https://goodworld.in A website by Madhav Bhope

Marathwada Mukti Sangram Day

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /][web_stories_embed url=”https://goodworld.in/web-stories/marathwada-mukti-sangram-day/” title=”Marathwada Mukti Sangram Day” poster=”https://goodworld.in/wp-content/uploads/2024/09/cropped-marathwada-mukti-sangram-din-photo-pics-status-dp-wallpaper-2.webp” width=”360″ height=”600″ align=”none”]

Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024 हत्ती गणपती मंडळ पुणे- देखावा 2024

Video by Sachin Bhope on 15 September 2024

हत्ती गणपती मंडळ पुणे देखावा 2024

Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024

हत्ती गणपती मंडळ, नवी पेठ पुणे यांनी यावर्षी रावण वधाचा हलता देखावा सादर केला आहे, आणि तो पाहण्यासाठी श्रद्धाळूंची गर्दी उसळली आहे.

पुण्यातील नवी पेठ हत्ती गणपती मंडळाला १३३  वर्षांचा इतिहास आहे. १८९३ मध्ये देवकर, पानसरे, पडवळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी नवी पेठ हत्ती गणपती मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून ही श्रींची तिसरी मूर्ती आहे. या मूर्तीला ५९  वर्ष पूर्ण झाली आहेत. वाघावर हत्ती आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान असणारी महाराष्ट्रातील अशी ही एकमेव मूर्ती आहे.

या मंडळाने यावर्षी प्रभू श्री राम रावणाचा वध करताहेत असा हलता देखावा उभारला आहे. त्या देखाव्यात श्री हनुमान हे आकाशात उडतांना दाखवले आहेत. आणि श्रीराम धनुष्याला  बाण लावत आहेत, बाण मारत आहेत, आणि रावण खाली पडतो आहे, असे भव्य दृश्य उभारले आहे, आणि ते बघायला भाविकांची गर्दी उसळत आहे.

पुणे येथेच लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेश उत्सवाची प्रथा सुरू केली होती.  त्यावेळच्या इंग्रज सरकारविरुद्ध भारतीयांना एकत्र आणण्याचे एक हत्यार, तसेच लोकांमध्ये राष्ट्रीयत्व आणि अस्मिता जागृत करण्याचे एक साधन  म्हणून लोकमान्य टिळकांनी  हा उत्सव सुरू केला होता. त्यामुळे, पुणे म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाचे माहेरघर आहे असे म्हटले तरी चालेल.

पुण्याचे पाच प्रमुख गणपती हे मानाचे गणपती समजले जातात आणि येथे गणेश उत्सव पाहण्यासाठी येणारे भाविक त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. याबद्दल मराठी आणि हिन्दी मधील सविस्तर लेख याधीच लिहिला आहे, तो खालील लिंक वर वाचू शकता

पुण्याचे पाच मानाचे गणपति 

पुणे के पाँच सम्मान के गणपति 

Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024

खालील व्हिडीओ मध्ये आमच्या असीम आनंद या यू ट्यूब चॅनेल वर पुण्याचा हत्ती गणपती मंडळाचा वरील देखावा बघून प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घ्या. आपण ही बघा आणि इतरांना ही पाठवा.

व्हिडिओ आवडल्यास असीम आनंद या चॅनेलला यू ट्यूब वर  subscribe करा.

गणेश पुराण -2

ganesh puran

श्री गणेश पुराणात मागील भागात आपण पाहिले की प्राचीन काळी सोमकांत नांवाचा राजा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन, आपली राणी आणि प्रधानासह अरण्यात गेला. तिथे त्याला आधी ऋषिकुमार च्यवन आणि नंतर त्यांचे वडील भृगू ऋषींची भेट झाली. भृगू ऋषीं नी आपल्या ज्ञानाने राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तान्त जाणून राजाला त्याच्या पूर्व जन्मी केलेल्या पापांची जाणीव करून दिली.

याआधील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आता पुढे-

 भृगू ऋषींच्या तोंडून आपले पूर्वजन्मीचे चरित्र ऐकून राजाच्या मनात संशय निर्माण झाला, आणि त्यावर त्याचा सहजी विश्वास बसेना. तो बराच वेळ काही न बोलता बसून राहिला.

ganesh puran-2

तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर आपल्या चोंचींनी प्रहार करू लागले, त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू आणि तडफडू लागला. त्याने भृगू ऋषींना तळमळून विचारले, “ हा काय प्रकार आहे? हे पक्षी माझ्यावर असे का तुटून पडले आहेत?”

त्यावर भृगू ऋषी म्हणाले, “हे राजन, तुझ्या मनात माझ्या बोलण्याबद्दल विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतःकरणात विश्वास निर्माण झाला, तर माझ्या एका हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील.”

त्यावर सोमकांताने मनातील विकल्प टाकून दिले आणि तो भृगू ऋषींना शरण गेला. तेंव्हा ऋषींनी मोठ्याने हुंकार भरला, आणि काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले.

भृगू ऋषी पुढे म्हणाले, “राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे एवढी भयानक आहेत की त्यांचे निरसन करायला काय करावे हा मला मोठा प्रश्न पडला आहे.

तथापि गणपतीचे माहात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता आणि भक्तांच्या दोषांचा नाश करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून तू आता ‘गणेश पुराण’ श्रवण कर. त्यामुळे तू निष्पाप होशील.”

सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले, आणि तो ऋषींना म्हणाला, महाराज, तुम्ही  माझे कल्याणच करणार याबद्दल माझी खात्री आहे. कृपया मला या रोगातून सोडवा.

तेंव्हा भृगू ऋषींनी श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या प्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्मरूपाने एक काळाकभिन्न पुरुष बाहेर पडला. पाहता पाहता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लालबुंद होते. जीभ बाहेर लोंबत होती, त्याच्या विक्राळ मुखातून अग्निज्वाला आणि रक्त, पू, इत्यादि घाण पदार्थ बाहेर पडत होते. तो आपल्या विक्राळ दाढा चावीत भृगू ऋषींकडे पाहू लागला. मात्र भृगू ऋषीं शांत होते. त्यांनी त्याला विचारले, “तू कोण आहेस?’ तो विकट हास्य करून म्हणाला, “मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्मरूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला राजाच्या देहातून बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे. नाहीतर मी या राजासह सर्वांचा फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस म्हणून माझ्या राहण्याचीही व्यवस्था तूच कर. 

भृगुंनी त्याच्या म्हणण्याने विचलित न होता, त्याला म्हटले, ” तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणाऱ् नाही. आता यापुढे तो समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत रहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजराण कर.” ऋषींपुढे आपले काही चालणार नाही हे ओळखून तो पापपुरुष मुकाट्याने त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय वृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगुंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेंव्हा भृगु  सोमकांताला म्हणाले, “राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील, आणि हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल.

ganesh puran-2
Image credit raja biswas pinterest

त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला गणेश पुराण सांगितले. गणेश पुराण हे एक उप पुराण असून त्याचे 155 अध्याय आहेत.  मूळ पुराण संस्कृतात असून, आजवर बऱ्याच जणांनी त्याचे मराठीत सुलभ भाषांतर केले आहे. 

त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.  कोणाला जर ते amazon वरून खरेदी करायचे असल्यास खालील लिंक वरून घेऊ शकतात. 

1. श्री गणेश पुराण कथासार – धार्मिक प्रकाशन 

2. श्री गणेश पुराण कथासार- ह. भ. प. रंगनाथ महाराज खरात 

3. श्री गणेश पुराण कथासार-गोविंदराय 

माधव भोपे 

Mahalaxmi Festival in Maharashtra

[web_stories_embed url=”https://goodworld.in/web-stories/mahalaxmi-arrival/” title=”Mahalaxmi Festival in Maharashtra” poster=”https://goodworld.in/wp-content/uploads/2024/09/cropped-IMG-20240911-WA0010.jpg” width=”360″ height=”600″ align=”none”]

गणेश पुराण -1

ganesh puran

सध्या गणेश उत्सवाचा उत्साह ऐन भरात आहे. श्री गणेश हे महाराष्ट्राचे प्रमुख आराध्य दैवत आहे. त्यामुळे हे दहा दिवस साहजिकच गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. अशा वेळी आपण श्री गणेश पुराणातील गणेशाच्या काही गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे  राहील असे वाटते.

प्राचीन काळी नैमिषारण्यात एकदा 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. (आजच्या संदर्भात पाहिले तर नैमिषारण्य हे लखनौ पासून 80 किमी दूर, सीतापूर जिल्ह्यात गोमती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थ आहे. हे पूर्वीपासून ऋषींचे अत्यंत आवडते तपस्थळ आहे, मार्कंडेय पुराणात याचा अनेक वेळेला उल्लेख, 88 हजार ऋषींच्या तपस्थळी च्या रूपात आलेला आहे. या ठिकाणी आज ही भागवत पारायण इत्यादि सारखे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.) तर प्राचीन काळी चालू असलेल्या या यज्ञसत्रात शौनकादि ऋषि हे ऋत्विज होते. त्या यज्ञात मध्यंतरात सूत मुनि सर्वांना पुराणातील गोष्टी सांगत होते. त्यावेळी जमलेल्या श्रोत्यांनी त्यांना सर्वांना पावन करणारी अशी कथा सांगायची विनंती केली. त्यावरून सूत मुनींनी सुरूवात केली.

ते म्हणाले की आज मी तुम्हाला श्री गणेशाची कथा सांगतो. अठरा पुराणांचे श्रवण तुम्ही केले आहे. आता उप पुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण तुम्हाला सांगतो.

सूत सांगू लागले, श्रोतेहो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांचा नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूतें त्याच्या अधीन आहेत. विधी, हरी आणि हर हे ज्याची आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे माहात्म्य मी काय वर्णन करणार? तथापि त्याची अल्पशी सेवा म्हणून मी त्याचे चरित्र तुम्हाला सांगणार आहे.

गणेशाचे हे परम पावन चरित्र सर्वप्रथम ब्रह्मदेवाने महर्षि व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगुला सांगितले, भृगुंनी ते सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले.

सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा प्रारंभ करीत आहे.

सोमकांताची कथा1ca20187f65e03635f6cc35d21219deb

सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी

सोमकांत हा एक धर्मशील राजा होता आणि त्याच्या राजवटीत प्रजा आनंदात राहत होती. त्याची तेवढीच धर्मशील पत्नी सुधर्मा नावाची होती, आणि त्यांचा एक कर्तृत्ववान पुत्र हेमकंठ हा होता.

या सोमकांत राजाला अचानक कुष्ठ रोग झाला. या दुर्धर व्याधीमुळे राजाची फार वाईट अवस्था झाली, तो जीवनाविषयी अत्यंत निराश झाला, आणि त्याने सर्वांपासून  दूर, निर्जन अरण्यात जाऊन, उर्वरित काळ ईश्वरचिंतनात घालवायचा  निर्णय घेतला. त्याच्या पत्नी, मुलाने आणि प्रधान इत्यादि सर्वांनी त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण राजाने पक्के ठरवले होते.

राजाने आपला पुत्र हेमकंठ याला राज्याभिषेक केला, आणि पत्नी आणि दोन प्रधानांसह अरण्याकडे निघाला.

भृगू ऋषींची भेट.

राजा, राणी आणि प्रधान एका निबिड अरण्यातून जात असतांना त्यांना एक स्वच्छ पाणी असलेले सरोवर लागले. त्यांनी तिथे स्नान केले आणि तेथील शीतल पाणी पिऊन, तिथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. त्यावेळी तिथे एक सुंदर तेजस्वी ऋषिकुमार त्याठिकाणी आला. राजाची पत्नी सुधर्मा हिला त्याला पाहून आनंद झाला आणि तिने आदराने त्याला बोलावले व त्याची विचारपूस केली. त्यावर ऋषि कुमाराने आपले नांव च्यवन असल्याचे सांगितले आणि आपण भृगू ऋषी आणि पुलोमा यांचा पुत्र असल्याचे सांगितले. नंतर त्या च्यवन ऋषींनी राजा आणि सर्वांची माहिती विचारली व राजाला काय झाले आहे ते विचारले. त्यावर राणीने आपले नशिबाचे भोग त्याला सांगितले. ऋषि कुमार च्यवन याने फार व्यथित झाले. च्यवन जेंव्हा परत त्यांच्या आश्रमात गेले, तेंव्हा त्याने दुःखी अंतःकरणाने आपले वडील  भृगू यांना हा सर्व वृत्तान्त सांगितला. तेंव्हा भृगूंनीही करुणा युक्त अंतःकरणाने त्या सर्वांना आश्रमात घेऊन यायला सांगितले.

च्यवन ऋषि मग त्या सर्वांना आश्रमात घेऊन आले. आश्रमात गेल्यावर राजा सोमकांताने भृगू ऋषींना आपली व्यथा सांगितली. “हे ऋषि, या व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. माझ्या पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले आहे. मी तुमच्या शरण आहे. आता तुम्हीच मला या व्याधीतून मुक्त होण्याचा उपाय सांगा”

सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू ऋषि त्याला म्हणाले, “ राजा, पूर्व जन्मीच्या पापामुळेच तुला या व्याधीने ग्रासले आहे. आता काळजी करून नकोस. तू इथे आला आहेस तेंव्हा आता या व्याधीतून तुझी सुटका होणार याविषयी खात्री बाळग. मग ऋषींनी त्या सर्वांना उत्तम वस्त्रे देऊन, प्रेमाने पोटभर जेवू घातले आणि विश्रांती करावयास सांगितले.

सोमकांताचे पूर्वजन्मचरित्रprocess aws

दुसरा दिवस उजाडल्यावर भृगू ऋषींनी, नित्याची कर्मे आटोपल्यावर सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगू त्रिकालज्ञानी होते. त्यांनी राजाचे पूर्व जन्मचरित्र सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले,

“ विंध्य पर्वता जवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. त्याची पत्नी सुभगा. त्यांना उशिराने एक मुलगा झाला. त्याचे नाव कामदा. तो अत्यंत देखणा होता. दोघा पती पत्नींनी त्याचे खूप लाडात संगोपन केले. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न लावून दिले. त्यांना सात मुले आणि पाच मुली अशी अपत्ये झाली. कालांतराने चिद्रूप आणि त्याची पत्नी मरण पावले.

त्यांच्यानंतर कामदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता. तो अत्यंत अविचारी होता. त्याने त्या संपत्तीची उधळण करायला सुरूवात केली. अनेक व्यसने करू लागला. आपल्या पत्नीचेही ऐकले नाही. त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी व्यसनापाई त्याने राहते घरही विकले.  नंतरच्या काळात तो पैसे मिळविण्यासाठी चोऱ्या करू लागला. लोकांना त्रास देऊ लागला. राजाने त्याला हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना ठार मारू लागला. त्याने आपली टोळी बनवली. अरण्यातच वाडा बांधून तो राहू लागला.

एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या जंगलातून जात असतांना त्याला त्याने अडविले आणि त्याच्याकडे पैसे नसल्याने चिडून त्याला मारू लागला. त्यावर त्या ब्राह्मणाने त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याचे काही न ऐकता कामदाने त्याचा शिरच्छेद केला.

अनेक प्रकारची पापकर्मे करून तो निर्दयी झाला होता. पुढे त्याला वृद्धत्व आले. अनेक व्याधी जडल्या. दिसेनासे झाले. कुटुंब त्याचा तिरस्कार करू लागले.

मग तो अहोरात्र पश्चात्ताप करू लागला. मग त्याने दानधर्म करायचे ठरवले. पण त्याचे दान घ्यायला कोणीच त्याच्याकडे फिरकेना. शेवटी त्याने जंगलातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले. त्याने एक परिचित ब्राह्मणास बोलावून घेतले आणि त्याच्या मार्गदर्शना नुसार बरेच धन खर्च केले. लोकांच्या सोयीसाठी तेथे चार विहिरी बांधल्या. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्याला यम आणि चित्रगुप्तासमोर उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, “धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्य भोगू इच्छितो.” त्यानुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळें भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगा सारखी महाव्याधी झाली आहे.”

पुढील भागात वाचा:

पुढील भागात, सोमकांत राजाचा आधी ऋषींवर अविश्वास, नंतर दृढ विश्वास, ऋषींचे श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या अंगावर शिंपडणे,  सोमकांता चे पापमुक्त होणे, मग भृगू ऋषींचे सोमकांत राजाला श्री गणेशाचे माहात्म्य वर्णन करणे, 

त्यापुढील भागात ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षरी मंत्राचा उपदेश. 

Teachers day 2024 शिक्षक दिवस

Dr Sarvepalli Radhakrishnan Essay e1738409045331

Memories of Teachers Day 

Teachers day 2024 शिक्षक दिन 

शिक्षक दिवस की पुरानी यादें 

कौन हैं इस वर्ष  के पुरस्कार विजेता शिक्षक ?

पूरे वर्ष में कई दिन मनाए जाते है। लेकिन स्वतंत्रता दिवस और गणतंत्र दिवस को छोड़कर केवल 5 सितंबर को  शिक्षक दिन ही मुझे पक्का याद रहता है। उसका कारण है शिक्षक  दिवस से जुड़ी हमारी स्कूली जिंदगी की यादें और साथ ही हमारे संस्कारी उम्र में हमें पढ़ाने वाले हमारे गुरुजनों  की यादें।

जिस तरह भारत में शिक्षकों के प्रति कृतज्ञता  व्यक्त करने के लिए शिक्षक दिवस मनाया जाता है, उसी तरह यह पूरी दुनिया में मनाया जाता है, लेकिन 5 सितंबर को नहीं। यूनेस्को 5 अक्टूबर को विश्व शिक्षक दिवस के रूप में मनाता है।

दुनिया के 100 से ज्यादा देशों में अलग-अलग दिनों को शिक्षक दिवस मनाया जाता है। विश्व शिक्षक दिवस 5 अक्टूबर को मनाया जाता है।

 1994 में यूनेस्को ने शिक्षकों के काम को मनाने के लिए 5 अक्टूबर को ‘विश्व शिक्षक दिवस’ के रूप में मनाने की मंजूरी दी।

1962 से, हम भारतमें  प्रसिद्ध शिक्षाविद् और भारत के दूसरे राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन पर  शिक्षक दिवस मना रहा है।

सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर, 1888 को ब्रिटिश काल के मद्रास प्रेसीडेंसी के उत्तरी आरकोट जिले के एक गाँव तिरुतनी में एक तेलुगु ब्राह्मण परिवार (अब तमिलनाडु में तिरुवल्लूर जिला) में हुआ था। अपनी विद्वता के माध्यम से उन्होंने शिक्षा के क्षेत्र में अपनी पहचान बनाई। कुछ पश्चिमी दार्शनिकों द्वारा वेदांत दर्शन को गलत परिप्रेक्ष मे दिखाए जाने पर  व्यथित  होकर, उन्होंने वेदांत दर्शन और अद्वैत दर्शन का गहन अध्ययन करके, पश्चिमी दार्शनिकों को उत्तर देने के लिए 1914 में “द एथिक्स ऑफ वेदांत ” नामक एक थीसिस प्रकाशित की, जिसमे वेदान्त दर्शन के मूल सिद्धांत को सही तरीके से पेश किया गया। वह सनातन हिंदू दर्शन और अद्वैत वेदांत के कट्टर समर्थक थे।

राधाकृष्णन को 1952 में भारत का उपराष्ट्रपति चुना गया और 1962 में वे भारत के दूसरे राष्ट्रपति बने। वह 1967 तक भारत के राष्ट्रपति रहे । राधाकृष्णन को 1954 में भारत रत्न से सम्मानित किया गया था।

जब वे भारत के राष्ट्रपति बने तो जब उनके कुछ छात्र 5 सितंबर को उनका जन्मदिन मनाने उनसे मिलने गए तो उन्होंने सुझाव दिया कि उनका जन्मदिन मनाने की बजाय 5 सितंबर को देश के शिक्षकों के सम्मान में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाना चाहिए। तब से, 5 सितंबर को भारत में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है।

हमारे स्कूली दिनों मे शिक्षक दिवस की यादेंteachers day

शिक्षक दिवस पर, हम उस समय के अपने शिक्षकों को याद किए बिना नहीं रह सकते। शिक्षक दिन मुझे अपने  शिक्षकों  के जुनून की याद दिलाता है। उस समय शिक्षकों और बच्चों के बीच बहुत गहरे  संबंध हुवा करते थे।teachers day छात्रों को शिक्षकों के प्रति बहुत सम्मान था, और शिक्षकों का भी छात्रों के प्रति अपार स्नेह हुवा करता था। शिक्षक दिवस को विशेष रूप से याद किए जाने का एक कारण यह भी है की उस दिन छात्र शिक्षक की भूमिका निभाते थे।  शिक्षक दिवस पर स्कूल के होनहार छात्र अलग-अलग विषयों के ‘शिक्षक’ बना करते थे । और शिक्षकों की तरह क्लास मे पढ़ाते थे।  उनके सहपाठी बड़े उत्साह के साथ उनकी कक्षा में उपस्थित होते थे । कुछ नटखट छात्र  अपने  इन ‘शिक्षकों  के, कुछ कठिन सवाल पूछ कर मजे भी लिया किया करते थे । शिक्षक भी अपने विद्यार्थियों को क्लास मे पढ़ाते हुवे देखने के लिए कक्षा में आते थे । हेडमास्टर भी कोई छात्र ही बना करता था। एक  कार्यक्रम मे शिक्षकों के सम्मान मे भाषण भी होते थे और उनके कार्य की सराहना करके उनको धन्यवाद दिया जाता था।  

शायद यह प्रथा अभी भी शुरू है।  पाठकों से अपील है की, वह इस बारे मे अपने अपने अनुभव, नीचे कमेंट्स में लिखे। 

भारत मे. सन 1958 से शिक्षकों को उनके कार्य के लिए पुरस्कार से सम्मानित किए जाने की प्रथा चल रही है। 1962 मे जबसे 5 सितंबर को शिक्षक दिन मनाया जाने लगा, तबसे यह पुरस्कार हर साल 5 सितंबर को दिया जाने लगा.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त करने वाले शिक्षकों की सूची

भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा निम्नलिखित 50 शिक्षकों को 5 सितंबर को उत्कृष्ट शिक्षक के रूप में सम्मानित किया जाएगा। और उन्हें नकद रु 50000/ एक प्रमाण पत्र और एक रजत पदक प्रदान किया जाएगा।

  1. अविनाशा शर्मा – हरियाणा
  2. सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
  3. पंकज कुमार गोया – पंजाब
  4. राजिंदर सिंह – पंजाब
  5. बलजिंदर बराड़ सिंह – राजस्थान
  6. हुकम चौधरी चंद – राजस्थान
  7. कुसुम लता गरिया – उत्तराखंड
  8. चंद्रलेखा दामोदर मेस्त्री – गोवा
  9. चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर – गुजरात
  10. विनय शशिकांत पटेल – गुजरात
  11. माधव पटेल प्रसाद – मध्य प्रदेश
  12. सुनीता गोधा – मध्य प्रदेश
  13. के, शारदा – छत्तीसगढ़
  14. नरसिम्हा मूर्ति एचके – कर्नाटक
  15. द्विति चंद्र साहू – ओडिशा
  16. संतोष कुमार कर – ओडिश
  17. आशीष कुमार रॉय – पश्चिम बंगाल
  18. प्रशांत कुमार मारिक – पश्चिम बंगाल
  19. उर्फनामीन जम्मू – कश्मीर
  20. रविकांत द्विवेदी – उत्तर प्रदेश
  21. श्याम मौर्य प्रकाश यू – उत्तर प्रदेश
  22. डॉ. मिनाक्षी कुमारी – बिहार
  23. सुकेंद्र कुमार सुमन – बिहार
  24. के. सुमा – अंडमान एंड निकोबर द्वीप
  25. सुनीता गुप्ता – मध्य प्रदेश
  26. चारू शर्मा – दिल्ली
  27. अशोक सेनगुप्ता – कर्नाटक
  28. एच एन गिरीश – कर्नाटक
  29. नारायणस्वामी.आर – कर्नाटक
  30. ज्योति पंका – अरुणाचल प्रदेश
  31. लेफिजो अपोन – नागालैंड
  32. नंदिता च ओंगथम – मणिपुर
  33. यांकिला लामा – सिक्किम
  34. जोसेफ वनलालह्रुआ सेल – मिजोरम
  35. एवरलास्टी एनजी पाइनग्रोप – मेघालय
  36. डॉ.नानी जी देबनाथ – त्रिपुरा
  37. दीपेन खानिकर – असम
  38. डॉ. आशा रानी – झारखंड
  39. जिनु जॉर्ज – केरल
  40. के सिवाप रसद – केरल
  41. मिडी श्रीनिवास राव – आंध्र प्रदेश
  42. सुरेश कुनाट – आंध्र प्रदेश
  43. प्रभाकर रेड्डी पेसरा – तेलंगाना
  44. थदुरी संपत कुमार – तेलंगाना
  45. पल्लवी शर्मा – दिल्ली
  46. चारु मैनी – हरियाणा
  47. गोपीनाथ आर – तमिलनाडु
  48. मुरलीधरन रमिया सेथुरमन – तमिलनाडु
  49. मंटय्या  चिन्नी बेडके – महाराष्ट्र Z.P.UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI
  50. सागर चित्तरंज एन बागडेमहाराष्ट्र SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR

 

संबंधित शिक्षकों के स्कूल का नाम, पता सहित पूरी सूची और पूरी सूची के लिए यहां क्लिक करें।