https://goodworld.in A website by Madhav Bhope

पुण्याजवळील पावसाळ्यातील पर्यटनस्थळे

madhe ghat

पावसाळ्यात फिरायला जाण्यासारखी पुण्याच्या जवळील नेहमीपेक्षा वेगळी पर्यटन स्थळे

यावर्षी पुणे आणि परिसरात पाऊस अगदी मनासारखा झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस जवळ जवळ रोज हजरी लावत होता. मध्यंतरी तर अति पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्यामुळे तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे पुण्यात बरीच धावपळ ही झाली होती आणि नुकसान ही झाले होते. तसेच काही जणांना अति उत्साहामुळे जीवही गमवावा लागला होता. 

आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे आहे.  आणि अशा वातावरणात बाहेर पडून निसर्गाच्या हिरवाईचा आस्वाद घेण्यात एक वेगळाच आनंद आहे. 

नेहमीच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी होत असल्यामुळे, अशा वेळी पर्यटकांचा हिरमोड होतो. अशा वेळी तितक्याच सुंदर, पण तुलनेने कमी गर्दी असणारी पर्यटन स्थळे असली तर किती छान असे वाटते. 

पुण्याच्या आसपास असणाऱ्या अशाच 11 पर्यटन स्थळांविषयी माहिती वाचा. 

यात अजून अधिकाधिक माहिती add करण्याचा प्रयत्न राहील. तेंव्हा या पोस्टला पुन्हा पुन्हा विजिट देत रहा.

  1. मढे घाट धबधबाmadhe ghat

पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या राजगड तालुक्यातील केळद गावातील मढे घाट धबधबा म्हणजे जणू मिनी महाबळेश्वर म्हणता येईल असे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हिरव्यागार वनश्री ने नटलेला हा परिसर आहे.

पुण्यापासून अंतर- 68 ते 80 किमी

कसे जाणार- पुणे-खडकवासला -पाबे घाटमार्गे वेल्हे-केळद (68 किमी) किंवा पुणे-नरसापूर-मार्गासनी-वेल्हे–केळद  (80 किमी)

123movies

embedgooglemap.net

  1. बेंदेवाडी धबधबाbendewadi

आंदर मावळ भागातील हा धबधबा दुर्गम भागात असला तरी सध्या या भागाची ओळख बनला आहे.

पुण्यापासून अंतर- 70 किमी

कसे जाणार- पुणे-कान्हेफाटा-टाकवे बुद्रुक-वडेश्वर-डाहूली-बेंदेवाडी धबधबा

  1. 123movies

    embedgooglemap.net

    दाऱ्या घाट- आंबोली

    darya ghat
    Click this image to watch video

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असणार्या. असणार्या. दाऱ्या  घाटाचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात पहाण्यासारखे असते पायथ्याशी असलेले निसर्गसौंदर्याने नटलेले आंबोली गाव  परिसरातील मुख्य सांडेदरा व वर्जंड धबधबा, मीना नदीचा उगमस्थान असलेले श्री क्षेत्र मीनेशवर, ढाकोबा व मारुती मंदिर, खळखळून वाहणारे ओढे, पावसाळ्यात डोंगरावरून फेसाळत वाहत येणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

पुण्यापासून अंतर- 112 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर- दाऱ्या घाट

  1. 123movies

    embedgooglemap.net

    आंबे हातवीजambe hatvij

जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील आंबे हातवीज परिसरात कांचन धबधबा, दुर्गादेवी मंदिर, कोकण कडा, देवराई, खुटादरा व डोनीदरा आदि परिसरात विविध प्रकारची जैव विविधता आहे.

पुण्यापासून अंतर-135 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर – आंबे हातवीज

  1. 123movies

    embedgooglemap.net

    डिंभे धरणDimbhe Dam Ambegaon Pune 3

आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशय परिसर  हा हिरवाईने नटला असून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जातांना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे मनमोहक स्वरूप पाहावयास मिळते.

पुण्यापासून अंतर-97 किमी

कसे जाणार- पुणे-मंचर-घोडेगाव-शिनोली- डिंभे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    123movies

    embedgooglemap.net

    वरंधा घाटVarandha Ghat

भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे श्रावणात ऊन पावसाचा खेळ बघणण्यास एक वेगळीच मजा असते. घाटात, पाऊस सुरू होताच धबधबे दिसायला लागतात.

पुण्यापासून अंतर-110 किमी

कसे जाणार- पुणे-भोर- वरंधा घाट

  1. आहुपे-

    AhupeGhatTrekJuly32011
    Trek continues… Gorkhgad seen in the backdrop.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेले, भीमाशंकर अभयारण्यातले आहुपे हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोकाचे गाव आहे. सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण, डोंगर दऱ्यातून वाहणारे लहान मोठे धबधबे, धुके, इत्यादि येथील मुख्य आकर्षण आहे.

पुण्यापासून अंतर-137 किमी

कसे जाणार-  पुणे-मंचर-घोडेगाव- डिंभे-फुलवडे-अडीवरे-तिरपाड-आहुपे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    नाणेघाट परिसर86351572Nane Ghat naneghat 4

नाणेघाट परिसरात पश्चिम घाट रांगेतील एक पर्वतीय खिंड, सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्ग, ब्राह्मी लिपी आणि मध्य इंडो-आर्यन बोलीतील संस्कृत शिलालेख असलेली प्रमुख गुहा, जकातीचा दगडी रांजण,  खळखळणारे ओढे, धबधबे व निसर्ग सौदर्य आकर्षक ठरते.

पुण्यापासून अंतर-125 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर- नाणेघाट

  1. 123movies

    embedgooglemap.net

    मयूरेश्वर अभयारण्यBlackbuck

बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे ठरत आहे. सुमारे 514 हेक्टर परिसरात हे अभयारण्य पसरलेले आहे. हे चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असून, विविध पक्षी आणि प्राण्यांचेही इथे दर्शन घडते.

पुण्यापासून अंतर-75 किमी

कसे जाणार- पुणे-चौफुला(ता. दौंड)-सुपे- किंवा हडपसर-सासवड-जेजुरी -मोरगाव-सुपे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    श्री क्षेत्र भुलेश्वरimages 26

श्रावण महिन्यात श्री शंकराचे दर्शन घ्यायचे असेल तर पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे यादवकालीन शंकराचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरावर शिल्पात कोरलेल्या मूर्ती आहेत. याची रचना वेरूळच्या मंदिरासारखी आहे. पुरातत्त्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे.

पुण्यापासून अंतर= 55 ते 60 किमी

कसे जाणार-पुणे-यवत- भुलेश्वर, किंवा, पुणे-सासवड-भुलेश्वर

  1. 123movies

    embedgooglemap.net

    सोनगावचे ‘सोनेश्वर मंदिर’soneshwar temple

बारामती तालुक्यातील कऱ्हा व नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनगावचे ‘सोनेश्वर मंदिर’ हे धार्मिक स्थळाबरोबर पर्यटन स्थळ ही आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते.  या काळात इथे युरोपातून ‘भोरड्या’ पक्षी मोठ्या संख्येने येतात. पक्षी निरीक्षकांसाठी ही एक पर्वणीच असते.

पुण्यापासून अंतर- 116 किमी.

कसे जाणार-पुणे-बारामती-सोनगाव.

  

123movies

embedgooglemap.net

The art of Compartmentalization कम्पार्टमेंटची गम्मत

lfhealth240225 photos

Guest article by vaidya Sohan Pathak

कंपार्टमेंट ची गंमत..

 
मानसिक ताणतणावामुळे शुगर वाढलेला एक रुग्ण आमच्या मधुमेह तज्ञ मित्राने समुपदेशनासाठी पाठवला होता.
 
ऑफिसमधला कामाचा ताण,उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून सुरु केलेला छोटा व्यवसाय ,त्याची वाढती जबाबदारी ,कौटुबिक ताण ,वाढणारी रक्त शर्करा एकंदर बऱ्यापैकी  वैतागलेला,पत्नीच्या भाषेत चिडचिडा स्वभाव अशी एकंदर रुग्णाची परिस्थिती होती.त्याचा मनात सतत आपण कुठे कमी पडणार तर नाही ,मला कुटुंबातले सदस्य समजावून घेत नाहीत असे विचार येत व त्या मुळे निद्रानाश , डोकेदुखी सारखे आणखी विकार मागे लागले होते.
 
 
सुरवातीला, तुम्ही डायनिंग टेबल वरचं खाण्याचं सामान नेहमी बेडरूम मध्ये ठेवता का ? किंवा रोज हॉलमधल्या चपला स्वयंपाक घरात आणता का ? असा प्रश्र्न मी विचारल्यावर
आता हा अजून काय नवीन प्रकार, अशा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहिले.

ignoring

 
नंतर त्याच्यांशी संवाद साधताना मी कंपार्टमेंट विचार पद्धती ची मजा सांगितली .
 
आपण कोणत्याही घटनेचा विचार करताना त्याचा संबंध अनेक घटनांशी लावत असतो.  उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि घरी आल्यावर मुलांचा गोंधळ चालू असेल किंवा पत्नीशी मतमतांतर झाले असेल तर आपण ऑफिसमधला ताणतणाव डोक्यात ठेवून मुलांवर किंवा पत्नीवर रागवतो .त्यांच्याशी नीट बोलत नाही.angry man1 
 
तसंच निर्णयाच्या बाबतीत कौटुंबिक मतभेद झाले तर आपण मतभेद झाले हाच विषय डोक्यात ठेवून इतर वेळी सामान्य पण वागत नाही .आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना मतभेद झालेला विषय डोक्यात ठेवून पूर्वग्रह दूषित संवाद करतो. त्यामुळे तो विसंवादच जास्त होतो .

silhouette, couple, people man-2480321.jpg

 
आपण आपली भूमिका नेमकी ठेवत नाही.आपल्या सगळ्या भूमिकांची सरमिसळ आपण करत असतो. जेव्हा वडील म्हणून काही संवाद साधायचा असेल तेव्हा आपली ऑफिसरची भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे पण मुलांची बोलताना बऱ्याच वेळा ऑफिसर च्या भूमिकेतूनच आपण बोलतो कुटुंबियांशी संवाद साधताना किंवा पत्नीशी संवाद साधताना अगोदर झालेल्या घटना, मतभेद डोक्यात ठेवून आपला संवाद होतो प्रत्येक वेळी मागे झालेल्या चुका संदर्भासाठी ठेवूनच आपण त्यांच्याशी बोलतो. 
 
 हा भूमिकांची सरमिसळ असलेला संवाद खूप त्रासदायक होतो. साधं “पाणी दे” हे वाक्य बोलताना सुद्धा मागच्या वेळेस पाणी थोडं सांडलं होतं हा रेफरन्स डोक्यात ठेवून पाणी न सांडता आण , असं बोलल्यास समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या चुका आठवून बोलण्याची तयारी करते . त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहून वादविवादाची ठिणगी पडते.
 
एखाद्या सुनेला स्वयंपाक जमत नाही म्हणून ती वाईट किंवा सासूंचे कामात सहकार्य नाही म्हणून बेबनाव अशा विचारांच्या गोंधळामुळे त्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्या लक्षात येत नाही.  जरी सुनेला स्वयंपाक येत नसेल, तरी ती नोकरी करते घर टापटीप ठेवते ,चांगलं लिहिते ,मुलांचा अभ्यास घेते सामाजिक संपर्क चांगला आहे ,कुटुंबियांची काळजी घेते घरातील महत्त्वाच्या गोष्टी मध्ये लक्ष घालते असे चांगले गुण तिच्यामध्ये असू शकतात पण आपण कंपार्टमेंटचा गोंधळ घातल्यामुळे आपल्या दृष्टीने ती वाईटच असं दृष्टिकोन होऊ शकतो. 
 
तसेच सासूबाईंना नातवांच्या जबाबदारी मधे , आज्ञार्थक बोलण्यामुळे, मतमतांतर असले तरी पण त्यांचे अनुभव ,त्यांचं घरातल्या अस्तित्व त्यांनी घराला घरपण देण्यासाठी आजवर केलेली मेहनत इतर कामात केलेली मदत या बाबींकडे पण लक्ष देणे आवश्यक असते दोघांनीही पूर्वग्रह दूषित ठेवला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतच आपल्याला चूक वाटू शकते .
 
अशाच प्रकारे एखाद्याशी वाद-विवाद झाले तर त्याचा राग इतर व्यक्तीशी बोलताना सुद्धा आपल्या मनात असतो आणि त्याच्याशी नीट बोलत नाही.त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होऊ असाच गोंधळ ऑफिस मधील कामात सामाजिक कामामध्ये सुद्धा होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी पूर्वी वाद घातलेला असेल तर आपल्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याच्या कौतुकासाठी अडचणी येते आणि नंतर आपण सुख संवाद न ठेवल्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता असते. 
 
यासाठी आपल्याला कंपार्टमेंट विचार पद्धती आवश्यक असते म्हणजेच आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या विचारांना काल्पनिक कंपार्टमेंटमध्ये ठेवणे आवश्यक म्हणजेच समजा ऑफिसमधला ताण तणाव हा एका वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवावा.  त्यामुळे आपल्या मुलांशी ,पत्नीशी वागताना त्याचा परिणाम होणार नाही. आपलं कौटुंबिक जीवन हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्याचा परिणाम आपल्या ऑफिसवर, कामावर, व्यवसायावर झाला नाही पाहिजे .
Free-pik image
Free-pik image
 
एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करू शकत नसेल तर आपले मतभेद त्या कामापुरतेच असावेत इतर वेळी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा कौतुक निश्चित केलं पाहिजे सतत त्याच्या चुकाबद्दल बोलणं हे त्या व्यक्ती सोबतच्या व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते माझा आनंद, माझे छंद, माझी मित्र मंडळी, माझे कुटुंब, माझा व्यवसाय हे आपले वेगवेगळे काल्पनिक कंपार्टमेंट आहेत. 
 
 जसं आपण एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत शक्यतो  ठेवत नाही तसंच या कंपार्टमेंट मधल्या विषयांची सरमिसळ आपण एकमेकांशी करू नये. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या काल्पनिक चाव्या सुद्धा आपल्याच हातात पाहिजे ज्यामुळे कितीही ताण तणाव असला तरी आपण कुटुंबासाठी, आपल्या छंदासाठी वेळ देऊ शकू .
 
एखादी घटना दुर्दैवी असेल, त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या घटने शिवाय आपली काही वेगळी जबाबदारी, जीवन, आनंद असू शकतो. त्या दुर्दैवी घटनेचाच विचार सतत आपण करत राहिलो म्हणजेच त्या कंपार्टमेंट मधले विचार इतर कंपार्टमेंट मध्ये जाऊ लागले तर आपल्या जीवनातले जबाबदारी, कर्तव्य, आनंद आपण व्यवस्थित उपभोगू शकणार नाही.पण जर आपली कंपार्टमेंटची भूमिका स्पष्ट असेल तर आपण या सगळ्यांमध्ये सरमिसळ होऊ देणार नाही आणि प्रत्येक भूमिका, जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकू आणि समजा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल समोरची व्यक्ती अगदीच असमजुतदार असेल तर त्या ताणतणावामुळे आपल्या जीवनातील उत्साह, आपल्या छंद, आपला आनंद ,आपली आवड याच्यावर अश्या कंपार्टमेंट विचार पद्धतीमुळे निश्चितच कमी परिणाम होईल आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकु.
मी सो…पा…
वैद्य सोहन पाठक
9822303175
sohanpathak@gmail.com

sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4

shriram

मागील लेखावरून-पुढे 

काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे.  आता त्यापुढील श्लोक:

 

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

 

दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.

 

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

 

वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.

 

श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.

 

 

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 

आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे,  विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.

 

श्रीराम राम रघुनन्दन राम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

 

भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे.  अशा या श्रीरामाला मी शरण आहे.

 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

 

श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.

 

 

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं

जाने नैव जाने न जाने ॥30॥

 

माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”

 

 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥

ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती  आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.

 

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.

 

यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.

 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

hanuman

वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.

मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो.  हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली

 

मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः  (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा  वेग)

अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा  आहे

मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.

 

यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.

 

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

valmiki

वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.kokila

 

कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

 

महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:

 

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’

valmiki

हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.

 

त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.

 

यापुढील श्लोक:

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

 

आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.

 

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

 

 

भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम

राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.

 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

 

राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.

 

निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”

 

रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति

परायणं= आश्रयस्थान  

परतर=  इतर,

म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.

रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.

माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!

 

वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.  

 

रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा  भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)

 

[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल

 

एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.


एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.


पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।

ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]

 

 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

 

वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.

मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.

 

भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.

 

पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.

 



 

 

राम       राम       राम.

 

 

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

 

बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.

 

श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.

 

अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे. 

माधव भोपे 

 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

shriram

मागील लेखावरून-पुढे 

यापूर्वीच्या लेखात आपण 10 व्या श्लोकापर्यंत पाहिले होते. त्यात श्लोक क्र. 4 पासून 10 पर्यन्त, श्री राम कवच बघितले. आता पुढे:-

 

आता यापुढील श्लोकांत या कवचाचे माहात्म्य श्रीरामाच्या नामाचे महत्त्व, श्रीरामाच्या रूपाचे वर्णन इत्यादि आहे.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

 

— पाताल+ भूतल+व्योम+ चारिणः+ छद्मचारिणः+न+ द्रष्टुं+ अपि+शक्ताः+ते+ रक्षितं+ राम+नामभिः

विष्णू पुराणात ३ लोक आणि चौदा भुवने सांगितली आहेत. तीन लोक म्हणजे पाताळ लोक, भूलोक आणि स्वर्गलोक. पाताळ लोकात दैत्य, दानव, यक्ष, नाग इत्यादिंचा वास असतो असे मानले गेले आहे. भूलोकात मनुष्य आणि इतर जीवजंतूंचा वास असतो, आणि स्वर्गलोकात इंद्र, वरूण, पवन, बृहस्पति, चंद्र, निरनिराळे ग्रह इत्यादि देवतांचा वास असतो. या तीन्ही लोकांमधील कुठलीही शक्ति, राम नामाने रक्षित माणसाचे वाकडे करू शकत नाही. याशिवाय, छद्म रूपाने वावरणाऱ्या  शक्ति असतात, ज्या की सामान्य दृष्टीला दिसत नाहीत(छद्मचारिणः).

अशा शक्ति, रामनामाने रक्षित झालेल्या व्यक्तिचे वाकडे करण्याचे तर सोडाच (अपि) पण त्याच्या कडे वाकडया नजरेने पाहूही शकत नाहीत.( न+ द्रष्टुं). अर्थात, ज्या व्यक्तिने राम नाम रूपी कवच धारण केले आहे, त्याला तीन्ही लोकांतील वाईट शक्तींची बाधा होऊ शकत नाही.(ग्रह नक्षत्र, भूत पिशाच, किंवा, या लोकातील वाईट प्रवृत्तीचे लोक)

म्हणूनच आपल्या इथे, कुठल्याही वाईट शक्तींची बाधा झालेली आहे, दृष्ट इत्यादि लागली आहे, अशी शंका असल्यास, रामरक्षा स्तोत्राचा अचूक उपाय आहे असे मानले जाते.

rakshas-1

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

image 2

 “राम”, “रामभद्र” किंवा “रामचंद्र” अशा कुठल्याही नावाने श्रीरामाचे जो स्मरण करतो, त्या पुरुषाला पापाचा स्पर्शही होत नाही. आणि “भुक्ति” आणि “मुक्ती” प्राप्त होते. (विन्दति = प्राप्त होणे )

भुक्ति म्हणजे ऐहिक भोग. मुक्ति अर्थात मोक्ष. श्रीरामाच्या नामस्मरणाने दोन्हीही प्राप्त होतात.

आपल्या आवडत्या व्यक्तिला, आपल्या लाडक्या मुलाला, जसे आपण बबड्या, छबड्या, सोन्या, राजा, छकुल्या, अशा अनेक नावाने हाक मारतो आणि कितीही नावांनी हाक मारली तरी आपले मन भरत नाही, तशीच अवस्था या ठिकाणी कवीची झाली आहे, असे मला वाटते, म्हणूनच, श्रीराम या आपल्या प्रेमास्पदाला, आपल्या देवतेला, “राम”, “रामभद्र”, “रामचंद्र” अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले आहे!

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

  जगज्जैत्र+ एक+ मंत्रेण+रामनाम्ना+ अभिरक्षितम्+यः +कण्ठे +धारयेत्+तस्य+ करस्थाः+ सर्व+ सिद्धयः

ज्याने जग जिंकता येते अशा एकमेव रामनाम रूपी मंत्राने जो अभिरक्षित आहे, संरक्षित आहे, रामरूपी मंत्र ज्याने कंठात धारण केलेला आहे, त्याला, सर्व सिद्धी हातातच असल्यासारख्या आहेत.

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥

vajra

वज्र+ पंजर+नाम+इदं+यो+ राम कवचम्+ स्मरेत+अव्याहत+ आज्ञः + सर्वत्र+ लभते+जय+ मंगलम्

इंद्राचे वज्र हे आपणास माहित आहे. देव आणि दानवांच्या लढाईत, जेंव्हा दानव देवांवर प्रबळ होऊ लागले, त्यावेळी दधिची ऋषींच्या हाडांपासून वज्र बनविण्यात आले होते आणि त्याचा वापर करून इंद्राने वृत्रासुरावर आणि इतर दानवांवर विजय मिळविला होता. हे वज्र अजेय समजले जाते. पंजर म्हणजे पिंजरा. रामकवच हे वज्राच्या पिंजऱ्यासारखे अभेद्य आहे. असे हे रामकवच जो  स्मरण करतो, त्याची आज्ञा कधीच मोडली जात   नाही. आणि त्याला नेहमी सर्वत्र, जय आणि मंगलाचीच प्राप्ति होते.(अव्याहताज्ञः या शब्दाचा अर्थ आपण मराठीच्या अव्याहत म्हणजे सतत असा घेतो आणि अशा व्यक्तिला नेहमी सर्वत्र जय मंगल प्राप्त होते असा करतो. पण सदरील शब्दाचा समास विग्रह अव्याहत+ आज्ञः असा होत असून त्याचा अर्थ ‘ज्याची आज्ञा मोडली जात नाही’ असा होतो)

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

budhkaushik rushi

 बुधकौशिक ऋषींना ‘हर’ म्हणजे भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन आदेश दिल्याप्रमाणे (‘आदिष्ट”) त्यांनी सकाळी उठून (प्रबुद्धो) हे रामरक्षा स्तोत्र लिहिले.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

“आराम” म्हणजे बगीचा, “विराम” म्हणजे “पूर्णविराम”, “अभिराम” म्हणजे आनंदकर, हर्षपूर्ण. अभिरामस्त्रिलोकानां म्हणजे तीन्ही लोकांना आनंद देणारा.    राम:+ श्रीमान+स+ न: +प्रभु:

 कल्पवृक्षाचा बगीचा , समस्त आपदा म्हणजे संकटांचा विराम (the end) असणारा , तीन्ही लोकांना आनंद देणारा(अभिरामस्त्रिलोकानां) असा “राम” हा आमचा “प्रभु” आहे.

इथपर्यंत रामरक्षा स्तोत्र, आणि त्याची उत्पत्ति कशी झाली, इत्यादि सांगून झाले. इथून पुढील श्लोक हे भक्तिरसात ओथंबलेले आहेत.

तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

ram and laxman

वरील श्लोकात श्रीराम आणि लक्ष्मण दोघांचे वर्णन आहे. दोघेही तरुण, रूपसंपन्न, सुकुमार आणि त्याच बरोबर महान शक्तिमान आहेत. दिसायला जरी सुकुमार असले तरी ते महाबलौ आहेत हे लगेच स्पष्ट केले आहे. “पुण्डरीक” म्हणजे कमळ. कमळाप्रमाणे विशाल ज्यांचे नेत्र आहेत, आणि ज्यांनी “कृष्णाजिन” म्हणजे काळ्या मृगाचे “चीर” म्हणजे वल्कल नेसले आहे.

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

फल आणि कंदमूल खाणारे, दान्तौ म्हणजे ज्यांच्याकडे संयम आहे; तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथाचे पुत्र, राम लक्ष्मण हे दोन भाऊ,

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

सर्व जीवांचे शरणस्थान , सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ, ज्यांनी राक्षस कुलांचा संहार केला आहे, (रक्षःकुल म्हणजे राक्षसांचे कूळ,  निहन्तारौ म्हणजे नष्ट करणारे), असे ते रघुकुलातील दोन उत्तम पुरुष, हे आमचे ‘त्रायेतां नौ’ म्हणजे रक्षण करोत.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

हा रामरक्षेमधील सगळ्यात अवघड श्लोक. हा बऱ्याचदा चुकीचा म्हणला जातो. याचा संधिविग्रह जर समजून घेतला तर तो सोपा वाटेल.

आत्त   = ताणलेले

सज्ज     = सज्ज

धनुषौ   =  धनुष्य

‘आत्तसज्जधनुषौ’  = ताणलेल्या धनुष्याने सज्ज असलेले (ते दोघे)

इषुस्पृशौ  =(इषु: म्हणजे बाण, इषुस्पृशौ =बाणांना स्पर्श करणारे )

अक्षय =   कधीही न संपणारा

आशुग =  गतिमान;

निषंग    = बाण  ;

संगिनौ   =  बाणांचा भाता घेऊन जात असलेले

रक्षणाय   = रक्षणासाठी  ;

मम     = माझ्या ;

रामलक्ष्मणावग्रतः    राम लक्ष्मण माझ्या पुढे

 पथि    = रस्त्याने ;

 सदैव    =  नेहमी ;

 गच्छताम्  =   चालोत. ;

भावार्थ:

हातात धनुष्य घेतलेले, पाठीवर अक्षय बाणांचा भाता असलेले, आणि ज्यांचे हात त्या बाणांवर, कुठल्याही क्षणी वापर करण्याच्या तयारीत आहेत, असे राम आणि लक्ष्मण हे माझ्या रक्षणार्थ  माझ्या पुढे चालोत.

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

सन्नद्ध म्हणजे शस्त्रास्त्रांनी पूर्ण सुसज्जित, तत्पर, उद्यत.

गच्छन्  म्हणजे चालत असलेले, अस्माकं म्हणजे आमचे, पातु म्हणजे रक्षण करणारा,

कवच,  खड्ग, धनुष्य, बाण यांनी सज्ज असलेले युवा  राम आणि लक्ष्मण, आमच्या  मनोरथानुसार आमचे रक्षण करण्यासाठी  आमच्या पुढे चालोत.

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥

लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे असा दाशरथी राम, शूर, बलवान, काकुत्स्थ वंशी, पूर्ण पुरुष, कौसल्येचा पुत्र आणि रघुकुलातील उत्तम पुरुष

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

वेदान्तानी जाणण्यायोग्य (वेद्यो), यज्ञांचा स्वामी किंवा ईश , पुराण पुरुषोत्तम, जानकीचा पति, श्रीमान म्हणजे वैभवाने युक्त, अप्रमेय पराक्रम म्हणजे ज्याच्या पराक्रमाचे मोजमाप करता येऊ शकत नाही.

वरील श्लोकातील श्रीमानप्रमेयपराक्रम हा शब्द, श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द मिळून झाला आहे. त्यामुळे याचा उच्चार करतांना “श्रीमान प्रमेयपराक्रम” असा न करता

“न” वर जोर देऊन, श्रीमानप्रमेयपराक्रम असा करायला पाहिजे जेणे करून की श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द असल्याची जाणीव होईल.

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

वरील संबोधन हे भगवान शिव करताहेत की वरीलप्रमाणे श्रीरामाची नांवे, जो माझा भक्त नित्य जपतो, त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळते यात काहीही संशय नाही.

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

shriram

 

मागील लेखावरून-पुढे 

श्रीराम आणि सीतेच्या ध्यानानंतर, रामरक्षा स्तोत्र सुरू होते.

त्यापुढील पहिल्या श्लोकात रामाच्या चरित्राची आणि नामाची महती सांगितलेली आहे:-

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

श्रीरामाचे चरित्र हे ‘शत कोटी’ श्लोकांमाध्येही वर्णन करून संपणार नाही, इतके मोठे आहे.

इथे श्रीरामाला ‘रघुनाथ’ म्हटले आहे. अर्थात, रघुवंशातील सर्वोत्तम पुरूष, किंवा रघु वंशाचा ‘नाथ’.

भगवंताने, रघुकुलामध्ये अवतार घेतल्यामुळे, त्या कुळाचा उध्दार झाला. श्री शंकर हे श्री रामाचे नि:सीम भक्त. एक कथा अशी आहे, की एकदा, तीन्ही लोक, म्हणजे देव, दानव आणि मानव हे शंकराकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. विषय होता, निरनिराळ्या मंत्रांचे योग्य वाटप. असे शंभर कोटी मंत्र होते. त्यावर, भगवान शंकरांनी तिघांनाही ३३ कोटी,३३ लाख ३३  हजार तीनशे तेहतीस मंत्र वाटून दिले. एक मंत्र राहिला, ज्यात ११ अक्षरे होती. शंकरांनी त्या मंत्रातील ३-३ अक्षरे तिघांना वाटून दिली. राहिली २ अक्षरे: “रा” आणि “म”. तेंव्हा शंकराने सांगितले, की ही दोन अक्षरे मात्र मी माझ्याच हृदयात ठेवणार.  

रघुनाथाच्या चरित्रामधील एक- एक अक्षर हे मनुष्याच्या महान पापांचे नाश करणारे आहे.

‘नीलोत्पल’- उत्पल अर्थात कमळ. ‘नीलोत्पल’ म्हणजे नील कमल. श्री रामाचा वर्ण नील कमलाप्रमाणे ‘नील’ ‘श्याम’ आहे. नील + श्याम. श्याम वर्ण म्हणजे काळा नव्हे. श्याम रंगाचे तेजच वेगळे आहे. श्री कृष्णाचे वर्णन ‘घनश्याम’ असे ही केले जाते. पुढे रामाचे ‘राजीव लोचन’ असे वर्णन केले आहे. राजीव लोचन म्हणजे कमला प्रमाणे नेत्र असलेला. वरील दोन्ही वैशिष्टये डोळ्यासमोर आणून श्रीरामाचे ध्यान करून पाहावे.

‘जानकीलक्ष्मणोपेतं’ म्हणजे ज्याच्या आजू बाजूला जानकी आणि लक्ष्मण आहेत असा. आणि जटा रुपी मुकुटाने मंडित झालेला, असा तो श्रीराम. जणू काही सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात श्री रामाच्या रूपाचे वर्णन करून कवीचे मन भरले नसावे! म्हणून या श्लोकात ‘नीलोत्पल श्याम’, ‘राजीवलोचन’, ‘जटा मुकुट मंडित’ अशा प्रकारे श्रीरामाचे ध्यान करून कवीने श्रीरामाच्या रूपाचे अजून बहारदार वर्णन केले आहे.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

main qimg 280b9c16cbb6d0bf90cbd86d6d340541 lqसंस्कृत मधील श्लोकांचा अर्थ समजावून घेतांना, संधि विच्छेद करून, शब्द सुटे सुटे करून घेतल्यानंतर त्यातील अर्थ लवकर लक्षात येतो. वरील श्लोकाचा संधि विच्छेद खालील प्रमाणे आहे:

स= सहित , असि= तलवार, किंवा खड्ग,

 (आपण असिधारा व्रत हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ: असिधारा व्रत- तलवारीवर चालण्यासारखे कठीण व्रत)

तूण= बाण ठेवण्याचा भाता, धनु:= धनुष्य, बाण= बाण, पाणि=हात

नक्तम्+चर = नक्त म्हणजे रात्र. चर म्हणजे चालणे, हिंडणे(उदा. गोचर, वनचर, दिनचर, निशाचर) नक्तंचर- रात्री हिंडणारे अर्थात, राक्षस  ; अन्तकम्= अंत करणारा.

नक्तंचरांतकम्‌= निशाचर असलेले म्हणजे राक्षस, यांचा अंत करणारा.

स्वलीलया= स्वतःच्या लीलांनी

जगत्+त्रातुम्+आविर्भूतम्+अजम्(जो अज आहे, अर्थात ज्याचा जन्म झालेला नाही असा तो श्रीराम )+विभुम् (सर्व व्यापक, महान)- अर्थात, जगाला तारण्यासाठी जो आविर्भूत झाला आहे, जो अजन्मा आहे, जो विभू, म्हणजे सर्वव्यापक आहे.

या श्लोकात श्रीरामाची आणखी ठळक वैशिष्टये वर्णन केली आहेत.

रामाचे रूप लक्षात आणतांना, सर्वात ठळक बाब म्हणजे रामाचे आजानुबाहू; पण त्यानंतर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रामाचा बाण. राम म्हटला की त्याच्या पाठीवर बाणाचा भाता, त्यात असलेले बाण, आणि एका हातात खड्ग हे आपल्या नजरे समोर येते. आपल्या दीर्घ बाहूंनी वरील शस्त्रें समर्थपणे चालवून राक्षसांचा नायनाट करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा राम.

परब्रह्माचा ‘जन्म’ होत नसतो, तर ते आविर्भूत होत असते. ते विभु म्हणजे सर्वव्यापक जरी असले , तरी भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मनुष्य रूपात आविर्भूत होत असते.

आतापर्यंत आपण रामरक्षेतील सुरुवातीचे ३ श्लोक पाहिले. त्यात श्री रघुनाथाच्या चरित्राचा विस्तार, आणि जगाच्या उद्धारासाठी रामाचा झालेला ‘अविर्भाव’ यांचा उल्लेख आहे.

आता यापुढील श्लोक- या श्लोकापासून राम कवच सुरू होते.

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

‘प्राज्ञ’ म्हणजे विद्वान लोक ‘पापघ्नीं’ म्हणजे पापांचा नाश करणारी, आणि ‘सर्व कामदां’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी अशी  रामरक्षा पठण करतात.

इथून पुढच्या ओळीपासून रामरक्षा कवच सुरू होते. यात शरीरात सगळ्यात वर असणारे ‘शीर’ म्हणजे डोक्या पासून सुरुवात करून(‘शिरो मे राघवः पातु”) सर्वात खाली, म्हणजे आपल्या पायापर्यंत, (‘पादौ बिभीषण: श्रीद:”)  आपल्या  शरीराच्या सर्व अवयवांचे श्रीराम रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.

आपण काळजीपूर्वक पाहिले, तर या सर्व श्लोकांमध्ये, श्रीरामाचे पूर्ण चरित्र, कालक्रमानुसार आलेले आहे, असे दिसून येते.

श्रीराम हे रघुवंशी, म्हणून सुरुवातीला त्यांचा, राघवः असा उल्लेख आला आहे. आणि त्यानंतर दशरथाचा पुत्र, म्हणून दशरथात्मज. रघुवंशी ‘राघव’ माझ्या डोक्याचे रक्षण करो, तर दशरथाचा पुत्र असलेला श्रीराम माझ्या ‘भालाचे’ म्हणजेच कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

वडिलांनंतर आईचे अर्थात कौसल्येचे नाव येते. आणि आईच्या नंतर विश्वामित्रांचे  नांव येते. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या ‘दृशौ’ म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो.

विश्वामित्रांना प्रिय असणारा श्रीराम माझ्या श्रुती म्हणजे कानाचे रक्षण करो.

इथे ‘नेत्र’ किंवा ‘कर्ण’ म्हटले नाही, हे लक्षात घ्यावे. ‘दृशौ’ म्हणजे दृष्टी म्हटले आहे. डोळे म्हणजे केवळ पाहण्याचा बाह्य अवयव आहे. दृष्टी मध्ये डोळे आणि आतील दृष्टीचे ज्ञानेंद्रिय दोहोंचा समावेश आहे. तसेच ‘श्रुती’ मध्ये कान आणि आतील कर्णेन्द्रिय दोन्हींचा समावेश आहे. तसेच ‘घ्राण’ म्हणजे नाक आणि आतील घ्राणेन्द्रिय दोन्हीचा समावेश आहे.

आपणास माहित  आहे, की जेंव्हा राम आणि लक्ष्मण थोडे मोठे झाले, वसिष्ठ ऋषींकडे विद्या प्राप्त करून आले, तेंव्हा ऋषि विश्वामित्र दशरथाकडे आले, आणि दशरथाला म्हणाले, “हे राजा, सांप्रत राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवलेला असून, ते ऋषींना यज्ञ करू देत नाहीयेत. त्यामुळे राक्षसांचा निःपात करण्यासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी तुझे हे दोन राजकुमार माझ्यासोबत दे” श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना या कामात सहकार्य केले, आणि ते त्यांना प्रिय झाले, म्हणून “विश्वामित्रप्रियः”

 ‘मखत्राता’- ‘मख’ म्हणजे यज्ञ. (लग्नात किंवा कुठल्याही शुभकार्यात ‘ग्रहमख’ करतात- ते म्हणजे नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचा यज्ञ.) मखत्राता म्हणजे ‘यज्ञाचे रक्षण करणारा’

त्यानंतरचे नांव ‘सौमित्रिवत्सल’ असे आहे. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. सौमित्रिवत्सल म्हणजे लक्ष्मणावर वात्सल्य असलेला. श्रीरामाचे आपली कनिष्ठ भावावर, नुसते ‘प्रेम’ नव्हते तर ‘वात्सल्य’ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वात्सल्य म्हणजे जे आईचे किंवा वडिलांचे मुलाप्रत असते, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. तसेच वात्सल्य श्रीरामाचे आपल्या लहान भावाप्रति होते. रामायणात आदर्श नातेसंबंध कसे असावेत याचा वस्तुपाठ श्रीरामांनी घालून दिलेला आहे.

कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे रक्षण करो; विश्वामित्रांना प्रिय असणारा राम माझ्या श्रुतीचे रक्षण करो; यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या ‘घ्राणाचे’ रक्षण करो; आणि लक्ष्मणावर वात्सल्य असणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.

जिंव्हा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

त्यानंतर येणाऱ्या जिंव्हा या महत्वाच्या अवयवाचे रक्षण करण्यासाठी ‘विद्यानिधि’ श्रीरामाची प्रार्थना केली आहे.

त्यानंतर येणाऱ्या ‘कंठ’ या अवयवाचे रक्षण भरताने वंदन केलेल्या श्रीरामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.

कंठ हा अवयव भावनांचे स्थान आहे. मनुष्य भावनावश झाल्यानंतर त्याचा कंठ अवरुद्ध होतो, घशात आवंढा दाटून येतो. भरताची श्रीरामाप्रत भक्ती ही अशा प्रकारची होती. श्रीराम लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर भरताशी झालेली गळाभेट आठवा. म्हणून या ठिकाणी कंठा साठी ‘भरत वंदित’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.

स्कंध अर्थात खांद्यांसाठी ‘दिव्यायुध’ हे विशेषण तसेंच ‘भुजा’ अर्थात दण्ड किंवा बाहू यासाठी ‘भग्नेशकार्मुक’ हे विशेषण असेच चपखल बसते. रामाचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण होते. आणि बाणाचा भाता खांद्यावर असतो.

विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाकरवी आधी त्राटिकेचा वध करविला. तसेच इतर अनेक राक्षसांचा वध दोन्ही बंधूंनी केला. तदनंतर जनक राजाकडून आलेल्या आमंत्रणावरून विश्वामित्र ऋषी दोन्ही बंधूंना सीता स्वयंवराला घेऊन घेले. तिथे श्रीरामांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावतांना ते तुटले, म्हणून भग्नेशकार्मुक असे नाव आले. ‘भग्नेशकार्मुक’ भग्न+ ईश+ कार्मुक; ईश अर्थात ‘शंकर’, ‘कार्मुक’ अर्थात धनुष्य. अर्थात, ज्याने श्री शंकराचे धनुष्य भग्न केले- तोडले- तो श्रीराम.

या श्लोकात श्रीरामाचे शिवधनुष्य भंगापर्यन्तचे चरित्र आले आहे.

आता त्यापुढील श्लोक:

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥seetapati shriram

जनकाच्या दरबारातील  स्वयंवरात श्रीरामाने सीतेचे वरण केले. तो सीतापति श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो.  लग्न करणे- म्हणजे “हात हातात देणे” वधूवर एकमेकांना हाताने माला  घालतात, म्हणजेच “वरतात”. या दृष्टीने इथे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो अशी प्रार्थना योग्य वाटते. 

श्रीराम जानकीशी स्वयंवर करून परत निघाले असतांना वाटेत जमदग्नीचा पुत्र परशुराम ‘जामदग्न्य’ याने श्रीरामाला शिवधनुष्य तोडल्यामुळे रागावून आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या युद्धात परशुरामांना, श्रीराम हे श्रीविष्णूचे अवतार असल्याची खात्री झाल्यानंतर, त्यांच्या मुखातील अवतार ज्योती श्रीरामाच्या मुखात शिरली अशी कथा आहे.  जामदग्न्याला म्हणजेच परशुरामांना जिंकणारा म्हणून जामदग्न्यजित्‌.parshuram

श्रीराम सीतेशी विवाह करून अयोध्येला परत आले, नंतर कैकेयीच्या दुराग्रहामुळे वनवासात गेले. वनवासात सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. श्रीराम पंचवटीला असतांना, रावणाची बहिण शूर्पणखा तेथे आली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. शूर्पणखेचा आक्रोश ऐकून त्रिशिर, खर आणि दूषण हे राक्षस (जे की रावणाचे दूरचे भाऊ होते) चौदा हजार सैन्यासह धावून आले. रामाने त्या सर्वांचा वध केला. म्हणून ‘खरध्वंसी’ हे विशेषण येथे आले आहे.khar dushan killing by shriram

नंतर, सीता हरणाचा प्रसंग झाल्यानंतर, सीतेच्या शोधात असतांना, हनुमान, नळ, नीळ, सुग्रीव आणि जांबुवंत यांच्याशी श्रीरामाची भेट झाली. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा, म्हणून ‘जाम्बवदाश्रयः’ हे विशेषण आले आहे.

“ खर राक्षसाचा वध करणारा श्रीराम माझ्या मध्य भागाचे रक्षण करो. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या ‘नाभि’ चे रक्षण करो.”

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

यापुढील श्लोकात सुग्रीवाचा ईश श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. सुग्रीवाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे.

यापुढील शब्द आहे ‘सक्थिनी’. सक्थिनी हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही. मराठी मध्ये एकवचन आणि बहुवचन असते. पण संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन  आणि बहुवचन असे तीन प्रकार आहेत. ‘सक्थिन’ म्हणजे कंबर आणि जांघ यांच्या मधील भाग. जांघ हा शब्द मराठी आहे, तो संस्कृत मधील ‘जंघा’ पेक्षा वेगळा आहे.  ‘सक्थिनी’ हे सक्थिन या शब्दाचे द्विवचन आहे. “हनुमंताचा प्रभु असलेला श्रीराम माझ्या सक्थिनी चे रक्षण करो.”parts of body- sanskrit

संस्कृत मधील ‘उरू’ म्हणजे मराठीतील ‘जांघ’ किंवा ‘मांडी’. “राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.”

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

मांडीच्या खालचा अवयव म्हणजे गुडघा. “जानु” म्हणजे गुडघा. जानुनी म्हणजे दोन्ही गुडघे. (जसे सक्थिन चे द्विवचन सक्थिनी होते, तसेच, जानु चे द्विवचन जानुनी झाले. ) त्यापुढील अवयव “जंघा”. संस्कृत मधील “जंघा” हे मराठीतील “जांघ” पेक्षा  वेगळे आहे. संस्कृत मध्ये “जंघा” म्हणजे “पोटरी”

ज्याने सेतू बांधला, असा श्रीराम माझ्या “जानुनी” म्हणजे गुडघ्यांचे रक्षण करो; आणि दशमुख रावणाचा वध केला तो श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो.

ज्या रामाने बिभीषणाला “श्री” म्हणजे वैभव आणि राज्य दिले, तो श्रीराम, माझ्या पावलांचे रक्षण करो.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

 एतां म्हणजे अशाप्रकारे. श्रीरामाचे बल युक्त असणारी अशी ही (एतां) रक्षा जो पुण्यवान मनुष्य पठण करेल, तो चिरायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.

याठिकाणी रामरक्षेतील मुख्य भाग म्हणजे ”कवच” संपले.

विशेष:आपल्याला एखादे वेळी बाका प्रसंग असेल, संकटात सापडलो असू, जिवाची भीती असेल, आणि पूर्ण रामरक्षा म्हणण्याइतका वेळ नसेल, तर नुसते हे “कवच” म्हटले, तरी कार्यभाग होतो, संकटातून रक्षण होते हा अनुभव आहे.  

 

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

107046678

भगवान श्रीराम हे आपल्या भारतीयांच्या रोमा रोमात वसलेले आहेत.  आपल्या बोलण्यात, ठायी ठायी ‘राम’ येतो. 

रामरक्षा स्तोत्र हे बहुसंख्य भारतीयांच्या घरात म्हटले जाणारे स्तोत्र आहे.  आणि या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. 

आमच्या इथे अनेक पिढ्यांपासून हे स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हटले जाते, जसे की ते अनेक घरांमध्ये म्हटले जाते. 

साधारण ४-५ वर्षांपूर्वी, यावर विचार करत असतांना, याबद्दल लिहावे, अशी प्रेरणा, झाली, आणि या स्तोत्राबद्दल, आमच्या फॅमिली whatsapp  group वर, काही भागांमध्ये,  लिहिण्यात आले. त्या लिखाणामध्ये निरनिराळ्या ठिकाणाहून घेतलेली माहिती आहेच, पण माझ्या मनाला भावलेले, सुचलेले, असे काही विचारही मांडले आहेत. त्यावेळी आणि त्यानंतरही, बऱ्याच जणांनी, हे लेख खूप उपयुक्त झाले असल्याचे कळविले. काही जणांनी ते सगळे एकत्र करून सेव्ह करून ठेवले.  रामरक्षा हे स्तोत्र कालातीत आहे. त्यामुळे, आज तेंव्हा ग्रुपवर टाकलेले भाग, काही सुधारणांसहित तसेच काही बदलांसहित   या ठिकाणी, ब्लॉगवर प्रकाशित करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त श्रीराम भक्तां पर्यन्त ते पोचतील. 

रामरक्षा स्तोत्र हे मंत्र म्हणून तर प्रभावी आहेच,  पण भक्तिरसामध्ये ओतप्रोत असे एक काव्य आहे. त्यामुळे याचा आस्वाद घेतांना, घाई  करून चालणार नाही. तर जशी आपण आपली आवडती वस्तू , डोळे बंद करून, तिचा स्वाद घेत, चाखत चाखत खातो, त्याप्रमाणे, यातील एकेक काव्यपंक्तीचा, कल्पनांचा, उपमांचा आस्वाद घेत घेत या स्तोत्राचे पठण-स्मरण  केले तर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. म्हणून आपण या स्तोत्राचा आस्वाद अनेक भागांमध्ये  घेणार आहोत.  पण त्याचबरोबर, सरते शेवटी, हे सर्व लेख एकत्र, एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून, शेवटच्या भागात, सगळ्या लेखांचे एकत्र असे एक pdf  देणार आहोत, जे की ज्यांना पाहिजे त्यांना डाउनलोड करून घेऊन, आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर सेव्ह करून ठेवता येईल.

 

आज त्या लेखमालेतील पहिला भाग प्रकाशित करीत आहे. 

सर्वप्रथम, संदर्भासाठी, श्रीराम रक्षा स्तोत्र शुद्ध स्वरूपात खाली देत आहे. 

श्रीरामरक्षास्तोत्रम्

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।

अथ ध्यानम्‌

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ।

 वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं

 नानालङ्कार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचन्द्रम् । ।

इति ध्यानम्‌

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्‌ ॥14॥

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां   रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥22॥

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 श्रीराम राम रघुनन्दनराम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु-

र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥30॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्‌ ॥31॥

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रम् सम्पूर्णम्

 

आता त्यावरील विवेचन:

श्री रामरक्षा स्तोत्र

श्री रामरक्षा स्तोत्र आपणा सर्वांनाच माहित आहे आणि त्याचे महत्त्वही आपणास माहित आहे.

रामरक्षा स्तोत्र हे ‘स्तोत्र मंत्र’ आहे. स्तोत्र हे सहसा एखाद्या देवतेचे गुणवर्णन करणारे काव्य असल्याचे दिसून येते. पण मंत्र म्हणजे शक्तिशाली अक्षर समूह. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य मन्त्र आहेत हे आपणास माहित आहे. आपण अशा स्तोत्र रूपी मंत्रांकडे कडे नीट लक्ष दिले तर आपणास असे दिसून येईल, की, प्रत्येक स्तोत्राचा एक ‘ऋषि’ असतो; म्हणजे, ते स्तोत्र रचणारा, किंवा, ज्याच्या द्वारे ते स्तोत्र प्रकट झाले, तो. तसेच प्रत्येक स्तोत्राची एक ‘देवता’ असते. तसेच, स्तोत्राच्या सुरुवातीला, ते स्तोत्र, कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, त्याचा उल्लेख असतो. तदनंतर, त्या स्तोत्राची ‘शक्ति’ कोण आहे याचा उल्लेख असतो. त्यानंतर, त्या स्तोत्राची  , किंवा मंत्राची , ‘कीलक’ असलेली देवता कोणती आहे, याचा उल्लेख असतो. कीलक म्हणजे किल्ली. स्तोत्र किंवा मंत्ररूप हा खजिना जर उघडायचा असेल तर त्याची किल्ली लावणे आवश्यक आहे. या रामरक्षा स्तोत्राची, हनुमान ही देवता कीलक आहे. आणि सरते शेवटी, त्या  स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग’ कुणा किंवा कशा प्रीत्यर्थ करण्याचे योजले आहे, याचा उल्लेख असतो.

आपणा ‘श्री सूक्तामध्ये’ ‘जपे विनियोग:’ किंवा ‘अभिषेके विनियोग:’ असा, प्रसंगानुसार उच्चार करतो. श्री सूक्ता’ ने अभिषेक करणार असू, तर ‘अभिषेके विनियोग:’, किंवा, श्री सूक्ताचा जप करणार असू तर, ‘जपे विनियोग:’.

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमद् हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः 

रामरक्षा स्तोत्राचे रचयिता, ‘बुधकौशिक’ ऋषि आहेत. बुधकौशिक ऋषि नक्की कोण होते, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, महर्षि वाल्मिकी म्हणजेच बुधकौशिक ऋषि होत.  रामरक्षा स्तोत्राच्या १५ व्या श्लोकात, 

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥ असे म्हटले आहे, अर्थात, हर म्हणजे महादेव यांनी स्वप्नात येऊन संगीतल्याप्रमाणे, सकाळी बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहिली, असा उल्लेख आहे. काहींच्या मते, बुधकौशिक ऋषि म्हणजे विश्वामित्र ऋषि होत.  असो. 

सध्या तो विषय बाजूला ठेवू.

या स्तोत्राचे ‘श्री सीता रामचंद्र’ हे देवता आहेत. आपल्याकडे सर्व मुख्य देवता या जोडीजोडीनेच येतात. आणि त्यातही, स्त्री देवतेचे स्थान प्रथम असते, हे लक्षणीय आहे. एखाद्या स्तोत्रात जी देवता मध्यवर्ती असते, किंवा ज्या देवतेचे गुणवर्ण त्या स्तोत्रात केले असते, ती त्या स्तोत्राची ‘देवता’.

त्याच्यानंतर, ते स्तोत्र हे मुख्यता: कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, याचा उल्लेख येतो.

अनुष्टुप्  छंद हा संस्कृत काव्यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा छंद आहे. वेदांमध्ये याचा वापर झालेला आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता  यांतील अधिकांश श्लोक हे अनुष्टुप् छंदामध्ये आहेत. या छंदात ८- ८ वर्णांचे चार पाद, असे एकूण ३२ वर्ण असतात.

प्रत्येक स्तोत्राची/ मंत्राची, एक ‘शक्ति’ असते. या स्तोत्राची, ‘सीता’ ही शक्ति आहे.

आता ‘कीलका’ विषयी: कीलक म्हणजे किल्ली. प्रत्येक मंत्राची, एक कीलक देवता असते. त्या देवतेचे स्मरण केल्याशिवाय ते स्तोत्र फलीभूत होत नाही. रामरक्षा स्तोत्राचे कीलक म्हणजे ‘हनुमान’ आहे. हनुमान हा रामाचा परम भक्त होता. हनुमानरूपी देवतेची ‘किल्ली’ लावल्याशिवाय, हे स्तोत्र ‘उघडणार’ नाही.

सरते शेवटी, ह्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग, कशा प्रीत्यर्थ, किंवा कुठल्या देवतेच्या प्रीत्यर्थ केला जात आहे, त्याचा उल्लेख.

बहुतेक स्तोत्रांमध्ये, सुरूवातीची ही प्राथमिक आणि आवश्यक माहिती  देऊन झाल्यानंतर, पुढील श्लोकामध्ये, त्या देवतेच्या, रूपाचे ‘ध्यान’ असते. म्हणून यापुढील श्लोकात, या स्तोत्राच्या देवतेचे, म्हणजे श्री रामचंद्राचे, व सीतेचे ध्यान केले आहे.

अथ ध्यानम्‌:

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥

वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।

 नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥

श्रीरामाच्या आकृतीचे स्मरण करतांना, आपल्याला त्यातील सर्वात प्रभावशाली  गोष्ट लगेच डोळ्यासमोर येणारी कुठली असेल, तर ती म्हणजे रामाचे दीर्घ आणि बलशाली बाहू!.‘जानु’ म्हणजे ‘गुडघा’ ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे बाहू त्याच्या गुडघ्यां पर्यंत लांब आहेत, तो श्रीराम. असे ‘आजानु बाहू’ ajanubahuपुरूष हे लाखो करोडोंमध्ये एखादेच असतात. आपण जेंव्हा रामरक्षा ‘कवच’ म्हणतो, तेंव्हा, रामाचे विशाल बाहू आपले संरक्षण करताहेत, ही भावना आपोआपच आपल्या मनात येते . रामाचे आजानुबाहू हे त्याच्या धनुर्विद्येसाठी वरदान होते.

‘धृतशरधनुषं’ 1d5d8c2740a0dfb1546b074b6f531db5अर्थात, हातात धनुष्य आणि बाण घेतलेला. ‘बद्धपद्मासनस्थं’ अर्थात,  बद्धपद्मासन घातलेला. पीत वस्त्र नेसलेला,

ज्याचे नेत्र, नुकत्याच उमललेल्या कमला सोबत स्पर्धा करतात आणि ज्याच्या मुखावर  ‘प्रसन्न’ भाव आहे.

ज्याच्या ‘वाम’ म्हणजे डाव्या अंकावर म्हणजे मांडीवर सीता विराजमान आहे.117271780 178882337200818 2702431598286977701 n

(हातात धनुष्य बाण घेतलेला, आणि बद्ध पद्मासन घातलेला आणि डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, या तीन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हे अजून मला समजले नाही. बद्ध पद्मासनामध्ये, पद्मासन घालून, आपले हात पाठीच्या मागून नेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे हाताने पकडायचे असतात. अशा वेळी हात मोकळे नसतांना धनुष्य बाण कसे धरणार? तसेंच अशा अवस्थेमध्ये, सीतेला डाव्या मांडीवर कसे घेणार? या विषयी काही खुलासा कुठे मिळतो का याचा शोध घेत आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथे श्रीरामाची मूर्ती, डाव्या मांडीवर सीता बसलेली, अशी आहे. इतर कुठे अशी मूर्ति दिसत नाही.)  

आणि डाव्या बाजूला बसलेल्या सीतेच्या मुख कमलाकडे कडे ‘मिलल्लोचनं’ म्हणजे ज्याचे डोळे खिळले आहेत. आणि डोळे कसे, तर ‘नीरदाभं’ म्हणजे पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांसारखे.main qimg 1d5b1752eb85adc08b2b37b63a0bc565 pjlq नाना+ अलंकार +दीप्तं म्हणजे विविध अलंकारांनी दीप्त झालेला; दधतम् म्हणजे  धारण करीत असलेला, काय? तर ‘उरु जटा’ उरु म्हणजे मांड्या. ‘उरु जटामंडनं’ म्हणजे मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांनी मंडित झालेला असा तो रामचंद्र. या ठिकाणी ‘जटामंडलं’ असेही काही ठिकाणी पाहण्यात येते. ‘जटामंडलं’ असा शब्द घेतल्यास  ज्याच्या भोवती मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांचे ‘मंडल’ आहे असा घेता येतो. मला व्यक्तिशः ‘जटामंडनं’ अधिक योग्य वाटते.

रामरक्षेला सुरुवात करतांना डोळे मिटून, अशा प्रकारे श्रीरामाचे रूप डोळ्यासमोर आणल्या नंतर, भाव समाधि लागणार नाही तर काय!  या इथे ‘ध्यान’ समाप्ति होते. ‘इति ध्यानम्.’    …..

क्रमशः 

पुढील येणारे भाग अवश्य वाचा, आणि सर्वात शेवटी येणाऱ्या भागात दिले जाणारे पीडीएफ डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा.

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- bhag 2 

 

 

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1