदार पांढरी गांधी टोपी, किंचित मग्रूर, तुसडी, क्रूर नजर, पांढरं शुभ्र धोतर आणि टेरिलीनचा चमचमता व्हाईट ओपन शर्ट अशा वर्णनाची ती व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्या सारखी दिसत होती. लांब, गालापर्यंत वाढलेले केसांचे दाट कल्ले, तलवार कट टोकदार मिशा आणि फक्त हनुवटी पुरतीच ठेवलेली छोटीशी फ्रेंच कट दाढी त्या व्यक्तीच्या एकंदर ग्रामीण पेहरावाला किंचित विसंगत वाटत असली तरी त्या लांब कल्ले व दाढी मिशांमुळेच ते व्यक्तिमत्व अधिकच गूढ, करारी भासत होते. image of janardan

त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील “काय काम आहे..?” अर्थाचे त्रासिक, प्रश्नार्थक भाव पाहून रमेश माझ्याकडे बोट दाखवत तेलगू भाषेत लगबगीनं म्हणाला..

“हे आमच्या बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर साहेब.. महाराष्ट्रातून आले आहेत.. त्यांना तुमच्याकडून काही माहिती हवी आहे..”

मला आपादमस्तक न्याहाळून झाल्यावर मागे वळत तो धोतर टोपीधारी गृहस्थ तेलगू भाषेतच म्हणाला..

“आत या..!”

आम्हाला दिवाणखान्यात बसवून तो गृहस्थ आत निघून गेला. जुनाट लाकडी माळवदाचं छत असलेल्या त्या दिवाणखान्यात लावलेल्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या काचेच्या फ्रेम मधील मोठ्या आकाराच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. शेजारीच पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांची ही छायाचित्रे टांगली होती. एका कोनाड्यात विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या मूर्तींसमोर एक निरंजन तेवत होतं. कोनाड्याच्या वरती भरजरी पोशाखातील अंदाजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलाचा ऐटीत खुर्चीत बसलेला फोटो होता. त्या फोटोला नुकताच ताज्या फुलांचा हार घातलेला दिसत होता. फोटो शेजारी लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध दिवाणखान्यात दरवळत होता.

“हे नक्कीच कुणा मराठी माणसाचं घर असलं पाहिजे..!” मी मनातल्या मनात अंदाज बांधला.

इतक्यात डोक्यावर पदर घेतलेली अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं लुगडं नेसलेली एक घरंदाज सोज्वळ स्त्री हातात तांब्या भांडं घेऊन दिवाणखान्यात आली. तिचा चेहरा उदास वाटत होता. आम्हाला पाणी देऊन काही न बोलता ती आत निघून गेली. ती गेल्यावर जनार्दन भाऊ तेलगू भाषेत म्हणाले..

“हं.. बोला..! कसली माहिती हवी आहे तुम्हाला..?”

त्यावर नीट सरसावून बसत रमेश म्हणाला..

“के. जनार्दन या नावाच्या इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा माणसाला तुम्ही ओळखता का ? खूप वर्षांपूर्वी आमच्या बँकेकडून त्या माणसानं ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतलं होतं. अजूनही ते कर्ज तसंच बाकी आहे आणि तो माणूस इंद्रवेल्ली गाव सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून गेला आहे..”

रमेशने एका दमात सर्व सांगून टाकलं. जनार्दन भाऊंनी काही तरी आठवायचा प्रयत्न केला. डोकं खाजवीत ते म्हणाले..

“के. जनार्दन..? इंद्रवेल्ली..? अं..हं..! मी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय..”

नंतर थोडा वेळ खाली मान घालून हनुवटी वरील मुठभर दाढीचा पुंजका कुरवाळीत ते विचार करत बसले. मग नकारार्थी मान हलवत ठामपणे ते म्हणाले..

“नाही..! या नावाच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल मला कसलीही माहिती नाही..! मी इथे शामपुरला आठ वर्षांपूर्वी आलो. त्यापूर्वी बरीच वर्षं मी आदिलाबाद इथं होतो. इंद्रवेल्ली गावात जायचं कधीच काही काम पडत नसल्यामुळे तेथील रहिवाशांबद्दल मला फारशी माहिती नाही..”

तोपर्यंत आतून आमच्यासाठी चहा आला होता. चहा पिऊन जनार्दन भाऊंचे आभार मानून आम्ही निघालो. परत जाताना वाटेत रमेश म्हणाला..

“हा जनार्दन खूप खडूस माणूस आहे. गेली पाच वर्षे मी ह्याच्याच दुकानातून बँकेच्या मोटारसायकल साठी व जनरेटर साठी भरपूर पेट्रोल खरेदी करतोय. मात्र पूर्वी एकदा आदीलाबादहून उतनूरला येतेवेळी रात्रीच्या वेळी माझी गाडी शामपुर जवळ बंद पडली होती. त्यावेळी मी या जनार्दनला त्याची मोटार सायकल फक्त रात्रीपुरती मागितली होती. एवढी ओळख असून आणि वारंवार विनंती करूनही जनार्दनने मला गाडी देण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. तेंव्हा पासून हा जनार्दन माझ्या मनातून साफ उतरलाय. तुम्हाला कसा वाटला हा माणूस..?”

“मला, हा माणूस आपल्यापासून काही तरी लपवतोय असंच जाणवत होतं..” मी म्हणालो.

“कशावरून..?” रमेशने आश्चर्यानं विचारलं.

“एक तर हा माणूस त्याच्या व त्याच्या पत्नीच्या पेहरावा वरून तसंच त्याच्या घराच्या ठेवणी वरून पक्का मराठी माणूस वाटत होता. मी महाराष्ट्रातील आहे हे कळूनही त्याने माझ्याशी मराठी बोलणं कटाक्षानं टाळलं. आपलं सर्व संभाषण तेलगू भाषेतच झालं. तेंव्हाच मला संशय आला..”

माझं हे बोलणं रमेशला अजिबात पटलं नाही. “धोतर, लुगडं हा इथलाच पेहराव आहे आणि विठ्ठल रखुमाई हे आंध्र व कर्नाटकाच्या सीमेवरील बहुसंख्य लोकांचे दैवत असल्यामुळे त्यांच्या मूर्ती, फोटो येथील घरोघरी आढळतात.. ” असे तो म्हणाला. आदीलाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बरीच गावे पूर्वी महाराष्ट्रात होती. त्यामुळे येथील अनेक जुन्या घरांत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे दिसून येतात, अशीही माहिती त्याने पुरवली.

दहा दिवसांनंतर वेळात वेळ काढून सकाळी एकटाच इंद्रवेल्लीच्या मंडल रेव्हेन्यू ऑफिस मध्ये गेलो आणि के. जनार्दनच्या जमिनीवर बँकेचा बोजा (चार्ज) नोंदविला की नाही याची चौकशी केली. त्यावर तेथील संबंधित कर्मचारी म्हणाला..

“गेल्या आठवड्यातच के. जनार्दन स्वतःच इथे आले होते. आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसून स्टेट बँकेचा काहीतरी गैरसमज झाला आहे असे ते म्हणाले. जमिनीवर बोजा नोंदविण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि तसे लेखी पत्रही त्यांनी आमच्या ऑफिसला दिले आहे.”

हा के. जनार्दन भलताच चलाख दिसत होता. MRO ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना देखील त्याने पटवलं असावं. MRO ऑफिसला दिलेल्या पत्रावर कुठेही त्याने आपला पत्ता किंवा फोन नंबर दिलेला नव्हता. मात्र हा के. जनार्दन जवळपासच कुठेतरी रहात असावा आणि इंद्रवेल्ली गावातील लोक त्याच्या नियमित संपर्कात असावेत हा माझा संशय आता पक्का झाला. निराश होऊन इंद्रवेल्लीहून परततांना शामपुर जवळ आल्यावर अचानक काहीतरी मनात आलं आणि “दामोदर बाजार” जवळ मी मोटरसायकल उभी केली. तेथून पायीच जात जनार्दन भाऊंच्या वाड्यासमोर उभा राहून दाराची कडी वाजवली.

“यवरू..?” (कोण ?) अशी आतून बायकी आवाजात तेलगू भाषेत विचारणा झाली.

“मी.. गंगाराम ! नागापूर पेट्रोल बंक वाला.. जनार्दन भाऊ आहेत का ?”

मी विचारपूर्वक आणि आवर्जून “मराठी” भाषेत धडधडीत खोटं बोललो. जवळच्या नागापूर पेट्रोल बंक वर गंगाराम नावाचा एक मराठी बोलणारा कर्मचारी असल्याचे मला माहिती होते. या गंगाराम कडूनच जनार्दन भाऊ किरकोळ विक्रीसाठी पेट्रोलचे बॅरल मागवीत असत.

काही क्षण आतून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. बहुदा आतील स्त्रीला काहीतरी संशय आला असावा. थोड्यावेळाने ती स्त्री “मराठीत” म्हणाली..

“ते परगावी गेलेत. दुपारी चार पर्यंत परत येतील..”

माझं काम झालं होतं. मी फेकलेला खडा अचूक लागला होता. हे घर मराठी माणसाचं असल्याचा माझा अंदाज खरा ठरला होता.

“ठीक आहे.. मी पाच वाजता येतो..”

असं बोलून मागं फिरून झपाझप पावलं टाकीत मी बाहेर ठेवलेल्या मोटारसायकल जवळ आलो. मी मागं फिरल्यावर आतील स्त्री ने दरवाजा उघडल्याच्या आवाज माझ्या कानावर पडला. कदाचित मी गंगारामच आहे किंवा नाही याची तिला खात्री करून घ्यायची असावी.

दुपारी पाच वाजता पुन्हा जनार्दन भाऊंच्या घरी गेलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडलं आणि मला पाहतांच मराठीत “या..!” असं म्हणाले. आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसल्यावर मी म्हणालो..

“काही पत्ता लागला का त्या के. जनार्दन नावाच्या माणसाचा..?”

“नाही..! मात्र काही वर्षांपूर्वी इंद्रवेल्लीची जमीन व घर विकून ते कुटुंबासह आदीलाबादला गेले एवढं समजलं. तुम्ही आदीलाबादला जाऊन चौकशी केली तर कदाचित त्यांचा काहीतरी ठावठिकाणा कळू शकेल..”

एवढं बोलून माझ्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“सकाळी ‘नागापूरचा गंगाराम’ असं नाव सांगून तुम्हीच घरी आला होतात ना ? हा गंगाराम तोतरा असून किंचित अडखळत बोलतो. त्यामुळे तुम्ही गंगाराम नाहीत, हे माझ्या बायकोने लगेच ओळखलं होतं. तुम्ही असं खोटं का बोललात ?”

जनार्दन भाऊंनी विचारलेल्या या थेट प्रश्नाने मी गडबडून गेलो. खोटं बोलल्याबद्दल ते मला असा आमने सामने रोखठोकपणे जाब विचारतील याची मी कल्पनाच केलेली नव्हती. आता काय उत्तर द्यावे हे क्षणभर मला सुचेचना.. कसंबसं स्वतःला सावरून घेत कसंनुसं हसत म्हणालो..

“गेल्या वेळी प्युन रमेश सोबत तुमच्याकडे आलो होतो तेंव्हा, मी महाराष्ट्रातून आल्याचं कळूनही तुम्ही आमच्याशी कटाक्षानं तेलगू भाषेतच बोललात. तुम्ही घरी मराठीच बोलत असावात असा माझा अंदाज होता. केवळ त्याची खातरजमा करण्यासाठीच तुमच्या पत्नीशी आज सकाळी मी खोटं बोललो. त्यात माझा अन्य कोणताही वाईट, विपरीत हेतू नव्हता..”

माझ्या ह्या उत्तराने जनार्दन भाऊंचं अजिबात समाधान झालं नाही. रागानं तीक्ष्ण स्वरात ते म्हणाले..

“कुणाशी कोणत्या भाषेत बोलावं हा सर्वस्वी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे. आणि, मी मराठी आहे किंवा नाही, हे तुम्ही खुद्द मला सरळ सरळ विचारू शकला असतात. त्यासाठी माझ्या घरच्यांशी असं खोटं बोलायची गरज नव्हती. मला हे मुळीच आवडलेलं नाही. माझी पत्नी हळव्या स्वभावाची असून हार्ट पेशंट आहे. त्यातून आधीच ती खूप दुःखी आहे. तुमच्या असं खोटं बोलण्यामुळे तिच्या मनात नाना शंका कुशंका येऊन ती घाबरून गेली आहे. तुमच्यासारख्या नवख्या, अनोळखी माणसाकडून यापुढे असलं कुठलं ही पोरकट, बेजबाबदार गैरकृत्य मी खपवून घेणार नाही..”

त्वेषानं बोलता बोलता जनार्दन भाऊंच्या नाकपुड्या संतापानं थरथरू लागल्या. अपराध्यासारखा खाली मान घालून मी निमूटपणे त्यांचे निर्भत्सनेचे कठोर बोल ऐकून घेत होतो. एवढ्यात बाहेरून कुणीतरी जनार्दन भाऊंना हाक मारली आणि त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी भाऊ वाड्याबाहेर गेले. थोडावेळ अस्वस्थपणे चुळबुळत मी जागीच बसून राहिलो आणि नंतर वेळ घालवण्यासाठी दिवाणखान्यात लावलेले भाऊंचे जुने फॅमिली फोटो पाहू लागलो.

थोड्यावेळाने जनार्दन भाऊ वाड्यात परत आल्यावर त्यांच्या नजरेला नजर न देता त्यांचा निरोप घेऊन एखाद्या चोरासारखा, खाल मानेनं वाड्यातून बाहेर पडलो.

(क्रमशः 4-ब)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Sant Tukaram abhang-8 संत तुकारामांचे अभंग-8

tukaram-3

संत तुकारामांचे अभंग या लेखमालेत दि . २३ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत संत तुकारामांच्या अभंगां ची माहिती ६ लेखांमधून घेतली. त्यानंतर ७ वा लेख दि. २४ मार्च रोजी लिहिला. मधल्या दीड महिन्याच्या खंडानंतर, पुन्हा दीड महिन्याचा खंड पडला. असो.  पण इतक्या छान विषयावर जमेल तसे लिहीत जावे असा प्रयत्न आहे.

Sant Tukaram abhang-8  

संत तुकारामांचे अभंग-8 

संत तुकारामांचे अभंग आपण गेल्या ६ लेखांमधून पाहत आहोत. मागील लेखात काही करुणापर अभंग आणि काही स्फुट अभंग आपण पाहिले. मी यू ट्यूब वर पू. डॉ. सुषमाताई वाटवे यांची प्रवचने ऐकत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. त्या म्हणतात की भक्तिला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, आनंदरूप आहे.. आणि आपणही ईश्वराचेच स्वरूप आहोत किंवा अंश आहोत. पण नुसते हे ज्ञान होऊन काय कामाचे? आपल्याला याची प्रचिती- प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, त्या ईश्वराकडेच करुणा भाकावी लागेल.

मनुष्य जसा जसा अध्यात्माकडे वळतो, तसे तसे त्याला आपल्यातले अवगुण प्रकर्षाने जाणवायला लागतात. तो पर्यंत कुठल्याही माणसाला आपल्यात काही अवगुण आहेत याची साधी शंका सुद्धा येत नाही. उलट आपल्यातल्या अवगुणांनाच आपले वैशिष्ट्य आणि आपले गुण समजून आपण तोऱ्यात असतो. पण जेंव्हा मनुष्य अध्यात्माकडे वळतो, तेंव्हा त्याची अवस्था कशी होते, ते खालील अभंगात तुकाराम महाराज वर्णन करतात-

माझे मज कळों येती अवगुण काय करूं मन अनावर

आतां आड उभा राहें नारायणा दयासिंधुपणा साच करीं

आणि जेंव्हा हे अवगुण लक्षात येतात- आणि आपल्याच्याने ते आटोक्यात येत नाहीत, त्यावेळी त्या दयासिंधू कडे करुणा भाकल्यावाचून पर्याय राहत नाही- “आता आड उभा राहे नारायणा.”

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मला खूप मदत केली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।।

अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचे बळ आपल्याकडे असतेच असे नाही. कित्येक वेळा काय बोलावे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलण्यात तितके हुशार किंवा हजरजबाबी नसतो. पण अशा वेळी, बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।। आपण जे काही बरळतो, त्याला तो नीट करून घेतो. आपल्या प्रत्येक हालचालीत, तो आपल्याला अगदी लहान मुलाला जशी त्याची माऊली हाताला धरून चालविते, तसे चालवितो. लहान मूल जसे जेंव्हा त्याला आईचा आधार असतो, तेंव्हा कशालाही घाबरत नाही, त्याप्रमाणे चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

आणि जेंव्हा असा आईचा आधार असतो, तेंव्हा कोणी आपले शत्रू वाटतच नाहीत- जसे लहान मुलाला शत्रू- मित्र अशी काही भावना नसते- त्याप्रमाणे देवाचा आधार घेतल्यानंतर- अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे. अवघे जन हे सोयरे- सखे वाटू लागतात.

आणि मग संसारातील अडचणी या अडचणी वाटतच नाहीत- सगळा खेळ वाटू लागतो- तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

हा अभंग खरेच त्या पातळीवर जाऊन अनुभवायचाच विषय आहे- जेंव्हा तो अनुभव येतो- तेंव्हा अंगावर सर्रकन काटा येतो.

जोपर्यंत विठू माऊलीची भेट होत नाही, तोपर्यंत साधकाची अवस्था कशी होते हे खालील अभंगातून वर्णन केले आहे-

पडियेलों वनीं थोर चिंतवनीं । उशीर कां आझूनि लावियेला

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे

आपल्या स्वभावातील अवगुण जसे जसे दिसू लागतात तसे तसे संत म्हणतात- “भागलो मी आता माझिया स्वभावे”

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें कृपा करोनि देवें आश्‍वासीजे

देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें अंगें हीं दातारें निववावीं

अमृताची दृष्टी घाळूनियां वरी शीतळ हा करीं जीव माझा

घेई उचलूनि पुसें तहानभूक पुसीं माझें मुख पीतांबरें

बुझावोनि माझी धरीं हनुवटी ओवाळुनी दिठी करुनी सांडीं

तुका म्हणे बापा अहो विश्‍वंभरा आतां कृपा करा ऐसी कांहीं

 

खालील एक अभंगही माझ्या खूप आवडीचा आहे. जेंव्हा कोणी तत्त्वज्ञानाचा खूप कीस पाडू लागते, तेंव्हा म्हणावेसे वाटते-

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड घेतां वाटे गोड नाम तुझें

नेणतें लेकरू आवडीचे तान्हे बोलतों वचनें आवडीनें

भक्ति नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं घातला विठाई भार तुज

तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि नाहीं माझे मनीं दुजा भाव

 

खरंच देवावर सर्व भार घालून राहणे- ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्यात क्षणोक्षणी आणि घडी घडीला येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर याच्या सारखा दुसरा उपाय नाही. आजकालच्या मॉडर्न सायन्सप्रमाणे सुद्धा relaxed राहणे हा सर्व प्रकारच्या टेन्शन वर उत्तम उपाय आहे.

अशा प्रकारे अनेक करुणापर अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी, काही शल्यें असतात, तो मनात राहतात, आणि ती आपण कोणापाशीही शेअर करू शकत नाही. जसे लहान मूल आपल्या आई पाशी सगळ्या गोष्टी शेअर करते, तसे मोठेपणी-

जाऊं देवाचिया गांवां देव देईल विसांवा

देवा सांगों सुखदुःख देव निवारील भूक

घालूं देवासीच भार देव सुखाचा सागर

राहों जवळी देवापाशीं आतां जडोनि पायांसीं

तुका म्हणे आम्ही बाळें या देवाचीं लडिवाळें

वरील अभंग हा उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात अगदी आर्तपणे गायला आहे. तो अभंग आपण आठवणीतील गाणी या वेबसाइट वर  खालील लिंकवर ऐकू शकतो. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Jau_Devachiya_Gava

तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल लिहितांना कोणताही अभंग सोडावासा वाटत नाही, इतके सर्व अभंग छान आहेत. आपण येत्या काही लेखांमधून आणखी काही अभंगांचा आस्वाद घेणार आहोत.

 आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

IFSC code search for Banks in India

IFSC featured image

IFSC Code Finder for Banks in India

goodworld.in
OR
0 results found
Enter search criteria and click Search

 

What is an IFSC code?

The full form of IFSC code is Indian Financial System Code. It is an 11 character alpha-numeric code  and is unique to each bank branch in India.

The IFSC code was introduced by the Reserve Bank of India (RBI) in 2008.  It was designed to modernize and streamline banking operations, particularly for electronic funds transfers.

The Indian Financial System Code (IFSC) has undergone a significant evolution since its inception. Over time, as the banking sector expanded and technological advancements took place, the IFSC system became an integral part of the National Electronic Funds Transfer (NEFT) and Real-Time Gross Settlement (RTGS) mechanisms. With the advent of Unified Payments Interface (UPI) and other digital payment platforms, IFSC codes have played a crucial role in ensuring secure and seamless transactions. Today, IFSC codes continue to be a fundamental component of India’s digital financial infrastructure, promoting efficient and standardized banking transactions. It is assigned by the Reserve bank of India to Banks in India.

IFSC Code Full Form and Its Components Explained

As mentioned above, the full form of IFSC means Indian Financial System Code. We will understand what each part of the code stands for:

IFSC example

First Four Characters (Alphabets) :

The initial four characters of the IFSC code represent the bank’s name. These characters are alphabetic and help identify the respective bank associated with the transaction.

Fifth Character (Zero) :

The fifth character of the IFSC code is always a zero. It has been reserved for future use and is currently static across all IFSC codes.

Last Six Characters (Alphanumeric) :

The final six characters of the IFSC code uniquely identify the specific branch of the bank. This alphanumeric combination is crucial for directing the funds accurately to the intended recipient.

These codes are allocated by the Reserve Bank of India (RBI) for identification purposes. This means that no two banks or their branches can have the same code.

Importance of IFSC Codes in Banking Transactions

Accurate Transfers :

The IFSC code plays a vital role in ensuring that funds are routed accurately to the intended recipient’s bank branch. With the unique alphanumeric combination, it eliminates the possibility of confusion and ensures that the funds reach the correct destination.

Electronic Transactions :

The IFSC code is particularly essential for transactions involving National Electronic Funds Transfer (NEFT), Real-Time Gross Settlement (RTGS), and Immediate Payment Service (IMPS). These electronic fund transfer mechanisms rely on the IFSC code to facilitate secure and efficient transactions.

Online Banking :

In the age of digital banking , where online transactions have become the norm, the IFSC code is a key component. Individuals conducting online transactions need to enter the IFSC code to initiate fund transfers, making it a crucial element in the digital banking ecosystem. It facilitates a plethora of online transactions such as paying bills, EMIs, insurance premiums, and taxes.

UPI Transactions :

Even in the case of Unified Payments Interface (UPI), which has gained immense popularity for its simplicity and speed, the IFSC code plays a role when transferring funds between different banks. While UPI transactions often use mobile numbers or virtual payment addresses, the IFSC code becomes relevant in cross-bank transfers.

International Transactions :

While the primary function of the IFSC code is for the domestic transactions, its concept aligns with the international standards of bank branch identification. For international transactions, SWIFT codes are used, serving a similar purpose to IFSC codes on a global scale.

Where to look for  Your Bank’s IFSC Code?

You can see your bank’s branch IFSC code at the following places:

On your  Cheque Book :

IFSC cheque-2

The IFSC code is usually printed on your bank’s cheque leaves. It is typically found at the top of each cheque leaf, either on the left or the right side.

Bank Account Passbook :

Check the front sheet of your bank passbook for account and branch details, including the IFSC. It is usually printed on the top right corner of the front sheet.

Your Account Statement

account statement

When you view or take a print out of your account statement online, you can see the IFSC code of your branch on the statement.

The need to search/ find the IFSC code of a bank branch:

When you want to transfer funds to someone either in the same Bank or another bank, you will need to first mention the IFSC code of the branch, and then the particular account number to which you want to transfer the funds. So when you know the name of the bank and branch, with the help of this tool, you can find the IFSC code and the full address of the branch immediately.

On the other hand, if you just know the IFSC code, you can find the full details of the bank, its branch and its address also with the help of this tool.

Although there are many tools available across the internet, including RBI own website, this tool has been developed by us with great efforts, taking into account the need of the common user as well as the Bankers and other financial agencies and is very convenient to use.

This tool uses list of 174898 IFSC codes provided by RBI  on its website updated as on 30.04.2025.

Precautions and disclaimer:

While going through the data available, we have found that in some cases, there are spelling mistakes- for example, the name of ‘AURANGABAD’ is mentioned as ‘AURANGABD’ in few places and AURANGABARD in one case. So you won’t get the results if you select ‘AURANGABAD’ in the drop down menu. The name of ‘BEED’ in Maharashtra is mentioned as “BID’ in some  places. The addresses of the branches have been jumbled up in case of merger of Banks.

However, we are sure, with the help of this tool, you will be able to find the information you are looking for very easily.

In case you find any anomalies, please inform us at goodworldmd@gmail.com so  that we can make necessary corrections.

Disclaimer

While we have made our best efforts to provide the user with  the latest data updated as available from RBI, users are requested to confirm the information with the respective bank before using the information provided. We accept no responsibility for the information provided on this platform and will not be responsible for any loss or damage suffered by any user, directly or indirectly by making use of the data provided on this website.

We expect you to use this website only for reference, and please confirm from the bank directly before performing any transaction.

Hanuman Chalisa Quiz

hanuman-2

जब आप क्विज़ शुरू करेंगे, तो पहली स्क्रीन जो आप देखेंगे उसे हनुमान चालीसा क्विज़- परिचय कहा जाता है। पहले दोहे के शब्द हल्के अक्षरों में दिखाई देंगे।  यादृच्छिक, वे  बिना किसी क्रम के आएंगे। उदाहरण के लिए-

श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।

ये सभी शब्द ऊपर दिए गए हैं। आपको शब्दों को अपनी उंगली से सही क्रम में खींचकर सही स्थानों पर रखना होगा। यदि शब्द का स्थान सही है तो वह वहां फिट होगा, अन्यथा नहीं। यदि उपरोक्त श्लोक के सभी शब्द सही स्थान पर हैं, तो आपको बधाई संदेश प्राप्त होगा, पूरा श्लोक पुनः लिखा जाएगा, तथा अगले श्लोक पर जाने के लिए अगला श्लोक(Next Shloka) नामक बटन दिखाई देगा। इस पर क्लिक करके आप अगले श्लोक पर चले जाएंगे और अगले श्लोक के शब्द आपके सामने उसी प्रकार प्रकट हो जाएंगे। इस तरह आप कुल 40 चौपाये पूरे कर सकते हैं। अंत में 

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप”

 

यह संदेश दिखाई देगा और आपको हनुमान चालीसा पूरी करने के लिए बधाई संदेश प्राप्त होगा। साथ ही, पूरी हनुमान चालीसा को एक ही स्थान पर पढ़ने के लिए एक बटन भी आएगा। इस पर क्लिक करके आप पूरी चालीसा एक ही स्थान पर पढ़ सकते हैं।

तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Hanuman Chalisa Quiz- Introduction या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत सुरुवातीच्या दोह्याचे शब्द येतील.  random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ-

श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि

यातील सर्व शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील  श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढील श्लोकावर गेले, की  पुन्हा पुढील श्लोकाचे शब्द त्याच प्रकारे तुमच्यासमोर येतील. अशा प्रकारे तुम्ही एकूण ४० चौपाया  पूर्ण करू शकता. शेवटी “

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप

हा मेसेज येईल आणि तुम्ही हनुमान चालीसा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनपर मेसेज येईल. तसेच पूर्ण हनुमान चालीसा  एका ठिकाणी वाचण्यासाठी एक बटन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण चालीसा एके ठिकाणी वाचू शकता.  

When you start the quiz, the first screen will appear to you – Hanuman Chalisa Quiz- Introduction. In it, the words of the first couplet will appear in faded letters. Random, that is, in no order. For example –

Shriguru Charan Saroj Raj Nij Manu Mukur Sudhari.

Baranau Raghuvar Vimala Jasu Jo Dayaku Phala Chari

All the words in this are given above. You have to drag the words in the correct order with your finger and place them in their correct places. If the place of the word is correct, it will fit there, otherwise it will not fit. If all the words of the above verse are placed in the correct place, you will get a congratulatory message, the entire verse will be rewritten, and a button called Next Shloka will appear to go to the next verse. By clicking on it, you will go to the next verse, or again the words of the next verse will appear in front of you in the same way. In this way, you can complete a total of 40 verses. Finally, “

Pavan Tanay Sankat Haran, Mangal Murti Roop.

Ram Lakhan Sita Sahit, Hridaya Basahu Sur Bhup”

This message will appear and a congratulatory message will appear for completing Hanuman Chalisa. Also, a button will appear to read the complete Hanuman Chalisa in one place. By clicking on it, you can read the complete Chalisa in one place.

Hanuman Chalisa Quiz

Hanuman Chalisa Quiz

हनुमान चालीसा

 

 श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।

बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार ।

बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।

 

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥

राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२॥

महावीर विक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुंडल कुँचित केसा ॥४॥

हाथ वज्र औ ध्वजा बिराजे ।

काँधे मूँज जनेऊ साजे ॥५॥

शंकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जग वंदन ॥६॥

विद्यावान गुणी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मनबसिया ॥८॥

सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥९॥

भीम रूप धरि असुर संहारे ।

रामचंद्र के काज सवाँरे ॥१०॥

लाऐ संजीवन लखन जियाए ।

श्री रघुबीर हरषि उर लाए ॥११॥

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावै ।

अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥१३॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कवि कोविद कहि सके कहाँ ते ॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा ।

राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र विभीषण माना ।

लंकेश्वर भये सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र योजन पर भानू ।

लील्यो ताहि मधुर फ़ल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही ।

जलधि लाँघि गए अचरज नाही ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रक्षक काहू को डरना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।

तीनहूं लोक हाँक ते काँपै ॥२३॥

भूत पिशाच निकट नहि आवै ।

महावीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरे सब पीरा ।

जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५॥

संकट तें हनुमान छुडावै ।

मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम राय सिर ताजा ।

तिनके काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।

सोइ अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारों जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु संत के तुम रखवारे ।

असुर निकंदन राम दुलारे ॥३०॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा हो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अंतकाल रघुवरपुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त ना धरई ।

हनुमत सेई सर्व सुख करई ॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६॥

जै जै जै हनुमान गोसाई ।

कृपा करहु गुरु देव की नाई ॥३७॥

जो शत बार पाठ कर जोई ।

छूटहि बंदि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़े हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥४०॥

 

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥॥