https://goodworld.in A website by Madhav Bhope

तेथे कर माझे जुळती

indian woman

तेथे कर माझे जुळती

कर्तव्यदक्ष आणि मायाळू परदेशी मावशी

आपल्या सर्वांच्या घरी बहुधा भांडी घासणे, कपडे धुणे व स्वयंपाक या कामांसाठी मोलकरणी लावलेल्या असतात.बहुतेक वेळा  गृहिणी आपल्या मोलकरणीच्या कामाबाबत खूष नसते .  अर्थात त्याला कारणही तसंच आहे.आजकालच्या मोलकरणी पाट्या टाकल्या सारखं कसंतरी काम करतात . अर्थात सर्वजणी तशा नसतात, त्यात खूप जणी खूप चांगल्या पण असतात. पण बऱ्याच जणी  पूर्व कल्पना न देता सर्रास गैरहजर राहतात.दोन दिवस येणार नाही असं सांगून प्रत्यक्षात आणखी कांही दिवस गैरहजर राहतात.मोबाईल फोन लवकर घेत नाहीत किंवा घेतच नाहीत आणि असे का केले म्हणून विचारले तर बॅटरी संपली होती , हे किंवा असेच कांहीतरी थातुरमातुर कारण सांगतात .त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार कित्येक वर्षापासून रूढ झाला आहे .म्हणजेच जेवढा एका महिन्याचा पगार तेवढाच दिवाळीचा बोनस.तसेच आपण  कांही दिवस गावी गेलो किंवा मोलकरीण गावी गेली तर त्या कालावधीचा पगार कापायचा नाही.पुन्हा दोन तीन वर्ष झाली की हमखास पगारवाढ द्यावीच लागते.

बरं , मोलकरीण बदलावी म्हटलं तर लवकर दुसरी मोलकरीण मिळत नाही . आणि समजा यदाकदाचित मिळालीच तर ती आहे तिच्यापेक्षा कामचुकार निघाली तर काय घ्या. त्यामुळे आहे त्या मोलकरणी कडून काम करून घेणेच ठीक आहे अशी भूमिका बहुतेक वेळी घेतली जाते…असो ….

मी ज्यावेळी औरंगाबादला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो त्यावेळी  किरायाची खोली घेऊन रहात होतो. आमच्या त्या वाड्यात बरेच विद्यार्थी रहात होते.मी स्वयंपाकासाठी ज्या मावशी लावल्या त्या परदेशी मावशी म्हणून ओळखल्या जात होत्या. परदेशी मावशींचं  खरं नांव  कुणालाच माहित नव्हतं . रोज दोन वेळ स्वयंपाकासाठी एका विद्यार्थ्यासाठी महिन्याचा पगार वीस रूपये होता.यामध्ये भांडी घासणे समाविष्ट होते .

मावशीच्या हाताला खरंच चव होती.

मी रूमची एक किल्ली मावशींकडे देऊन ठेवली होती.मी बाहेर असलो तर मावशी परस्पर रूमवर येऊन स्वयंपाक करून जायच्या.

रूममधल्या सुतळीच्या तुकड्याला सुध्दा मावशींनी कधी हात लावला नाही..

मावशी अजब नगर मधे कुठेतरी रहात होत्या.माझ्या खोलीपासून सुमारे एक किलो मिटर अंतर होते.

मावशीला मूलबाळ नव्हते असे मला समजले. वाड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्या मुलासारखी माया करायच्या.

एकदा माझ्याकडे पीठ संपले होते. गहू दळून आणायला मला जमले नाही . कॉलेजला   गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संध्याकाळी रूम वर आलो तर मावशी छान पोळ्या करीत होत्या. मी विचारले , मावशी कणीक तर संपली होती ना ? मग ह्या पोळ्या कशा ? मावशी म्हणाल्या , सदाफुले (माझा मित्र आणि शेजारी) कडून पीठ आणलं .तुम्हाला उपाशी कसं ठेऊ ? नाही जमत कधी कधी पोरांना दळण आणायला . तेंव्हा मी असंच दुसऱ्या मुलाकडून पीठ आणून पोळ्या करते. तुमचं गिरणीतून पीठ आलं की सदाफुलेला त्यांचं उसनं घेतलेलं पीठ परत करील.

माझा भाचा, शंकर, याला त्याच्या परिक्षेच्या काळात मी माझ्या रूमवर एक महिना ठेऊन घ्यायचो. एकदा संध्याकाळचा स्वयंपाक करून मावशी निघून गेल्या. थोड्या वेळाने शंकर आला. माझ्याकडे राहण्यासाठी. त्याच्यापाठोपाठ मावशीही आल्या. मी म्हटले , आत्ताच तर तुम्ही स्वयंपाक करून गेलात ना. मग पुन्हा कशाला आल्या ? त्यावर मावशी म्हणाल्या शंकरसाठी स्वयंपाक करायचा म्हणून आले .

आणि त्यांनी कांही मिनिटात शंकरसाठी जास्तीचा स्वयंपाक केला ..

मावशींमध्ये किती माणुसकी, सहृदयता,  extreme devotion towards duty  हे दुर्मिळ गुण होते याचं आणखी एक उदाहरण देतो ..

एकदा  शहरात कुठेतरी दंगल झाली होती त्यामुळे शहरात कर्फ्यू लागला होता. त्यामुळे जेवणाची अडचण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.कर्फ्यूमुळे मावशी येणार नाहीत असं मी समजत होतो. पण माझा अंदाज सपशेल खोटा ठरला. मावशी त्यांच्या नेहमीच्या वेळेत रुमवर हजर झाल्या. मी म्हटलं , अहो मावशी , गावात संचारबंदी लागलीय. तुम्ही कशा आल्या आणि कशाकरता आल्या ?

मावशी म्हणाल्या मी मेन रोड चुकवून गल्लीबोळातून आले. पोरांना उपाशी कसं ठेवू? स्वयंपाक करून मग अशीच गल्लीबोळातून घरी परत जाईन .येतांना नाही का आले ? कुठे काय झालं ?’

मी अवाक् झालो !!!

आणि निरूत्तरही झालो.मनात म्हटले केवढ्या मोठ्या मनाची, कर्तव्यदक्ष आणि हिकमतीची आहे ही माय माऊली.

आमच्या वाड्यातल्या मुलांचा स्वयंपाक करूनच मग मावशी गल्लीबोळातून अजबनगरला आपल्या घरी गेल्या .

मित्रांनो , जगात चांगली  माणसे कमी प्रमाणात आहेत आणि अतिशय चांगली माणसे तर त्यापेक्षा कमी प्रमाणात आहेत .पण आहेत जरूर. अशा माणसांमुळेच जग चालले आहे.

 

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र सरकार 

उन्हाळ्यातील त्रासावर घरगुती उपाय

extreme-heat-man-standing-on-road

Health and Wellness category

गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्र खूप बदलले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढते आहे. यावर्षी तर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच उन्हाळा जाणवायला लागला, आणि आता मार्चच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच, मे महिन्यासारखे ऊन्ह पडते आहे. तापमान 40 डिग्री च्या जवळपास पोचले आहे.

उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागणे, कितीही पाणी पिले तरी तहान न भागणे, डोळे जळजळ करणे, अंगातील शक्ति कमी होणे, पाय दुखणे, लघवीला जळजळ होणे, अन्न पचन नीट न होणे, असे अनेक त्रास या दिवसांमध्ये आपल्यापैकी काही जणांना होतात.

काही दिवसांपूर्वी मीही अशाच काहीश्या त्रासाकरिता आमच्या नेहमीच्या वैद्यांकडे गेलो होतो. त्यांनी एक अत्यंत साधे घरगुती औषध सांगितले. त्याचे नांव षडंगपानीय. त्यात कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात किंवा जडीबूटीच्या दुकानात मिळणारी नेहमीच्या ओळखीची द्रव्ये आहेत.

  1. मुस्ता, म्हणजेच नागरमोथा
  2. पर्पटक म्हणजेच पित्तपापडा
  3. वाळा किंवा ज्याला उशीर असेही म्हणतात (जो आपण थंड पाण्याच्या माठात पूर्वी टाकायचो, ज्याचा सुवास येतो आणि पाण्याला छान चव येते व तहान भागते)
  4. रक्तचंदन (लाल रंगाचे चंदन)
  5. उदीच्य- पांढरे चंदन
  6. सुंठ पावडर

मुस्तपर्पटकोशीरचन्दनोदीच्यनागरै :
शृतशीतं जलं देयं पिपासा ज्वर शान्तये

भैषज्य रत्नावली . . ज्वराधिकार

वरील सर्व चूर्ण प्रत्येकी 20 ग्रॅम घेऊन, साधारण 1200 ml पाण्यामध्ये स्टीलच्या पातेल्यात उकळायचे. उकळून साधारण अर्धे झाले, की खाली काढून, गाळून थंड करून ठेवायचे.

वरील पाणी हे पित्त आणि कफ यांच्या विकारांवर उपयोगी आहे. तसेच वरील कारणामुळे आलेला ज्वर (ताप) ही यामुळे कमी होतो.

वरील पाणी जेंव्हा जेंव्हा तहान लागेल तेंव्हा, किंवा थोड्या थोड्या वेळाने, थोडे थोडे, म्हणजे घोट  घोट पीत राहायचे. मात्र रोज नवीन पाणी तयार करायचे.

मी वरील सर्व पावडर आणून असे पाणी घेतल्यावर खूप छान वाटले. थोड्याश्या पाण्यानेही, उष्णतेमुळे होणारे त्रास लगेच दूर झाले. वरील पाणी हे पाचक ही आहे. शरीरातील आम दोष, म्हणजे न पचलेला किंवा अर्धवट पचलेला जो भाग असतो, तो पचवला जातो.

काही वेळेला, अशा छोट्या छोट्या त्रासाकरिता, आपल्या family vaidya चा सल्ला सहजपणे खूप काम करून जातो. अर्थात त्यासाठी असे family vaidya प्रत्येक कुटुंबासाठी असले पाहिजेत.

अर्थात, वरील माहिती, ही कुठलाही वैद्यकीय सल्ला नाही. आणि मी कुणी जाणकार वैद्यही नाही. पण सोपा उपाय शेअर करावा म्हणून हा प्रपंच केला आहे.

वरील सर्व घटक असलेली तयार पावडरही काही ठिकाणी मिळते. त्यात Amazon वर काही उपलब्ध आहेत. 

पण त्यापेक्षा सर्व पावडर आपल्या जवळच्या दुकानातून आणून त्या एकत्र करून वापरणे जास्त चांगले असे मला वाटते. 

 

Ganesha idol
Ganesha idol
Stepped Stool
Stepping stool
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page

The Story of the 10th Man

story of the 10th man

The story of the 10th Man- दहाव्या माणसाची गोष्ट

वेद आणि उपनिषदांत त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितले आहेत. काही काही सिद्धांताना “ महावाक्य” असे म्हणतात. त्यातील छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसि अर्थात, “तूच ते ब्रम्ह आहेस” हे खूप प्रसिद्ध आहे. 

उपनिषदांतील हे सिद्धांत आपल्या आचार्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींद्वारे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. 

चौदाव्या शतकात विद्यारण्य  स्वामी हे तत्त्वचिंतक होऊन गेले. त्यांनी उपनिषदांतील सिद्धांतावर “पंचदशी” ही टीका लिहिली. त्यात त्यांनी एका मजेदार गोष्टीद्वारे एक मोठे तत्व विषद करून सांगितले आहे.

एकदा दहा मित्र जंगल भ्रमणासाठी निघाले होते. जंगलातून जाता जाता एके ठिकाणी त्यांना एक नदी लागली. नदी चांगलीच खोल होती. त्या नदीतून आपण सर्वजण पलीकडच्या तीरावर सुरक्षित पोंचू की नाही, याविषयी त्या सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली.  तरी सगळे मित्र एकमेकांचे हात धरून कसेबसे नदीच्या पैलतीरावर पोंचले. 

पैलतीरावर आल्यानंतर त्या सर्वांनी ठरवले, की आपण सगळे आलोत की नाही हे एकदा मोजून पाहू. 

ते सर्व गोल करून उभे राहिले. मग त्यातील एकाने त्याच्या डाव्या बाजूपासून मोजायला सुरूवात केली- एक-दोन-तीन- चार..असे करत करत त्याने नऊ पर्यंत मोजले आणि त्याच्या उजव्या हाताच्या मित्रापर्यंत येऊन थांबला. तो एकदम चमकून म्हणाला, “अरे देवा, आपण निघालो तेंव्हा दहा होतो. आणि आता फक्त नऊच आहोत. एक जण कमी आहे! हाय रे दैवा! आपल्यापैकी एक जण बुडाला वाटते.” 

त्याच्या बाजूचा मित्र म्हणाला “ अरे, थांब, थांब. तू नीट मोजले नसशील. मी मोजतो.” असें म्हणून त्यानेही त्याच पद्धतीने मोजले, आणि अर्थातच ते नऊच भरले. आता त्याची खात्री झाली. मग एकेक करत बाकीच्या सर्व मित्रांनी त्याच पद्धतीने मोजले आणि सर्वांची गणती नऊच भरली. तेंव्हा ते सर्व खाली बसून मोठमोठ्याने रडू लागले आणि आपल्यातील एकजण बुडाला म्हणून शोक करू लागले. 

तिकडून एक पांथस्थ चालला होता. त्यांचे रडणे ऐकून तो थांबला, आणि काय झाले म्हणून विचारू लागला. 

तेंव्हा सर्व मित्रांनी त्यांचे रडण्याचे कारण सांगितले. तो वाटसरू हुशार होता. त्याने पट्कन मोजून पाहिले तेंव्हा त्याला दहा लोक दिसले. मग तो त्या सर्वांना म्हणाला, “ शांत व्हा, शोक करू नका. तुमच्यातील कोणीही बुडाले नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा.” 

तेंव्हा ते मित्र त्याला म्हणाले, “तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? तुम्ही आम्हाला दहावा मित्र दाखवा, तर आम्ही विश्वास ठेवू”. 

मग त्या वाटसरूने त्यातील पहिल्या मित्राचा हात धरून त्याला पुन्हा मोजायला सांगितले. एक- दोन करीत तो जेंव्हा नवव्या पर्यंत आला, तेंव्हा मग त्या वाटसरूने त्याचा हात धरून त्या मित्राकडे स्वतः कडे वळविला, आणि म्हणाला, “ त्वं दशमस्ति” तूच तो दहावा आहेस. त्याबरोबर त्या मित्राला परम आनंद झाला आणि  “सापडला, सापडला, दहावा सापडला!” असे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. त्या वाटसरूने एकेक करीत त्या दहाही मित्रांना अशा प्रकारे त्यांच्यातील कोणी हरवला नसल्याची खात्री करून दिली. 

वरील उदाहरणात, वास्तविक, दहावा कुठे गेलेलाच नव्हता, आणि मोजणारा स्वतःच तो होता. पण तो स्वतः ला सोडून सगळ्यांना मोजत होता. 

 

वरील उदाहरणात मनुष्याच्या अध्यात्मिक वाटचालीतील 7 टप्पे आहेत.

  1. Ignorance- अज्ञान- नदीच्या अलीकडील तीरावर असतांना, पुढील मार्गाबद्दल काहीच माहीत नसणे.
  2. Covering of the truth- आवरण. दुसऱ्या टप्प्यात नदीच्या दुसऱ्या तीरावर आल्यावर, एकजण कमी आहे असे वाटणे. म्हणजेच, खरे तर सत्यावर आलेले आवरण.
  3. Suffering- -born out of the first 2 विक्षेप: म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यांमुळे निर्माण झालेले दुःख.
  4. Indirect knowledge- परोक्षज्ञान. जेंव्हा त्याला इतर कुणी( अर्थात गुरु किंवा तत्सम ज्ञानी पुरुष) सत्य परिस्थिती सांगतो, तेंव्हा त्यावर तो विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो.
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान. म्हणजे जेंव्हा त्याला स्वतःला त्या सत्याचा अनुभव येतो.
  6. Removal of sufferning/sorrow-दुःख निवृत्ती. सत्याचा अनुभव आल्यानंतर दुःख नाहीसे होते.
  7. Bliss- – happiness- तृप्ति- त्यानंतर त्याला करण्यासारखे काही राहत नाही. तो कृतकृत्य होतो.

वरील उदाहरण रामकृष्ण मठाचे  स्वामी सर्वप्रियानंद यांच्या प्रवचनातून वेचून, इथे प्रस्तुत केले आहेत. तसेच इतर काही स्रोतांचा इथे वापर केला आहे. 

काहीतरी सकस वाचूयात.
उन्नतीच्या मार्गावर चालूयात!

The story of the 10th Man.

In the Vedas and Upanishads, some eternal principles are stated. These are are called  “Mahavakyas”, meaning the “great phrases.” Of these, the “Tattvamsi” of the Chhandogya Upanishad, which means “You are that Brahma”, is very famous.

These principles in the Upanishads have been explained by various scholars in the ancient times in a very simple manner through some stories.

The 14th century scholar Vidyaranya swami had written a book called “Panchadashi” in which he explains the principle very lucidly with the help of an interesting story.

Once ten friends were passing through a forest.  On their way through the forest, at one point they came across a river. The river was quite deep. They all doubted whether all of them would be able to reach the other end safely.  So all the friends held each other’s hands and somehow reached the other end of the river.

After coming to the other end, they all decided to count their numbers to ensure that none of them was left out.

They all stood in a circle. Then one of them started counting from his left side—  one-two-three, four..In doing so, he counted upto nine and reached for his right-hand friend. Then he stopped as there were no more to be counted. He was terrifed and said, “Oh my God, we were ten when we started. And now we’re only nine. One less!  One of us seems to have drowned!.”

The friend next to him said ” Oh, wait, wait. Perhaps you have not counted properly. Let me count.”  So he counted the same way, and to his horror, it was nine again! So he was also convinced and joined the first friend and started yelling. Then, one by one, all the other friends counted in the same way, and all counted nine. Then they all sat down and started crying loudly and mourning the death of one of them. 

There was a passerby walking from there. Hearing them cry, he paused, and began to ask what had happened.

Then all the friends told him the reason for their grief.  The passerby was a normal person and he could clearly see that there were 10 of them.. Then he said to them, ” Calm down, don’t mourn. None of you have drowned, trust me.”

Then the friend said to him, how can I trust you? If you show us the tenth friend, we’ll believe it.

Then the passerby grabbed the hand of his first friend and asked him to count again. When he came to the ninth, counting from one, two etc,  then the passerby took his hand and turned it to the friend himself, and said, “You are the tenth.” It suddenly dawned on to the first friend that no one was lost and he himself was the 10th one.  With that, the friend was overjoyed and said, “Found, found, tenth found!” So he started dancing with joy. One by one, the passerby convinced all ten friends that none of them had been lost and in fact they were the 10th friend.

The above story depicts 7 stages in the spiritual life of a person.

7 stages in the story of the 10th man

  1. Ignorance- अज्ञान 
  2. Covering of the truth-आवरण 
  3. Suffering- विक्षेप -born out of the first 2. projection of imagined tragedy
  4. Indirect knowledge-परोक्ष ज्ञान 
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान 
  6. Removal of suffering/sorrow-दुःखनिवृत्ती 
  7. Bliss- – happiness-तृप्ति 

The above story and its explanation is sourced from the discourses of Swami Sarvapriyananda of Ramkrishna Math and some other sources.

Let us read something healthy and walk on the path of self realization.

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product 

Interesting story of parrot पोपटाची गोष्ट

story of parrot

Story of parrot

एकदा एक पोपट पकडणारा पारधी होता.  त्याने जंगलात एक पाण्याचे छोटेसे कुंड बनवले होते. त्यावर एक लाकडाची दांडी आडवी ठेवली होती. तिच्यावर पोपट बसला, की ती दांडी उलटी होत असे. पोपट जेंव्हा खाली बघत असे तेंव्हा चहूबाजूनी त्याला खोल पाणी दिसत असे. त्यामुळे पोपट त्या दांडीला घट्ट पकडून ठेवत असे. मग तो पारधी येऊन त्या पोपटाला पकडून नेऊन बाजारात विकत असे. 

हे दृश्य पाहून एका दयाळू माणसाला’ त्या पकडल्या जाणाऱ्या पोपटांची दया आली. त्याने एक पोपट घेतला, आणि त्याला शिकवले- “हे बघ पोपटा, जिथे पाण्याचे असे कुंड असेल, तिथे जायचे नाही.”

तेंव्हा पोपटाने ते पाठ करून तो तसेच म्हणू लागला. मग माणसाने  त्याला सांगितले, की “तिथे आडवी दांडी असेल, तिच्यावर बसायचे नाही”. पोपटाने  ते पण पाठ केले. मग माणसाने  त्याला शिकवले-  “चुकून बसलाच, तर उडून जायचे! उडून गेलास  तर पकडला जाणार नाहीस”. पोपटाने तेही पाठ केले आणि तसेच म्हणू लागला.  असे शिकवून दयाळू माणसाने  पोपटाला  सोडून दिले.  त्या पोपटाने इतर पोपटांनाही हे शिकविले. 

नंतर एके दिवशी पुन्हा त्या पारध्याने पाण्याच्या कुंडावर आडवी दांडी ठेवली.  तो शिकवलेला  पोपट उडत उडत तिथे गेला, आणि त्या आडव्या दांडीवर बसला! आणि तोंडाने म्हणू लागला, “पाण्याच्या कुंडीवर जायचे नाही, आडव्या दांडीवर बसायचे नाही, बसले तरी  उडून जायचे, म्हणजे आपण पकडले जात नाही.”

पण प्रत्यक्षात काही त्या पोपटाने ती दांडी सोडली नाही. खाली पाणी  दिसत होते, आणि त्याला पाण्यात बुडून मरण्याची  भीती वाटत होती. दांडी सोडली तर आपण उडू शकतो हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. 

तेवढ्यात पारधी येऊन त्या पोपटाला पकडून घेऊन गेला. 

अशीच काहीशी अवस्था आपली सर्वांची तर नाही? 

याच प्रकारे वानराला  पकडणारे लोक, एका अरुंद तोंडाच्या घड्यात चणे ठेवून देतात. वानर येते आणि हात घड्यात घालून ते चणे मुठीमध्ये घेऊन बाहेर काढू बघते. पण मूठ बांधलेली असल्याने ती अरुंद तोंडातून बाहेर येऊ शकत नाही, आणि वानर चणे सोडत नाही. वानर पकडणारा येऊन सहज त्याला पकडून घेऊन जातो.

परोपदेश बेलायाम् सर्वे शिष्टा भवन्ति  हि |

विस्मरन्ति   तत्सर्वं स्वकार्ये समुपस्थिते |

 

 

नारायण, नारायण!

सुख दुःख की परिभाषा

shriram

प्रत्येक परिस्थिति- साधन सामग्री- कल हमने देखा कि

सुख-दुःखकी एक परिभाषा यह हुई कि सुख नाम हुवा बाहरकी अनुकूल सामग्री का और दुःख नाम हुवा बाहरकी सामग्रीके अभाव का. 

दूसरी वास्तविक परिभाषा सुख-दुःखकी यह है कि जिसके मन मे हर समय प्रसन्नता ‘रहती है-वही सुखी है. 

चाहे उसके पास बाहरी सामग्री कम है अथवा नही है या बहुत अधिक है, पर जिसके मनमे चिंता-फिकर नही है, वही सुखी है. 

बाहरकी सामग्री अत्यधिक मात्रा मे रहते हुवे भी हृदय जलता है, मनमे दुःख-संताप है, तो वह दुःखी ही है 

अब मन मे प्रश्न उठता है कि  किसी के यहाँ चोरी हुवी, किसी को किसीने चोट पहुंचाई, नुकसान किया,या अपमानित किया, तो दूसरा व्यक्ति दुःख देनेवाला हुवा न? फिर यह कैसे कहा गया कि दुःख देनेवाला कोई दूसरा नहीं है? 

इसका उत्तर यह है कि दूसरे व्यक्ति दुःखदायी  परिस्थिति तो पैदा करते है, किन्तु उस परिस्थितिमे  दुःखी होना अथवा न होना, यह अपने हाथ की बात है। कोई भी हमे दुःखी होनेके लिए बाध्य नहीं कर सकता। दुःखकी परिस्थिति देनेमे जो दूसरे निमित्त बनते है, वह हमारे प्रारब्ध का फल है; परन्तु  हर परिस्थितिमे हम प्रसन्न रह सकते है।  

सुख की सामग्री और दुःख की सामग्री दोनों ही भगवतप्राप्तिकी  साधन सामग्री है। फ़रक  इतना है कि दुःखदायी  परिस्थिति जल्दी कल्याण करनेवाली है। क्योंकि दुःखदायी परिस्थितिमे भगवान याद आते है.

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय ॥- संत कबीर 

स्वामी रामसुखदासजी महाराजके ‘कल्याणकारी प्रवचनों से 

 

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product 

प्रत्येक परिस्थिति-उन्नतीकी सामग्री

shriram and nishadraj

सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता
परो ददातीति कुबुद्धिरेषा।
अहं करोमीति वृथाभिमानः
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः॥

 

भगवान श्रीराम वनवासमे  गये तो दूसरी रात्रीमे  शृंगवेरपूरमे विश्राम किया. गुहने बहुत आदर-सत्कार किया. रात्रीके समय जब श्रीरामजी सो गये तब लक्ष्मणजी धनुष्य-बाण लेकर पहरेपर बैठ गये. वहा आपस मे वार्ता हो रही थी. निषादराजने कहा- देखो! उस कुटिल कैकेयीने  रामजी और सीताजी को सुखके अवसर पर दुःख दे दिया.

तब लक्ष्मणजीने उपरोक्त श्लोक कहा. 

इस श्लोक का अर्थ है कि  सुख-दुःख का देनेवाला दूसरा कोई नही है. सुख दुःख दूसरा देता है यह  मानना कुबुद्धी है.

‘दुःख तो दूसरा देता है और सुख मै स्वयं कर लेता हूं ‘ यह मानना झूठा अभिमान है . सभी मनुष्य अपने कर्म-सूत्रसे बंधे हुवे है. सभी अपने किये हुवे कर्मो का फल भोगते है. 

सीधी बात तो यही है कि  सुख-दुःख अपने  कर्मो का ही फल-भोग है, पर वास्तवमे सुखी और दुःखी होना कर्मो का फल नही  है; यह तो मूर्खताका फल है . 

प्रायः लोग कहते है- “जिसके पास बाहरकी सामग्री बहुत है तथा जिसको अनुकूल परिस्थिती प्राप्त है- वह बहुत सुखी है.” 

बडा घर है, पासमे रुपये बहुत है, कुटुंब अनुकूल है; शरीर निरोग है; समाजमे सब तरहसे इज्जत-प्रतिष्ठा है तो वह सुखी समझा जाता है; और जिसके पास अन्नका अभाव है; संतान  नही है; शरीर रोगी है; रहनेके  लिये घर नही है, पासमे पैसा नही है, तो वह मनुष्य बहुत दुःखी कहा जाता है. 

सुख-दुःखकी एक परिभाषा यह हुई कि सुख नाम हुवा बाहरकी अनुकूल सामग्री का और दुःख नाम हुवा बाहरकी सामग्रीके अभाव का. 

दूसरी वास्तविक परिभाषा सुख-दुःखकी यह है कि जिसके मन मे हर समय प्रसन्नता ‘रहती है-वही सुखी है. 

चाहे उसके पास बाहरी सामग्री कम है अथवा नही है या बहुत अधिक है, पर जिसके मनमे चिंता-फिकर नही है, वही सुखी है. 

बाहरकी सामग्री अत्यधिक मात्रा मे रहते हुवे भी हृदय जलता है, मनमे दुःख-संताप है, तो वह दुःखी ही है 

 

 

स्वामी रामसुखदासजी के प्रवचनोसे . 

 

इसका आगेका भाग अगले ब्लॉगमे पढिये.

 

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product